२६ नोव्हेंबर २०१३
सकाळी मक्ताल येथून गाडीने निघालो.
सकाळची सुप्रसन्न वेळ....
झुंजुमुंजु होऊ लागले होते.
अजून सुर्योदय व्हायचा होता.
गाड्या वल्लभपूरला आल्या.
गाडीतून उतरल्यावर समोरच शांत, संथ कृष्णामाईचे दर्शंन…!!!
आणि पाण्यात हरगोल/बुट्ट्या दिसत होत्या. यातूनच आम्ही कुरवपूरला जाणार होतो.
झुंजुमुंजु होऊ लागले होते.
अजून सुर्योदय व्हायचा होता.
गाड्या वल्लभपूरला आल्या.
गाडीतून उतरल्यावर समोरच शांत, संथ कृष्णामाईचे दर्शंन…!!!
आणि पाण्यात हरगोल/बुट्ट्या दिसत होत्या. यातूनच आम्ही कुरवपूरला जाणार होतो.
हरगोल म्हणजे चटईची टोपलीच असते.
यात टायर ठेवला होता.
त्यावर बसून आमचा या
तिरावरून त्या तिराकडे प्रवास सुरू झाला.
एका बुट्टीत सात ते आठ जण बसतात.
पाचसात मिनिटातच आम्ही कुरवपूरला पोहोचलो.
पाचसात मिनिटातच आम्ही कुरवपूरला पोहोचलो.
जात असतांना सुंदर असा सुर्योदय होत होता
आम्ही गजर करत श्लोक म्हणत
दत्तनामावली ऐकत कुरवपूरला आलो.
आमचा अंजी नावाचा नावाडी होता जो लहानपणापासून हेच काम करतो.
तेथून पंधरावीस पावलांवर पाच वड एकत्र आले आहेत असे १००० वर्षापुर्वीचे वडाचे झाड
तेथून पंधरावीस पावलांवर पाच वड एकत्र आले आहेत असे १००० वर्षापुर्वीचे वडाचे झाड
आणि तेथे श्रीपाद श्रीवल्लभ ध्यान करत असत असं हे ठिकाण आहे,
तेथे आता छोटेसे श्रीपाद वल्लभ यांचे मंदीर आहे.
त्यांचे दर्शन घेतले.
तुपाचे पाच दिवे लावले.
नमस्कार करून मुख्य मंदिराकडे निघालो.
त्यांचे दर्शन घेतले.
तुपाचे पाच दिवे लावले.
नमस्कार करून मुख्य मंदिराकडे निघालो.
No comments:
Post a Comment