Sunday, 1 November 2015

साफसफाई


रविवारी केलेल्या स्वच्छतेदरम्यान
मनात आलेलं तुमच्याबरोबर शेअर करते…!!!

★हात फिरे तेथे लक्ष्मी वसे…!!!

आपणच कुठे काय ठेवलंय ते दिसतं, मग नेमक्या वेळेला ते सापडतं.
शरीराला व्यायाम घडतो.
आपलंच घर नवं नवं दिसू लागतं.
आपण आपल्या घरासाठी दिलेला वेळ सार्थकी लागतो.
जुने, नको असलेले सामान बाहेर टाकून देतो, त्यामुळे छान गोष्टी ठेवण्यासाठी मस्त जागा होते.
दिवे, ट्यूब पुसल्यामुळे घरात छान प्रकाश पडतो.
पंखे पुसल्यामुळे तर मलाच प्रसन्न वाटतं
खुर्च्या पुसल्या, चादर, उशी कव्हर बदललं की झोपतांना मस्त वाटतं.
कपड्यांच्या घड्या छान लावल्या की कोणासमोरही कपाट उघडायची वेळ आली तरी काही (लाज) वाटत नाही.
आरसा पुसला की आपणच त्यात छान दिसतो.
केर जर चांगला काढला गेला तर लादी पुसायची गरज नाही. एकदा पुसली की झालं
घराचे काने कोपरे स्वच्छ ठेवावेत/करावेत.
तेथेच कोळी, मुंग्या येतात.
★असं म्हणतात
 वास्तू पुरूष या कानाकोपऱ्यातून "तथास्तु" म्हणत फिरत असतो.
 जर ते स्वच्छ असतील तर तो आपल्याला शुभाशीर्वाद देतो.
म्हणूनच चांगलं बोलावं, मनात सुद्धा चांगले विचार आणावेत.
 कोणाचेही शुभ चिंतावे.

आणि सगळ्यात महत्त्वाचं…

आपलंच सुंदर घर पाहून आपण आनंदी होतो, 
आपण आनंदी तर आपले विचार आनंदी....
समोर दिसेल ते सुंदर दिसतं.
सुख सुख म्हणजे काय असतं आणखीन…!!!

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

माधुरी पटवर्धन:
अगं तुझंना आता मला वाटतं असं घडत असावं .......
"तुका म्हणे होय मनाशी संवाद,
आपलाची वाद आपणाशी"

   पण म्हणूनच विचाराचे मंथन घडून सद् विचारांचे नवनीत
 आम्हाला आयते मिळते आहे हेच समाधान.

•••••~•••••~•••••~•••••~•••••~•••••~•••••~•••••~•••••~•••••~•••••~•••••

No comments:

Post a Comment