आज लवकरच जाग आली. पाऊस पडत होता,
जावं की न जावं???
या विचारात दोनचार
नित्याची कामं केली, तोपर्यंत रोजची फिरायला जाण्याची वेळ झाली. पाऊस
थांबला होता, लगेच बाहेर पडले, आभाळ पूर्ण भरलेलं!!!!!
समुद्रकिनारी आले तर ....
लाटांचा आवाज, पावसाने भरलेले ढग, आणि त्याचीच छाया पाण्यावर..... पाणी
काळसर-गढूळ दिसत होतं. मरीन ड्राइव्हला लाटा किनाऱ्यावर आपटत होत्या, आणि
ते उसळून फेसाळणाऱ्या लाटा पहायला मस्त वाटलं
मस्त समुद्रदर्शन
काही लोकांच्या हातात छत्र्या होत्या. मनात विचार आला की काय उपयोग छत्रीचा समुद्रकिनारी????
इतक्या वाऱ्यात फक्त छत्री सांभाळायची तारांबळ होणार!!!!!
तर.. रेनकोट असेल तर ठीक नाहीतर भिजायचं मस्त!!!!!
आणि नसेल भिजायचं तर...
इतक्या वाऱ्यात फक्त छत्री सांभाळायची तारांबळ होणार!!!!!
तर.. रेनकोट असेल तर ठीक नाहीतर भिजायचं मस्त!!!!!
आणि नसेल भिजायचं तर...
घरातून मस्त गरम गरम चहा कॉफी घेत आनंद घ्यायचा पावसाचा!!!!!
है ना.....
(पावसाळाच आहे येणारच पाऊस कोणत्याही वेळी)
हो ना.....
No comments:
Post a Comment