Tuesday, 21 July 2015

सुप्स.....


जेवणाच्या सुरुवातीला घेतलं जातं ते सुप!!!!!
प्रचलित आहे ते टोमॅटो सुप, मिक्स व्हेज सुप, कॉर्न सुप...
यामधून आपल्या शरीरासाठी आवश्यक घटक मिळतात.
जेवढी भाजी खाऊन मिळणार नाहीत. कारण भाजी कमी खातो पण सुप एक वाटी घेतलं तर .....
पण यासंबंधी जर कोणाला बोलतांना ऐकलं तर निरनिराळ्या प्रतिक्रिया ऐकतो आपण!!!!
★ पहिल्यांदाच सुप प्यायलं तर पोटच भरतं. मला नको सुप.
खरं बघायला गेलं तर सुप प्यायलं की भूक चांगली लागते.
★ सुप ना आजारी पडलं की बरं वाटतं!
     पण तब्येत छान रहावी म्हणून सुप प्यावं.
★ हल्ली ना कसली कसली सुप्स बनवतात????
पण त्या भाज्या या निमित्ताने पोटात जातात.
     परंपरागत जेवण पद्धतीमध्ये वरण, आमटी, कढी, अळू-मेथी-पालक यांच्या पातळ भाज्या,
 टोमॅटो सार, कटाची आमटी, कैरीफणसाची कढी, चिंचेचे सार, सोलकढी किंवा
 आमटी मधे व्यंजन म्हणून भाज्या घालतो ते पण सुपाप्रमाणेच. 
फक्त ते आपण जेवणापुर्वी न घेता जेवतांना घेतो.
तसंच कडधान्याची कळणं करतो ,
मूग, कळीथ, चणे, चवळी इ. ती आवडीने प्यायली जातात.
दूधीचं सुप आवडीने पिऊ शकतात.
 पण... याची भाजी किती अप्रिय असते. हो ना...
तसंच कोथिंबीर सुप पण खुप छान होतं.
तसंच या सुपबाबत.... खरंतर हे कोणीही बनवू शकतं. झटपट बनू शकतं!!!!!
★ कोकणातील माणसं आवडीने पितात ती भाताची पेज!!!! उत्तम सूप प्रकारातच येतं
(पण समज असा की ताप आला की पेज प्यायची, खरंतर रोज पेज घेतली तर उत्तम. ब्रेकफास्ट बरोबर घ्यावी की पेज)
पण सुप म्हटलं की......
गैरसमज आहेत.

No comments:

Post a Comment