Wednesday, 22 July 2015

औषधांच्या गोळ्या...


खास करून मधुमेह, रक्तदाब ज्यांना असतो, त्यांच्यासंबंधी-
कधीही मनाने कोणतेही औषध सुरु किंवा बंद करू नये. 
जी औषधे डॉक्टरांनी लिहून दिलेली असतात, त्यात आपण बदल करू नये.
★ औषधाची वेळ चुकवू नये चुकल्यास मधे जर अर्ध्यातासावर वेळ गेला असेल तर औषध घेऊ नये.

मला वाटतं, औषध घेतलं नाही वाटतं!!!!!

तर... नक्की आठवत नसेल तर परत औषध घेऊ नये.
★ रक्तदाबासाठी एकदा गोळी लागली की ती कायम घ्यावी लागते, 
त्यासाठी कोणती योग्य वेळ आहे हे डॉ. ना विचारून त्याच वेळेला घ्यावी,
 एखाद्या वेळी विसरलो तर आठवण झाल्यावर घेऊ नये.
★ एकदा गोळी सुरु झाली की आपण खाऊची गोळी खातो तशीच ती रोज खावी.
जी औषधे जेवताना किंवा जेवणानंतर घ्यायची असतील,
 ती पान वाढताना आधी ठेवावीत व मग पान वाढावे 
 ★ कोणतीही शंका मनात ठेवू नये.
 यामुळे असं झालं असेल का?
 मी असं केलं म्हणून असं झालं का????
त्यापेक्षा डॉ. ना आपल्या शंका विचाराव्यात.
कोणतीही औषधाची गोळी ही प्रत्येकाची वेगवेगळी असते.
 चालेल तुझी आत्ता!!!!
 करून घेऊ नये.
 कारण प्रत्येकाच्या गोळीची पॉवर वेगळी असते.
कुठेही जातांना अगदी मोजून गोळ्या बरोबर ठेवू नयेत,
 तर थोड्या जास्त गोळ्या व डॉक्टरांनी लिहून दिलेला कागद बरोबर ठेवावा.
तसेच डॉ. कडे जातांना सर्व बरोबर ठेवावे.
आपल्या मनात काही डॉक्टरांना विचारायचे असेल तर लिहून न्यावे,
 म्हणजे सर्व विचारलं जाईल.
आपल्याला माहिती आहे म्हणून कोणतेही औषध कोणाला सांगू नये.
 
☆☆☆☆☆☆☆☆☆☆

★★★ तरूणांनी घरातल्या प्रौढांच्या औषधाची माहिती करून घ्यावी.
किमान लक्ष ठेवावे,
हॉस्पीटल मध्ये न्यावे लागल्यास  डॉक्टर  जवळ बसलेल्यांनाच विचारतात.
डोस कसे आहेत?

No comments:

Post a Comment