Monday, 27 July 2015

पंढरपूर...!

 भूलोकीचं वैकुंठ!!!!

आज आषाढी एकादशी
     काही वर्षापुर्वी मी पंढरपूरला गेले होते. तेव्हा आम्ही मुख दर्शन घेतले होते.
आणि रखुमाईची पूजा करायला मिळाली होती हे मात्र मी आमचे भाग्य समजते
(पूजा आम्ही दोघांनी केली )
 पण.... माऊलीच्या चरणी माथा टेकवता आला नाही म्हणून रुखरुख लागली होती.
 पण....  दोन तीन वर्षांनी तो योग आला. आणि मन भरून पावले.
प्रथम नामदेवाची पायरी दर्शन!!!!
मग मुख्य मंदिरात गेलो. सोळा खांबांच मंदीर, गरूडखांब!!!

     विठूमाऊलीच्या चरणी माथा टेकवला

 आणि माऊलींकडे मी एका कोपऱ्यात उभे राहून डोळे भरून पाहत होते,
 रूप डोळ्यात साठवत होते.
 माऊलींची दृष्टी लाघवी आहे.
 हात कमरेवर आहेत.
 मकर कुंडले तळपत होती.

 " माऊली, माऊली" अशी हाक मारली.

तेथील पुजारी म्हणाले.... ताई तुम्हाला किती वेळ उभं रहायचं असेल तेवढा वेळ उभं राहून दर्शन घ्या.....
माझा आनंद गगनात मावेना!
      मी शांतपणे गाभाऱ्यात, एका कोपऱ्यात उभं राहून दर्शन घेत होते. 
अगदी देहाचे डोळे करून ते सुंदर रुप पाहत होते.
मग संपूर्ण मंदिर बघितलं.

खुप खुप खुपच छान अनुभव आहे हा!!!!! 

खरंतर हा अनुभव अनुभवायचा आहे.
 तो शब्दात वर्णन करता येण्यासारखा नाही.
पांडुरंगासमोर लीन होतांना कान पकडून तीन उड्या मारल्या. (वारकऱ्यांप्रमाणे)
विट्+ठल (स्थल)
विटेवर उभा असलेला. तो विठ्ठल!!!
पांडुरंग या नावावरून तर पंढरपुर हे नाव झालं असेल का?

विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल…

Sunday, 26 July 2015

येऊर चा डोंगर...


     अहाहा..... किती सुंदर हिरवाई!!!!! 
अधुन मधुन पडणारा पाऊस,
डोंगर हिरव्या गर्द झाडांनी भरलेला.
आम्ही या डोंगराला तेराव्या मजल्यावरून बघत होतो,
 आणि ही इमारत डोंगराला अगदी जवळ आहे,
 त्यामुळे अगदी नजरेच्या टप्प्यात.
हा भाग टिकुजीनी वाडीच्या येथे आहे.
छान धबधबा पहायला मिळाला!
त्याच्या खाली तलाव,
हिरव्या झाडांमुळे पाणी पण हिरवं भासतंय!!
पावसाचं पाणी पिऊन पिऊन झाडे हिरवी गर्द भासतात बहुतेक!!!
थोडं वर बघितलं तर एक मचाण दिसलं!!!
उत्तम निसर्ग सौंदर्य!!!!!
अगदी तेथून हलु नये असं वाटत होतं!
आणि खाली आल्यावर असं वाटलं की जावं या डोगरावर!!!!!
(निसर्गाच्या कुशीत)
बोरीवली भागात वाघ दिसतात (संजय गांधी राष्ट्रीय उद्यान)
 पण ठाण्याकडील भागात अजुन तरी वाघ दिसला नाही
 मात्र माकडं दिसतात. असं समजलं!

Saturday, 25 July 2015

अस्तिक... काळभैरव!!!

रात्री काळभैरवाची आठवण करतात
आणि म्हणतात....
★ पड पड कुडी धरणीवरी
धरणीमाता कृपा करी
अस्तिक अस्तिक
काळभैरव दंडपाणी
कफल्लक कफल्लक कफल्लक
अस्तिक अस्तिक काळभैरव दंडपाणी
माझ्या पाठीमागुन येईल त्याला
अस्तिक ऋषींची शप्पथ शप्पथ शप्पथ!!
        ।।श्रीगुरूदेव दत्त।।
        ।।श्रीगुरूदेव दत्त।।
        ।।श्रीगुरूदेव दत्त।।



* अस्ति कस्ति काळभैरवाची दुही...
पड पड कुडी
गंगाभागीरथी च्या तिरी
गया गमन प्रयागी मरण
काशिविश्वेश्वरा दाखवी तुझे चरण!

★पडपड कुडी धरणीवरी
गंगा भागीरथीच्या तिरी
गयाके गमन
काशीविश्वेश्वरा नित्य तुझे स्मरण
अास्तिक अास्तिकअास्तिक !!
काळभैरव काळभैरव काळभैरव!!
 दंडपाणी दंडपाणी दंडपाणी!!!
कफल्लक कफल्लक कफल्लक






Thursday, 23 July 2015

गुलबक्षी....


सुंदर, नाजुक,

संध्याकाळी उमलणारी ही फुलं!!!

 म्हणूनच हिला सायंकाळ हे सुद्धा नाव आहे
किती सुंदर सुंदर रंगात असतात गुलबक्षीची फुलं!
फिका गुलाबी, गडद गुलाबी (याचचं नाव मी गलुबक्षी रंगअसं ठेवलंय),
 पिवळा, पांढरा, आणि काही फुलं तर पिवळ्या फुलात एखादीच रेघ गडद गुलाबी,
 गडद गुलाबी मधे पांढरी रेघ, पांढऱ्या फुलात गडद गुलाबी रेघ.... अशी विविधता आढळते.
 विविध रंगांच्या बिया एकत्रित करून एकत्र झाड बनले तर
 प्रत्येक फांदीला वेगळ्या रंगाचे फुल फुललेले दिसते.
याची पानं पसरट, मऊ असतात,





 पानांचा रंग छान हिरवा असतो.
याचं रोप आपोआप येतं,
याच्या बिया काळ्या मिरी किंवा पपईच्या बी प्रमाणे दिसतात.
( काळ्या रंगांच्या असतात.)
मला वाटतं या बिया वाळल्या की वाऱ्याने उडतात व रोप येते.
 फुलाखालीच हिरव्या रंगाचं बीजांड असतं
त्याचीच बी बनते.
या फुलांची वेणी हार करतात,
ही वेणी करणं ही एक कला आहे.
 ती करण्यासाठी सुईदोरा लागत नाही.

फुलंच एकमेकांत गुंफुन मस्त वेणी बनवतात.

  संध्याकाळी देवदिवा लावल्यानंतर हा फुलांचा हार  देवाला वाहिला की खूप सुंदर वाटतं.

आमच्याकडे मात्र फिक्या गुलाबी रंगांची फुले येतात.
 कोणत्याही रंगाच्या फुलांचं बी कुंडीत घातलं तरी
 फुलं येतांना मात्र फिकि गुलाबी येतात.






Wednesday, 22 July 2015

औषधांच्या गोळ्या...


खास करून मधुमेह, रक्तदाब ज्यांना असतो, त्यांच्यासंबंधी-
कधीही मनाने कोणतेही औषध सुरु किंवा बंद करू नये. 
जी औषधे डॉक्टरांनी लिहून दिलेली असतात, त्यात आपण बदल करू नये.
★ औषधाची वेळ चुकवू नये चुकल्यास मधे जर अर्ध्यातासावर वेळ गेला असेल तर औषध घेऊ नये.

मला वाटतं, औषध घेतलं नाही वाटतं!!!!!

तर... नक्की आठवत नसेल तर परत औषध घेऊ नये.
★ रक्तदाबासाठी एकदा गोळी लागली की ती कायम घ्यावी लागते, 
त्यासाठी कोणती योग्य वेळ आहे हे डॉ. ना विचारून त्याच वेळेला घ्यावी,
 एखाद्या वेळी विसरलो तर आठवण झाल्यावर घेऊ नये.
★ एकदा गोळी सुरु झाली की आपण खाऊची गोळी खातो तशीच ती रोज खावी.
जी औषधे जेवताना किंवा जेवणानंतर घ्यायची असतील,
 ती पान वाढताना आधी ठेवावीत व मग पान वाढावे 
 ★ कोणतीही शंका मनात ठेवू नये.
 यामुळे असं झालं असेल का?
 मी असं केलं म्हणून असं झालं का????
त्यापेक्षा डॉ. ना आपल्या शंका विचाराव्यात.
कोणतीही औषधाची गोळी ही प्रत्येकाची वेगवेगळी असते.
 चालेल तुझी आत्ता!!!!
 करून घेऊ नये.
 कारण प्रत्येकाच्या गोळीची पॉवर वेगळी असते.
कुठेही जातांना अगदी मोजून गोळ्या बरोबर ठेवू नयेत,
 तर थोड्या जास्त गोळ्या व डॉक्टरांनी लिहून दिलेला कागद बरोबर ठेवावा.
तसेच डॉ. कडे जातांना सर्व बरोबर ठेवावे.
आपल्या मनात काही डॉक्टरांना विचारायचे असेल तर लिहून न्यावे,
 म्हणजे सर्व विचारलं जाईल.
आपल्याला माहिती आहे म्हणून कोणतेही औषध कोणाला सांगू नये.
 
☆☆☆☆☆☆☆☆☆☆

★★★ तरूणांनी घरातल्या प्रौढांच्या औषधाची माहिती करून घ्यावी.
किमान लक्ष ठेवावे,
हॉस्पीटल मध्ये न्यावे लागल्यास  डॉक्टर  जवळ बसलेल्यांनाच विचारतात.
डोस कसे आहेत?

Tuesday, 21 July 2015

सुप्स.....


जेवणाच्या सुरुवातीला घेतलं जातं ते सुप!!!!!
प्रचलित आहे ते टोमॅटो सुप, मिक्स व्हेज सुप, कॉर्न सुप...
यामधून आपल्या शरीरासाठी आवश्यक घटक मिळतात.
जेवढी भाजी खाऊन मिळणार नाहीत. कारण भाजी कमी खातो पण सुप एक वाटी घेतलं तर .....
पण यासंबंधी जर कोणाला बोलतांना ऐकलं तर निरनिराळ्या प्रतिक्रिया ऐकतो आपण!!!!
★ पहिल्यांदाच सुप प्यायलं तर पोटच भरतं. मला नको सुप.
खरं बघायला गेलं तर सुप प्यायलं की भूक चांगली लागते.
★ सुप ना आजारी पडलं की बरं वाटतं!
     पण तब्येत छान रहावी म्हणून सुप प्यावं.
★ हल्ली ना कसली कसली सुप्स बनवतात????
पण त्या भाज्या या निमित्ताने पोटात जातात.
     परंपरागत जेवण पद्धतीमध्ये वरण, आमटी, कढी, अळू-मेथी-पालक यांच्या पातळ भाज्या,
 टोमॅटो सार, कटाची आमटी, कैरीफणसाची कढी, चिंचेचे सार, सोलकढी किंवा
 आमटी मधे व्यंजन म्हणून भाज्या घालतो ते पण सुपाप्रमाणेच. 
फक्त ते आपण जेवणापुर्वी न घेता जेवतांना घेतो.
तसंच कडधान्याची कळणं करतो ,
मूग, कळीथ, चणे, चवळी इ. ती आवडीने प्यायली जातात.
दूधीचं सुप आवडीने पिऊ शकतात.
 पण... याची भाजी किती अप्रिय असते. हो ना...
तसंच कोथिंबीर सुप पण खुप छान होतं.
तसंच या सुपबाबत.... खरंतर हे कोणीही बनवू शकतं. झटपट बनू शकतं!!!!!
★ कोकणातील माणसं आवडीने पितात ती भाताची पेज!!!! उत्तम सूप प्रकारातच येतं
(पण समज असा की ताप आला की पेज प्यायची, खरंतर रोज पेज घेतली तर उत्तम. ब्रेकफास्ट बरोबर घ्यावी की पेज)
पण सुप म्हटलं की......
गैरसमज आहेत.

आज २१ जुलै.....


आंतरराष्ट्रीय योगदिन झाला त्याला एक महिना झाला.
करतोय आपण काही ना काही!!!!
 हो ना....
* दीर्घ श्वसन
* सकाळी आळस देणे
* पी.टी. करणे.
* चालायला जाणे
* आपण घेत असलेल्या श्वासाकडे काही क्षण लक्ष देणे.
* जेवण झाल्यावर काही मिनिट वज्रासनात बसणे.
* भजन लावून टाळ्या वाजवणे, तालावर डोलणे.
* गाण्याचा रियाझ, यासाठी ॐ म्हटला जातो.
* ध्यान लावणे.
( कठीण आहे पण सरावाने जमू शकतं)
अगदी काही क्षणापासुन सुरूवात करू शकतो.
ही आणि अशी विविधता असेल तर योगा आनंदाने होईल.
हो ना!!!!!
तुम्ही काय करता सांगा हं

Wednesday, 15 July 2015

गूळ

★  गूळ  :-

१. हल्ली गूळ पावडर मिळते तर तूप गूळ करतांना सोपे होतेे.
२. पण खीर करतांना, खीर थंड झाली की ही पावडर घालावी
३. गूळ नवा असतो तेव्हा तो खारट असतो, तोच जुना असेल तर त्याचा खारटपणा कमी होतं.
४. कोणी आल्यानंतर आपण गूळपाणी देतो. कारण गुळामधे आयर्न, कॅलशिअम मिळते, आपल्याला घाम आलेले असतो थकवा आलेला असतो तो निघून जातो.
५. ऑरगॅनिक गुळाच्या अगदी छोट्या ढेप मिळतात
याचा उपयोग पूजेच्या वेळी गूळ खोबऱ्याचा नेवैद्य दाखवतो त्यावेळी वापरता येईल. नुसतं पाणी देतांना ही छोटी ढेप देता येईल.
६. खोकला झाला असेल तर गूळ हळद गोळी करावी व दिवसात चारपाच वेळा खावी.
७. गूळ बनवतांना काकवी बनवतात ती काही लोक आवडीने पितात.
८. गूळ-दाणे आवडीने खाल्ले जातात.
९. विविध प्रकारची चिक्की आवडीने खाल्ली जाते.
१०. श्रावणात हळदीकुंकू केलं जातं तेव्हा चणे-गूळ दिले जातात.
११. गाईला चणाडाळ व गूळ खाऊ घालतात.

Tuesday, 14 July 2015

स्वयंपाक घरातून....

स्वयंपाक घरातून....

१] दोडक्याची भाजी करतांना, दोडक्याची साल त्यात तिखट मीठ घालून मिक्सर मधे वाटून घ्यावे व ते भाजीला घालावे, म्हणजे दाण्याचं कूट व खोबरं घालावं लागत नाही.
२] पडवळाच्या बिया मिक्रमधे वाटून त्या तांदुळाच्या पिठात घालावे व घावन करावेत म्हणजे घालन चुरचुरीत होतात.
३] थालिपीठ करतांना त्यात आमटी, वरण असेल तर ते घालावे. म्हणजे एक वेगळी टेस्ट येते व ती खुसखुशीत होतात.
४] ड्रायफ्रुट लाडू करतांना खजूर घालावा व त्यात तूप घातले तर लाडू वळणे सोपे होतेे.
५] कुकरची शिटी झाल्यावर एखादे छोटे पातेले पाणी घालून  झाकणावर ठेवावे म्हणजे पाणी गरम होते आणि ते गरम पाणी हात पुसायचा रुमाल, किंवा
तेलकट-तुपकट भांडे धुण्यासाठी होतो.
६] कांदा चिरतांना डोळ्यातून पाणी येते ते येऊ नये म्हणून
दातात सेफ्टी पीन पकडावी पाणी येत नाही डोळ्यातून. तसेच एक लसूण सोलून बाजूला ठेवावी यामुळे डोळ्यातून पाणी येतं नाही.

(डोळ्यातून पाणी येणं चांगलं, कारण यानिमित्ताने डोळे स्वच्छ होतात.)

**********************************************

Monday, 13 July 2015

समज गमती गमतीतला

शवासन!!!

मला सर्वात कोणतं आसन आवडतं माहिती आहे?
शवासन.
मस्त झोपायचं.....
असं अनेक लोक गमतीने म्हणतांना आपण ऐकतो.

तर बघू काय आहे शवासन!

* आसनं केल्यानंतर शरीराला व मनाला यामुळे विश्रांती मिळते.
* शरीराकडे, प्रत्येक भागाकडे आपण लक्ष देतो, अगदी पायाच्या बोटाच्या टोकापासून ते डोक्यापर्यंत!!
* एरव्ही श्वास आपोआप घेतो पण शवासनात लक्षपुर्वक श्वासाकडे लक्ष देतो.
* अगदी कानाचा मागील भाग पुढील भाग कानाचे स्नायू इतक्या बारकाईने शरीराच्या भागाकडे बघतो.
* डोळ्याच्या पापण्या अलगद मिटलेल्या, दातांमध्ये किंचित अंतर...इतकं बारकाईने बघतो आपण.
* तसंच ॐकारचा उच्चार करतो.
* नजरेसमोर निळेभोर आकाश आणून त्यात ॐ बघण्याचा प्रयत्न करतो.
तर असं हे शवासन!!!!!
जागतिक योगदिनाच्या निमित्ताने सगळे आसनं, प्राणायाम, मॉर्निंग वॉक काही ना काही करताय
 तर यापैकी काहीही केल्यानंतर शवासन आवश्यक!!!!!

निदान १० मिनिटे तरी!!!!!

असं का ?????


कित्येक वस्तुंबाबत असं घडतं!!!
* चष्मा पुसण्यासाठी एक द्रव देतात आणि मऊ कापड. 
आपण ते वापरतो की नीट कपाटात जपून ठेवतो???
(आणि चष्मा पुसत नाही).
* मिक्सर, ज्यूसर, टोस्टर, ग्रिलर इ.चा वापर करतो आणि काम झालं की परत खोक्यात ठेवतो??
(परत खोक्यात ठेवण्यापेक्षा नजरेसमोर असतील तर त्याचा वापर नेहमी करतो).


* हौशीने व्हॅक्यूम क्लिनर घेतो आणि तो खोक्यात ठेवुन तो खोका कपाटावर, माळ्यावर ठेवतो.
 पण.…
तोच जर केरसुणीसारखा दारामागे ठेवला तर....


* डिनर सेट आणला आणि तो खोक्यात ठेवला तर.....
वापरला जाणार नाही
* काचेचे सेट हौशीने आणतो आणि..... फुटतील म्हणून वापरले नाहीत तर.....
नुसतीच आणण्याची हौस होईल, पण वापरण्याची हौस होणार नाही...

असंच आपण काही करतो का???
सांगा हं......

Saturday, 11 July 2015

।आज कमला एकादशी।

ॐ नमो भगवते वासुदेवाय।

         नमस्कार
     
आषाढ अधिक मास
।आज कमला एकादशी।
या महिन्याचा स्वामी मुरलीधर श्रीकृष्ण, भगवान विष्णू पुरूषोत्तम....    
    अधिक महिन्यात भगवान विष्णुची पूजा अर्चा, दानधर्माचे विशेष महत्त्व आहे.
     विष्णूपूजा करून तुळस अर्पण करावी.
तर.... मनात आलं की आज विष्णूसहस्त्रनाम म्हणून श्रीकृष्णाला १००० तुळशीपत्रे वहावीत.
कालच तुळशी आणल्या होत्या सकाळी देवांची पुजा झाल्यावर विष्णूसहस्त्रनाम म्हटले ...
सुरूवात करताना प्रथम...
अथ ध्यानम्
शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं।
विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगम्।।
लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं।
वंदे विष्णू भवभयहरं सर्वलोकैकनाथम्।।

।। इति ध्यानम् ।।
अथ श्रीविष्णूसहस्त्र नामावलीः
।। श्री गणेशाय नमः ।।
१. ॐ विश्वस्मै नमः
२. ॐ विष्णवे नमः
३. ॐ वषट्काराय नमः
४. ॐ भतभव्यभवत्प्रभवे नमः
५. ॐ भूतकृते नमः......
........
........
९९७ ॐ गदाधराय नमः
९९८.ॐ रथांगपाणये नमः
९९९.ॐ अक्षोभ्याय नमः
१०००.ॐ सर्वप्रहरणायुधाय
           नमः।
इति श्रीमन्महाभारतस्य अनुशासनपर्वणि
 भीष्मयुधिष्ठिर संवादानुसारिणी
 श्रीविष्णोर्दिव्यसहस्त्र नामावलिः समाप्त।।

प्रत्येक नाम घेतांना तुळस अर्पण केली श्रीकृष्णाला.

खुप छान प्रसन्न वाटलं.
देवाचं करतांना- रांगोळी काढली, ताजी फुले, तेवणारा दिवा,
 सकाळची प्रसन्न वेळ, कोणतीही घाई गडबड नाही आणि 

 मुखी भगवंताचे नाम!!!!!!

किती छान प्रसन्न वाटतं!!!

() () () () () () () () () () () () () () () () () () () ()

Friday, 10 July 2015

रस्त्यांची ओळख.....


सुप्रसिध्द व्यक्तींच्या नावाने रस्त्यांची ओळख असते.
फिरायला जातांना या पाट्या दिसतात.
यातील पहिली पाटी...
अगमोध्धारक आचार्य
श्री.आनंद सागर सुरीजी महाराज चौक
तर हे कोण??? त्यांचे कार्य..
ही माहिती लिहिलेला फलक लावला तर????
एका खास आदराने या फलकाकडे बघितले जाईल.
आता मी तरी या पाटीकडे संभ्रमात बघते.
तसंच दुसरे.....
"पद्मभूषण"
डॉ. श्रीकृष्ण नारायण रातंजनकर चौक.
यांच्याबद्दल सुध्दा त्यांच्या बद्दलच्या माहितीचा फलक असता तर ....
असा विचार माझ्या मनात नेहमी येतो.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Wednesday, 8 July 2015

नाबाद १००


     बघता बघता १०० लिखाणं झाली की...!!!!

रोज तुम्ही माझ्याबरोबर मॉर्निंग वॉकला येताय, अगदी न कंटाळता.....!!
त्यामुळे आज १०० लिखाणं, छोटी छोटी पूर्ण केली.
 दररोज आपला छान संवाद होतोय, विचारांची मस्त देवाणघेवाण होत आहे.
* मे महिना सुरू झाला आणि आता तु पाठवलेलं शांतपणे वाचता येईल!!!
* आज काही लिहिलं नाहीस का?
* पावसाळा सुरू झाला की लिहिणार की नाही, पण आम्हाला पाठवच तू लिहिलेलं!!!!
* तु लिहिलेलं अगदी नजरेसमोर उभं राहिलं.
* चित्रकार असेल तर त्याने हुबेहुब चित्र काढलं असतं हे वर्णन वाचून!!!!
* तुझं लिखाण पेपरमधे छापून येईल..
माझे तुला आशीर्वाद आहेत!!!!
* प्रार्थना तर तूच म्हणतेस असं वाटलं!
* तू छान लिहितेस गं!!!
* खरंच का गं तुला मोर दिसला मुंबईत की मनातलं लिहितेस???
* छान छान!!!
वॉकच्या निमित्ताने नाचणारा मोर, गाणारी कोकीळा, झोपाळा.... मज्जा आहे तुझी!!!!
* अरे व्वा!!! आता तुझं लिखाण निसर्गाकडून व्यक्तींकडे, मग प्रवासवर्णन पण येऊ दे.
* तू लिहि , छान लिहितेस.
* काहीवेळा छान शिर्षक सुचवलंत.
* आज काय असेल बरं???
म्हणून whatsapp उघडतो
या आणि अशा तुमच्या प्रेमळ शब्दांनी लिहित गेले, ब्लॉगवर टाकत गेले. नवनविन मांडायचा प्रयत्न करत आहे.
यामुळे प्रत्येक गोष्ट, घटना, निसर्ग, व्यक्ती याकडे पाहण्याची दृष्टी मिळाली.
तुम्ही मला दिलेला reply इतका सुंदर असतो की त्या reply ची मी आतुरतेने वाट बघते.
योगायोगानेच सुरू झालं लिखाण!!!
५ एप्रिलला झालेलं सुरेख सूर्यदर्शन!!!!! 
आणि ते लिहिलं आणि तुम्हा सर्वांना ते आवडलं!!!!
मग सुरू झालं माझं लिखाण.

मस्त निसर्गसौंदर्याचा काळ!
      मला दोनचार जण म्हणत होते तू लिहू शकशील, लिही. पण....
योग्य वेळ यावी लागते हेच खरं!!! एखादवेळेस वही पेन घेऊन लिहिलंही नसतं कदाचित रोज. पण हातात मोबाईल आणि मराठी टाईप करता येतंय,
बरोबर तुम्ही सगळे मग सुरू झालंय लिखाण.

Tuesday, 7 July 2015

चष्मा एक दागिना!!!!


आज फिरायला बाहेर पडले. मस्त थंड वारा, देवळाजवळ गाय वासरू, नागचाफ्याची फुलं, पहात पहात नानाचौकात आले, आणि लक्षात आलं, अरे आपण चष्मा लावायला विसरलोय!!
    जाऊ दे, अडत नाही, दिसतंय की चष्मा नसला तरी!!!
मग मनात आलं चला आज चष्म्याबद्दलच बोलू या!!!!
    चष्मा हा एक मस्त रोज रोज नेहमी नेहमी वापरण्यात येणारा सुंदर दागिना आहे.

हल्ली कित्ती कित्ती सुंदर चष्मे बनवून मिळतात.
यामुळे आपले सौंदर्य खुलुन येते.
* आपला चष्मा दिवसातून दोनवेळा मऊ कापडाने पुसावा.
* चष्मा ही शोधाशोध करण्याची गोष्ट होऊ नये म्हणून तो गळ्यात अडकवावा.
(हल्ली खुप छान छान माळा,चेन्स मिळतात.)

चष्म्याची शोधाशोध झाली तर असं वाटतं की त्याला पण रिंग देता आली तर.... पटकन सापडेल.

* रात्री झोपतांना चष्मा ठराविक जागीच ठेवावा, म्हणजे सकाळी लगेच लावला जाईल.
* चष्मा योग्य पद्धतीने ठेवावा म्हणजे काचेवर चरे पडणार नाहीत.
* एकमेकांचा चष्मा वापरू नये. कारण ....
प्रत्येकाचा नंबर वेगळा असतो.
काही नाही चालेल,
दिसतंय मला असं वागू नये.
चेहऱ्याचा आकार वेगळा असतो, त्यामुळे तो सैल होऊ शकतो.

* जर चष्मा लावल्यावर सैल वाटत असेल तर 
तो लगेच चेहऱ्याला योग्य बसेल असा करून आणावा, तसाच सैल चष्मा वापरू नये.

* आपल्याला चष्मा आहे आणि तो सापडत नाही तर....

तसाच TV बघू नये.
पेपर वाचन करू नये
कारण डोळ्यांवर ताण येतो, नंबर वाढतो
.
(एकदा केलं तर काय झालं???? तर मग ती सवयच लागते .)
* एक चष्मा कामाच्या ठिकाणी ठेवावा,
 व एक डोळ्यांना कायम लावावा.
* कोणाकडे गेल्यावर आठवणीने मोबाईल घेतला आहे ना हे बघतो तसं
 चष्मा विसरत नाही ना??? हे बघावे.
* घाम , पावसाचे पाणी,  यामुळे काहीवेळा समोरची व्यक्ती ओळखता येत नाही मग गैरसमज होतो,
 तर नेहमी जवळच्या व्यक्तींना सांगावे की नीट दिसत नाही काहीवेळा तर तुम्हीच मला हाक मारा.
* एसी गाडीतून उतरल्यावर चष्म्याच्या काचेवर बाष्प जमा होते, 
तर ते नीट पुसुन चालायला सुरुवात करावी म्हणजे धडपडायला होणार नाही.

* एकदा आपल्याला चष्मा लागला आहे हे कळल्यावर..

तो लावण्याची टाळाटाळ करू नये म्हणजे....
वाचन होईल
नंबर वाढणार नाही
डोळ्यांना ताण येणार नाही.

गाय....

गाय....

     सकाळी फिरायला जातांना आणि फिरून येतांना असं दोनही वेळेला
दोन- तीन गायी आणि मागून भैय्या असं नेहमी दिसतं.
 मग लक्षात आलं की देवळाजवळ गायवाली असते ना ती या गायी घेऊन बसते.
आणि आपण तिला चारा, लाडू जे गायवालीने बनवलेले असतात ते खाऊ घालतो.
     तर......  गायीचे डोळे नीट बघितले आहेत का निरखून ? 
 डोळे पाणीदार असतातच पण
वात्सल्य, प्रेम, माया असे भाव कायम तिच्या डोळ्यात दिसतात.

     चातुर्मासात गोपद्म व्रत करतात. चार महिने रोज ३३ गोपद्म देवासमोर काढतात. 
असं ५ वर्ष नविन लग्न झालेल्या स्त्रिया व्रत करतात.
     संस्कार भारती या रांगोळी प्रकारात गोपद्माला महत्वपूर्ण स्थान आहे.
 चैत्रांगणात, दररोज देवासमोर, उंबरठ्यावर काढल्या जाणाऱ्या रांगोळीत गोपद्म काढलं जातं.
     धार्मिक कार्यात गोदानाला खुप महत्व आहे. तसेच गायीसाठी गोग्रास ठेवतात.
     देव्हाऱ्यात गाईच्या मुर्तीची पूजा केली जाते.
     मूळ नक्षत्रावर बाळाचा जन्म झाला तर
     बाळाला सूपात ठेवून गायीकडून बाळाला स्पर्श किंवा चाटवले जाते.
     दिवाळीचा पहिला दिवस वसूबारस!!!!!
     गाय-वासराची पूजा करून गोड पदार्थाचा नेवैद्य दाखवतात.


     एखादी स्त्री सहनशील असेल तर गरीब गाय आहे !!! असं म्हणतात.

     गायीला गोमाता म्हणतात.

(म्हशीचं दूध रोज आपण वापरतो पण तिला मावशी पण म्हणत नाहीत)
     हिंदू धर्मात गायीला आपण देव मानतो.
★ श्रीगुरूदत्तात्रेयांजवळ गाय.
★ श्रीकृष्णाला पण गाय प्रिय.
★ गायींना पाळणाऱ्यांना गोपाल म्हणतात.....
★ तिच्या  पोटात ३३ कोटी देव आहेत असं आपण मानतो.
असे अनेक विचार माझ्या मनात रोज या गायींना बघितले की येतात.

आणि या सर्व छान गोष्टींचं स्मरण रोज होतं.

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::







शब्दकोडे......


पुर्वी मी शब्दकोडे सोडवत नसे.

 मला वाटायचं की वेळ जातो व डोक्याला उगाचच त्रास......
     माझी एक मैत्रीण मला म्हणाली का नाही सोडवत शब्द कोडे????
खूप छान डोक्याला चालना मिळते.
 नवे शब्द वाढतात.
विस्मृतीत गेलेले शब्द, वाक् प्रचार, म्हणी, बोधवाक्य,
 सण, ग्रामीण शब्द, संस्कृत मधील शब्द, असा शब्दांचा खजीना सापडतो.
आणि मी खरंच आता शब्द कोडे सोडवतेच आणि खुप आनंद मिळवते.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

तसंच सुडोकू बद्दल....

मला सुडोकू येत नव्हतं. फक्त पेपर मधे येतं एवढंच माहिती होतं
 मग मी ते पण शिकले आणि ते पण सोडवायला लागले.

 यातून सुद्धा खूप आनंद मिळतो.

****************************************************************

का बरं असं वागतो आपण???


* ट्रेनमधील संवाद :
काय गं कसे हे कानातले?
ताई , १० रु ला १.
मग तीन घेते, २५ रु ला देणार का ????
पण.... तेच जर दुकानात, मॉलमधे गेलो आणि
 अगदी १०० रु म्हटलं तर लगेच पैसे काढून देतो.

() () () () () () () () () () () () () () ()  () () () () () () () () () () () () () () ()

एखाद्या समारंभाला जातो.
जर सर्वसामान्य व्यक्ती असेल तर...
चालेल कमी किमतीची वस्तू दिली तरी, किंवा कमी पैसे पाकिटात भरले तरी.
पण...
जर श्रीमंत असतील तर पैसे जास्त भरतो, किंवा
 अहेर घेणार नसतील तरी घ्या, घ्या म्हणून आग्रह करतो.

[] [] [] [] [] [] [] [] [] [] [] [] [] [] [] [] [] []  [] [] [] [] [] [] [] [] [] [] [] [] [] [] [] [] [] []

आपल्या घरी अचानक घरी पाहुणे येतात.
 आपण भराभर आंबे कापतो, पाहुण्यांसमोर ठेवतो,
पण ते खात नाहीत.
का करतो आपण असं ????
त्यांनी ते आंबे खावे असं वाटत असेल तर
 आपण आंब्याची साल काढून, फोडी करून, वाटी चमचा असे जर पुढे ठेवले असते तर?????

{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}

प्रथमच आलेल्या पाहुण्यांना आपण समोर वेफर्स ठेवले तर......
ते खात नाहीत.
का बरं!!!!
आपण पण कोणाकडे प्रथमच गेल्यावर खाणार नाही.

का बरं?????
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

Saturday, 4 July 2015

अतिथी देवो भव!!!!

अतिथी देवो भव!!!!
मला वाटतं अतिथी म्हणजे तिथी न सांगता, न ठरवता आलेली व्यक्ती.
म्हणजेच अचानक आलेले पाहुणे, व्यक्ती.
आपण अतिथीचे स्वागत आनंदाने, हसतमुखाने केले पाहिजे. प्रथम पाणी दिले पाहिजे. मग चहा, कॉफी, सरबत किंवा फळं दिली पाहिजेत. मग जेवणाची वेळ असेल तर गरम जेवण आग्रहाने प्रेमाने, सुहास्यवदनाने वाढले पाहिजे
     अतिथीला पुन्हा आपल्या घरी यावेसे वाटले पाहिजे.

Friday, 3 July 2015

* प्रार्थना *

                                     * प्रार्थना *

आपल्या जीवनात प्रार्थनेला महत्वाचं स्थान आहे. लोक प्रार्थनेनंतर दैनंदिन कामाला सुरूवात करतात.
* प्रार्थना चालीत म्हटली तर मन चांगलं एकाग्र होते.
* आपण जी प्रार्थना म्हणणार आहोत त्याचा अर्थ माहित असणं महत्वाचं आहे.
* प्रत्येक धर्मात प्रार्थनेला अतिशय महत्त्व आहे.
* प्रार्थना अंतःकरणापासून, श्रद्धेने म्हटली पाहिजे.
* प्रार्थना म्हटली म्हणजे चांगले विचार येतात.
* प्रार्थनेत शब्दांपेक्षा मन गुंतलेले असणे जास्त चांगले.
* प्रार्थना म्हटल्यामुळे....
★ अंतःकरण शुद्ध होतं.
★ सद्सदविवेक बुद्धी प्राप्त होते.
★ मानसिक तणावापासून दूर जातो.

     ।। शांतीपाठ ।।

      ॐ सह नाववतु
      सह नौ भुनक्तु
      सहवीर्यं करवावहै।     
  तेजस्वीनावधितमस्तु।
      मा विद्विषावहै।।

  ॐ शातीः शांतीः शांतीः।।
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
                                     ही मी रोज म्हणते.
                                      माझी स्वतःची!!!
प्रार्थना.....
हे देवा माझं चुकत आहे त्याबद्दल मला क्षमा कर आणि मला योग्य मार्गाने चालव.
★ तुझे गोड नाव अखंड मुखात राहू दे. शेवट जे सुटेल ते तुझे नावच असुदे.
★ सर्वांचं चांगलं कर !!!!!
ंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंं
ही पेपरमधे आली होती, त्यात काही माझी वाक्य आहेत.
(४ मे २०१५ संध्यानंद)
प्रार्थना.....
देवा मला चांगली बुद्धी दे !
अशी आपली प्रार्थनेची लहान वयात ओळख होते.

मग शाळेत आपण तालासुरात प्रार्थना म्हणतो. ती छान पाठ पण होते.
     प्रार्थना हे नम्रतेचं दुसरं रुप आहे. आपण त्रासात असलो, दुःखात असलो की देवाजवळ प्रार्थना करतो.
     काहीवेळा समोर उभ्या राहिलेल्या परिस्थितीला सामोरं कसं जायचं हे कळत नाही, काही मार्ग दिसत नाही, सुचत नाही, अशावेळी आपल्यापेक्षा अधिक जाणून घेणारा, सर्व ज्ञानी असलेला, असलेली परिस्थिती बदलू शकणारा, आपलं शांतपणे ऐकून घेणारा तो देव, त्याच्याकडे आपण प्रार्थना करतो.
★ मनापासून नम्र होणं ही शिकवण आपल्याला प्रार्थना देते, प्रार्थनेतून आपल्याला उर्जा मिळते.
प्रार्थना म्हणजे आत्मशोधाचा  आत्मचिंतनाचा एक मार्ग आहे. प्रार्थनेतून देवाची नुसती स्तुती करण्यापेक्षा या चैतन्याशी संवाद साधता आला पाहिजे.
★ आज सगळे घाईत आहेत. जर थोडा शांतपणा, ठेहराव हवा असेल तर तो आपल्याला प्रार्थनेतून मिळेल.
★ मनाला शांत करत नेणं, जीवन डोळसपणे जगण्याकडे जाणं, समृध्द होत राहणं, सकारात्मक होत राहणं आणि त्यातून साकारणाऱ्या जगण्याला अनुभवत राहणं....
सर्वे पि सुखिनः सन्तू।
सर्वे सन्तु निरामयाः
सर्वे भद्राणि पश्यन्तु।
मा कश्चित् दुःखमाप्नुयात् ।।

ॐ शांतिः शांतिः शांतिः ।।

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
मी ही वाचलेली प्रार्थना

हे ईश्वरा....

सर्वांना चांगली बुद्धी दे,
आरोग्य दे.
सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव.
सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि
तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.....
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

              
                 

Thursday, 2 July 2015

आजचे समुद्रदर्शन

सुप्रभात.....

पाण्याचा रंग सांग बाई सांग
     घडेल ज्याचा संग,
          त्यातच दंग

   आजचे समुद्रदर्शन

समुद्रावर पावसाच्या ढगाची छाया पडली होती, ढग एकदम दाट होते. त्यामुळे पाणी मातकट गढूळ दिसत होते तरीही ते संथ शांत दिसत होते. पुढे आले तर पावसाळी ढग रस्त्यापर्यंत आला होता आणि कोणीतरी वरून पाणी टाकावे असे सात-आठ मोठे थेंब खाली आले, या थेंबाचं चित्र जमिनीवर मात्र खरंच नाणं मोठं कसं दिसेल तसं दिसत होतं आणि समुद्राचं पाणी मात्र छान स्वच्छ निळं!!!! कारण आता समुद्रावर अजिबातच काळे ढग नव्हते
     स्टेशनकडे वळतांना मात्र सुर्यदेवांचे दर्शन झाले पण..
खूप प्रकाशमान!!!! बघता येत नव्हते. तरी सुर्याला वंदन केले. आणि जिनखान्यांच्या बाजुने झाडाझाडातून मात्र सुंदर दर्शन झाले.
रेल्वेत बसल्यावर सुद्धा झाडातून त्याची किरण रेल्वे डब्यात येत होती. आणि सुर्याकडे बघता पण येत होते
*********************************************************************

बस,रेल्वे...


आज सगळं कालच्या प्रमाणेच!
 सूर्यदर्शन नाही झालं. पण वाऱ्याच्या झुळका मात्र मस्त येत होत्या.
रेल्वे...... येतांना मी रेल्वेने येते, जर मरीनलाइन्स ला चढले तर प्लॅटफॉर्म खाली आहे, गाडी उंच वाटते, त्यामानाने चर्नीरोड स्टेशनची बरी आहे उंची प्लॅटफॉर्म ची. 
आणि ग्रँटरोडचा प्लॅटफॉर्म खाली आहे. मस्त वाटतं उतरतांना!!!!!
उतरल्यानंतर कितीतरी लोक धावत गाडी पकडतात, चालू गाडी पकडतात.
मग उगाचच आपलं बीपी. वाढतं. मी काय करते अशांकडे लक्ष देऊ नये म्हणून सरळ डोळे मिटून उभी राहते. गाडी जाईपर्यंत
म्हणजे काही क्षण!!!! घरातून लवकर निघावं किंवा मागून येणारी गाडी पकडावी
पण..... काय होईल याची कल्पना असूनही असंच वागतात....
असंच शाळा सुटतात ना, त्यावेळी बस स्टॉपवर होतं.
आता मुलंच ती हुल्लडबाजी करतात. काही सांगितलं तर ती ऐकत नाहीत, ऐकण्याच्या मनःस्थितीत नसतात.
मग आपण कशाला त्रास करून घ्यायचा?????
है ना!!!