Friday, 1 May 2015

प्रति बालाजी


     हे मंदिर सातारा रोड येथे आहे. पुन्हा पुन्हा जावं असं वाटतं , असं हे मंदिर.
     या मंदिरात मी वेगवेगळ्या वेळी गेले आहे. अगदी सकाळी, भरदुपारी- पाय अक्षरशः पोळले होते, संध्याकाळी- मस्त दिव्यांची रोषणाई केली होती.

     तर.....  सुरेख होणारं बालाजीचं दर्शन  .....  म्हणूनच पुन्हा पुन्हा जावंसं वाटतं.

     नेटकी व्यवस्था, उत्तम स्वच्छता, घाई-गडबड, गोंधळ अजिबातच नाही. शांत, उत्तम निसर्ग सौंदर्याने नटलेला परिसर मनाला आनंद देऊन जातो. येथे प्रसाद द्रोणात देतात. पण जर प्रसाद थोडा जरी सांडला तर तो उचलण्यासाठी लोक आहेत, जेणेकरून प्रसादाला पाय लागू नये.
     येथे आपणही गेला असाल आणि छान झालेल्या दर्शनाने खुष झाला असाल!!!!!
तिरूपतीलाच जाऊन दर्शन घेऊन आल्याचं समाधान नक्कीच मिळालं असेल.
हो ना!!!!!!

No comments:

Post a Comment