परवा आलोय तो भाग म्हणजे
भारताचे शेवटचे गाव...
संध्याकाळी येथील दोन गावांना भेट दिली... चालत.!
(एकूण चार गावे आहेत.)
योल आणि फ्रोल...
आमचा गाईड अली नावाचा तरुण होता...
तेथील पाण्यावर चालणारी पिठाची चक्की बघितली...
पाण्याला जबरदस्त फोर्स आहे.
सतत पाणी वाहते त्याचा आवाज येत असतो
उजव्या हाताला पाकिस्तान बॉर्डर...
त्यांची चौकी, टेहेळणी तर डाव्या हाताला आपली.!
हा गाईड भारतीय जवानांना हव्या असलेल्या वस्तू अन्नधान्य पुरवतो. (रसद)
खेचर घेऊन त्यावर सामान घेऊन जातो. सकाळी चार वाजता निघाला तर वर जाऊन खाली येण्यास संध्याकाळी 4 वाजतात.
जर काही कारणाने खेचरला इजा झाली
आणि सामान वर गेले नाही,
वाटेत सांडले तर... जवान म्हणतात ,
तू व्यवस्थित आहेस ना.!
माझी माझ्या कुटुंबाची चौकशी करतात...
पूर्वी
येथे येथील राजाची सत्ता होती
पण जेव्हा येथून पाकिस्तान जाऊन भारताने हा
भाग जिंकला
तेव्हा भारतीय जवानांनी येथील लोकांना धीर दिला,
कामाचा मोबदला
व्यवस्थित दिला.
येथे स्त्रिया घरासमोर भाजीपाला लावतात.
बार्ली, गहू यासारखी पिके घेतात, येथे सर्व लोक मुसलमान आहेत.
स्त्रिया बुरखा घालत नाहीत.
मुले मिलिटरी शाळेत जातात.
येथे एकोपा आहे.
या गावात एक सामूहिक रगडा आहे
एक चक्की आहे.. ती चक्की स्त्री चालवते..
पाठीवर वेताची बॅग असते.
त्यात सामान आणतात
तसे घरासमोर अशीच बास्केट
लटकलेली असते त्यात कचरा टाकतात...
सर्व गाव स्वच्छ आणि सुंदर आहे.
हिरवाई आहे
आजूबाजूला उघडे डोंगर,
कुठेतरी अगदी वर बर्फ..!
घरासमोरून पाणी वाहत असते,
त्यामुळे पाणी भरणे हा प्रकार नसावा.!
येताना थोड्या कठीण वाटणाऱ्या वाटेने आलो.
येथे गेस्ट हाऊस तसेच tea स्टॉल, असे व्यवसाय आहेत.
येथे ताजी तुती खायला मिळाली...
येथील लोक स्वतः काही काम करून उपजीविका करतात.!
( एन जी ओ) काम करतात.
जेव्हा पीक घेता येते, तेव्हा ते साठवून ठेवतात...
पिकणाऱ्या भाज्या सुद्धा वाळवून ठेवतात.
जेव्हा फक्त बर्फ पडतो तेव्हा ते खाता येते.!
काही विकत नाहीत.
जेव्हा बर्फ पडते तेव्हा काही वेळा घराभोवती चार पाच फूट बर्फ असते.
आम्ही ज्या हॉटेल वर उतरलोय ते अतिशय सुंदर आहे..
रूमस आहेत तसे टेन्टस आहेत
हा तरुण बंगलोर येथे जाऊन हॉटेल मॅनेजमेंट करून आला आहे...
त्यामुळे सर्व सोय मस्त.!
त्याचे भाऊ याच व्यवसायात आहेत
(एकत्र व्यवसाय)
गावात फिरत असताना छोटी मुले... टॉफी दे दो.! असे मागत होती.
सुंदर, गोरी, गोबऱ्या गालाची, लाल गुलाबी गालाची मुले मोठी गोड दिसतात,
फोटो निकालु?
असे विचारले तर ....
No No असे म्हणत.!
गावात असे पाहुणे या सीझनला येतात हे आता माहित झाले असेल,
तर या पाहुण्यांकडे अनिमिश नेत्रांनी बघत होती.
जो परिसर फिरलो तो स्वच्छ सुंदर.!
जरी पर्यटक येतात तरी!
म्हणजे जसे या परिसरात स्वछता लोक ठेवतात.
तसे पर्यटक पण ठेवतात.!
Turtuk
दुमजली घरे
तळमजला.. गाई गुरे
बर्फ पडतो इथे... म्हणून
वरील मजल्यावर कुटुंबे राहतात
500 घरे आहेत,
तर 500 जवान.!!
प्रत्येक घरी एक गाढव असतेच.!
मुले आर्मी शाळेत जातात
नदी वाहते तर खूप पाणी असते म्हणून ब्रिज बांधला
आर्मी गाडीने मुले येतात जातात.!
डिसेंबर 1971 पर्यंत तांदूळ माहित नव्हता
हा भाग भारतात आला आणि
येथील लोकांना तांदूळ साखर चहा पावडर असे दिले गेले.
गिलगिट, बाल्टीस्टान
अशी अजून दोन गावांची नावे आहेत
Turtuk गाव
अगदी पाकिस्तान सीमा.!
छोटे सुंदर गाव
पाकिस्तानी जवान येथे होते म आपल्या जवानांनी हा भाग आपल्या ताब्यात घेतला...
येथील लोक स्वतः कमावणारे आहेत...
K2 हे शिखर दिसतंय
येथे आम्ही टेन्ट मध्ये राहणार आजची रात्र.!
टेन्ट अगदी आधुनिक.!!
भारतीय लोक येथे येतात याचा त्यांना खूप आनंद होतो.
खूप छान स्वागत करतात.! जेवण अप्रतिम आहे.
आता संध्याकाळी गाव बघायला जाऊ.
ज्यांच्या बरोबर आम्ही आलोय ते आर्मी मध्ये 5 वर्ष होते...
त्यांच्याकडून कथा ऐकताना... मस्त वाटते.!
सियाचीन
करीता mule बटालियन होती
वर असणाऱ्या जवानांना या mule च्या पाठीवरून रसद पाठवली जायची
हे mule यू पी कडील प्रशिक्षित असत.
त्यांना जवानांचा दर्जा मिळत असे.
मेडिकल ट्रीटमेंट., मसाज, व्यवस्थित खाणे उत्तम आहार.!
असो
खूप काही कळले
तुरतुक टेल्स
असे गूगल वर सर्च केल्यास अनेक कथा ऐकायला पाहायला मिळतील....
आज आम्ही गाव बघण्यासाठी जो गाईड घेतला तो 'अली'
त्याचे वडील आज 80 वर्षाचे आहेत.
ते
म्हणतात जेव्हा आपण पाकिस्तान साठी काम करत होतो तेव्हा पाच दिवस काम करत
होतो तेव्हा एक दिवसाचे पैसे मिळत पण आपण भारतीय झालो तेव्हा एक दिवस
भारतीय जवानांसाठी काम करतो तेव्हा पाच दिवस काम करून जेवढे पैसे मिळतात
तेवढे एका दिवसात काम करून मिळतात...
आणि इकडचे लोक खूप छान वागणारे
respect देतात.!
आता गाव बघू
बरोबर गाईड असेल
बरीच माहिती मिळेल...
मुंबईत राहून आपण किती सुखी आहोत हे कळते
नैसर्गिक अडचणी आल्यामुळे अनेक गोष्टी राहून गेल्या
मुख्य बॉर्डर.. कारगिल येथे
10 किमी अंतरावर होती
तेथे पाकिस्तानी आणि भारतीय जवान समोरासमोर...
बघणे बोलणे असा अनुभव.! राहून गेला.
असो....
No comments:
Post a Comment