आज मी पाचवा अध्याय पाठ करायला घेतला आहे.
हा 29 श्लोकांचा अध्याय आहे.
कर्म संन्यास योग..!!
म्हणजेच कृष्णभावनाभावित कर्म..!!
आता हा पाठांतराचा शेवटचा अध्याय आहे...
हा अध्याय पाठ झाला कि संपूर्ण गीता पाठ होईल.
○ म उत्तम कशी म्हणता येईल...
○ बिनचूक कशी म्हणता येईल..
○ बारीक सारीक कुठे चुकते,
○ कुठे अडखळते ...
*तिकडे पूर्ण लक्ष द्यायचे आहे...*
खूप सराव करावा लागेल..
तुमच्या सर्वांच्या सदिच्छा पाठीशी आहेत
म्हणून मी हे करू शकत आहे
मैत्रीणीला म्हटले तुला सांगू??
तू दिलेले पुस्तक खूप उपयोगी पडते....
प्रत्येक श्लोक पाठ करताना आधी अर्थ बघते..
शब्दाचा, मग श्लोकाचा..
म श्लोक पाठ करताना बरे पडते...
नंतर मात्र इतका अर्थ लक्षात राहत नाही
पण श्लोक पाठ होतो...
त्या पुस्तकातील फक्त अर्थच वाचते... इतर निरूपण वाचत नाही सध्या..
तेवढा वेळ नाही
श्लोक पाठांतराला महत्व
सध्या..
है ना
पुस्तकाचा छान उपयोग...
गीता जशी आहे तशी हे प्रभूपाद यांचे पुस्तक
सिद्धी ने मला गीता संथा वर्ग सुरु झाल्यावर दिले आहे...
तिलाच मी सांगत होते कि आता माझी गीता पाठ होईल
****************************** **
No comments:
Post a Comment