Monday, 13 April 2015

Monday Morning

मस्त समुद्रकिनारा.

 किनाऱ्यावर ओळींनी लावलेली नारळाची झाडे, त्याभोवती छोटासा पार !!! 
 आणि त्या झाडाभोवती सुंदर हिरवे गवत गालीचाच जणू! 
ओळीने लावलेली झाडं! 
 मग आकाशाकडे लक्ष गेलं तर खुप काळे ढग !!!!
 पण जेथून सूर्योदय झाला होता तेथे सोनेरी आकाश !!!!!

अप्रतिम!!!!!


२ मि. बसले आणि सूर्यनारायणाचे दर्शन झाले. पण ७.०० वाजताच त्याच्याकडे बघता येत नव्हते. मग नमस्कार केला आणि निघाले...... रस्ता ओलांडला आणि
 मस्त दृष्य..... पलिकडे पण नारळाची झाडे. आणि दूरवर कौलारू घर आणि ३/४ नारळाची झाडे आणि त्यातून सूर्यदर्शन...
 प्रखर भासलेला सूर्य असा आडून मस्त वाटला.

रेल्वे मधे बसले आणि पूर्वेकडे लक्ष गेले तर रेल्वेलाईनला लागून छान ओळीत माडाची झाडे. आणि आठवलं ८२/८५ मध्ये आमच्या वाडीत ४ नारळाची झाडे होती. आणि नारळ पडला की कोणीतरी धावत जाऊन नारळ घेअसे.... ती पण एक मजा होती.

मुंबईला सुंदर समुद्रकिनारा आहे.

 हे कोकणंच खरंतर पण शहरीकरण झालं आणि

 निसर्ग सौंदर्य कमी होऊन गगनचुंबी इमारती होऊ लागल्या

 तरीसुद्धा जाणीवपूर्वक निसर्ग जपण्याचा प्रयत्न होतोय छान वाटतं.

No comments:

Post a Comment