Monday, 20 April 2015

स्वामी समर्थ

भगवद् गीतेच्या नवव्या अध्यायातील श्लोक.....

' अनन्याश्चिंतयंतो मां ये जनाःपर्यूपासते ।

तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ।।'


हा श्लोक स्वामींनी म्हटला
- आणि महानिर्याण !

चैत्र वद्य त्रयोदशी शके १८०० या दिवशी श्रींनी आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली.

     आज तो दिवस....

।। भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ।।

मठात अखंड नामस्मरण सप्ताह होता त्याची आज सकाळी ६.०० वाजता सांगता झाली.
आज मी मठात गेले होते खुप
छान वातावरण होतं
दर्शन मस्त झालं गर्दी असुनही .
रांगोळी काढुन प्रवेशद्वार सजवलं होतं
रोजच्या पेक्षा वेगळी व्यवस्था होती.प्रसादासाठी ३ प्रकारचे लाडू, दाणे- पत्री साखर,
उपवासाचा बटाटा चिवडा एका द्रोणात देत होते.
      सुंदर फुलांचे तोरण,
 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असं लिहिलेल्या पताका,
असं प्रसन्न वातावरण, आणि त्यानंतर मस्त स्वामींचे दर्शन.......

आजची सकाळ सुंदर झाली

 

 

 

 

 

 


No comments:

Post a Comment