Saturday, 11 April 2015

मासेमारी

आज ओहोटी होती. त्यामुळे किनाऱ्याला थोडा कचरा होता. लक्ष सगळं आकाशाकडे लागलं. कालच्याप्रमाणेच मस्त सुर्योदय झाला २ मिनिटे शांत बसून उगवत्या सूर्यनारायणाचे दर्शन घेतले. आणि परत वळले तर समद्रात ४ कोळी जाळे बाहेर खेचून काढत होते  ते काढण्यासाठी त्यांना खुप श्रम होत असावेत.
त्याचवेळी साधारण    २००/३०० कावळे भराभर किनाऱ्यावर हजर झाले.
कसं कळतं यांना की आता आपल्याला खाणं मिळणार?
    तर त्या कोळ्यांनी जाळे बाहेर आणले तर मलातरी लांबून  असं वाटलं की खूपच मासे त्यांनी पकडले होते. ते बघतांना मनात विचार आला की किती कष्ट आहेत, या कामात! आणि ते किती निष्ठेने काम करत आहेत.
जाळं साधारण १०० फूट तरी असेल आणि व्यक्ती ४.
माशांच वजन आणि पाण्यातुन हे वजन खेचणं खुप कष्टाचं वाटलं मला.

No comments:

Post a Comment