Thursday, 15 November 2018

पंगत

 पंगत हि पोस्ट आली आणि मी काही पाहिलेल्या आणि
 अनुभवलेल्या पंगती डोळ्यसमोर आल्या 
प्रथम मी अनुभवलेल्या पंगती 
आणि नंतर आलेली पोस्ट.. 
 पंगत हा प्रकार पूर्णपणे भारतीय.

आठवणीतील पंगती..!!!


आता लोक सुध्दा... 
कधी देता पार्टी???
असे म्हणतात..

अंगत पंगत करू एकदा
असे कोणी म्हणत नाही..
आमची आई दिवाळीच्या पहिल्या दिवशी
 आमच्या मित्र मैत्रिणींना फराळ करायला बोलावे.  
मी बैठक घालून रांगोळी, उदबत्ती असा थाटमाट असे. 
आणि पंगतीत गप्पा मार्ट आमचा फराळ चालत

पंगतीत चढाओढीने सुंदर
 खणखणीत आवाजात श्लोक ऐकले आहेत.
श्लोक म्हणण्याचा सुद्धा आग्रह होत असे.

 पंगत आणि पार्टी
पूर्वी पंगत आणि त्यात पक्वान्नाचा आग्रह बघितला आहे, 
त्याकाळी आता सारखे पात्री जेवण नसायचे,
 सामान देऊन आचारी असायचे
जिलेबी आणि मठ्ठा... 
जिलेबीची ताटे वाढली जात आणि
 मजेने गप्पा टप्पा करत खाल्ली जात..
. मी स्वतः हे पाहिले आहे...

अशा पंगतीत मुली हौसेने वाढत 
म्हणजे लग्नाची मुलगी असेल तर...
तिचे लग्न जमत असे.

पाणी वाढणे, ताक वाढणे, डावी बाजू वाढणे
 अशी कामे मुली आनंदाने करत.
पंगत सुरु होण्यापूर्वी  वरण  भातावर तूप मात्र यजमान वाढत.

लक्ष भोजने होत...
तेव्हा बहुतेक पुरुष सगळी कामे करत.

अजूनही काही धार्मिक कार्यक्रम...
 पुरुष सोवळे नेसणार ना???
 पाटावर बसणार ना... 
अशी विचारणा क्वचित केली जाते.

पण... 
आता बहुतेकांना खाली बसता येत नाही..

खुर्ची हवी.
म कार्यक्रम असो जेवायचे असो...
गप्पा मारायच्या असोत.

अशा पंगतीत मी पदार्थ वाढले आहेत.. 
अगदी आमच्या मजल्यावर झाली आहे पंगत..

टेबल खुर्ची अशा पंगतीत वाढते...
 लग्न कार्यात..
 (अगदी जवळचे घरातले लग्न असेल तर)
नवरा नवरीच्या पंगतीत.. वाढते

आणि पिठापुरं येथे
अपंग, गरीब लोकांना अन्नदान असते, 
त्यात सुध्दा वाढले आहे. 


 अक्कलकोट येथे अन्नदान / महाप्रसाद असतो
त्यात सुध्दा वाढते...


 गमतीत अस म्हटलं जातं
पंगतीत वाढपी फिरत असतात
पार्टी मध्ये आपण हातात ताट घेऊन फिरतो आणि वाढपी एका जागी स्थिर असतात...
***************************

याच धर्तीवर पाश्चात्य देशात जे होते 
त्याला पार्टी म्हणतात. 

पंगत म्हणजे डिसीप्लीन-शिस्त.
पार्टी म्हणजे धांगडधिंगा. 

पंगत म्हणजे सहभोजन.
पार्टी म्हणजे स्वभोजन.

पंगत म्हणजे बैठक ठोकून जेवावे.
पार्टी म्हणजे उभ्याउभ्याच हादडावे.

पंगत म्हणजे शारिरीक मानसिक आणि आध्यात्मिक साजशृंगार
पार्टी म्हणजे सामाजिक दिखाऊपणाचा अधिभार.
पंगत म्हणजे हवं तेवढं जेवा.
पार्टी म्हणजे हवंतर जेवा.

पंगत म्हणजे उदबत्यांचा घमघमाट.
पार्टी म्हणजे बाटल्यांचा खणखणाट.

पंगत म्हणजे श्लोक म्हणायची घाई
पार्टी म्हणजे मोठ्या आवाजाची महागाई

पंगत म्हणजे एका रेषेत ताटे वाढलेली
पार्टी म्हणजे रांग लावून अन्न घेतलेली

पंगत म्हणजे ताटाभोवती काढलेली रांगोळी
पार्टी म्हणजे रिकाम्या वाट्यांची रोषणाई

पंगत म्हणजे मिळते पावती तृप्तीची 
पार्टी म्हणजे गोष्ट कोल्हा करकोच्याची

पंगत म्हणजे हर हर महादेवा 
पार्टी म्हणजे डान्सचा जलवा

पंगत म्हणजे जय जय रघुवीर समर्थ
पार्टी म्हणजे डीजे नाय तर सगळं व्यर्थ

पंगत म्हणजे निकोप स्पर्धा खाण्याची
पार्टी म्हणजे भीती उपाशी राहाण्याची

पंगत म्हणजे सत्व रजाची आरास
पार्टी म्हणजे रज तमाची नुसती रास

पंगतीमधे यजमान पाहुण्यांना शोधतात.
तर पार्टीत पाहुणे यजमानांना हुडकतात.

पंगत म्हणजे काय काय सांगू ?
पार्टी म्हणजे आणखी काय सांगू  !

Thursday, 4 October 2018

नमस्कार करावा परमात्म्याला...

सकाळी जाग आली कि उठून बसावे, 
आणि दोन्ही हात जोडून
 नमस्कार करावा परमात्म्याला...
आणि त्याचे आभार मानावे, आजची सकाळ दाखवली...
 म हाताची ओंजळ करावी... आणि 

कराग्रे वसते लक्ष्मी

कर मूले सरस्वती

करमध्ये तू गोविंद 

प्रभाते कर दर्शनम


हा श्लोक म्हणावा.

आपला हा आरसा आहे

आपल्या तब्येतीचं दर्शन यात होते...
तसेच.. कोणालाही दान देतात ते पसाभर, ओंजळभर.!!!
आपल्याला जे अन्न लागतं ते खरतर ओंजळभर पुरतं, 
पाणी पितो ते सुध्दा ओंजळीने, आणि याने आपली तहान भागते.
सर्व कामे हाताने करतो...
असे शांततेत बसले कि आपल्याला दिवसभर कोणती कामे करायची आहेत याचा विचार करायला वेळ मिळतो, 

देवाचे त्या जगन्नियंत्याचे नाम आपोआप ओठी येते.

~~~~~~~~~~~~

हात... मैत्रीचा आश्वासक हात खांद्यावर असतो,

ओळख करून देताना, भेट झाली कि आपण हस्तांदोलन करतो,

भविष्य दाखवायला हातच पुढे करतो.

आणि निरोपासाठी सुध्दा हातच हलवतो..

हाताचा स्पर्श खूप काही सांगून जातो.

आहे मी पाठीशी म्हणून सुध्दा आपण पाठीवर हातच ठेवतो.
(त्यावेळी काही बोलले नाही तरी चालते).

हातावर महत्त्वाचे पॉईंट असतात ते प्रेस केले तरी आजारपणात आराम मिळतो..

दोन्ही तळवे एकमेकांवर घासून 
ते जर चेहऱ्यावरून फिरवले तरी
 आपला थकवा निघून जातो..

कोणताही आनंद झाला तरी आपण टाळ्या वाजवतो,
देवाची आरती करताना वाजवतो त्या टाळ्या...
( टाळ्या वाजवताना तळहातावरील पॉइंट्स प्रेस होतात )

अगदी सख्खी भावंडे स्वभाव सारखे नाहीत 
हे सांगताना सुध्दा उदाहरण देतो ते...
 हाताची बोटे सारखी नसतात..

एखादा  छान मदतनीस याचा उल्लेख करताना
 हे अगदी माझा उजवा हात आहेत असे म्हटले जाते.

एखादी गोष्ट केली नाही , 
माहित नाही यासाठी म्हण आहे तर हात वर करणे...

काहीही काम करायचे नसेल तर म्हणतात हाताची घडी घालणे.

एका हाताने केलेले दान दुसऱ्या हाताला कळता काम नये.

कुणाशीही लढा देताना म्हणतात दोन हात करणे.

हाताला हस्त, कर... म्हणतात..
सगळी कामे हाताने करतो म्हणून
 हाताला 'कर' असे म्हणत असतील?

असे अनेक...


~~~~~~~~~~~~

म आपण धरणी मातेवर पाय ठेवण्यापूर्वी म्हणतो,


समुद्रवसने देवी

पर्वतस् तन मंडले

विष्णू पत्नी नमॊस्तुभ्यं

पादस्पर्शम क्षमस्वमे...

 

 


हे माते मी आता माझे पाय तुला लावणार आहे
तू मला क्षमा कर..
तू मला अन्न पाणी देतेस
जे काही सूक्ष्म जीव यावर आहेत त्यांची न कळत हत्या होईल , तू मला क्षमा कर...

या दोन श्लोकातून आपल्याला कष्ट करा,

 आणि चूक होवो वा न होवो कुणाचीही माफी मागा...

असे आपल्याला पूर्वजांनी संदेश दिले आहेत.

पूर्वी श्लोक म्हणून मुलं ते म्हणत...
 पण आता वेळ नाही आणि माहित नाही,
म्हणून म्हटले जात नसतील,
 पण त्यामागील भाव महत्त्वाचा आहे.

नव्या जुन्याची सांगड घालत श्लोक म्हणायला काय हरकत आहे...

ज्यांना माहित आहे त्यांनी  म्हणावा,
 आपोआप घरातील लोकांनाच पाठ होईल.

श्लोक म्हटल्याने शब्दोच्चार स्पष्ट होतात.


असो आपले दोन श्लोक. आणि त्यावर सुचलेले असे बरेच..

Sunday, 23 September 2018

उकडीचे मोदक...!!!

२३ सप्टेंबर

बाप्पा करीता त्याच्या आवडीचे मोदक


उकडीचे मोदक...!!!

खास मोदक पिठी मिळते.
 त्याचे मी मोदक करते..

साहित्य : २ वाट्या पिठी चाळून, दीड वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूध,
चिमूटभर मीठ आणि थोडे तेल.
पाण्याला उकळी आली कि त्यात मीठ तेल घालावे, 
आणि चाळलेले पीठ घालून 
कविलथ्याच्या मागील टोकाने ती चांगली ढवळावी 
आणि झाकून गॅस बंद करावा.

उकड मळणे
आता एक शुभ्र फडके घेऊन ओले करावे 
व त्यात हि गरम उकड घ्यावी 
आणि पुरचुंडी करून छान मळावी
 हात न भाजता मस्त उकड मळता येते. 
गोळी अजिबात राहत नाही.
म थोडा गोळा घेऊन तेल, पाणी याचा हात लावत लावत मऊसूत मळावा.

लिंबाच्या आकाराची गोळी करून 
त्याची वाटी करावी... 

पारी पातळ करावी.. 

(काही जण पारी थापून करतात, तर काही पुरी यंत्र वापरून पारी करतात)


आता त्यात तयार केलेले सारण भरावे.
आता पारीच्या कळ्या कराव्या... 
कोणाला पाच सात किंवा त्याहून जास्त   सुद्धा येतात..

<><><><><><><><>

मोदक वाफवताना ... 

 

अगोदर पात्रात पाणी उकळण्यास ठेवावे,
 म तयार झालेले मोदक वाफवण्यास ठेवावे.

मोदकपात्रात शुभ्र कापड पसरून
 त्यावर मोदक पाण्यात बुडवून ठेवावा.
असे मोदक तयार झाले कि 
गॅसवर भांडे मोदक  वाफवण्यास ठेवावे. 
मोदक उकडताना 
चकचकीत तांब्याचे ठोक्याचे मोदक पात्र असेल तर.... 
मस्त वाटते

मोदक वाफावताना
 पात्रामधून दणदणीत वाफा/ पांढऱ्या वाफा आल्या
 कि मोदक तयार झाले असे समजावे,
झाकण काढून बघितले तर 
मोदक हाताला चिकट लागत नाही,
 तुकतुकीत दिसतो.  

मोदक तयार झाले कि...
 भांड्यात काढताना वरून थोडे पाणी शिंपडावे, 
म पाण्यात हात बुडवून एक एक मोदक डब्यात ठेवावा.
डब्यात तळाला केळीचे पान ठेवले तर उत्तम.!!!

वाफवताना.. 
काही हळदीचे पान वापरतात.. 
म्हणजे मोदकांना हळदीचा वास येतो.

काही जण प्लास्टिकची झबला पिशवी वापरतात.
म्हणजे मोदक चिकटत नाहीत.

मोदक...
१५ मिनिटे वाफवावेत. 
मोदक पानात वाढले कि...
 खाणारे मोदक फोडतात आणि 
साजूक तूप घालून मोदक खातात.

मोदक सारण आवडीप्रमाणे गोड करावे.

मोदक करताना त्याचे 'नाक' छान करावं.!


~~~~~~~~~~~~

उकड जितकी मळतो तितके मोदक सुरेख होतात.
(मळून जो पदार्थ करतो तो चांगला मळून मगच पदार्थ करावा)
(पोळ्या, पुरी, चकली, कडबोळी, भाकरी इ.)

मोदक उकडून झाले कि पाच मिनिटे तरी तसेच झाकलेले ठेवावे.

बाप्पाला नेवैद्य दाखवताना 

मोदकावर साजूक तूप थेंब थेंब तरी घालावे, 

आणि त्यावर दुर्वा ठेवावी.

*******************
काही साच्यातून मोदक करतात. 
(थोडी जाड पारी आणि पुरण मात्र अगदीच थोडे राहते त्यात दिसायला सगळे सारखे मोदक)

:::::::::::::::::::::::::::::::::::

आत्ता सोपे यंत्र म्हणून अशा मुद करताना वापरतो 
त्या चमच्याचा वापर करून सुंदर पुष्कळ कळ्यांचा मोदक करता येतो.




 हे आहे सोपे यंत्र .... !
*******************

निवगऱ्या.!!

 


मोदक करायचे कि काही जण निवगऱ्या करतातच.

यासाठी उकड काढताना थोडी जास्त काढतात
त्यात जिरे पावडर, मिरची बारीक वाटून घालतात. 
छोट्या लाट्या करून त्याच्या पातळ पाऱ्या करतात, 
आणि तेलाचा हात लावून वाफायला ठेवतात, मोदक प्रमाणे... ! 
गोड मोदक आणि थोड्या तिखट निवगऱ्या.
*******************

मोदक करताना एक तरी करंजी करायची. 

त्यामागे भावाला एक तरी बहीण हवी असा भाव आहे. 

आणि 

करंजी करताना एक तरी मोदक करतात 
बहिणींना एक तरी भाऊ हवा.

Thursday, 30 August 2018

नर्मदे हर !



20 ऑगस्ट रोजी थोडा पाय दुखावला..!
म घरातच बसून होते
सहज व्हाट्सअॅप मेसेज बघत असताना.. पायी नर्मदा परिक्रमा केली त्यांची लिंक दिसली
ऐकायला सुरु केली, ओघवती भाषा शैली, अगडी खिळवून ठेवले सगळे भाग एका बैठकीत ऐकले.!!!
गुरुवार चा दिवस आणि अचानक श्रीगुरुदेव दत्त यांचे अप्रतिम दर्शन.!
म वहिनीला, आणि अजून काही मैत्रिणींना लिंक पाठवली आणि म्हटलं....
 आज हे तू ऐकावं
अस मला वाटतय...

खूप छान अनुभव आहे

त्यांच्या तोंडूनच ऐक
आणि बघ.
अजून एका भागात 
 गजानन महाराज
आणि अजूनही सुंदर
असे होते तो भाग लिंक पाठवली.
 संपूर्ण 18 भाग आज ऐकले. २३ ऑगस्ट याच दिवशी.!!!



[8/30,  एक मज्जा.....
श्रावण सुरु आहे
नर्मदा परिक्रमा....
३० ऑगस्ट या दिवशी 
घरात अनेक दिवस असलेले पुस्तक वाचायला घेतले.
दुसरी सुरु आहे माझी
पहिली you tube वर ऐकली
ती पायी होती
ओघवती भाषा शैली
आणि आता सुरु आहे ती सायकल वरून...
पुस्तक वाचन काल सुरु केलाय आज होईल बहुतेक पूर्ण
आहे ना कमाल
पाय ठीक नाही आणि मानस नर्मदा परिक्रमा दोन झाल्या...
या पुस्तकात वाहन प्रदक्षिणा....
यांचे नंबर  आणि बरीच माहिती
एक दिवस परिक्रमा
हि माहिती आहे
बघू
योग असेल तर....
जाऊ... है ना

 आताच पुस्तक वाचून पूर्ण झाले
गेल्या गुरुवारी.... 
मी यू ट्युब वर ऐकली.नर्मदा परिक्रमा ऐकली. भाषा ओघवती आहे अनुभव खूपच सुंदर आहेत. अगदी पूर्ण ऐकल्याशिवाय बंद करता आले नाही ऐकणे.!!!

आणि काल पुस्तक वाचू लागले ते आज गुरुवार पूर्ण झाले.

इंदोर येथे काही वर्षांपूर्वी गेले तेव्हा ओंकारेशवर येथे गेले, अमलेश्वर दर्शन, मैया च्या तीरावर गजानन महाराज मठ.!
असे सुंदर दर्शन झाले
मुख्य मैय्याचे दर्शन.!

महेश्वर येथे नर्मदा मैया, सुंदर घाट संध्याकाळची वेळ, आणि सुंदर असे शंकर मंदिर, मन भरून पावले.!

::::::::::::::::::::::::::::::::::::

 नर्मदे हर ! नर्मदे हर ! नर्मदे हर !

एक सुंदर पुस्तक वाचायला घेतले काल 8 वाजता रात्री.
खाली ठेवावे वाटत नाही.!

सायकल वरून नर्मदा परिक्रमा...

ज्यांनी लिहिलय त्या जावयाच्या मित्राच्या आई आहेत.
आता लेह ट्रेक साठी हि दोघे त्यांच्या बरोबर गेली आहेत...!

हे पुस्तक गेले वर्षभर कपाटात होते,
गीता पाठांतर करत होते त्यामुळे हात लावत नव्हते.
आणि कालपासून 102 पाने वाचून झाली आहेत.

सुंदर लिहिलय.!


काही ठिकाणी मी जाऊन आले आहे.
म थोडे त्या आठवणीत रमते...
काही ठिकाणी अगदी त्या गावाला गेले
पण... तेथे नर्मदा मैया चे दर्शन घ्यायला का गेले नाही???  गुजराथ येथील सिद्धपूर.! 
जायला हवे होते.. असे वाटले..

::::::::::::::::::::::::::::::::::::

" त्वदीय पादपङ्कजं नमामि देवी नर्मदे "

नर्मदे ऽ ऽ ऽ धर्मदे ऽ ऽ ऽ शर्मदे ऽ ऽ ऽ

हर, हर, हर !!!

○○○○○○○○○○○○○


 श्री नर्मदेचा गायत्री मंत्र

ॐ रुद्र देहायै विद्महे
मेकलकन्यकायै धीमहि
तन्नोरेवा प्रचोदयात् !!

*******************

Wednesday, 15 August 2018

पत्नी होना आसान नहीं होता...

 
एका मैत्रिणीने खालील मेसेज पाठवला .!

पत्नी होना आसान नहीं होता...

अपनी इच्छाओं को मारकर घर के हर सदस्य को खुश रखना पड़ता है...

इसलिए ध्यान रखें.. कि...

जब वह  Restaurant में  मेन्यू कार्ड से कोई  dish पसंद कर रही हो,
तो 
उसे पसंद करने दें....

घर में हर रोज
हर बार का खाना बनाने के लिये वह अपना काफी समय सिर्फ इसलिये देती है
कि क्या बनाना है, 
कितना बनाना है और ...
किसके लिये बनाना है...!

जब वह बाहर जाने के समय तैयार होने के लिये time ले रही हो ... तो लेने दें...
उसने अपना time 
आपके press किये कपडो़ं को जगह पर संभाल कर रखने में, 
socks  और रूमाल संवार कर रखने में दिया है...!

वह अपने बच्चे को संवारने के लिये भी बहुत मेहनत करती है, ताकि ...
वह अडो़स पडो़स के सब बच्चों से अच्छा दिख सके...!

जब वह TV पर अपना मनपसंद ...
हमारी नजर में बेसिरपैर का  serial देखती है, तो देखने दें,
उसका उस serial  में तो ध्यान आधा ही रहता  है...
बाकी का ध्यान तो दिमाग में चल रही घडी़ पर रहता है,
आपके 
आते ही वह अपना मनपसंद serial अधूरा छोड़ कर kitchen की तरफ चल देती है....!

जब वह breakfast  बनाने में time लगा रही हो तो उसे लगाने दें,क्योंकि ...
वह सबसे बढि़या और कुरकुरे toast सबको दे रही है और 
ज्यादा सिंके व जले toast खुद के लिये अलग कर रख रही है...!

जब वह चाय का कप हाथ में ले कर खिड़की के बाहर शून्य में निहार रही हो, तो उसे निहारने दें...
रात को किचन का काम निबटा कर सोने जाती है तब 
लग व्हाटस्अप फेसबुक पर अपना मन बहलाती है तो उसे टोके नही ... उसे शांति मिलेगी 

ध्यान रहे.... येे उसकी अपनी जिंदगी है, 
उसने अपनी जिंदगी के अनमोल व अनगिनत घंटे आपको दिये हैं....!

अब यदि वह अपने जिंदगी के कुछ पल खुद के लिये लेना चाहती है तो लेने दें...!

उसका जीवन दूसरों के लिये  भागादौडी़ में ही बीत रहा है....
कृपया  उसे और ज्यादा तेज भागने के लिये मजबूर या निराश न करें.......!!

Salute every Women
 Regards,
      
   नारी शक्ति को नमन
 ( मला काय सुचले ते ... तिच्या बरोबर गप्पा )

माझ्या माहितीतील कुणी पुरुष मित्र असतील तर त्यांना मी हे सांगते
तुम्हाला कंटाळा येतो बाहेर खाण्याचा
पण कधीतरी आपण होऊन घरातील 
स्त्रीला
बाहेर न्या जेवाखायला.
 कधीतरी बरे वाटते.!

रोजच्या रोज साफसफाई करतो पण
महिन्यातून एकदा अजून छान साफसफाई करतो
म स्वयंपाक करून जेवणे..

थोडे थकायला होते,
तेव्हा बाहेर खायला बरे वाटते.

बाहेरगावी जातो तेथून आल्यावर दुप्पट काम असते.
म काही नाश्ता बाहेरून बरा वाटतो.!

पाहुणे मंडळी येणार तर... बरेचसे पदार्थ घरी करतो, नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात करतो.
म पाहुणे गेले कि दुसऱ्या दिवशी बाहेर जायला बरे वाटते.

पाहुणे येणार तर एखाद दुसरा पदार्थ बाहेरून आणला तर....
आपले थोडे काम कमी होते
आपण फ्रेश राहतो.
पाहुण्यांची उठबस करायला...

मुलांना आवडणारे पदार्थ जसे पिझ्झा, बर्गर दाबेली पावभाजी असे पदार्थ नेहमी घरी करतो.
पण कधी बाहेरून पण बरे वाटते,

पुलाव बिर्याणी यासारखे पदार्थ घरी करतो,
पण एखाद वेळी बाहेरून आणला 
घरच्यांना टेस्ट आवडली तर त्यात काय घातले हे पाहण्यासाठी, टेस्ट कशी पाहिजे हे पाहण्यासाठी बाहेरून आणावे....

एखादे हॉटेल विशिष्ट पदार्थासाठी प्रसिद्ध असते, आपण जवळ राहत असलो तरी आपण तेथून कधी आणले नसते किंवा गेलो नसतो,
तर असे होऊ नये म्हणून तिकडे जाऊन खावे...

तरी घरची गृहिणी तिला घरीच करण्याची आवड असेल, तर मात्र बाहेर जाऊ नये...
आईला मुलाने पोटभर चांगले खावे , आवडते करून खाऊ घालावे असे वाटते... 
त्यात फायदा किती होणार हा विचार नसतो,
त्यात माया ममता प्रेम असते. आपल्या माणसांनी आवडीने खावे केलेल्या पदार्थाला दाद दयावी एवढीच अपेक्षा असते,

खाताना, जो पदार्थ केला आहे तो अमुक एका ठिकाणी कसा चांगला मिळतो ते सांगू नये एवढीच अपेक्षा असते... करणाऱ्या स्त्रीची.!

पूर्वी सगळे त्या त्या ऋतू , सण या नुसार पदार्थ केले जात, त्यामुळे ते आवडीने खाल्ले जात. बाहेर खाण्याची पद्धत नव्हती...

आता श्रीखंड हवे तर... आण छोटी डबी आणि खा, असे असते
पूर्वी दूध आणून त्या पासून श्रीखंड केले जाई म त्याची किंमत होती
आता एक फोन केला कि घरी हवा तो पदार्थ!!

आणि आता घरोघरी एकटी स्त्री असते, वेगळ्या चवीचे खायला तिला मिळत नाही,
म्हणून तरी बाहेर जावे कधीतरी...

बाहेर खातो पण असे लक्षात येते कि
पाणीपुरी, भेळ या सारखे पदार्थ एक प्लेट खाल्ले कि पोट भरते,
पण घरी केले कि.... अजून सगळेच आवडीने खातात

बाहेर पदार्थ खाल्ले कि काही जणांना गॅसेस किंवा ऍसिडिटी चा त्रास होतो...

खूप सारे पैसे होतात बाहेर खाल्ले कि...

एवढासा भात प्रकार पण किती पैसे असतात त्याचे
पण कंटाळा आला तर...
कधीतरी बरे वाटते.

काही प्रकार घरी केले जात नाहीत जसे कि स्टार्टर्स.... म हॉटेल मध्ये ते खावेत...

काही वेळा घरात अगदी दोन माणसे... म तळणी घालायचा कंटाळा येतो,
अशा वेळी बाहेरून दोन वडे आणून खावेत..

काही वेळा घरात खूप माणसे असली तरी बाहेरून आणणे बरे वाटते... खूप काम पडते आणि खाण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात करावा लागतो...

काही पदार्थ बाहेर महाग का मिळतात? हे बघण्यासाठी घरी करून बघावेत, म्हणजे त्यामागे किती मेहनत आहे ते कळते.... आणि घरातील दोन व्यक्तीसाठी घरी करण्यापेक्षा बाहेरून बरा वाटतो.
**********************************

Thursday, 2 August 2018

गोडाचा शिरा



एक शिरा... किती प्रकारांनी आपल्या समोर येतो..  
पण
 प्रसादाचा शिरा याची गोडी काही अविटच.!!!!

आई भूक... अस लहानपणी म्हटलं कि थांब हं, पटकन शिरा करते.. 
असं म्हटलं कि आम्ही भावंडं एकदम खुश व्हायचो.!
आणि तुपावर रवा भाजला जात असताना 
जो काही भाजलेल्या रव्याचा वास सुटायचा कि... 
भूक खवळायची..
आणि त्यात घालण्यासाठी वेलची पावडर करायला घेतली कि आजूबाजूला पण कळे... 
आज शिरा करतायत यांच्याकडे!
जेव्हा उभ्याचा ओटा नव्हता तेव्हा आई खाली बसून रवा भाजायची, 
आणि जेव्हा उभ्याचा ओटा झाला तेव्हा आई ओट्यावर बसून रवा भाजत असे, 
आणि रवा भाजताना आई घामाघूम होत असे,
 पण ती मन लावून रवा भाजे 

ते काम करताना ती सुंदर दिसे.!

करता करता आई सहज काही सांगत असे,
 रवा छान गुलाबी भाजला गेला पाहिजे
 म्हणजे तो चिकट होत नाही,
 रवा छान फुलतो, गोड पदार्थ असला
 तरी त्यात कणभर मीठ घालावे, 
केशर घालताना वाटी किंचित गरम करावी 
म त्यात केशर काड्या घालाव्या,
 म्हणजे ते छान चुरले जाते आणि दुधात एकत्र पटकन होते, 
साखर विरघळली कि केशर वेलची केले बेदाणे जे काही घालायचे ते घालावे
 आणि गॅस बंद करून त्यावर झाकण ठेवावे.
 आणि असे व्हायचे कि 
कधी एकदा शिऱ्याची ताटली समोर येते
 असे होऊन जायचे. 
ताटलीत नुसता शिरा कधीच नसायचा, 
बरोबर पोहा पापड भाजून आणि लिंंबु लोणचे.! 
अहाहा... तो जो काही (स्वर्गीय ) आनंद व्हायचा... 
कुठली चांगली बातमी कळली ...
 पटकन कर शिरा, अचानक कुणी आलं कर शिरा
, मधली वेळ कर शिरा... 
पण हा शिरा वेगळ्या वेगळ्या स्वरूपात समोर येई.
कधी केशरी शिरा,
 कधी बदाम बेदाणे घालून
 तर कधी भाजताना केळे घालून..
पण ताटलीत असे तो मात्र छान मूद करून लोणचे पापड असलेले..
    काही जणांना नुसते पाणी घालून केलेला शिरा आवडतो.
 कुणाला प्रसादासारखा शिरा आवडतो.. 
काहींना केळे घालून शिरा आवडतो..
पण (काही म्हणा पूजेच्या वेळी असणारा शिरा वेगळीच चव असते.
प्रसाद म्हणजे "प्रभूंचे साक्षात दर्शन.!" )
आणि हा अगदी इवलाच मिळतो... पोटभरीचा नसतो.!
----------------------------------------------

अक्कलकोट येथे

 अन्नछत्र मध्ये  जो शिरा... 
भात वाढण्याच्या वाढण्याने 
(म्हणजे तसा तो खूप असतो)
 गरम गरम शिरा वाढतात... व्वा.! 

असा अप्रतिम शिरा घरी केला तरी मात्र होत नाही.

******************************
साजूक तूप, रवा साखर 
आणि दूध/पाणी सर्वाना सारखे दिले तरी
 प्रत्येकीचा शिरा वेगळा होईल...
******************************
आणि या गोडाच्या शिऱ्याची/ सांज्याची पोळी.. 
गूळ घालून बारीक रव्याचा सांजा करायचा.
 मस्त .. एक पक्वान्न


पूर्वी शिरा पुरी एक पक्वान्न होते.


लहानपणी ट्रिप म्हणजे गोडाचा शिरा आणि

 तिखटमिठाच्या पुऱ्या असा डबा असायचा...
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

हा जसा पटकन होणारा शिरा तसा... 
श्रीपाद श्रीवल्लभ यांना आवडणारा ... हलवा
म्हणजेच कणकेचा शिरा
कणिक भरपूर तूप घालून छान भाजायची
 आणि साखर किंवा गुळ घालून शिरा करायचा..
हा शिरा हातांनी खाण्यात वेगळीच मजा आहे.!
*******************************

गव्हाच्या जाड रव्याचा/ सोजीचा शिरा...

 थोडे वेळमोडे काम .
छान तुपावर हा रवा भाजायचा ,
 वेळ लागतो भाजायला... 
आणि रवा छान शिजला कि गूळ घालायचा...
 मस्त लागतो..
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
शिऱ्याची वेगळी रूपे

रवा केक


 


आणि गोड आप्पे...


Wednesday, 1 August 2018

Double Humped Camel


लडाख येथे भारत चीन सीमा रेषेवर गस्त घालणे व रसद पुरवठा करणे यासाठी उंटांचा वापर केला जाणार आहे. 
लडाखच्या नुब्रा valley येथे दोन मदार असलेले उंट आहेत, 
त्यांना बॅक्टीरियन नावाने ओळखले जाते.
भारताचे सीमा सुरक्षा दल देशाच्या पश्चिम सीमेवरील वाळवंटी भागात उंटांचा वापर गस्तीसाठी करणार आहेत. सध्या या उंटांना प्रशिक्षण देण्यासाठी बिकानेर येथील राष्ट्रीय उंट संशोधन केंद्रातून ४ उंट सैन्याला देण्यात आले आहेत. 
( हि माहिती एका बुलेटिन मध्ये वाचली )

सध्या येथे जे उंट आहेत ते सफारीसाठी उपयोगी आहेत... 
दोन मदारी हे त्यांचे वैशिष्ट्य.!!!
 वाळवंटातील जहाज.!
यावर बसण्याचा आनंद काही वेगळाच आहे.
 बरोबर दोन मदारी मध्ये बसण्याची जागा...
 बर्फात असल्याने अंगावरील फर जरा वेगळीच.!





Wednesday, 18 July 2018

गीता अठरा अध्याय

श्रीमद्भगवद्गीतेत एकूण ७०० श्लोक आहेत.

गीता  अठरा अध्याय

।। ॐ श्रीपरमात्मने नमः ।।

        अध्याय १ 
     धृतराष्ट्र उवाच

अर्जुनविषाद योग
                 श्लोक ४७
--------------------------------------------------

          अध्याय २ 
       सञ्जय उवाच

सांख्ययोग
                 श्लोक ७२
--------------------------------------------------

          अध्याय ३ 
        अर्जुन उवाच

कर्मयोग 
                श्लोक ४३
--------------------------------------------------
           अध्याय ४
       श्रीभगवानुवाच

 ज्ञानकर्मसंन्यासयोग               
                श्लोक ४२
------------------------------------------------
         अध्याय ५
       अर्जुन उवाच
 
कर्मसंन्यासयोग
                  श्लोक २९
------------------------------------------------
           अध्याय ६
       श्रीभगवानुवाच

 आत्मसंयमयोग
                  श्लोक ४७
--------------------------------------------------
      
          अध्याय ७
      श्रीभगवानुवाच

 ज्ञानविज्ञानयोग
                   श्लोक ३०
-------------------------------------------------
           अध्याय ८ 
         अर्जुन उवाच

अक्षरब्रह्मयोग
                    श्लोक २८
-------------------------------------------------
          अध्याय ९ 
      श्रीभगवानुवाच

राजविद्याराजगुह्य योग                    

                  श्लोक ३४
-------------------------------------------------
          अध्याय १० 
        श्रीभगवानुवाच

विभूतियोग
                  श्लोक ४२
--------------------------------------------------
        अध्याय ११
       अर्जुन उवाच
  
विश्वरूपदर्शन योग                  

                  श्लोक ५५
--------------------------------------------------
         अध्याय १२ 
        अर्जुन उवाच

भक्तियोग
                   श्लोक २०
--------------------------------------------------

        अध्याय १३
     श्रीभगवानुवाच
 
क्षेत्रक्षेत्रज्ञविभाग योग                 
                  श्लोक ३४
--------------------------------------------------
       अध्याय १४ 
     श्रीभगवानुवाच

गुणत्रयविभाग योग             
                    श्लोक २७
--------------------------------------------------
        अध्याय १५
      श्रीभगवानुवाच
  
पुरुषोत्तमयोग
                  श्लोक २०
--------------------------------------------------
        अध्याय १६ 
      श्रीभगवानुवाच

 दैवासुरसम्पद्विभागयोग
                   श्लोक २४
--------------------------------------------------
         अध्याय १७
         अर्जुन उवाच
 
श्रद्धात्रयविभागयोग
                    श्लोक २८
--------------------------------------------------
         अध्याय १८
        अर्जुन उवाच

 मोक्षसन्न्यासयोग
                  श्लोक ७८

♤ॐ♤ॐ♤ॐ♤ॐ♤♤ॐ♤ॐॐ♤ॐ♤

।।अध्याय समाप्ती सूचक।।

ॐ तत्सदिति श्रीमहाभारते शतसाहस्त्र्यां( व् )
 संहितायां ( व् )
वैयासिक्यां ( म् )
भीष्मपर्वणि श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां (य् ) योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे - - - - -
नाम - - - - - - ध्यायः । 
         हरये नमः । 
   श्रीकृष्णार्पणमस्तु ।
          श्रीरस्तु । 
        शुभंभवतु ।

⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘

अध्याय ७, ९, १३, १५, १६.

हे संपूर्ण भगवंतांनी सांगितले आहेत..


ॐ♤ॐ♤ॐॐ♤ॐ♤ॐ♤ॐ♤ॐॐ♤ॐ♤

Tuesday, 17 July 2018

भगवद् गीता .... सराव करताना



नोव्हेंबर मध्ये गीता पाठ झाल्यानंतर...

१७ नोव्हेंबर २०१७ या दिवशी गीता पाठ झाली.

पाठांतराचा सराव करताना....
शृंगेरीला कंठस्थ... अशी स्पर्धा घेतली जाते.
यादृष्टीने सराव सुरु केला.
 यासाठी गीता
मुखोदगत असणे आवश्यक आहे.

अशावेळी मनाचा काही वेळा संचार होतो 
आणि चांगले पाठ असून काही बाही म्हटले जाते...
-------------------------------------------------

आमचा वर्ग हा संथा वर्ग.!
संथा म्हणजे एकाने सांगणे आणि दुसऱ्याने म्हणणे.!
यामध्ये उच्चार व्यवस्थित असणे याला महत्त्व असते.
-------------------------------------------------
तर कंठस्थ म्हणजे 
घडान् घडा म्हणणे.!
-------------------------------------------------

दोघी तिघी चौघी असे एकत्र म्हणू लागलो जमेल तसे.!

मी म्हणताना... एकटीच समोर *यांना* बसवून म्हणते.

दोघी असताना एक म्हणते आणि
 मी पुस्तक समोर ठेऊन उच्चार बरोबर करतात ना/
 आणि माझा कुठे उच्चार नीट होत नाही, 
याकडे लक्ष ठेवते,
-------------------------------------------------

उच्चार...

☆ अनुस्वार उच्चार

☆ विसर्ग उच्चार
(वाक्याच्या शेवटी, आणि मध्येच येतो तेव्हा)
☆ विसर्ग नंतर स, क्ष  ष, श,
असेल तेव्हा.!
☆ ऱ्हस्व  दीर्घ उच्चार याकडे नीट लक्ष द्यायचे.
------------------------------------------------

सराव कसा करतो?


• श्लोकाची सुरुवात करून दिली कि पुढे श्लोक म्हणायचा.
निदान चार पाच श्लोक म्हणायचे.. म पुढचा म्हणेल.

• सम विषम श्लोक म्हणायचे...

• जर श्लोकाची सुरुवात करून दिली तर 

तो श्लोक कोणी म्हटला असेल तर... 

तशी सुरुवात करायची
दुसरा अध्याय... ४था श्लोक
उदा. 
कथं भीष्म....
अशी सुरुवात करून दिली तर...
अर्जुन उवाच...
कथं भीष्म 
असे म्हणायचे.. आणि पुढे श्लोक म्हणायचा.!

• दोन श्लोक थोडे सारखे वाटतात ते सारखे नसतात...
पण सारखे वाटल्याने थोडे चुकण्याचा संभव असतो,
ते श्लोक पुन्हा पुन्हा म्हणून चुकू नये अशी खबरदारी घ्यायची.
 
• काही श्लोक म्हणताना गडबड होते म आधीचा श्लोक, 
तो श्लोक आणि त्यानंतरचा श्लोक असे जोडून म्हणायचा, अनेकवेळा...

• एकटे गीता म्हणताना

पुस्तकात बघूनच गीता म्हणायची.


• प्रत्येक अध्यायाची सुरुवात... कोणी केली आणि
 पहिला श्लोक कोणता??? ते नीट करायचे, 
• अध्यायाच्या शेवटचा श्लोक कोणता
आणि अध्यायाचे नाव पक्के लक्षात ठेवायचे....

• श्लोक म्हणत असताना
कोणी आलेगेले, 
कोणी मोठ्याने बोलले
 तरी आपण श्लोक पुढे चालू ठेवायचा...
-------------------------------------------------

अध्याय अठरावा..
अतिशय छान पाठ असला पाहिजे..
पाठांतरच्या वेळी ..

चला झाली गीता पाठ असे होऊ नये.!

----------------------------------------------
अध्याय पहिला सुरुवात धुतराष्ट्र उवाच
हा एक श्लोक यांचा आहे फक्त.!

संजय यांचे अधेमधे श्लोक आहेत... 

तर ते नीट करायचे,


-------------------------------------------------
सञ्जय उवाच
१ | २४
एवमुक्तो ऋषीकेशो गुडकेशेन भारत ।
सेनयोरुभयोर्मध्ये 
स्थापयित्वा रथोत्तमम् ।।
-------------------------------------------------
१ |४७
एवमुक्त्वार्जुनः सङख्ये 
रथोपस्थ उपविशत्
विसृज्य सशरं चापं 
शोकसंविग्नमानः
(शेवटचा श्लोक)
--------------------------------------------------
२ | ९
एवमुक्त्वा हृषीकेशं
गुडकेशः परंतपः
न योत्स्य इति गोविन्द
मुक्त्वा तूष्णीं बभूव ह ||
--------------------------------------------------

११ | ९

एवमुक्त्वा ततो राजन्
महायोगेश्वरो हरिः
दर्शयामास पार्थाय
परमं रूपमैश्वरम्
--------------------------------------------------
११ | ३५

एतच्छ्रुत्वा वचनं केशवस्य
कृताञ्जलिर्वेपमानः किरीटी ।
नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णं –
सगद् गदं भीतभीतः प्रणम्य ।।

हे श्लोक चांगले लक्षात ठेवावे...

 थोडी गडबड होण्याची शक्यता असते...
--------------------------------------------------
तसे शेवटचे पाच श्लोक संजय यांचे आहेत,
 ते छानच म्हणता आले पाहिजेत.!
--------------------------------------------------
प्रत्येकाची म्हणण्याची पद्धत वेगळी असते,
कुणी वेगात म्हणते,
 कुणी हळू म्हणते, 
कुणाची चाल वेगळी असते, 
कुणी आठ अक्षरानंतर किंचित pause घेते,
 कुणी सोळा अक्षरे एका दमात म्हणते,
या बरोबर आपल्याला जुळवून घ्यावे लागते.!
--------------------------------------------------

मी रोज गीता म्हणण्यापूर्वी...


ॐ पार्थाय प्रतिबोधितां...

ध्यानम् श्लोक
गीतामाहात्मम्
असे म्हणते.!
--------------------------------------------------

गीता पाठ झाली.
आता काही श्लोक अर्थ,
काही शब्द अर्थ बघते.

सकाळी उठल्यानंतर..
गीतामहात्म्य वाचते, 
संपूर्ण अध्यायाचा अर्थ वाचते....
--------------------------------------------------

गीता वाचताना काही गोष्टी लक्षात येऊ लागल्या
(इतके दिवस पाठांतर एवढेच ध्येय होते)

--------------------------------------------------

Monday, 16 July 2018

गीता पाठ झाल्यानंतर...



गीता पाठ झाल्यानंतर...

काही ठिकाणी अडखळले जाते...
का?? काही साम्य?
असे बघितले
तर थोडे साम्य आढळले
तर ते श्लोक पॉईंट आऊट केले
आणि एका वहिवर लिहून काढले... ते पुढील प्रमाणे.

१ | २८  , ११ | ५१
१ | ३८ , १ | ३९
२ | ३३ , २ | ३९
२|४८ , १८|२६ , ४|२२
२ |५८ ,२ | ६८
३ | २३ , ४ | ११
४ | ६ ,  ९ | ८
४ | ३१ , ४ | ४०
६ | २९ , १२ | ४
६ | २९ , ६ | ३१
६ | २४ , १२ | ४
६ | १४ , ६ | २७
६ | १५ , ६ | २८
६ | ७ , १२ | १८
८ | ८ , १२ | ९
८ | ७ , १८ | ६८
९ | ३४ , १८ | ६८
९ | १६ , ९ | २४
१२ | १६ , १४ | २५
१६ | २३, १७ | १
१६ | ७ , १८ | ३०

असे काही श्लोक आहेत
जे मी वहीत पाच पाच वेळा लिहिले आहेत.

अजून एक आहे
५ |९ आणि १३ | ८
खरे साम्य काही नाही तरी माझा सध्या गोंधळ होतोय

असे मी श्लोक अनेक वेळा म्हणते.
गीता..

        श्रीभगवानुवाच

कालोऽस्मि लोकक्षयकृत्प्रवृद्धो

  लोकान्समाहर्तुमिह प्रवृत्तः ।

ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे 

  येऽवस्थिताः प्रत्यनीकेषु योधाः ।।

११| ३२


श्री भगवान म्हणाले,
जगतांचा विनाश करणारा काळ मी आहे. 
आणि सर्व लोकांचा संहार करण्यासाठी
 मी या ठिकाणी आलो आहे. 
तुझ्या व्यतिरिक्त 
(पांडवांव्यतिरिक्त)
 दोन्ही सैन्यातील 
सर्व योद्ध्यांचा विनाश होणार आहे.

------------------------------

गीता वाचत असताना

 सुप्रभात... 

आज गीता वाचत असताना एक गोष्ट लक्षात आली...


१. जेव्हा जेव्हा आपण देवाय तस्मै नमः ...
असे म्हणतो , 
देवळासमोर  आतील मूर्तीला नमस्कार करतो तेव्हा तेव्हा... 
बहुतेक उजव्या हाताने नमस्कार करतो तेव्हा

 स्वाभाविकपणे हात हृदयाकडे जातो, 

म्हणजे 
एकतर तो मनापासून नमस्कार असतो 
आणि दुसरा विचार..  
आपल्या अंतरात स्थित असलेल्या परमेश्वराला नमस्कार असतो, 
असे असेल का?

गीता महात्म्य .. वाचताना

पक्षी आपल्या पिलांचे संगोपन केल्या नंतर 
विसरून जातात कि हि आपली पिले आहेत, 
आणि पिलांनी एकदा भरारी घेतली कि 
आपले आई वडील,
 यांनी आपले संगोपन केले हे विसरून जातात... 
( प्राणी सुध्दा)

जसे आपण बाळ असताना आपला आधीचा जन्म विसरतो.!

त्यासाठीचा काळ झोपेत जातो.. 
झोपेत आपण हसतो, रडतो
 काहीवेळा चेहऱ्यावर भाव येतात...
असे असेल का???
असे विचार मनात आले..

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Friday, 13 July 2018

तुर्तुक. ... येथे जाताना...



या सुंदर गावाबद्दल ऐकले होते, कधी येथे जातो असे होऊन गेले होते,
वाटेत जे काही दिसते ते डोळ्यात साठवून ठेवत होतो, काही ठिकाणी फोटो, चालत्या गाडीतून कधी गाडीचालक म्हणाला उतरायच का... तर उतरून फोटो काढत होतो... 
माझी खूप इच्छा प्रबळ होती लेह लडाख बघण्याची.!
 हिमालय दर्शन. 
मिलिटरीच्या गाड्या ओळीने जाताना बघण्याची, 
जवानांबरोबर बोलण्याची, काय आहे सियाचीन.. 
 काराकोरम डोंगर रांग बघण्याची ,
 येथील लहरी निसर्ग बघण्याची.! 
येथील काय असेल जनजीवन हे जाणून घेण्याची...
लेह येथून निघालो आणि सुंदर असे ठिकाण नुब्रा व्हॅली..  हुंडर येथे आलो,
 जेथे उतरलो तेथून सियाचीन डोंगर दिसत होता, 
मागेच हेलिपॅड
विमान लँडिंग दिसणार
.. हे गाव पायी फिरताना छान वाटले... 
अनेक गोष्टी ऐकत, कानात साठवत मस्त वाटत होते...

 हुंडार हे ठिकाण (cold desert) थंड वाळवंट, 

तसेच अतिशय सुंदर (sand dunes) वाळूच्या देवता

  या साठी प्रसिद्ध. 
दूरवर एकीकडे पाकिस्तानचे डोंगर तर
 दुसरीकडे चीनचे.
आज तापमान किती असे विचारता त्यांनी सहज सांगितले...

 ज्यादा नही 5 है .... नॉर्मल.!!

 मधोमध असलेल्या व्हॅलीत आम्ही.
 जेथे उतरलो तेथे समोरच सुंदर शेती
 आणि जेवणामध्ये येथील भाजा, भाज्यांचे सुंदर असे सूप.!

सकाळी तुर्तुकच्या दिशेने निघालो. 
  
निघाल्या पासूनच वाटेत 
 इंडियन आर्मीचे ट्रक जरा जास्तच संख्येने दिसू लागले होते.  
 जे मी सिनेमात बघितले तसे.!
 जसजसे पुढे जाऊ लागलो तसतसे
 रस्त्याच्या कडेने

 photography prohibited area

 ह्या आशयाच्या पाट्या दिसू लागल्या. 


 Strickly no stopping area , Tresspassers will be shot dead  ह्या पाट्या दिसायला लागल्या. 
 तो होता सियाचिनला जाण्यायेण्या साठीचा एअरपोर्ट. 
अतिशय सेन्सिटिव्ह एरिया. 
आणि गाडीचालक सूचना देत होताच

. अभी फोटो खिंचना मना है.!

 किधर भी रुकनेका नही.!


    हळूहळू तुर्तुक गाव जवळ येऊ लागलेले
. सोबतीला वहात होती ती Shyok नदी अगदी तुर्तुक पर्यंत.

 Shyok?

 कधी शाळेत असताना वाचल्याचे आठवत नाही.!
 होय shyok हेच नाव ह्या नदीचं.
 It's a river of death.
 तिचं नाव हे का ते इथून जाताना कळते.
 कडेने उंचच उंच डोंगर,
 कधी अख्खा कोसळून संपूर्ण परिसर एका क्षणात बदलून जाईल माहीत नाही.
 एकही झाड नाही की सभोवताली चिटपाखरू नाही.
 नदीचा वेग असा की भारतातून थेट पाकिस्तानातच जाऊन पोचते....
गाडी चालक याना विचारले कि 
या नदीतून प्रवास करतात का?? 
किती वेळात पाकिस्तान.! 
ते म्हणाले आधा घंटा .!

लोक मासेमारी करतात पण 

कोणी तिकडे जाण्यासाठी उपयोग करत नाहीत.! 
(आपले लोक तिकडे जात नाहीत, कदाचित हालहाल करून मारत असतील)

 “Your Lifetime Experience Is Our Daily Routine”


हे khardung La येथे 
 लिहिलेल्या वाक्याचा अर्थ येथून गाडी जात असताना
 आणि गाडीचालक माहिती देत असताना आला.

आम्ही गाडीतून हा परिसर बघितला
गाडीचालक माहिती देत होता... सगळी

कानात साठवत होतो.
एक किमी वर पाकिस्तान बॉर्डर...
धस्स होत होते,
पाषाण हृदयीं माणसे
उगाच त्यांना काफर नाही म्हणत.
युद्धाचे नितिनियम न पाळणारे..

यासाठी आपले जवान किती अलर्ट राहतात...

किती आणि काय बघायला ऐकायला मिळाले...
किती खडतर प्रशिक्षण पूर्ण करून असे जोखमीचे काम करतात...
लडाखी लोक सैन्यात जाण्यासाठी किती धडपड करतात,
ज्यांना काही कारणाने सैन्यात भरती होता येत नाही
 ते तरुण जवानांना रसद पुरवण्याचे काम करतात,
 काही आपल्याला या भागात फिरवण्याचे काम करतात.
 गाडीतून, किंवा गाईड म्हणून.!
******************************

तुरतुक भागात 500 घरे आहेत  ते स्वतःला बाल्टी म्हणतात.
 त्या गावाचे भागाचे नाव बाल्टीस्तान आहे.!
तेथे प्रत्येक घरातील तरुण आपल्या सैन्यासाठी काहींना काही काम करतो,
सर्व घरे मुस्लिम आहेत.
तरी त्यांना आपल्या हिंदुस्थान बद्दलच प्रेम आहे.

१४ डिसेंबर १९७१ च्या रात्री ते पाकिस्तानी होते

(हा भाग पाकिस्तान चा भाग होता)

१५ डिसेंबर सकाळी ते भारतीय झाले

आपल्या आर्मीने हा भाग जिंकला...

 (आता ते आपलेच आहेत, आपल्या जवानांसाठीच काम करतात)
 जेव्हा आपल्या आर्मी ने हा भाग जिंकला तेव्हापासून.! 
आर्मी बद्दल गौरवोद्गार काढतात.!
येथे NGO काम करतात... कुणीही येथे जाऊन काम करू शकते
********************************
त्यांचे नातेवाईक जे पाकिस्तान मध्ये राहतात
 ते म्हणतात तुम्ही कधीही इकडे येऊ नका,
येथील लोक चांगले वागत नाहीत.

आपल्याकडे मॅरेथॉन होते तेव्हा 30 जवान त्यात भाग घेतात
 1 महिना सराव करण्यास येतात 
त्यांना मुंबईचे आकर्षण नाही, 
त्यांना येथील हवामान आवडत नाही.
ते इथे रमत नाही.
आपण या भागांना भेट देतो तेव्हा... 
आपल्याला हवामान केव्हा सूट होईल ते बघून जातो, सहल ट्रिप म्हणून.! 
पण जेव्हा प्रतिकूल हवामान असते तेव्हा ...
 कसे काय काम करत असतील???
असो...
वाटेत काही स्मृती स्तंभ/ शीला दिसत त्या वीर जवान यांच्या स्मृती साठी
त्यांनी जेथे कामगिरी केली तेथे स्मृती , कोणती कामगिरी केली...
ते लिहिलेले असते

असे वाटेत दिसत होते... गाडीचालक तेथे माहिती देत..

आपोआप नतमस्तक व्हायला होत होते.!

 डोळ्यातून अश्रू येत.

मनोमनी सलाम करत होतो,

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

 जय हिंद म्हणत होतो...

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::: 

बडा बुद्ध

 




हुंडर 

तुर्तुक  उतरलो ते ठिकाण

Monday, 2 July 2018

गुलमोहोर...


      उन्हाळ्यात, पाणी कमी असलेल्या जागी, समुद्रकिनारी फुलणारा गुलमोहोर.!

याची कोवळी पाने फारच सुंदर रंगाची असतात, आता लॅबर्नम वाळू लागला डार्क चॉकलेटी शेंगा दिसू लागला.. (या शेंगा आकाराने छोट्या असतात.) 

     आणि गुलमोहोर मात्र फुलू लागला , फुलाला पाच पाकळ्या असतात.. मध्येच केशरी पिवळी छटा असते. फुले गळतात, असे म्हणण्यापेक्षा  याच्या पाकळ्या गळतात आणि सडा पडतो, फुलांना कोणताही वास नसतो, नाही देवाच्या पायाशी, नाही फ्लॉवर पॉट मध्ये... पण रस्ता कडेने ओळीने असणारे हे झाड याच्या खास रंगाने लक्ष वेधून घेते. जसा लालभडक रंग तसा केशरी रंगाची फुले असलेली झाडे बघितली आहेत. अगदी शेंड्यावर फुले असतात, आणि इतका बहरतो तेव्हा पाने आहेत कि नाहीत असे वाटते. आणि जेव्हा बहर ओसरतो तेव्हा मस्त कोवळी पोपटी पाने दिसतात... पाने छोटी छोटी असतात.. चिंचेच्या किंवा गुंजेच्या पानांसारखी.!!!

याच्या शेंगा चॉकलेटी रंगाच्या साधारण दीड दोन फूट लांब असतात त्या खुळखुळ वाजतात, पूर्वी ट्रिप मध्ये गाणी म्हणताना वाजवल्याचे स्मरते.! 

या शेंगा मागील वर्षाच्या फळापासून बनतात.

याची मुळे जमिनीवर उथळ असतात...

 त्यामुळे वादळ वारा सुटला तर झाड उन्मळून पडते...

रस्त्याच्या कडेने नैसर्गिक फ्लॉवर पॉट.!

आता बाकी उन्हाळी फुलांचा सिझन संपला आहे आणि गुलमोहोर बहरू लागला आहे....

अगदी लक्ष वेधून घेतोय.!!

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::