Thursday, 4 October 2018

नमस्कार करावा परमात्म्याला...

सकाळी जाग आली कि उठून बसावे, 
आणि दोन्ही हात जोडून
 नमस्कार करावा परमात्म्याला...
आणि त्याचे आभार मानावे, आजची सकाळ दाखवली...
 म हाताची ओंजळ करावी... आणि 

कराग्रे वसते लक्ष्मी

कर मूले सरस्वती

करमध्ये तू गोविंद 

प्रभाते कर दर्शनम


हा श्लोक म्हणावा.

आपला हा आरसा आहे

आपल्या तब्येतीचं दर्शन यात होते...
तसेच.. कोणालाही दान देतात ते पसाभर, ओंजळभर.!!!
आपल्याला जे अन्न लागतं ते खरतर ओंजळभर पुरतं, 
पाणी पितो ते सुध्दा ओंजळीने, आणि याने आपली तहान भागते.
सर्व कामे हाताने करतो...
असे शांततेत बसले कि आपल्याला दिवसभर कोणती कामे करायची आहेत याचा विचार करायला वेळ मिळतो, 

देवाचे त्या जगन्नियंत्याचे नाम आपोआप ओठी येते.

~~~~~~~~~~~~

हात... मैत्रीचा आश्वासक हात खांद्यावर असतो,

ओळख करून देताना, भेट झाली कि आपण हस्तांदोलन करतो,

भविष्य दाखवायला हातच पुढे करतो.

आणि निरोपासाठी सुध्दा हातच हलवतो..

हाताचा स्पर्श खूप काही सांगून जातो.

आहे मी पाठीशी म्हणून सुध्दा आपण पाठीवर हातच ठेवतो.
(त्यावेळी काही बोलले नाही तरी चालते).

हातावर महत्त्वाचे पॉईंट असतात ते प्रेस केले तरी आजारपणात आराम मिळतो..

दोन्ही तळवे एकमेकांवर घासून 
ते जर चेहऱ्यावरून फिरवले तरी
 आपला थकवा निघून जातो..

कोणताही आनंद झाला तरी आपण टाळ्या वाजवतो,
देवाची आरती करताना वाजवतो त्या टाळ्या...
( टाळ्या वाजवताना तळहातावरील पॉइंट्स प्रेस होतात )

अगदी सख्खी भावंडे स्वभाव सारखे नाहीत 
हे सांगताना सुध्दा उदाहरण देतो ते...
 हाताची बोटे सारखी नसतात..

एखादा  छान मदतनीस याचा उल्लेख करताना
 हे अगदी माझा उजवा हात आहेत असे म्हटले जाते.

एखादी गोष्ट केली नाही , 
माहित नाही यासाठी म्हण आहे तर हात वर करणे...

काहीही काम करायचे नसेल तर म्हणतात हाताची घडी घालणे.

एका हाताने केलेले दान दुसऱ्या हाताला कळता काम नये.

कुणाशीही लढा देताना म्हणतात दोन हात करणे.

हाताला हस्त, कर... म्हणतात..
सगळी कामे हाताने करतो म्हणून
 हाताला 'कर' असे म्हणत असतील?

असे अनेक...


~~~~~~~~~~~~

म आपण धरणी मातेवर पाय ठेवण्यापूर्वी म्हणतो,


समुद्रवसने देवी

पर्वतस् तन मंडले

विष्णू पत्नी नमॊस्तुभ्यं

पादस्पर्शम क्षमस्वमे...

 

 


हे माते मी आता माझे पाय तुला लावणार आहे
तू मला क्षमा कर..
तू मला अन्न पाणी देतेस
जे काही सूक्ष्म जीव यावर आहेत त्यांची न कळत हत्या होईल , तू मला क्षमा कर...

या दोन श्लोकातून आपल्याला कष्ट करा,

 आणि चूक होवो वा न होवो कुणाचीही माफी मागा...

असे आपल्याला पूर्वजांनी संदेश दिले आहेत.

पूर्वी श्लोक म्हणून मुलं ते म्हणत...
 पण आता वेळ नाही आणि माहित नाही,
म्हणून म्हटले जात नसतील,
 पण त्यामागील भाव महत्त्वाचा आहे.

नव्या जुन्याची सांगड घालत श्लोक म्हणायला काय हरकत आहे...

ज्यांना माहित आहे त्यांनी  म्हणावा,
 आपोआप घरातील लोकांनाच पाठ होईल.

श्लोक म्हटल्याने शब्दोच्चार स्पष्ट होतात.


असो आपले दोन श्लोक. आणि त्यावर सुचलेले असे बरेच..

No comments:

Post a Comment