Tuesday, 11 August 2015

काही खटकणाऱ्या गोष्टी


कोणाचे श्रद्धास्थान असते, त्याबद्दल ती व्यक्ती बोलत असते, तिची खिल्ली उडवली जाते, 
विरोधी बोलले जाते.


चलनी नोटांवर कोणाचा फोन नं. पत्ता इ. लिहिले जाते. ते योग्य वाटत नाही.


दिलेली वेळ पाळली जात नाही, आणि त्याबद्दल दिलगीरी, एखादा फोन पण केला जात नाही.

आपल्याला कोणाकडे जायचे असेल तर ज्यांच्याकडे आपण जाणार त्यांना
 फोन करून वेळ आहे किंवा नाही याची खातरजमा करून न घेता अचानक त्यांच्याकडे जाणे.

रेल्वे प्रवासात काही groups जसं काही आपणच फक्त प्रवास करत आहोत अशा प्रमाणे वागतात,
 याचा त्रास सहप्रवाशांना होतो हे त्यांना जाणवत सुद्धा नाही.

हल्ली पाठीवर सॅक असते, प्रवासात या सॅकचा कोणाला त्रास तर होत नाही ना!!!!!
याचा विचारही करत नाहीत,

(ही सॅक खूप लागते, आणि ते सॅक पाठीवर असते त्याला जाणवतही नाही)

नाट्यगृहात प्रथमच सुचना असते, आपले भ्रमणध्वनी बंद ठेवावेत, 
तरीसुद्धा मोबाईल वाजतो आणि त्यावर बोलले जाते. 

नाटक, चित्रपट सुरू असतांना गप्पा मारतात, त्यातील संवाद,
 पुढे काय होणार ते पण बोललं जातं. मग सांगायची वेळ येते. की बोलू नका.

No comments:

Post a Comment