Sunday, 30 August 2015

सुंदर सकाळ

सुंदर सकाळ

     सकाळी लवकरच जाग आली. पाऊस पडून गेलाय, म्हणजे फिरायला जायला मिळणार तर....
लगेच तयार झाले आणि निघालेच. मस्त झुंजुमुंजु वातावरण!!!! 
 आकाशाचा सुरेख निळसर रंग मन मोहवित होता. गायवासराचे दर्शन घेतले  आणि पुढे निघाले. रस्ते मस्त ओलसर, स्वच्छ! बाबुलनाथ मंदिराच्या कळसाचे दर्शन घेतले.
 कळसावर असलेली भगवी पताका... छान वाटत होत.
समुद्रकिनारी आले तो पर्यंत छान उजाडलं आणि आता केव्हाही पाऊस येईल असं वाटू लागलं.
 पण समुद्र मात्र अथांग, शांत दिसत होता. 
 तेथील ढग मात्र पावसाने पुर्ण भरलेले! त्यामुळे पाण्याचा रंग तसाच काळसर, राखाडी!
 गेले नेहमीच्या ठिकाणापर्यंत. सूर्यदर्शन होणार नव्हतंच.
      पावसाला सुरूवात झालीच. आणि तिकडे मोठा बसथांबा. 
जशी समुद्राची विशालता तसाच हा बसथांबा विशाल, सुंदर!!!
सहज १०० लोक आडोशाला थांबले. काहींना बसायला पण मिळाले.
 पण सगळेच फिरण्याच्या मनस्थितीत त्यामुळे कोणीच कोणाशी बोलत नव्हते. 
पाऊस केव्हा थांबेल याची वाट पाहत होते.
तेवढ्यात तेथे एक व्यक्ती आली, हातात अत्तराची कुपी होती,
 पटापट चारपाच जणांना अत्तर लावले.
 ती जागा मस्त सुगंधी झाली.
मनात विचार आला की आपण देवाला पुजेच्या वेळी अत्तर लावतो,
 मेसेज वाचतो की ओंजळीत फुले घेतली तर आपल्या हाताला पण सुगंध येतो...
असेच छान विचार येत होते...
अरे, बस आलीच की!!! पटकन बसमधे चढले.
तर देवळापाशी सुंदर दृश्य!!
गाय उभी आहे आणि 
ते छोटं बछडं तिच्या पोटाखाली आसऱ्याला उभं आहे, 
त्याला पर्याय सापडलाय.
 आपलं मुल असेल तर ते आईचा पदर घेतं डोक्यावरुन!!!
हो ना!!!

Monday, 24 August 2015

औंढ्या नागनाथ...


१२ ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग....

नागेशं दारुकावने....
 औढ्या नागनाथ
परभणी येथुन निघालो आणि साधारण साठ किमी वर मंदिर....
प्रथम दर्शनीच अंबरनाथ मंदिराची आठवण झाली.
हे मंदिर पांडवकालीन आहे, पाचहजार वर्षापुर्वीचे आहे.
एकाच शीळेतील सुंदर कोरीवकाम केलेले अप्रतिम मंदिर!!!!!
श्रावण महिना, आणि शंकराचं दर्शन.....
गाभाऱ्यात भगवान शंकराची शेज, ते दर्शन घेतले.
आणि तेथेच थोडं उडी मारुन खाली रांगतच शंकराचे दर्शन घेतले,
 एक वेगळाच अनुभव आला.
दर्शन झाल्यावर दोन माणसांच्या मदतीने वर आलो 
आणि मंदिराच्या बाहेर आल्यावर प्रदक्षिणा घातली.
येथील वैशिष्ट्यं म्हणजे येथे पूर्ण प्रदक्षिणा करता येते. 
तसं पूर्ण प्रदक्षिणा घातली.
    तेथे शाळेत शिकणारे विद्यार्थी मंदिराबद्दल खुप सुंदर माहिती सांगतात. 
 ती ऐकली. 
येथे संत नामदेवांचे मंदिर आहे. आणि विशेष म्हणजे पंजाबी लोक येथे दिसले.
आम्ही २१ ऑगस्ट, शुक्रवारी येथे गेलो होतो.

योगेश्वरी दर्शन


सुंदर झाली यात्रा आणि देवदर्शन.
आणि हो प्रवास सुद्धा.
सगळ्यांसाठी उत्तम आरोग्य, सुखसमाधान मागितले.
सगळ्यांचा नमस्कार सांगितला.
देवीच्या गाभाऱ्यात जवळ जवळ अर्धातास उभं रहायला मिळाले, शांतपणे!
मी गेले तेव्हा तेथे कोणीच नव्हते.
छान ओटी भरता आली. मंदिराच्या गाभाऱ्यात समोरच योगेश्वरी देवी!
सुंदर, प्रसन्न, शांत पहात रहावं असं रुप आहे.
उजव्या हाताला तुळजाभवानी आहे.
मग बाहेर ओट्यावर बसलो.
  त्यानंतर २ किमी वर असलेल्या मूळ योगेश्वरीला गेलो,
 तेथे प्रथम रेणूकामातेचे दर्शन घेतले. मग मुख्य योगेश्वरे देवीचे दर्शन घेतले.
तेथून परळीला गेलो. वैजनाथ दर्शन घेतले. 
श्रावण महिना आणि देवांचे देव महादेवाचे दर्शन!!!
अप्रतिम!!!!! दर्शन
खरंतर हा बीड जिल्हा.
अंबाजोगाई हे गावाचं नाव
आणि देवी... योगेश्वरी देवी
परळी हे गावाचं नाव आणि
वैजनाथ हे शिवाचं नाव.
पण लातुर येथुन फक्त ४० किमी अंतर आहे.
 पण आम्ही परभणीला उतरून अंबाजोगाई येथे गेलो.
सुंदर निसर्ग सौंदर्याने नटलेल्या परिसरात मूळ योगेश्वरी देवीचे मंदिर.
पण प्रथम दिसतं रेणूकामातेचे मंदिर...
पायऱ्या उतरून खाली योगेश्वरी देवीचे मंदिर.
आणि प्रथम मंदिर आहे - श्रीगुरुदेव दत्त
खुप सुंदर आहे मुर्ती!!!!! 

 मूळ योगेश्वरी मंदिर योगेश्वरी देवी











  गाभाऱ्यातील देवी
येथे शांतपणे उभी राहिले

  रेणुका माता 

खुप दिवसांनी मॉर्निंग वॉक...


आज १७ ऑगस्ट

आज खूप दिवसांनी मॉर्निंग वॉकला निघाले.
मस्त सकाळ!!!
पण....
चांगलं काम करायला सुरुवात केली की अडथळे येतातच.
कोणीतरी म्हणालं की मायादेवी असते ती आपल्याला चांगल्या कामापासून परावृत करते,
 तर हा क्षण टाळता आला पाहिजे.
तर बारीक पावसाला सुरूवात झाली. पर्याय होताच की समोर. नाना चौक फ्लाय ओव्हर ब्रीज!!
वर गेले आणि मस्त चालायला सुरुवात केली. भरलेलं आभाळ आणि मधेच पुर्वेला छान सोनेरी आभाळ!!! जेथून सुर्योदय होत आहे. असं सुंदर दृश्य!!!!
ग्रँटरोड ब्रीज छानच दिसत होता .. या पार्श्वभूमीवर!! स्वच्छ, शांत, निवांत!!!
चालतांना मदारी दिसला. सोबत छोटसं माकड!
 त्याला काढून दिलेले डाळिंबदाणे दिले होते.
 तर त्याने ती पुडी भिरकावून दिली होती.
 मनात विचार आला.... जर याला अख्खं डाळिंब दिलं असतं तर.... पटापट ते फस्त असतं!!!
     मग पुढे आले आणि बाबुलनाथ मंदिराच्या कळसाचे दर्शन घेतले.
 असंही आज पहिला श्रावणी सोमवार!!!
     मग आजपासून केली आहे सुरूवात मॉर्निंग वॉकला!!!!

Friday, 14 August 2015

आपला स्वातंत्र्यदिन!


१५-८-२०१५

आज भारतीय स्वतंत्रता दिवस. या दिवशी शाळेचे दिवस आठवतात. त्यावेळी आदर्श वेगळे,
म्हणजे क्रांतीवीर, थोर नेते, म्हणजेच देशासाठी ज्यांनी त्याग केला बलिदान केले ते आदर्श होते.
     आज देशप्रेम दाखवलं जातं तर तिरंगा विकत घ्यायचा, गाडीत लावायचा,
 मुलांच्या हातात द्यायचा, कपडे तीन रंगात घालायचे, असं दिखाऊ प्रेम!!!!
मग दुसऱ्या दिवशी ते ध्वज रस्त्यांवर पायदळी सुद्धा दिसतात. पण.....
ध्वजवंदन आपल्या भागात असेल तर तिकडे जात नाहीत.
आपले राष्ट्रगीत लागले तर स्तब्ध उभे राहत नाहीत.
राष्ट्रगीत लागले तर ते स्वतः म्हणत नाहीत.
आपले राष्ट्रगीत, वंदे मातरम्
हे प्रत्येकाला आलंच पाहीजे.
लहानमुले नीट उच्चार करतात का ते बघितलं पाहिजे.
ध्वज विकत घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचं काय करणार ते ठरवावं मगच तो  विकत घ्यावा.
ध्वजाचा पताका म्हणून वापर करु नये.

ध्वजाचा मान राखावा.

आपल्याला देशासाठी कोणते काम करता येईल ते नक्कीच करावे.
एकटा मी काय करणार?? हा विचार योग्य नाही,
थेंबे थेंबे तळे साचे याप्रमाणे आपल्यापासुनच सुरू करावी.
हा राष्ट्रीय सण आहे तर सर्वांना सुट्टी असते, तर 
सहलींचे आयोजन न करता जे काही आपल्या देशासाठी करता येईल त्याची सुरुवात करावी.
आपल्या आजुबाजुला जर कोणी त्यावेळचे स्वातंत्र्यसैनिक असतील तर त्यांची जरुर भेट घ्यावी.
 व त्यांचे अनुभव, मार्गदर्शन घ्यावे.
आपल्या देशालाच तीन वेगनेगळ्या नावांनी ओळखलं जातं.
भारत,
प्रतिज्ञा म्हणतांना पण म्हणतो,
भारत माझा देश आहे...
मेरा भारत महान!
मी भारतीय आहे.
भारतमाता की जय!
हिंदुस्थान.
सारे जहॉं से अच्छा
हिंदोस्ता हमारा
आणि
INDIA
I- independence
N- nation
D- declare
I- in
A- August.
****************************************************************

Thursday, 13 August 2015

चौरंग:


आता श्रावण सुरू होतोय तर बघूया 

 चौरंगाचं महत्त्व!!!!

       चार बाजुला,
       चार पायीला
       केळीचे खांब,
   चौरंगावरी मधे बैसले          
    
    सत्यनारायण!!!!!        
सत्यनारायणाची पूजा म्हटलं की चौरंग हवाच.
 केळीचे खांब बांधण्यासाठी खास सोय केलेली असते, 
किंवा खांबाच्या आकाराच्या बाटल्यात खांब ठेवतात. म्हणजे खांब हलत नाहीत.
    मंगळागौरीची पूजा,  हरितालिकेची पूजा,  लघूरूद्र,
म्हणजेच कोणतीही पूजा म्हटली की चौरंग हवाच.
     जावयाचा मान करतांना,
    विहिणीचा मान करतांना
    चौरंग हवाच!!!!!
फार पुर्वी पाहुणे आले तर त्यांचे ताट चौरंगावर ठेवत असत.
ही एक पाहुण्यांना मान देण्याची पद्धत होती.
आता चौरंगाविषयी:

लाल रंगाचा चौरंग,

तो सुशोभित करण्यासाठी काही वेळा तो पितळेच्या फुलांनी, चांदीच्या फुलांनी सुशोभित केलेला असे.
काही चौरंग ड्रॉवर असलेले असतात. म्हणजे त्यात पुजेचे साहित्य ठेवता येते.

त्याचे पाय सुद्धा वेगवेगळे असतात, 

चौरंगाचे पाय सरळ असतील तर खांब बांधणे सोपे होतेे,

पण काही चौरंगाचे पाय सिंहाच्या पायासारखे असतात.
 हा चौरंग थोडा उंचीला कमी असतो पण मस्त दिसतो, याला खांब बांधणे थोडे त्रासाचे असते.

लाकडी, शिसवी, पितळेचा सुद्धा चौरंग असतो. पण...
आता नविन जमान्याप्रमाणे सुंदर नक्षीकाम केलेले,
 व्हाईट मेटल वापरून सुशोभित केलेले चौरंग बघायला मिळतात.
हे चौरंगाचं आधुनिक रूप मन मोहवून टाकते.

बहुतेक प्रत्येक घरी चौरंग असतोच!!
पण नसेल आणि पूजेसाठी तो आणला गेला तर तो नुसताच परत देत नाहीत तर
 त्याबरोबर नारळ देण्याची पद्धत आहे.

Wednesday, 12 August 2015

ब्रह्मकमळ.....


ब्रह्मकमळ .... मस्त फुल!

पांढरं शुभ्र फुल!!
रात्री उमलतं आणि सकाळी ते मावळतं. हे त्याचं वैशिष्ट्यं!!!!
या झाडाला पानफुटी असं म्हणतात.
 नुसती झाडाची फांदी/ दांडी लावली की रोप वाढतं. पानाच्या एका भागातून दुसरं पान येतं. 
आणि आषाढ महिन्यात फुलं येतात. पण एखाद-दुसरंच फुल येतं असं मला वाटतं.
विरार-वसई-कर्नाळा याबाजुला ही झाडं घराच्या कुंपणाला लावतात. 
आणि रात्री ती फुलतात तर कोणी बघत पण नाहीत असं कोणीतरी मला म्हणालं.
पण आपल्याकडे एखाद फुल येतं मग त्याचं खुप कौतुक असतं. खुप लोक फुल बघायला येतात.
     पण असं म्हणतात की 
 खरं ब्रह्मकमळाचं फुल हिमालयात येतं, ऋषीमुनी त्याचा शोध घेतात 
आणि ते मिळालं की शंकराला वाहतात. असो,
   हे फुलणारं फुल  फुलतांना बघणं, 
त्याचा मंद सुगंध घेणं,
 फुललेलं फुल पहाणं हा एक आनंददायी सोहळाच असतो.
पानाच्या एका कडेतूनच कळी दिसायला लागते 
 कळी दिसायला लागल्यापासून साधारण पंधरा दिवसांनी फुल फुलतं.
 रात्री साधारण साडेसात पासुन कळीचं फुलात रुपांतर होतं. बारा वाजता ते पुर्ण उमलतं.









****************************************************

Tuesday, 11 August 2015

चहा .....

चहा .....

     सकाळी उठल्या उठल्या चहा पिणाऱ्यांना चहा लागतोच.
त्यात किती तऱ्हा असतात.
• कुणाला ताज्या दुधाचा ताजा चहा लागतो. 
त्यात पण कुणाला आयता मिळाला तर हवा असतो, तर कुणी स्वतः करून पितात.

• आता असा पहिला चहा पितांना कुणी आलं तर त्यातील अर्धा ते देत नाहीत, म्हणतात...
 थांबा हं माझा चहा पिऊन झाला की देतो.

• हा चहा पितांना कुणी मगात चहा पिणे पसंत करतात तर कुणाला कपबशीच हवी.

• पुर्वी तर चांदीच्या कपबशीमधून चहा प्यायला जायचा.

• काही ठिकाणी चहा ग्लासमधे मिळतो,

• कुणाला चहा लालसर हवा तर कुणाला पांढरट!!!!

• कुणाला प्युअर दुधाचा तर कुणाला पाणी दुध मिक्स!

• यात कुणी चहा, मसाला घालुन पितात तर कुणी आलं घातलेलाच पितात.

• कुणी कुणी अगदी गरमगरम चहा पितात, इतका गरम पितात की,
 (त्यांच्याबाबतीत असं म्हणतात की गॅसवरून सरळ यांच्या तोंडात चहा गाळावा.)
तर कुणी अगदी गार पितात.

• कुणाला चहा स्ट्राँग लागतो तर कुणी अगदी नावाला पावडर घालून जास्त न उकळवता पितात.

• कुणाला तर गुळाचा, काळा चहा आवडतो.

• कुणीकुणी एकाच ब्रँडचा चहा पितात.

• कुणाला कडक पण गोड चहा आवडतो, पण काहीजण साखर न घालताच चहा पितात.

• कुणाचं चहा हे अगदी दैवत असतं तर कुणी कधीच चहाची चवच घेतलेली नसते.

•  एकदा चहा पिऊन झाला की थोड्याथोड्या वेळाने दोन दोन घोट चहा पिणारे लोक असतात.
तर.... सकाळी एकदा मनाप्रमाणे चहा पिऊन झाला की परत ते चहा पित नाहीत.

• काही जण फक्त घरचाच चहा पितात.

• चहा पितांना काहीजण उभे राहून चहा पितात तर काहींना बसून जोडीला वर्तमान पत्र असेल तर....
 फारच छान!!!!!
(म्हणजे वर्तमान पत्र हवंच)

• बाहेर चहा पितांना काहीजणांना कटींग चहा प्रिय, तर 
काही ठिकाणी कटींगमध्ये पण कटिंग चहा मिळतो अशी तक्रार करतात.

• काही जणांना दुपारी अगदी ठरलेल्या वेळी चहा हवाच नाहीतर त्यांचं डोकं दुखतं, बेचैन होतात.

   काहीजण रात्री झोपताना चहा पिउन झोपतात  तर काहींना संध्याकाळनंतर चहा प्यायला कि झोप येत नाही.

    अनेकांना चहा प्यायला की काम करायला तरतरी येते. तर काही जणांना चहा प्याला की भूक लागत नाही,
   
     प्रवासात नुसतं पाणी न पिता काही चहा पितात म्हणजे उकळलेले पाणी प्याल्यासारखे होते.

• काहीजण चहा स्वतः पित नाहीत, पण चहा उत्तम करतात.

व्यक्ती तितक्या प्रकृती याप्रमाणे,
 एकाच घरातल्या व्यक्तींच्या चहाबाबतच्या सवयी निरनिराळ्या असतात.

• आलेल्या पाहुण्याचे स्वागत चहाच्या कपाने होते.
• खुप पाऊस पडत असेल तर गरमगरम चहासोबत कांदाभजी!!!
 मग काय पावसाचा आनंद द्विगुणित होतो.
कुठेही, केव्हाही, आवडीने प्यालं जाणारं पेयं म्हणजे चहा!!!

• जे चहाबाज असतात ना, त्यांना चहा घेणार का????
असं विचारलेलं आवडत नाही.
 (माहितीतले काका म्हणत की सवाष्णीला हळदीकुंकू लावते म्हटलं तर ती ते अव्हेरत नाही,
 तसं चहाबाज चहा म्हटलं तर नको म्हणत नाही)

• तर असं हे चहा पुराण!!!

आपल्यापण आजुबाजुला असे चहाबाबतचे किस्से असतीलच!
हो ना....
(आता ग्रीन टी, हर्बल टी... असे चहाचे प्रकार आहेतच).
{} {} {} {} {} {} {} {} {} {} {} {} {} {} {} {} {} {} {} {} {} {} {} {} {} {} {} {} {} {} {} {}

काही खटकणाऱ्या गोष्टी


कोणाचे श्रद्धास्थान असते, त्याबद्दल ती व्यक्ती बोलत असते, तिची खिल्ली उडवली जाते, 
विरोधी बोलले जाते.


चलनी नोटांवर कोणाचा फोन नं. पत्ता इ. लिहिले जाते. ते योग्य वाटत नाही.


दिलेली वेळ पाळली जात नाही, आणि त्याबद्दल दिलगीरी, एखादा फोन पण केला जात नाही.

आपल्याला कोणाकडे जायचे असेल तर ज्यांच्याकडे आपण जाणार त्यांना
 फोन करून वेळ आहे किंवा नाही याची खातरजमा करून न घेता अचानक त्यांच्याकडे जाणे.

रेल्वे प्रवासात काही groups जसं काही आपणच फक्त प्रवास करत आहोत अशा प्रमाणे वागतात,
 याचा त्रास सहप्रवाशांना होतो हे त्यांना जाणवत सुद्धा नाही.

हल्ली पाठीवर सॅक असते, प्रवासात या सॅकचा कोणाला त्रास तर होत नाही ना!!!!!
याचा विचारही करत नाहीत,

(ही सॅक खूप लागते, आणि ते सॅक पाठीवर असते त्याला जाणवतही नाही)

नाट्यगृहात प्रथमच सुचना असते, आपले भ्रमणध्वनी बंद ठेवावेत, 
तरीसुद्धा मोबाईल वाजतो आणि त्यावर बोलले जाते. 

नाटक, चित्रपट सुरू असतांना गप्पा मारतात, त्यातील संवाद,
 पुढे काय होणार ते पण बोललं जातं. मग सांगायची वेळ येते. की बोलू नका.

नमस्कार....वंदन... नमन


नमस्कार....वंदन... नमन

काही शब्द....
राम राम
राम राम पाव्हनं
जय राम जी की
नमस्कार
नमस्कार मंडळी
सप्रेम वंदे
सादर प्रणाम
साष्टांग दंडवत
शि. सा. न.
साष्टांग नमस्कार
आपण सकाळी जाग आल्यावर धरणी मातेला वंदन करतो. आणि आभार मानतो.
"हे धरणीमाते, तुझ्यावर आता आम्ही आमची पावले ठेवणार आहोत, तु आम्हाला अन्न, वस्त्र, निवारा हे सर्व देतेस!"
पंचमहाभुतांना नमस्कार करतो.
देवाचे आभार मानतो की, आजचा दिवस आम्हाला दाखवलास.

ज्यांच्या चरणी लीन व्हावे असे वाटते त्यांना आपण सहज नमस्कार करतो.

सुर्याला नमस्कार हा तर उत्तम सर्वांग सुंदर व्यायाम आहे.
सुर्याला अर्ध्य देणे,
 उगवत्या सुर्याला अभिवादन करणे हे सुद्धा नमस्काराचे प्रकार आहेत.

तसेच कोणाची माफी मागायची असेल तरी आपण नमस्कार करतो.
विनंती करायची असेल तरी नमस्कार करतो

काही वेळा आपण असं म्हणतो, तुला कोपरापासून नमस्कार करतो,
 मला माफ कर, किंवा माझं ऐक!!
किंवा पाया पडतो तुझ्या, पण माझं ऐक असं म्हणतो.

साधारणपणे वाकून नमस्कार करतात,
काही पुरूष साष्टांग नमस्कार करतात.
हल्ली मात्र गुडघ्याला हात लावून एका हाताने नमस्कार करतात

जेव्हा न वाकता नमस्कार केला जातो,
 तेव्हा स्वाभाविकपणे आपण थोडेसे कमरेतून झुकतो,
 दोनही हाताचे तळवे जोडले जातात, मान किंचित झुकते डोळे मिटले जातात.
यालाच आपण नम्रत्वतेने नमस्कार असं म्हणतो.

काही वेळा हात उंचावून सुद्धा झालेला आनंद, भेट हा सुद्धा नमस्काराचा प्रकार म्हणता येईल.

समवयस्क भेटल्यानंतर आलिंगन देतात ते सुद्धा नमन म्हणता येईल.

पाया पडू नको, भेटू एकमेकांना, म्हणून मिठी मारतात

तसेच समवयस्क, समविचारी, ऑफिसमधे भेटणारे, नव्याने ओळख होत असतांना हस्तांदोलन करतो,
 तो सुद्धा नमस्काराचा प्रकार म्हणता येईल.

मंदिरासमोरून जातांना केला जाणारा नमस्कार : उजवा हात कपाळाशी, मग हनुवटी-ओठापाशी,
 आणि मग छातीपाशी नेऊन मान झुकवतात.
वेगवेगळ्या धर्मात वेगवेगळे शब्द प्रकार असतील तर ते आत्मसात करावेत, 
व त्या धर्माचे लोक भेटले की तसे शब्द वापरावेत.

जय श्रीकृष्ण,
जय योगेश्वर

मुसलमान धर्माप्रमाणे
सलाम वालेकुम,
वालेकुम अत् सलाम!

हरे कृष्णा मंदिरात
हाक मारायची असेल तर, फोनवर बोलतांना...
हरी बोल..
हरे कृष्णा, दंडवत प्रणाम!
अशी सुरूवात करतात
मस्तच ना
आपण हरी ॐ
असंही आपण बोलतांना ऐकतो.

अशा अनेक प्रकारांनी नमस्कार, कृतज्ञता व्यक्त केली जाते.

Friday, 7 August 2015

।।बालक विहार विद्यालय।।


माझ्या शाळेचा स्नेह मेळावा

।।बालक विहार विद्यालय।।

माझी शाळा....

      बंध मैत्रीचे
  १ ऑगस्ट २०१५
बालक विहार विद्यालय
   माजी विद्यार्थ्यांचा
       स्नेह मेळावा...
डिसिल्व्हा हायस्कूल दादर
वेळ: संध्याकाळी ४ ते ८


३१ जुलैला झालेली गुरूपौर्णिमा,
१ ऑगस्टला असणारी लोकमान्य टिळक पुण्यतिथी,
आणि २ ऑगस्टला आलेला friendship day...
असे सुंदर औचित्य साधुन आमचा स्नेह मेळावा झाला. (१ ऑगस्ट रोजी)
(गेट-टुगेदर)
     माँटेसरी पासून ते १० वी पर्यंतचे संपूर्ण शालेय शिक्षण मी या शाळेत घेतले.
माझी शाळा गोखले रोड नॉर्थ, दादर येथे आहे.
     माँटेसरीचे वर्ग
आराम बिल्डिंग मध्ये भरत असत.
१९७५ या वर्षी' मी १० वी मॅट्रीकची पहिल्या बँचची विद्यार्थीनी!!!!!
१ ऑगस्ट २०१५ या दिवशी आमच्या शाळेचे सर्व माजी विद्यार्थ्यांचे गेट टुगेदर झाले.
 एवढ्या वर्षांनी प्रथमच हे गेट टुगेदर झाले असं मला वाटते.
  त्यादिवशी हॉलमधे १२०० विद्यार्थी होते. हजर असलेल्या विद्यार्थ्यात सर्वात जुने विद्यार्थी होते...
जगदिश धोपेश्वरकर...
बॅच होती १९४० ची.
आज त्यांचे वय ७८ वर्ष आहे.
(हे आराम बिल्डिंग मधेच राहतात.)
तसेच समाजात, निरनिराळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा
 सत्कार, गौरव करण्यात आला.
यामध्ये लक्षात राहिलेली नावे :
अभिनय क्षेत्रात असलेले सतीश पुळेकर,
विरार वसईच्या नगरसेविका वैद्य ,
नॅशनल लेव्हलचे खो खो पटू - बागायतकर, विवेक पडते,
लेखक- भूषण पालकर,
(आणि बरेच जण)

माझ्या बॅचचे १३ विद्यार्थी आले होते, सगळे मुलगे!!!!
आणि मुलींमध्ये मी एकटीच!
तर... हे माझे सगळे वर्गमित्र मला नावाने ओळखत होते.
 याचे मला खूप आश्चर्य वाटले कारण आज ७५ सालानंतर ते मला प्रथमच भेटत होते.
पण..... मी मात्र दोघांनाच ओळखू शकले.
मी आपली प्रत्येकालाच.. sorry .. म्हणत होते.
    जिकडे-तिकडे शाळांमध्ये गेट-टुगेदर होतात हे मी ऐकते त्याच्या गमतीजमती मी ऐकत होते ....
 या आनंदापासून मी वंचीत होते. पण १ ऑगस्ट २०१५ च्या संध्याकाळने मला हा आनंद मिळवून दिला. 
 आम्ही तीनही भावंडं या शाळेचे माजी विद्यार्थी!!!!! आणि हो,.... वहिनी प्रायमरी शिक्षिका!!!!

आणि तिघेही हजर होतो... वहिनीसुद्धा!

पण.... यादिवशी एक धक्कादायक बातमी कळली.
 शाळेत सध्या ८वी, ९वी, १०वी हे तीनच वर्ग भरतात.
तर परत शाळा पूर्ण भरण्यासाठी काय करता येईल???
 त्यासाठी काही मार्ग सुचवा!!! यासाठी हे गेट-टुगेदर होते.
आता ३ समित्या स्थापन केल्या आहेत 
व whatsapp च्या माध्यमातून संपर्क ठेवून काम करायचे ठरले आहे.

(शाळेला आर्थिक मदत नको तर शाळा पुन्हा विद्यार्थ्यांनी कशी भरेल? यासाठी सुचना, प्रयत्न हवे आहेत)

ंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंं

शाळा स्थापना: १९३६

आराम बिल्डिग, गोखले रोड नॉर्थ. दादर 


संस्थापिका : सरस्वतीबाई दीक्षित.
शाळेच्या मुख्याध्यापिका ...
सुधा साठे... यांनी M.A. पर्यंत शिक्षण घेतले होते.
वयाच्या १८ व्या वर्षीच त्या मुख्याध्यापिका झाल्या.
(या संस्थापिका सरस्वतीबाई दीक्षित यांच्या कन्या)

प्रदीप साठे सर:
 नेव्हीतून पोलीस डिपार्टमध्ये कार्यरत,
नेव्हीमध्ये दोन युध्दात सहभाग.

आताचे ट्रस्टी अजित साठे,
इंजिनिअर आहेत,
 ते कामानिमित्त परदेशात होते.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

 जगदीश धोपेश्वेरकर 

काही विचार ऐकलेले...

काही विचार ऐकलेले...
आपल्याला जे शिकायचं आहे ते शिकावे पण आई वडिलांची इच्छा आहे ते पण करावे.
आई वडिल सुखी समाधानी तर आपलं जीवन सुखी आनंदी!!!!!

ÖÖööÖÖööÖÖööÖÖÖÖööÖÖööÖÖööÖÖ

हे कलियुग आहे, तरीसुद्धा दिवसाचे तास चोवीसच आहेत.

पण..... त्यातील तेवीस तास रावणाचे आहेत तर एक तास रामाचा आहे.

तर हा एक तास चांगल्या कामासाठी द्या.

Ï ï Ï ï Ï ï Ï ï Ï ï Ï ï Ï ï Ï ï Ï ï Ï ï Ï ï Ï ï Ï ï Ï ï Ï ï Ï ï Ï ï Ï ï Ï

जे काम करतांना लपून, कोणालाही न सांगता करावेसे वाटते ते चुकीचे असू शकते.




क्षमा





एक मस्त विचार.....

सहज गप्पांमध्ये एकजण म्हणाले की,
      जे आपलं श्रद्धास्थान (अर्थात देव) असेल त्यासमोर उभं राहावे.
 व आपण कोणाबद्दल काही वाईट बोललो असु, व्यंगावर हसलो हसु,
 कोणाचे वाईट चिंतले असेल, वाईट विचार मनात आले असतील तर
 दररोज, आठ दिवसांनी, महिन्यांनी केव्हातरी देवासमोर उभे राहून 
त्याची कबुली द्यावी.
 मला हा विचार खुप आवडला!!!!
यामुळे बहुतेक आपल्या विचारात, स्वभावात बदल होऊ शकेल.
म्हटलं तुमच्याबरोबर हा विचार बोलुया... आणि जाणुया तुमचं पण मत....

मला वाटतं ख्रिश्चन धर्मात चर्चमधे फादर समोर कन्फेक्शन देतात.

हिंदु धर्मात पापक्षालन करण्यासाठी गंगा नदीचे स्नान करतात.
(तीर्थयात्रा करतात)
पण स्वतः बोलल्यामुळे आपल्या विचारात नक्की बदल होईल असं मला वाटतं.

़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़
संकलन :
सामान्य व्यक्तींमध्ये आपल्या हातून झालेल्या चुका कबूल करण्याचे धैर्य नसते.
खरंतर यामुळे आत्मशुद्धी होईल.
जी चूक कबूल करायला लाज वाटत असेल ती चूक करतांनाच लाज वाटली पाहिजे.
ंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंं
     देहरुपी देवळात जो अंतःकरणरुपी गाभारा आहे,
 त्यात बसून तेथे असलेल्या देवाजवळ खूप खूप बोला 
आणि बाह्य जगात वावरतांना लक्षात ठेवा की...
भाषण रुपे आहे तर मौन सोने आहे.

(Speech is silver, but silence is gold)

                       न्या. राम केशव रानडे.
•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•

वाचाल तर वाचाल




काय वाचले पाहिजे????
• आपण बसने प्रवास करतो, तर त्या तिकिटावर काय लिहिलेले असते?
 हे वाचावे आणि माहिती करून घ्यावी.

रेल्वेने प्रवास करतो, तर त्या तिकिटावर काय लिहिले आहे
 ते वाचले पाहिजे.

• आपल्या घरी इलेक्ट्रिक बिल येते ते वाचले पाहिजे व
 त्या विषयी माहिती करून घेतली पाहिजे.

टेलिफोन बिल : हे बिल वाचले पाहिजे.

जीवनविमा पॉलिसी काढतो, त्यात लिहिलेली माहिती वाचली पाहिजे.

• वस्तू खरेदी करतो, त्याचे बिल नीट वाचावे. 

• तसेच काही औषधं खरेदी करतो त्यावरील माहिती, वाचावी.
 त्यावरील मुदत कधी संपते ते जाणून घ्यावे.

• काही ठिकाणी अगदी बारीक अक्षरात लिहिलेले असते आणि
 त्याला *हे चिन्ह असतं. पण ते दिसत नाही आणि त्यामुळे आपण वाचत नाही
 तर.... भिंग घेऊन ते वाचावे. (ते महत्वाचे असते).
 
• कोणत्याही कागदावर सही करण्यापुर्वी तो वाचावा मग सही करावी.

चेकवर सुद्धा जे लिहिलेले असते ते काय???
 त्याची माहिती करून घ्यावी.

सेव्हिंग अकाउंट बुक वाचून बँकेच्या नियमांची माहिती करून घ्यावी.

फिक्स डिपॉझिटची पावती वाचावी,
 त्यात कस्ट आयडी, पावती क्रमांक वगैरे माहिती असते त्याबद्दल वाचावे.

पॅन कार्ड वाचावे व त्यातील एक एक अक्षर, अंक याबद्दल माहिती करून घ्यावी.

• अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्या हातात येतात
 पण आपण त्या वाचत नाही पण त्या वाचाव्यात व माहिती करून घ्यावी....

• काही खाद्यपदार्थ पॅकबंद असतात त्यावरील एक्सपायरी तारीख बघावी.

{} {} {} {} {} {} {} {} {} {} {} {} {} {} {} {} {} {} {} {} {} {} {} {} {} {} {}
 {} {} {} {} {} {} {} {}

फोर्जेट हिल.....


टॅक्सी.... टॅक्सी....

भाजी गल्लीच्या सुरूवातीला एक बाई टॅक्सी बघत होती आणि
 मी चकित होऊन त्या बाईकडे बघत होते.....
कारण फोर्जेट हिल तर...
हे इथे...... मग ????
टॅक्सी कशाला????
असा विचार मनात आला. मग म्हटलं बघुया जाऊन फोर्जेट हिलला !!!
म्हणजे कळेल का हवी टॅक्सी?
फोर्जेट हिलसाठी??
     संध्याकाळी निघाले... आणि छेः!!! दमच लागला चढतांना, काय हा चढ??
 तरीच ती टॅक्सी बघत होती.
मला नुसतं चालतांना एवढा दम लागत होता तर.... 
भाजी, सामान घेऊन चढणं खरंच कठीण आहे.
(म्हणतात ना लगेचच कोणाबद्दल पटकन मत बनवू नये.
 त्यामागे काहीतरी नक्की कारण असतं, आणि ते जाणून घ्यावं)
     तर.... अशा हिलवर जागा असणं हे खूपच छान!!!
(तेथे खूप इमारती आहेत).
पण त्यामागे काही समस्या असू शकतात, ज्या कालांतराने जाणवत असतील.
 किंवा त्या समस्या आहेत असं आपल्याला वाटत असेल !
असो त्या निमित्ताने फोर्जेट हिल थोडासा बघून आले.
आता कधीतरी प्रत्यक्ष ती टेकडी/ किंवा तो डोंगर चढायचा विचार आहे.
[] [] [] [] [] [] [] [] [] [] [] [] [] [] [] [] [] [] [] [] [] [] [] [] [] [] [] [] [] [] [] [] [] [] [] []