Sunday, 19 June 2016

उपवास....वडाची पूजा

उपवास....

उपास....असा आपण चुकीचा शब्द वापरतो

खरा शब्द...उपवास

उपवास म्हणजे देवाच्या सान्निध्यात राहणे...

तेवढेच आपण करत नाही.

○○~~○○~~○○~~○○~~○○~~

☆ अन्नात बदल करतो .. 

दिवसभर आपण आज उपास आहे उपास आहे असे बोलत राहतो.

☆ आणि हे उपासाचे पदार्थ.... नेहमीपेक्षा जास्त खातो.

☆ जे काही जणांना तब्येतीसाठी योग्य नसतात.

★ म उपवासासाठी पदार्थ कोणते???

फळं, दूध, लिंबु सरबत, नारळपाणी, काकडी,
दही ताक, आले वडी,
आलं लिंबु पाचक
असे आपल्याला सोसतील, असे पदार्थ....
पण आपण मात्र त्या उलट करतो....

★ आपल्या जिभेला आवडतात असे पदार्थ अगदी आवडीने खातो

□□   □□   □□   □□   □□   □□  □□  □□  □□

उपवास... जसं देवाजवळ राहणे

तसंच लंघन हा पण एक अर्थ आहे..

तसंच उपवास म्हणजे संयम.

*******************************

"उपवास" करणारे जेव्हा 'उपास' करतात तेव्हा 

त्याचा गाजावाजा होतो,

 लोक टिंगल करतात.

काय म आज...
● "एकादशी आणि दुप्पट खाशी आहे का????
● किंवा,.. आज कशावर उपास आहे???
● काही जण तर उपवास म्हणजे तक्रारीचा सूर लावतात.
● माझं आज डोकं दुखत आहे..
● हे दाणे सोसत नाहीत.
● नको असलेलं खावं लागत
● दोन दोन स्वयंपाक करावे लागतात.
● बटाटा साबुदाणा हे भारतीय पदार्थ आहेत का???
● कधी एकदा हा उपास संपतोय असं झालंय!
● भात जेवले कि बरं वाटेल..
कायकाय बोललं जातं.
● उपवास करणाऱ्याची चेष्टा केली जाते...

*******************************

म खाली दिल्या प्रमाणे उत्तर मिळू शकते
मी उपवास करते त्याचा तुम्ही कृपया उपहास करू नका...
तुम्ही आपला तुमचा तुमचा उपहार करा..

*******************************

आता आज वट पौर्णिमा...

पावसाला सुरुवात होते,
म हलका आहार घ्यावा,
म्हणजे पुढील काळ हा चांगला जावा.....
या साठी उपवास पूजा करतात...

*******************************

पूर्वी मुलींचे वय लहान असे व त्या मानाने नवऱ्याचे वय मोठे असे...
.म देव असं म्हणून तिला नवऱ्याचे दीर्घयु मागण्यासाठी पूजा करावी असे सांगितले असावे,
किंवा या निमित्ताने तिला घराबाहेर पडता येत असे.
नटून सजून बाहेर चार समवयस्क मैत्रिणीच्या मध्ये जायला मिळत असे.

<><><><><><><><><><><><><>

तसच...वडाची पूजा का??

✽ वडाच्या झाडाला भरपूर आयुष्य आहे,

✽ या झाडापासून जास्त प्राणवायू मिळतो,

✽ या झाडाचा विस्तार खूप मोठा असत

 तसच कुटुंब राहूदे 

✽ ✽✽  ✽✽  ✽✽ ✽✽  ✽✽  ✽✽  ✽

भगवान श्रीकृष्ण 

यांनी गीतेतील पंधराव्या श्लोकात प्रथमच असे सांगितले आहे कि...
वटवृक्ष हा असा एक शाश्वत वृक्ष आहे कि 
ज्याचे मूळ वर आहे आणि शाखा खाली आहेत 
आणि  

पाने वैदिक मंत्र आहेत.

जो या वृक्षाला जाणतो तो या वेदांना जाणतो.

*******************************

आता या वृक्षाच्या तोडणी विषयी.....

हल्ली घरी पूजा केली जाते. पूजेसाठी वृक्षतोड केली जाते.
तर विचार केला तर मला वाटत 
पावसाळ्यापूर्वी झाडे योग्य पद्धतीने छाटली तर त्यांची वाढ चांगली होते

(घरी फांदी आणून पूजा करू नये)

म काय करतात?????
◎◎  एखाद्या देवळातील दानपेटीत पैसे ठेवावेत..

◎◎  घरीच गुरुजींना बोलावून दक्षिणा द्यावी..

◎◎  या दिवशी जर कोणी स्त्री आली तर तिला पैसे, वस्तू द्यावी.

◎◎  पूजेसाठी पाच फळं घेतात ती पूजा होईपर्यंत उघडीच राहतात. 

म ती कोणी खात नाही, तर एखादे अख्खे फळ कोणाला द्यावे.

○○~~○○~~○○~~○○~~○○~~○○

आता या विषयी आलेले विनोद.....

:) आज बायका उपास करतात.... पण तोंडाने वडा पाव!
वडा पाव म्हणतील आणि उपास करतील.

;)   ;)   ;)
पु लं ची एक भारी कमेंट आहे   .......
" वटेश्वरा, आज तुझ्या बुन्ध्याला   गुंडाळलेले सूत हे नुसतंच " बंडल "   आहे,
हे लक्षात असू दे".!

◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇

महिलांसाठी एक खास सूचना........

वडाच्या झाडांच्या फांद्या तोडूंन घरी आणण्या पेक्षा 
घरी जो तुमचा हक्काचा वड आहे त्यालाच गुंडाळा.........

नेहमीप्रमाणे

♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀

असे विनोद वाचून कुणी विचारी व्यक्तीने असा छान विचार पाठवला...↓

कृपया विचार करा....१९ ला वटपौर्णिमा आहे.
 व्हाट्सअप /फेसबुक
वर भरपुर विनोद येतील.
ते कृपया पुढे पाठवू नयेत.

ही विनंती.

आपल्याच सणांची माहीती न घेता आपणच जर अशी खिल्ली उडवली तर इतर मागे राहतील का?..

असे विनोद इतर धर्मीय सणा बदल कधी ऐकलेत का?...

Σ゚Σ゚Σ゚Σ゚Σ° Σ° Σ° Σ° Σ° Σ°

यावर माझा विचार असा आहे कि...

आपण आपल्या सणांची माहिती न घेता,
त्या मागे काय विज्ञान असेल बरं?? 
आपल्या पूर्वजांनी ज्या अर्थी ऋतुप्रमाणे सण उत्सव यांची निर्मिती केली 
त्यासाठी निरनिराळे प्रसाद ठरवले.
निरनिराळ्या प्रांतांप्रमाणे ते ते सण साजरे होतात. असं का??????
याचा शोध घेत नाही.
म्हणून विनोद सुचतात.
हो ना....

आपण राहतो भारतात 

आणि

 आपली राहणी, विचारसरणी परदेशी.... म कशी सांगड बसणार????

卐  卐  卐  卐  卐  卐  卐  卐  卐  卐

तसच हा एक नीट माहिती देणारा लेख↓

पूर्ण वाचा....... काय आहे सात जन्माचे रहस्य ?
     आज वट पौर्णिमा.
सात जन्म वरून खूप विनोद होत आहेत.
पण हे सगळेच अज्ञान मूलक आहेत.
मुळात या सातजन्म मागणीत पुढच्या जन्माचा संबंधच नाही.
तो होणार का नाही ?
माहित नाही.
माणसाचा मिळेल का? माहित नाही.
हीच पुन्हा ओळखायची कशी ?
अशा निरर्थक बाबी आपल्या शास्त्रात नाहीत.
मग काय आहे सात जन्म. ?
ही शुद्ध जीवशास्त्रीय भूमिका आहे.
शरीरविज्ञान सांगते की आपल्या शरीराची रचना राज्यसभेसारखी असते.
काही पेशी मरतात काही नवीन जन्माला येतात.
शरीर सतत बदलत असते आणि तरीही अखंड वाटते.
या शरीरातील एकूण एक पेशी बदलायला काळ लागतो बारा वर्षे.
म्हणून तप करायचे बारा वर्षे.
बारा वर्षांनी आपले शरीर पूर्ण बदलले असते.
जणू एक नवा जन्म.
असे सात जन्म म्हणजे
१२ × ७ = ८४
पूर्वी लग्न होत १६ व्या वर्षी.
त्या वेळी ती नवविवाहिता प्रार्थना करायची की सात जन्म हाच पती मिळो
अर्थात पती
१६ + ८४ = १००वर्षे
जगो.
पतीच्या शतायुत्वाची कामना आहे सात जन्म.
पुढच्या जन्माचा काहीही संबंध नाही.
विनाकारण आपल्याच धर्मातील विचार निष्ठ बाबींची टिंगल करू नका.
वट सावित्रीच्या शतायुत्वाच्या शुभेच्छा.
     ||श्री शुभं भवंतु||

卐  卐  卐  卐  卐  卐  卐  卐  卐  卐

 एक सुंदर कविता 

      मीच तो वड 

पिंपळ, आंबा, फणस 

सर्व रागावलेत माझ्यावर 

म्हणे , क्काय जादू केली 

तू या महिला वर्गावर 

नटून थटून सर्वजण 

येतात तुझ्या पारावर

 नाहीच भेटला तू तर

 फांदी ठेवतात पाटावर 

 

काय सांगू त्यांना 
वैतागलो मी या सणाला 
नमस्कार माझा त्या ऋषीमुनींना 
केला सन साजरा 
धरून विज्ञानाला  महत्त्व प्राप्त करून दिले 
या भारत देशाला 

विज्ञान समजत नाही म्हणून 
उभे केले सावित्रीला 
 वडाजवळ येउन बस फायदा
 होईल आरोग्याला 
माझ्या पानामधून द्रव निघतो 
पावसाच्या सुरुवातीला 
स्त्रियांचे आजार उभे राहणार नाहीत वाऱ्याला 

या सर्व गोष्टी राहिल्या बाजूला 
आणि सावित्रीच्या लेकी 
लागल्या पूजेला 

झाड लावा माझे 

मी चोवीस तास oxigen देतो. 

पटत नाही लोकांना 
म्हणे

 फारच जागा घेतो. 

 वर्षातून एकदाच लागते,

कशाला हवे झाड?

नाहीच मिळाले तर 

कुठून फांदी तोडून आण 

 

किंमत राहिली नाही 

या अक्षय  वट  वृक्षाची 

गरज आहे आता समाजाला

 झाडे लावण्याची 

 

बिघडलेल्या या वसुंधरेचा 

तोल सावरण्याची 

मीच आहे तो सत्यवान 

ज्याला गरज आहे 

झाडे लावणाऱ्या 

सावित्रीच्या लेकींची 

 

 

❀❀ ❀❀ ❀ ❀❀ ❀❀

अशाच काही गोष्टींसाठी
चातुर्मास  पाळला जातो....
उपवास केले जातात.
नियम केले जातात.
सण उत्सव साजरे होतात...
काही समजून घेऊन करतात.
 तर काही कर्मकांड, प्रथा म्हणून करतात. !!!!!

❀❀ ❀❀ ❀ ❀❀ ❀❀

 

No comments:

Post a Comment