Saturday, 30 April 2016

" बाण स्तंभ "

" बाण स्तंभ "

 

 

 

  ( मला आलेला व्हॉट्सअॅप वरील मेसेज)




 इतिहास हा फार चकवणारा विषय आहे.
आणि इतिहासाचा मागोवा घेता घेता आपण एखाद्या अशा जागी येऊन उभे राहतो की मन अक्षरशः थक्क होऊन जाते. हे असं शक्य आहे कां, या विषयी मनात गोंधळ उडतो. दीड हजार वर्षांपूर्वी हे इतकं प्रगत ज्ञान आपल्यापाशी होतं यावर विश्वासच बसत नाही.

गुजराथच्या सोमनाथ मंदिरापाशी येऊन आपली अशीच परिस्थिती होते. 

 मुळात सोमनाथ मंदिराचा इतिहासच विलक्षण. 

बारा ज्योतिर्लिंगांतील हे एक देखणं, वैभवशाली शिवलिंग.

 इतकं समृध्द की उत्तर पश्चिमेतून येणाऱ्या प्रत्येक आक्रमकाचं लक्ष सोमनाथ कडे गेलं आणि अनेकवार सोमनाथ लुटल्या गेलं. सोनं, नाणं, चांदी, हिरे, माणकं, रत्न. . . सर्व गाडे भरभरून नेलं. आणि इतकी संपत्ती लुटल्या जाऊन ही दर वेळी सोमनाथचं शिवालय परत तशाच वैभवानं उभं राहायचं.

मात्र फक्त ह्या वैभवासाठी सोमनाथ महत्वाचं नाही. सोमनाथचं मंदिर भारताच्या पश्चिम समुद्र किनाऱ्यावर आहे. विशाल पसरलेला अरबी समुद्र रोज सोमनाथाचे पादप्रक्षालन करत असतो. आणि गेल्या हजारो वर्षांच्या ज्ञात इतिहासात ह्या सागराने कधीही सोमनाथाचा उपमर्द केलेला नाही. कोणत्याही वादळामुळे सोमनाथाचे गौरवशाली मंदिर कधी उध्वस्त झाले नाही.
ह्या सोमनाथाच्या मंदिराच्या आवारात एक स्तंभ आहे. हा ‘बाण स्तंभ’ म्हणून ओळखला जातो. हा केंव्हापासून त्या ठिकाणी आहे, हे सांगणं अवघड आहे. इतिहासाचा धांडोळा घेत घेत मागे गेलो की कुठेतरी सहाव्या शतकापाशी आपण पोहोचतो, जिथे ह्या 'बाणस्तंभा' चा उल्लेख आढळतो. पण म्हणजे हा सहाव्या शतकात उभारला गेलाय असं सिध्द होत नाही. हा स्तंभ किती जुना आहे, याबद्दल नक्की सांगणं शक्य नाही.
हा बाण स्तंभ म्हणजे दिशादर्शक स्तंभ आहे. यावर एक बाण उभारलाय आणि खाली लिहिलंय –

‘आसमुद्रान्त दक्षिण ध्रुवपर्यंत अबाधित ज्योतिर्मार्ग’

याचा अर्थ असा – या बिंदुपासून दक्षिण ध्रुवापर्यंत सरळ रेषेत एकही अडथळा नाही. अर्थात या मार्गात एकही जमिनीचा तुकडा नाही.
ज्याक्षणी सर्वप्रथम मी हा स्तंभ बघितला अन् हा शिलालेख वाचला, तो वाचून डोक्यात त्याचा अर्थ जाता क्षणीच अंगावर काटा उभा राहिला !
हे ज्ञान इतक्या पूर्वी आपल्याला होतं..? कसं शक्य आहे हे? आणि जर हे खरच असेल तर किती समृध्दशाली ज्ञानाचा वैश्विक वारसा आपण बाळगतोय..!
संस्कृत मधे कोरलेल्या ह्या एका ओळीच्या अर्था मधे अनेक गूढ अर्थ सामावलेले आहेत. ह्या ओळीचा सरळ अर्थ आहे, सोमनाथ मंदिराच्या त्या बिंदुपासून दक्षिण ध्रुवा पर्यंत
(म्हणजे अन्टार्टिक पर्यंत) एक सरळ रेघ ओढली तर मधे एकही भूखंड लागत नाही. आता हे खरं कशावरून..? आजकालच्या ह्या तंत्रज्ञानाच्या युगात हे शोधणं सोपं व्हावं. मात्र हे तितकंसं सोपं नाही. गुगल मॅपवरून बघितलं तर वर वर बघता भूखंड दिसत नाही. मात्र तो मोठा भूखंड. एखादा लहान भूखंड शोधायचा असेल तर त्या पूर्ण मार्गाला ‘एन्लार्ज’ करत करत पुढे जायचे. हे तसं किचकट काम. मात्र संयम ठेऊन, चिकाटीने हळू हळू बघत गेलं की मार्गात एकही मोठा भूखंड, म्हणजे 10 Km X 10 Km चा, लागत नाही. त्या खालचा भूखंड हा विशेष तंत्रज्ञानानेच शोधावा लागेल. थोडक्यात, तो संस्कृत श्लोक खरा आहे असं धरून चालू.
पण मूळ प्रश्न तसाच राहतो. अगदी सन ६०० मधे हा बाण स्तंभ उभारला असं जरी म्हटलं, तरी त्या काळात पृथ्वीचा दक्षिण गोलार्ध आहे, हे ज्ञान कुठून मिळालं ? बरं, दक्षिण गोलार्ध माहीत होता हे गृहीत धरलं तरी सोमनाथ मंदिरापासून दक्षिण ध्रुवापर्यंत सरळ रेषेत गेलं की मध्ये कोठेही एकही भूखंड येत नाही, हे ‘मॅपिंग’ कोणी केलं ?
सारंच अद्भुत..!
याचाच अर्थ, बाण स्तंभ उभारण्याच्या काळात, भारतीयांना पृथ्वी गोल आहे हे माहीत होतं आणि फक्त तितकंच नाही, तर ह्या पृथ्वीला दक्षिण ध्रुव आहे (म्हणजेच अर्थात उत्तर ध्रुव ही आहेच), हे ज्ञान ही होतं. हे कसं काय शक्य झालं ? त्यासाठी पृथ्वीचा ‘एरियल व्ह्यू’ घेण्याचं काही साधन होतं कां ? नसल्यास पृथ्वीचा नकाशा त्या काळी अस्तित्वात होता कां ?
नकाशाशास्त्र (इंग्रजीत ‘कार्टोग्राफी’ – मूळ फ्रेंच भाषेतून उचललेला शब्द) हे फार प्राचीन शास्त्र. ख्रिस्तपूर्व सहा ते आठ हजार वर्षांपूर्वी गुहेत कोरलेल्या आकाशस्थ ताऱ्यांचे नकाशे मिळाले आहेत. मात्र पहिल्यांदा पृथ्वीचा नकाशा कोणी काढला, यावर एकमत नाही. भारतीय ज्ञानाचे पुरावे मिळाले नसल्याने ‘एनेक्झीमेंडर’ ह्या ग्रीक शास्त्रज्ञाकडे हा मान जातो. ख्रिस्तपूर्व ६११ ते ५४६ हा त्याचा कालखंड. मात्र त्याचा नकाशा हा अत्यंत ढोबळ आहे. त्या काळात जिथे जिथे ज्ञात मनुष्यवस्ती आहे, तो भाग या नकाशात दाखविण्यात आलेला आहे. या नकाशात उत्तर आणि दक्षिण ध्रुव दिसण्याचं ही काही कारण नाही.
आजच्या वास्तविक जगाच्या जवळ जाणारा पृथ्वीचा नकाशा हेनरीक्स मार्टेलस ने साधारण सन १४९० च्या आसपास केलेला आढळतो. असं म्हणतात, कोलंबस ने ह्याच नकाशाचा आधार घेतलेला होता.
‘पृथ्वी गोल आहे’ हे मत युरोपातील काही शास्त्रज्ञांनी ख्रिस्तपूर्व काळात व्यक्त केलेले आढळते. एनेक्झीमेंडर ने ख्रिस्तपूर्व ६०० वर्षांपूर्वी पृथ्वीला एका ‘सिलेंडर’ च्या स्वरूपात बघितले होते. एरिस्टोटल ने ही पृथ्वीला गोल म्हटलेले आहे.
मात्र भारताजवळ हे ज्ञान फार आधीपासून होते ह्याच्या अनेक खुणा मिळतात. याच ज्ञानाच्या आधारावर सन ५०० च्या आसपास आर्यभट्ट ने फक्त पृथ्वी गोल आहे, हेच सांगितले नाही, तर पृथ्वीचा व्यास ४,९६७ योजने आहे (म्हणजे नवीन मापना प्रमाणे ३९,९६८ कि. मी.) हे देखील ठासून सांगितले. आज सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून पृथ्वीचा काढलेला व्यास ४०,०७५ कि. मी. आहे. अर्थात आर्यभट्ट च्या आकलनात चूक होतेय ती फक्त ०.२६ %. सोळाशे वर्षांपूर्वी आर्यभट्ट जवळ हे ज्ञान आले कोठून..?
सन २००८ मधे जर्मन इतिहासतज्ञ जोसेफ श्वार्टझबर्ग ने हे सिध्द केले की ख्रिस्तपूर्व दोन / अडीच हजार वर्षांपूर्वी पासून भारतात नकाशाशास्त्र अत्यंत विकसित होते. नगर रचनेचे नकाशे तर त्या काळात उपलब्ध होतेच, पण नौकानयना साठी आवश्यक असे नकाशे असल्याचे ही पुरावे आढळतात.
भारतात नौकानयन शास्त्र फार पूर्वीपासून विकसित होतं. संपूर्ण दक्षिण आशियात ज्या प्रकारे हिंदू संस्कृतीच्या पाउलखुणा आढळतात, त्यानुसार भारताची जहाजं पार पूर्व टोकापर्यंत, म्हणजे जावा, सुमात्रा, यवद्वीप ओलांडून जापान पर्यंत समुद्रात विहार करत होती याचे भरभक्कम पुरावे मिळाले आहेत. १९५५ साली शोधण्यात आलेल्या गुजरात च्या लोथल मधे अडीच हजार वर्षांपूर्वीचे अवशेष सापडले आहेत. यात भारताच्या प्रगत नौकानयना विषयी अनेक पुरावे दिसतात. 
अर्थात सोमनाथ मंदिर उभारण्याच्या काळात दक्षिण ध्रुवापर्यंत चे दिशादर्शन त्या काळातील लोकांना असेल हे निश्चित.
दुसरा अजून एक विचार समोर येतो की दक्षिण ध्रुवा पर्यंत सरळ रेषेत जमीन नसलेला समुद्र आहे हे नंतर शोधून काढण्यात आलं की दक्षिण धृवापासून जमीन नसलेल्या सरळ रेषेची सांगता भारतात जिथे होते, तिथे सोमनाथ हे ज्योतिर्लिंग उभारण्यात आलं..? त्या बाण स्तंभावर लिहिलेल्या ओळीत उल्लेख केलेला आहे,

‘आसमुद्रान्त दक्षिण धृव पर्यंत अबाधित ज्योतिर्मार्ग’

तो ज्योतीर्मार्ग म्हणजे नेमकं काय..?

!! सोरटी सोमनाथ !!


आज ३० एप्रिल २०१६.

सोमनाथ दर्शन.!

संध्याकाळी आम्ही सोरटी सोमनाथ ...

. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक.. 

आणि ऐतिहासिक पार्श्वभुमी असलेलं मंदिर...

सुंदर समुद्रकिनारा.... होणारा सुर्यास्त...

 सर्व नजरेत ठेवत होते... 

मंदिरात सुंदर दर्शन...

 अजिबात गर्दी नाही. फुलांची मस्त आरास.!

दर्शनासाठी उभं राहायला मिळालं याचा आनंद.!

बरोबर सुंदर बेलाची पानं आणि छान सुवासिक मोठ्ठा गजरा...
 (हे वहिनीने दिलं होतं... सगळ्यांचं म्हणून)
हे तेथील पुरोहितांच्या हाती दिलं.... तर 
तेथे असलेल्या स्वयंसेविकेच्या चेहऱ्यावरील आनंद टिपला... 

 तर पुरोहीत म्हणाले...

 आप महाराष्ट्रसे हो क्या?? कहाके???

आम्ही म्हटलं मुंबईसे...
ते पण आनंदीत झाले.
सुंदर अशा दर्शनानंतर आम्ही समुद्र दर्शन घेतलं आणि 
।तेथे दुर्बीण होती..
 त्यातून सहा किमी. अंतरावरील वेरावळ येथे समुद्रातील दोन शिवलिंगांचं दर्शन घेतलं.
खरंतर येथे तीन शिवलिंगं आहेत. पण ओहोटीवेळी तीनही दिसतात.
हे ठिकाण (वेरावळ) म्हणजे श्रीकृष्णाचे जेथे महानिर्वाण झाले ... 
 जेथे श्रीकृष्णाला बाण लागला ते ठिकाण.!
पुन्हा कधीतरी ... यात्रा करेन तेव्हा तेथे जाईन.
तर होणाऱ्या सुर्यास्तामुळे संपूर्ण मंदिर सोनेरी भासत होते...






 रात्री येथे दिव्यांचा शो असतो असं म्हणतात.
समुद्रकिनारी नारळपाण्याचा आस्वाद घेतला.!
रिसॉर्ट कडे येण्यास निघालो...

 वाटेत अचानक गाडी थांबली.!

 समोर बघितलं तर.... 

एक सिंहिण रस्ता ओलांडून डावीकडून  उजवीकडे गेली होती....

इतक्यात अजून एक सिंहिण येतांना दिसली. अरे...मागोमाग अजून एक.!

व्वा.! ऐकलं होतं असं वाटेत कुठेही सिंह त्याच्या कुटुंबासह दिसतो. 

तेव्हा आश्चर्य वाटलं की होतं.. पण आज प्रत्यक्ष समोरच पाहिलं..
काय त्याचा आनंद वर्णावा.!

∞  ∞  ∞  ∞  ∞  ∞  ∞  ∞  ∞  ∞  ∞

Tuesday, 26 April 2016

वाळवण...


एप्रिल सुरू झाला की वेध लागायचे वाळवणाचे

यांत सुद्धा ...…
पोहापापड, बटाटा पापड, उडीदपापड, 
बटाट्याचा किस, तांदळाच्या फेण्या, गव्हाच्या कुरडया,
 साबुदाण्याच्या चकल्या, चिकवड्या...
कुणीकुणी शेवया करत.

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

पोहा पापड... 

आधीची मेहनत न करता पापड वाळत टाकणे 
 आणि असेच ओले पापड गट्टम करणे... खुप मज्जा.!
नंतर मिळणारं डांगर खाणं
व्वा... मस्तच!

बटाटा पापड... 

असंच पापड लाटायला आणि वाळत घालण्याची कामं करत होतो.
नंतर डांगर ... वाह.!
खुपच आवडती गोष्ट.

उडीद पापड... 

पीठ कालवून त्याच्या लाट्या करतात ते अगदी बघत राहावे असे.!
पापड लाटणे सोप्पे.
आणि तेलात बुडवुन लाटी खाणे.. आनंददायी.
पापड वाळत घातल्यावर त्यावर पांढरं कापड पसरायचं. 
म्हणजे पापड सरळ राहतात, डब्यात भरणं सोप्पं भाजतांना त्रास होत नाही.
( कापड पसरलं नाहीतर पापडाचे द्रोण होतात.) 
 शक्यतो धोतर वापरत.

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

चिकवड्या...

 सकाळी लवकर चिक तयार झाला की उन्हापुर्वी चिकवड्या चमच्याने छान पसरायच्या.
जरा उन्हं येईपर्यंत राखण करायची. नाहीतर कावळे चोची मारतात.
याचा चिक खायला खुप आवडायचा.
आणि त्या संध्याकाळी  उलट करायच्या व ताटात परातीत पसरवायच्या. 
अशा अर्ध्या वाळलेल्या चिकवड्या मस्त लागायच्या.





या रंगीत केल्या तर..
 व्वा कोणत्याही शुभकार्याला शोभा येते.





--------------------------------------------------

गव्हाच्या कुरडया... 

थोडं त्रासाचं वाटायचं पण वाळलेली ... 
मग तळलेली खाण्यातली मज्जा....!
गव्हाचा चिक खायला मस्त पुन्हा पौष्टीक...

<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<

तांदळाच्या फेण्या...

 सुंदर अप्रतिम पदार्थ.... करायला थोडा कष्टाचा. 
कारण त्यावेळी स्टँड उपलब्ध नव्हते.!
फेणी करण्यासाठी पितळेची वेळणी घ्यायची, 
त्याला किंचित तेलाचं बोट लावायचं आणि पीठ पसरायचं ,
 त्याला वाफ द्यायची, मग.....
फेणी एक एक करायची अलगद सोडवायची आणि वाळत टाकायची.

ही ओली फेणी सायीच्या दह्याबरोबर मस्तच लागते.

वाळून तळल्यावर तर इतकी हलकी, पांढरी शुभ्र की काय विचारूच नका. 




>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

साबुदाण्याच्या चकल्या... 

व्वा.! थोडं वेळमोडं काम
 पण
 वाळवुन तयार झाल्या की कधी एकदा तळुन खातो असं होतं

बटाट्याचा किस... 

केवढे तरी बटाटे उकडून सोलून उन वाढण्यापुर्वी कामाला सुरुवात करायची.
 व्यवस्थित किस झाला की उपवासाला हा घरी केलेला चिवडा... 

आपल्या चवीप्रमाणे बनवता येतो म खायला मस्त.!

••••• ••••• ••••• •••••  •  ••••• ••••• ••••• •••••

गव्हाच्या शेवया...

 हे फक्त करतांना बघितलंय आणि बनवलेलं वाळत घालत असु.

 याची खीर, गोड शेवयांचा शिरा, तिखट शिरा करता येतो.

{•}{}{•}{}{•}{}{•}{}{•}{}{•}{}{•}{}{•}{}{•}

लहान असतांना फक्त आई, मामी, मावशी करताना
आपल्याला  येतंय तेवढी मदत करून शेजाऱ्यांच्या मदतीला जायचं.
दिवस ठरलेले असत.

पदार्थ बनला की शेजारीपाजारी नेऊन द्यायचा.

तर या सगळ्यातली मज्जा म्हणजे

ओले पापड वाळत घालण्याची..!

या निमित्ताने गट्टम करणे, पळवणे.....

तसंच... चिंचेचे गोळे वाळत घातले की हळुच थोडी थोडी पळवणे.

********************************

शेंगदाणे वाळत घातले की बरेचसे पळवायचे.

 मित्रमैत्रिणींनी वाटून खायचे.

********************************

चणाडाळ 

वाळत घातल्यावर जर वरती पातळ पसरलं नाही तर......

कबुतरं अर्धी डाळ फस्त करतात.

********************************

दिवसभर उन्हात बसुन केलेल्या पदार्थांची पाखरापासुन राखण करायची 
आणि नंतर
 राखता राखता थोडं थोडं गट्टम करायचं. 
भावंडांबरोबर मित्रमंडळही सहभागी व्हायचं.

*********************************

ही सगळी पावसाळ्याची बेगमी !!!

जास्त पाऊस झाला आणि भाजी आणायला जाता आलं नाही
 तर तळुन वेळ भागवायची.

आणि सणासुदीला तळण म्हणुन उपयोग!!!!!

()()()()  ()()()()  ()()()()  ()()()()  ()()()()

नंतर मोठं झाल्यावर स्वतःचं करू लागल्यावर 

त्यामागे किती कष्ट असतात ते कळू लागलं.

गव्हाच्या कुरडयांसाठी 

गहू तीन दिवस भिजवायचे, रोज पाणी बदलायचं, ते वाटायचे....
 म भरपूर पाणी घालून ते काही तास ठेवायचं,
 म वरचं पाणी काढायचं ,खाली राहिल ते सत्वं, 
म त्याचा चिक तयार करायचा.!

तसंच तांदळाच्या फेण्या...

[][][][][][][][][][][][][][][][][][][][][][][][][][][]

प्रत्येक पदार्थामागे भरपूर कष्ट...

मळभ, सुटणारे वारे, मधेच पाऊस आला तर...
पाखरं, आणि मुलांपासून या पदार्थांचं कसं संरक्षण करायचं???? 
 कळत नव्हतं.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

पण पळवणे, 

गट्टम करणे 

ही मजा मुलांनी करावी असंही वाटायचं.!!!!!

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

पण गेल्या काही वर्षात मात्र तयार छोटीशी पुडी आणायची 
आणि 
त्यावेळेपुरतीच तळून संपवायचं. परत नवं आणायचं....

=========================

पण वाळवण 

 अनेक गोष्टी वाळवण यात येतात 
पण या गोष्टींच्या बालपणातल्या 
पळवापळवीच्या आठवणी

मजेशीर.. आनंददायी.!

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

आता काय वाटतं माहिती आहे????

आताची ही छोटी मुलं या आनंदाला मुकली का???

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

 

साबुदाणा चकली 

चिकवड्या

 कुरडया 

 तांदूळ फेण्या 

बटाटा किस

चला पोहा डांगर खायला

Monday, 25 April 2016

पुर्वी काय करत होते.!

दादी माँ बनाती थी.. रोटी !!
पहली.. गाय की ,
और  आखरी.. कुत्ते की..!
      हर सुबह.. नन्दी आ जाता था ,
      दरवाज़े पर.. गुड़ की  डली के लिए..!
कबूतर का.. चुग्गा ,
चीटियों.. का आटा..!
      शनिवार, अमावस, पूर्णिमा का
      सीधा.. सरसों का तेल ,
गली में.. काली कुतिया के ब्याने पर.. 
चने गुड़ का प्रसाद..!
     सब कुछ.. निकल आता था !
     वो भी उस घर से..,
जिसमें.. भोग विलास के नाम पर..
एक टेबल फैन भी न था..!
आज..
      सामान से.. भरे घरों में..
      कुछ भी.. नहीं निकलता !
सिवाय लड़ने की.. कर्कश आवाजों के.!
....हमको को आज भी याद है -
मकान चाहे.. कच्चे थे
लेकिन रिश्ते सारे.. सच्चे थे..!!
     चारपाई पर.. बैठते थे ,
     दिल में प्रेम से.. रहते थे..!
सोफे और डबल बैड.. क्या आ गए ?
 दूरियां हमारी.. बढा गए..!
छतों पर.. सब सोते थे !
      बात बतंगड.. खूब होते थे..!
      आंगन में.. वृक्ष थे ,
सांझे.. सबके सुख दुख थे..!
दरवाजा खुला रहता था ,
       राही भी.. आ बैठता था...!
      कौवे छत पर.. कांवते थे
      मेहमान भी.. आते जाते थे...!
एक साइकिल ही.. पास था ,
फिर भी.. मेल जोल का वास था..!
     रिश्ते.. सभी निभाते थे ,
      रूठते थे , और मनाते थे...!
पैसा.. चाहे कम था ,
फिर भी..
माथे पे.. ना कोई गम था..!
      मकान चाहे.. कच्चे थे ,
      पर..रिश्ते सारे सच्चे थे..!!
अब शायद..सब कुछ पा लिया है !
पर..
लगता है कि.. बहुत कुछ गंवा दिया!!!

∞-∞-∞-∞-∞-∞-∞-∞-∞-∞-∞

हा मेसेज आला आणि मन भूतकाळात डोकावलं.

लहानपणी दोन तीन लोक

 एक चाकाची ओढणारी गाडी ओढत भाकर तुकडा मागत असत. 

अगदी सकाळीच.!
शिळं, कालचं उरलेलं अन्न ते खात असत.

एक लहान मुलगा असं कोणी भाकर तुकडा मागायला आलं की म्हणे... 

ए आई पोळी झाली का तुझी करून? यांना पोळी हवीय
आणि ती आईसुद्धा ताजी पोळी त्यांना देत असे.

तव्यावर बनलेली पहिली

पोळी काऊचिऊसाठी असे. 
तर दहीभाताचा घास हा कावळ्यासाठी असे.

कोणतेही धार्मिक कार्य असेल तर

 कावळा, गाय यांच्यासाठी आवर्जुन पान वाढले जाते.

ग्रहण असलं की ते सुटायच्या आधीच...

 दे दान सुटे गिराण.. तांबे दान, सोनं दान चांदी दान.. वस्त्र दान.. 
असं आवाज(गोंगाट) ऐकायला येई.

  दर अमावास्येला....

अवस वाढा अवस.... असा आवाज येई
म कोणी शिधा, कोणी तेल, कोणी वस्त्र देत असत.

कडकलक्ष्मी येत असे

 त्यांना कपडे पैसे अन्न दिले जात असे.

  अजुनही वासुदेव...

 येतो छान अभंग म्हणतो. दिलेले पैसे, मिठाई जे देऊ ते घेतो.

काही वर्षापुर्वी एकादशी.....

असं म्हणत...एक ब्राह्मण दक्षिणा मागत असे...

तर दुसऱ्यादिवशी...

द्वादशी... असं म्हणत दुसरा ब्राह्मण येई... 
त्यालाही दक्षिणा दिली जात असे.

   एक बाई दर दोनतीन महिन्यांनी येई.!

ती म्हणे सत्यनारायणाची पूजा करायची आहे तर पैसे द्या. 
अधिक माहिती विचारली तर ती म्हणाली ... 
असं मागूनच पूजा करेन असं बोलले आहे.

गोसेवा, साईसेवा...

 म्हणून देणगी पावत्या फाडल्या जात.

********************************

थोडक्यात काय???

 तर दारी आलेल्याला विन्मुख पाठवलं जात नसे.

देण्यात आनंद होता, मागण्यात संकोच नव्हता.

********************************

आता मात्र आधुनिकतेने दिले जाते.

★ चांगले कपडे संस्थांना दिले जातात.
★ काही जुनं देण्याऐवजी रोख रक्कम संस्थांना देतात.
★ देवस्थानांना देणगी स्वरुपात जीर्णोध्दारासाठी पैसे दिले जातात.
★ अन्नदान म्हणून देवस्थानात पैसे देऊन पावती घेतली जाते.
★ अनाथाश्रम, वृद्धाश्रम येथे छान मिठाई, नवे कपडे, गरज असलेल्या वस्तू दिल्या जातात.
★ माहितीतला एक मुलगा...
 स्वतःचं शिक्षण मदत घेऊन झालंय म्हणून
 एका गरीब मुलीचं शिक्षण, सहलीला पाठवणं सगळं करतो.
★ काही कुटुंबं मुलींचं शिक्षण करा अशा योजना असतात 
त्यांना दोन, तीन मुलींचा पूर्ण वर्षभराचा शिक्षण खर्च करतात.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

असे अनेक नवे जुने मार्ग नजरेसमोर आले.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

 एक reply 

 पूर्वी रामदासी येत
एक श्लोक म्हणत व पुढे जात
बहुतेक जण यांना पैसे देत. 


दुसरे 
गायत्रीची विनंती ऐका
 तुम्ही सर्वजण 
असे म्हणत येत 

हे दोघेही शनिवारी येत 
यांना सुद्धा पैसे देत

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

Sunday, 24 April 2016

संवाद... आठवडी बाजारचा.!


गेल्या रविवारी मी आमच्या येथील आठवडी बाजाराबद्दल लिहिलं होतं 
दोनचार ओळीत.!
ते वाचून आज माझ्या एका मैत्रिणीने या बाजाराला भेट दिली ... 
आणि मला सांगितलं... मी आज सहज एक फेरी मारून आले.

तर हा तिच्या-माझ्या मधील झालेला संवाद.!

-.-   -.-    -.-   -.-  -.-   -.-

︶  ︶    ︶   ︶  ︶  ︶

☆ हे चिन्ह मैत्रिण
★ मी

----------------------------------------------------

  ☆ आज सहज आपला रविवार बाजार फिरून आले. भाजीगल्ली मधला.!
काही घ्यायचं नव्हतं

★ मस्त वाटतं ना बघायला....
☆ पण त्या दिवशी तुम्ही ब्लॉगवर लिहिलंत, मग जायची इच्छा झाली.
★ रोजची झगमगती दुकानं बंद असतात... 
आणि कमी प्रकाशाच्या दिव्यातला रंगीबेरंगी बाजार....
☆ हो, खुपच सुंदर वाटलं.!
★ आपल्याला काही खरेदी करायची नसते... 
तरीही तो गावाकडचा फिल छान वाटतो.
☆ हो ना....
 म्हणजे आपल्याला असं वाकून खरेदी करायची सवय नसते.
म लोक कसं निवडून खरेदी करतात, ते निरिक्षण केलं.!
★ छान निरिक्षण.!
मी असा आठवडी बाजार...
नाशिकजवळ खोडाळा हे एक निसर्गसौंदर्याने नटलेलं छोटं गाव आहे तेथे बघितलाय.
आणि अलिबाग येथे असा आठवडी बाजार,
शिर्डी येथील...
☆ आपण किती क्वालिटीचा विचार करतो ना....
 पण तरीपण लोक तिथे खरेदी करतात आणि आनंदाने वापरतात.
★ हो खरंय....
तसं.. पुर्वी मी दारावर कोणताही फेरीवाला आला की वस्तू घेत असे... 
असं वाटायचं हे दहावीस रुपयांचे घेऊन त्याच्या विक्रीला दाद द्यावी...

आठवडी बाजारातील वस्तू स्वस्त, मस्त, ना टिकावू

दर महिन्याला नविन वापरता येतं. फेकतांना वाईट वाटत नाही

है ना...

आपण ब्रँडेड घेतलं की खूप टिकवायचं मेंटेन करायचं
खुप किंमत म्हणून जपून वापरायचं.
पण... आपण त्यात दिसतो छान हे मात्र खरंच.
☆ हो ना... मी खरंतर दोन बेबी नॅपकीन घेतले..
 १० रुपयांना एक.! असंच मज्जा...
डिझाईन आवडलं.

★ हो खरंच... डिझाईन रंगसंगती मस्त असते.
गिऱ्हाइक आकर्षित होईल असे.!

येथील विक्रेत्यांची विक्रिभाषा मस्त असते...

आपण मोजे खरेदी करायला गेलो. 
पुरुषांसाठीचे मोजे... ६० रुपये.
 म आपण म्हटलं की... दोन जोड घेते... १०० रुपयांना द्या... 
तर लगेच ते दुकानात १०० रुपयांना एक जोडी असेल तर घ्याल... 
आमचे पण ब्रँडेड आहे... हा बघा कंपनीचा खोका....
अगदी आपल्याला पटेल असं सांगतात...
 म्हणजे आपण ती वस्तू घेतोच.!
●● ●● ●● ●● ●● ●● ●● ●● ●● ●● ●● ●●

खरंतर दुकान थाटलं की इतर खर्च खूप असतात.

लायसन्स फी, नोकरांचे पगार, दुकानाचं भाडं, मेंटेनन्स,
 वीजबील, सरकारी कर, कोणाला हप्ते.. इत्यादी, इत्यादी....
●● ●● ●● ●● ●● ●● ●● ●● ●● ●● ●● ●●
खरंच

 दुकानात आपण किंमतीबद्दल घासाघीस करत नाही...

 काय सांगतील ती किंमत सहज देतो..

.ツ.....ツ.....ツ.... .ツ.....ツ.....ツ.....ツ.... .ツ....

Friday, 22 April 2016

काळा गडद ढग


 

नुकतंच उजाडू लागलंय.!

गार वारे, कोकिळेचं कूजन,फाटकातला, 
आणि समोरचा फुललेला लॅबर्नम स्वागताला.! 
 रस्त्यावर अंथरलेला पिवळ्या फुलांचा गालिचा....
भर मुंबईत राहत असुनही नशीबवान आहोत आपण...
 सर्वकाही अनुभवता येतंय...
छान शांत निवांत समुद्रकिनारा..
 मधेच दूरवर दिसणाऱ्या बोटी, नजरेच्या टप्प्यात दिसणारे मचवे...
 बोटींगच्या बोटी(छोट्या) संध्याकाळी हे सगळं मुलामाणसांनी फुलुन येतं ठिकाण!!
असं बघत, निसर्गसौंदर्य न्याहाळत जात होते. 
आज कसं असेल बरं सुर्यदर्शन??
परवा प्रमाणेच... मनात विचार आला...
 सगळं आकाश सुंदर आकाशी रंगाचं, ढग पांढरे शुभ्र... म जेथे सुर्य आहे त्यासमोरचा ढगच कित्ती काळा, गडद... 
की उगवत्या सुर्याचे दर्शन होऊ नये....
 पण म असं वाटलं.. 
की ही रंगांची किमया कशी दिसली असती???

सुर्य उगवणार तेथे आजूबाजु सोनेरीसर,

 मधेच काळा ढग त्याला सुंदर सोनेरी किनार , बाकी आकाश... आकाशी

ओ... असं म्हणेपर्यंत सुर्यनारायणाचे सुरेख दर्शन!

पण ते सुद्धा प्रखर झालेच.
(पायाखाली बदामाच्या फुलाची पखरण...)
कुणीतरी म्हणालं होतं..
मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांसाठी निसर्ग सुद्धा निरनिराळे चमत्कार दाखवतो....
खरंच दररोजचा अनुभव वेगळा,!
असो...याचे किरण पश्चिमेकडील उंच इमारतीच्या काचेत कसे सुंदर दिसत आहेत.!
::*::*::*::*::*::*::*::*::*::*::*::*::*::*::*::

Monday, 18 April 2016

सुर्यदर्शन


बरेच दिवसांनी.!

घरातून बाहेर पडले. थोडं उजाडलंय.! छान गार वारे.
कोकीळ गातोय. अंबामातेचं सुरेख दर्शन झालं.
खूप दिवसांनी कार्ला ज्यूस मिळाला. 
समुद्रकिनाऱ्याने जात आहोत. शांत अथांग समुद्रदर्शन.!
किनाऱ्याकडे अगदी छोट्या लाटा... पण आवाज येतोय.
आकाश थोडं तांबूस दिसतंय. म्हणजे येथून होणार आहे सूर्यदर्शन.!

एक काळा ढग, त्याला सुरेख सोनेरी किनार आहे.

 हा एकच काळा ढग आणि तो ही अगदी सुर्यदर्शन होणार आहे तेथेच!!!!!
आज जरा पूढे जाऊ...
दिसत आहेत सुर्यदेव. पण त्या ढगाआडून..... केशरी सोनेरी
पण पूर्ण गोल नाही. पण दोन मिनिटातच तो ढग दिसेनासा झाला. 
आणि तेजस्वी सुर्यदर्शन....
मग मात्र बघता येत नव्हते इतके प्रखर.!!
आज सुर्योदय : ६.२१

︶      ︶      ︶     ︶     ︶     ︶

संकलन:

आज वर्धमान महावीर जयंती.!
जैन संप्रदायाचे चोविसावे तीर्थंकर.
त्यांनी केलेला उपदेश....
● कोणत्याही प्राण्यास मारू नका.
● कोणालाही त्रास देऊ नका.
● खोटा अभिमान बाळगू नका.
● खरे बोला.
● सर्वांवर प्रेम करा.
● इंद्रियांवर ताबा ठेवा.
त्यांची तत्वे....
☆ अहिंसा
☆ अपरीग्रह
☆ अनेकांतवाद
☆अचौर्य

'महावीर जिन'

काम, क्रोध, लोभ, द्वेष इ. दोषांना जिंकले.
 म्हणून ते 'महावीर जिन'....

जिनांचे अनुयायी ते जैन!

❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀

जन्म : इ.स. पूर्व ५४०,
चैत्र शुद्ध त्रयोदशी, सोमवार
पाटण्याजवळील कुंडग्राम येथे झाला.
परमज्योतित विलिन : इ.स. पूर्व ४६८ 
कार्तिकी अमावास्येला मध्यरात्री श्रावस्ती येथे वयाच्या ७२ व्या वर्षी.!

❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀

Sunday, 17 April 2016

चंद्राची शीतलता, थंड वारे


आज रविवार...!

चला वेगळं करू काहीतरी...
मॉर्निंग वॉकच्या ऐवजी संध्याकाळी जाऊ... फिरायला...
 रोज सुर्योदय म आज सुर्यास्त बघायला जाऊ.
सुर्यास्त... ६.५५
घरातून निघतांना १० मिनिटे उशीर झाला. ६.४० ला बाहेर पडलो. 
फाटकातून बाहेर पडतांना चंद्रदर्शन...
आज एकादशी.!
चंद्राकडे बघतांना एक विचार आला.... 
चंद्र डाग स्वतःकडे ठेवतो आणि शीतल प्रकाश देतो. 
सकाळी बाहेर पडतांना जशा थंड वाऱ्याच्या झुळका येतात
 तसंच आता संध्याकाळी थंड वारे वाहत आहेत.

० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ०

    दिवसभर उकाड्याने हैराण झालेले लोक 
आज सुट्टीमुळे समुद्रावर थंड, मोकळ्या हवेत निघालेत.
 माणसांची, वाहनाची गर्दी आहे
 फेरीवाले...फुगेवाला, भिरभिरंवाला, पॉपकॉर्न, कुल्फी.....
आणि दुकानातून बर्फाचे गोळे, भेळपुरी-पाणीपुरी... आणि काय काय??? 







काय मिळत नाही असा प्रश्न पडावा.
पण आम्ही मात्र नारळपाणी घेतलं.! 
चौपाटी आणि भेळपुरी, 

पण समुद्र म्हणजे नारळपाणी.! 

आणि उन्हाळा म्हणजे बर्फाचा गोळा, आईस्क्रिम.!
हे मात्र बाहेर फिरायला गेल्यावर.!
घरात असलो की,
लिंबू-कोकम-आवळा सरबत,  लस्सी, ......
छान थंड वाऱ्याचा आनंद घेत चालण्याचा पण आनंद घेत होतो..

.ツ....  .ツ.....  ツ....   .ツ....

बालभवनची बाग सुर्योदयाला उघडते आणि सुर्यास्त झाला की बंद होते, 
 म्हणून तेथे गर्दी नाही.
ही बाग स्त्रिया व बारा वर्षांखालील मुलांसाठी आहे
सुर्यास्त तर केव्हाच झाला होता... आम्हाला मात्र  सुर्यास्त दिसला नाही.
रेल्वेस्टेशनला तर खुप गर्दी होती.

∞ ∞ ∞ ∞ ∞ ∞ ∞ ∞ ∞ ∞

आमच्याकडे अजुनही आठवडी बाजार असतो.. 

रविवारी..!

आणि बऱ्याच वस्तू या बाजारात बघायला मिळतात.
 एरव्ही सर्वकाही मिळतंच...
 पण गावच्या सारखा आठवडी बाजार भर मुंबईत भरतो याची मज्जाच वाटते. 
आणि लोक सुद्धा आवर्जुन खरेदी करत असतात.
~~~~~~~~~~~~~~
चौपाटीकडे जातांना चाफा...
 गुच्छागुच्छांनी दिसला, 
उद्या यातीलच काही फुलं रस्त्यावर पडलेली दिसतील.

पण आत्ता मात्र ही फुलं बघतांना एकदम प्रसन्न वाटतंय.!

❀   ❀   ❀   ❀   ❀   ❀   ❀   ❀   ❀

 

 

 

Saturday, 16 April 2016

ताजं हिरवं गवत


चर्नीरोड स्टेशनजवळच एक गाय वासरू बांधलेलं बघते, लोक चारा घालतात.
छान हिरवा चारा असतो.
रोज ते गायवासरू स्टेशनजवळ बांधलेलं बघते
गाय→ काळीभोर, शेपटीचे केस काळेभोर, अंगावर कुठे कुठे पांढरे ठिपके.! गोमाता
पाडा, गोऱ्हा →तिच्यासारखाच... फक्त शेपटीचे केस पांढरे.!
      तीनचार दिवस मी जरा लवकर जात होते फिरायला...
हे वासरू... पाडा, गोऱ्हा... आहे तो... असेल दोनतीन महिन्याचा.!
त्या मायलेकराला एकत्र बांधतात. 
पहिल्या दिवशी कळलं नाही की का एकत्र बांधलंय????
म्हणजे चारा घालतो तिथे सुद्धा एकत्र बांधतात.
दिवस पहिला.... ते गायवासरू मजेत डिव्हायडर मधे असलेलं 
ताजं छोटं छोटं असलेलं गवत खात होते.

* * * * * * * * * * * ********** * * * * * * * * * * *

हे गवत हिरवं असतं, फुलं छान फुललेली असतात कारण टँकरने पाणी घातलं जातं.!

* * * * * * * * * * * ********** * * * * * * * * * * *

दिवस दुसरा.... ते त्या गवताच्या दिशेने जात होते. 
आणि मागून तो माणूस ( डोक्यावर गवताचा भारा घेऊन)
 त्यांना हाकलण्याचा प्रयत्न करत होता.
 पण तो पाडा मात्र पुन्हा पुन्हा त्या गवताच्या दिशेने जाण्याचा धावून धावून प्रयत्न करत होता.
 याचा मात्र त्या गाईला एकत्र बांधलेलं असल्यामुळे त्रास होत होता.....
 पण ती माऊली आपल्या पाड्यासाठी,गोऱ्ह्यासाठी तो त्रास सहन करत होती....
होता होता त्यांची बांधण्याची जागा आली मात्र....
ते गायवासरू शांतपणे त्या जागी जाऊन उभे राहीले.

:: :: :: :: :: :: :: :: :: :: ::::::::::::::::::: :: :: :: :: :: :: :: :: :: ::

प्राण्यांना सर्व काही कळतं.

ताजे गवत, नेहमीची जागा, हटकलं की त्या बाजुला जायचं नाही....
आई समजुतदार पण मुल खट्याळ....

(खट्याळ असल्यामुळेच बांधतात बहुतेक एकत्र) अजुनही बरंच काही...!

:: :: :: :: :: :: :: :: :: :: ::::::::::::::::::: :: :: :: :: :: :: :: :: :: ::

Thursday, 14 April 2016

★ || श्रीराम || ★


आज रामनवमी...

सुर्योदय ६.२४
आज खुप दिवसांनी सूर्यदेवांचे सुरेख दर्शन.!
घरातून बाहेर पडले, 
छान सुखद शीतल वारे,
 सर्व झाडांना फुटत असलेली पालवी,
 वडाची फळं,
 फुललेली रातराणी, कण्हेरीचा बहर,
 फुटपाथवर बदामफुलांची पखरण, 
 लॅबर्नम रोडवर थोडासा पिवळा गालिचा,
खाली पडलेली उंबराची फळं,
सुरेख पिंपळवृक्ष .!

झाडांना पालवी फुटत आहे तर 

प्रत्येक झाड, पान् न पान बघत रहावं असं.!

शांत, अथांग समुद्र

असा मस्त देखावा बघत बघत नेहमीच्या ठिकाणी आले, 

छान सुर्योदय बघायला मिळाला. 

आजुबाजुला तांबूस रंग आणि सुर्यदेव तांबूस सोनेरी.!

आज रामनवमी...

भरदुपारी रामजन्म.....

जवळपास राममंदिर असेल तर जरूर जाऊन

 रामाचा पाळणा झुलवत झुलवत...

बाळा जो जो रे...
कुलभूषणा दशरथ नंदना...
बाळा जो जो …

असं म्हणून आनंद घेता येईल.!

मी जाणार आहे.
आतासुद्धा मी रामदर्शन घेऊन आले.

देऊळ आवारात मोगरा फुलला आहे...

येथून बाहेर पडतांना मन बालपणात गेलं
दादर येथील राममंदीर.!
रात्री होणारी किर्तनं, आम्ही अगदी हौशीने जात असू किर्तनाला.!
रामजन्मानंतर झुलवलेला पाळणा, सुंठवडा....

सुंदर असं होणारं दर्शन...

आजही हे मंदीर पुर्वीप्रमाणेच आहे..

जसं मंदिर असावं तसंच....

********************************

 

 

 

 

राम जन्मला गं सखे राम जन्मला

१५ एप्रिल


हा माझा जन्मदिवस

आई म्हणायची तुझा जन्म सकाळचा..... 

त्यावेळी कोकिळ पक्षी गात होता.

त्या दिवशी  " गुड फ्रायडे " होता.

❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀

अहो नावात काय आहे???

 

 

 

 

 

नावात गणपती आहे.
गणपती म्हणजे चौसष्ट कलांचा अधिपती.!
सुखकारक, दुःखनिवारक.!
मात्र त्यासाठी हातात कला आणि कलाकाराची नजर हवी.

आणि हो.... 

 नावात सुंदर अर्थसुद्धा....

❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀

१९६० सालीच महाराष्ट्र कर्नाटक सीमा वाद संपला व महाराष्ट्राची निर्मिती झाली.

म्हणून सीमा आणि  रेखा अशी दोन नावे सुचवली होती.

 शेवटी चिट्ठी टाकून रेखा हे नाव ठेवले गेलं.
( मुख्य म्हणजे लग्नानंतर नाव बदललं नाही)

रेखा म्हणजे, line, limit.

line -रेषा...

काही शब्द.... भाग्यरेषा
हस्तरेषा,
व्यक्तीरेखा...

limit.. मर्यादा...

लक्ष्मणरेषा, सीमारेषा

असा अगदी साधा सरळ अर्थ.!

~•~•~•~•~•~•~•~•~•~•~
रेखा हा संस्कृत शब्द आहे.

शिवाच्या कपाळावरील गंधाच्या तीन ओळी...

<><><><><><><><><>

रामाच्या कपाळावरील गंध!

=================

देवतांच्या भोवती असणारे तेजोवलय

***********************

चंद्र सूर्य यांचे तेज.!

★★★★★★★★★★

या सगळ्यांना रेखा असं म्हणतात.

♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡

आजच्या दिवसाचा योग म्हणजे आज रामनवमी...
माझ्या आजीचा तिथिने वाढदिवस असायचा.

★★★★★★★★★★★

Wednesday, 13 April 2016

"आत्मसंयोग" भगवद् गीता

आज १४ एप्रिल....

काल गीता वर्गात सहावा अध्याय कसा म्हणायचा हे शिकवून पूर्ण झाले.

हा अध्याय "आत्मसंयोग" नावाचा अध्याय आहे.

卐  卐  卐  卐  卐  卐  卐  卐  卐  卐

या वर्गामुळे ....
पुर्वी गुरूगृही राहून विद्यार्थी एकत्र कसे वेद, पुराणं शिकत असतील
 याचा अनुभव घेत आहोत.
एकत्र बसून म्हणण्याचा
यामुळे आनंद मिळतो.

मला भगवद् गीता म्हणायला शिकायची होती.
 आणि हा योग छान जुळुन आला.

●  भगवद् गीता हे भगवंताचे प्रत्यक्ष शब्द आहेत.

●  सुमारे पाचहजार वर्षापुर्वी भगवान  श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्धभूमीवर गीता सांगितली.
● आजही आपल्याला गीता मार्गदर्शन करते.
● जर गीता योग्य शब्दावर आघात देऊन,
● विशिष्ट पद्धतीने म्हटली गेली,
● लयीत म्हटली,
● शुद्ध, सुस्पष्ट म्हटली गेली

तर कानाला गोड लागते.

● गीता म्हटल्यामुळे स्फुर्ती मिळते.
● यातून होणारे ध्वनीतरंग मनात आनंद व समाधान निर्माण करतात.
● कोणत्याही प्रश्नाचे उत्तर गीतेत आहे.
● पाठांतर शक्ती विकसीत होईल.
● स्मरणशक्ती चांगली राहिल.
● उच्चार चांगले होतील
जसं... ष, स्तता, स्थिती...

卐  卐  卐  卐  卐  卐  卐  卐  卐  卐

१६/२/१६
संध्याकाळी
श्रीमद्भगवद्गीता संथा वर्ग सुरू झाला.

☆ संथा म्हणजे.....

कोणाकडूनतरी ऐकणं आणि कोणीतरी म्हणणं.!
☆ यामध्ये गीता कशी म्हणायची ते शिकवतात.
☆ हा वर्ग मंगळवार बुधवार असतो.
☆ वेळ संध्याकाळी ६ ते ७
प्रत्येक श्लोकातील प्रत्येक ओळीत १६ अक्षरे असतात
त्यातील ८ अक्षरांचा एक गट ७ वेळा म्हणायचा 
मग पुढचा गट सातवेळा म्हणायचा.
८ अक्षरांनंतर यती... म्हणजे किंचित पॉज् घ्यायचा.
    मग पूर्ण ओळ ५ वेळा म्हणायची याप्रमाणे दुसरी ओळ.
मग पूर्ण श्लोक ३ वेळा म्हणायचा. ही पद्धत आहे .
एकावेळी पाच श्लोक म्हणायचे कसे ते दाखवतात.
आणि दुसऱ्या दिवशी ते पाच श्लोक आपल्याकडून म्हणून घेतात..
 म्हणजे कुठे उच्चार चुकत असेल तर कळते.
☆ ( ं ) अनुस्वाराचा उच्चार कसा होतो?
☆ कोणत्या शब्दावर जोर द्यायचा?
☆ ऱ्हस्व शब्द असेल तर त्याचा उच्चार
आणि
☆ दीर्घ शब्दाचा उच्चार....
☆ जोडाक्षर आलं की आधीच्या शब्दावर जोर द्यायचा.

☆  ☆  ☆  ☆  ☆  ☆  ☆  ☆  ☆  ☆

सहावा अध्याय....

हा अध्याय म्हणण्याची स्पर्धा डिसेंबर मधे होणार आहे.
 म्हणून आता हा अध्याय शिकविला.
सगळ्यांना या स्पर्धेत भाग घेता यावा म्हणून.!
अगोदर पहिला अध्याय कसा म्हणायचा त्याची संथा दिली.

☆  ☆  ☆  ☆  ☆  ☆  ☆  ☆  ☆  ☆

↓↓↓.....संकलन.....↓↓↓

☆  ☆  ☆  ☆  ☆  ☆  ☆  ☆  ☆  ☆

श्री गोंदवलेकर महाराजांना

एकाने विचारले कि महाराज आम्हाला
गीता कधी कळायची?
महाराज म्हणाले कि वाचून कळत नसेल तर 

त्या पुस्तकावरचे चित्र लक्षात ठेव.

अर्जुनाच्या रथाचे दोर भगवान श्री कृष्णांनी आपल्या हातात धरले आहेत.

आपल्या जीवनाची दोरी भगवंताच्या हातात आहे हे कळले कि गीता कळली!!!

तसंच अजून एक....

❀   ❀   ❀   ❀   ❀   ❀   ❀   ❀   ❀

भगवद् गीतेची ओळख.

"मी पाच साडेपाच वर्षाचा असेन. 
एक दिवस माझ्या आईने मला सुर्योदयापुर्वीच आंघोळ घातली.
 गंध लावले
आणि देवापुढे साष्टांग नमस्कार करायला सांगितलं. 
मी आता देवाला फुलं वाहिली, निरांजन, उदबत्ती लावली.
 त्या मंद प्रकाशात तिनं माझ्या डोक्यावर भगवद् गीता ठेवली आणि गंभीर आवाजात .....
'धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे' हा पहिलाच श्लोक मला सांगितला. 
माझ्याकडून दोन-तीन वेळा म्हणूनही घेतला.
 अर्थ सांगितला. त्यावेळी काही कळलं नाही.
ती मला म्हणाली,
"आजपासून दर आठवड्याला दोन श्लोक मी सांगेन.
 ते पाठ करायचे. तरच जेवायला मिळेल.
भगवंताचा शब्द आहे हा.
    आज कळणार नाही, पण पुढे हळूहळू कळेल. 
    समजून घे. अन् तसं वाग."
आज ते सारं आठवतं.
आज आई नाही. 
पण गीताई आहे. तसं वागायचा प्रयत्न करतो.
 पण.... अनेकवेळा जमत नाही. धडपडतो, पडतो.
परमेश्वराचं आश्वस्त शब्दातलं सुस्पष्ट मार्गदर्शनच ते.
केव्हाही स्मरणीय आणि अनुकरणीय दीपस्तंभच.!"

          - अरविंद इनामदार -

❀   ❀   ❀   ❀   ❀   ❀   ❀   ❀   ❀

     ۞ गीता-सार ۞

* जो हुआ अच्छा हुआ।
* जो हो रहा है वह अच्छा हो रहा है ।
* जो होगा वह अच्छा ही होगा।
* तुम्हारा क्या गया जो तुम रोते हो ?
* तुम क्या लाये थे
      जो तुमने खो दिया?
* तुमने क्या पैदा किया था,
      जो तुमने खो दिया ?
* तुमने जो लिया यही से लिया।
     जो दिया, यही पर दिया।

۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞

खूबसूरत शायरी में गीता सार -:

★ यह जिस्म तो किराये का घर है;
एक दिन खाली करना पड़ेगा:!!
★ सांसे हो जाएँगी जब हमारी पूरी यहाँ;
रूह को तन से अलविदा कहना पड़ेगा:!!
★ वक्त नही है तो बच जायेगा गोली से भी;
समय आने पर ठोकर से मरना पड़ेगा:!!
★ मौत कोई रिश्वत लेती नही कभी;
सारी दौलत को छोंड़ के जाना पड़ेगा:!!
★ना डर यूँ धूल के जरा से एहसास से तू;
एक दिन सबको मिट्टी में मिलना पड़ेगा:!!
★सब याद करे दुनिया से जाने के बाद;
दूसरों के लिए भी थोडा जीना पड़ेगा:!!
★ मत कर गुरुर किसी भी बात का ए दोस्त:!
तेरा क्या है..? क्या साथ लेके जाना पड़ेगा...!!
★ इन हाथो से करोड़ो कमा ले भले तू यहाँ...
खाली हाथ आया खाली हाथ जाना पड़ेगा:!!
★ना भर यूँ जेबें अपनी बेईमानी की दौलत से...
कफ़न को बगैर जेब के ही ओढ़ना पड़ेगा..!!
★यह ना सोच तेरे बगैर कुछ नहीं होगा यहाँ;
रोज़ यहाँ किसी को 'आना' तो किसी को 'जाना' पड़ेगा

۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞

  ۞ ।।हरी ॐ हरी।। ۞

۞ वाचा सदोदित गीता l
ती असे आपुली माता ll१ll
۞ कर्तव्य कसे करावे l
हक्कास कसे जपावे ll२ll
۞ कोणता असे धर्म l
कोणते असे कर्म ll३ll
۞ मानवांची नातीगोती l
मनास भ्रम पाडिती ll४ll
۞असल्या समस्या अपार l
राम म्हणे गीता आधार ll५ll
۞ समस्यांची हो उकल l
गीता करते सकल ll६ll

 * न्या. राम रानडे. *

♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀

ॐ नमो भगवते वासुदेवाय ।

         ..^..
        ,(-_-),
  '\'''''.\'='-.
     \/..\\,'
        //"")
        (\  /
          \ |,
         ,,; ',

ॐ नमो भगवते वासुदेवाय ।

Tuesday, 12 April 2016

पिंपळवृक्ष....



काल बसस्टॉपवर उभी होते आणि सहज लक्ष वेधून घेतले...
 पिंपळवृक्षाने.!

या झाडाला छान पालवी फुटत आहे..

या पानांचा रंग गुलाबी तांबूस
म जरा अजून निरखून बघू लागले...



 व्वा.!

 पालवी फुटुन  काही दिवस झालेत, त्या पानांचा मस्त पोपटी कोवळा रंग.!



 जुनी पानं आहेत त्यांचा गडद हिरवा रंग. 
आणि अजूनही जुनी पण झाडावर आहेत अशी जरा जाळी होऊ लागलेली पानं.!
वाळलेली पानं मात्र फिकट तपकीरी असतात.

जाळीदार पानं.. पण हिरवी!

मला वाटतं की अशी पानं काही तरी प्रक्रिया करून बनवतात.
यावर छान चित्र काढतात.
लहानपणी असं जाळीदार पानं असावं 
असं  प्रत्येकालाच वाटायचं आणि पुस्तकात ते पान जपलं जायचं.

 मैत्रीचे नाते हे पिंपळाच्या 
पानासारखे असायला हवे 
त्याची जाळी झाली तरी ते पान
जीवनाच्या पुस्तकात 
आयुष्यभर जपून 
ठेवायला हवे


 या पानांचा आकार - हृदयासारखा असतो.

पानाचा देठ थोडा मोठा असतो,
 त्यामुळे वारा आला की पानं डोलतात, 
आणि पानांची सळसळ ऐकू येते,

 डोलणारी पाने बघणे डोळ्यांना 

आणि

 पानांची सळसळ कानाला सुखद वाटते.

पिंपळापासून लाख बनते.

या वृक्षाची फळे पक्षी आनंदाने खातात.

काग विष्टेचे झाले पिंपळ 

तयासी निंद्य कोण म्हणे

 आणि त्यांच्या विष्टेतून याचे बी कोठे पडेल तेथे हा वॄक्ष उगवतो.
त्यामुळे कोठेही याचे झाड दिसते.
 पण.... इमारतीच्या भिंतीत याचे झाड उगवले तर... 
मात्र भिंतींना तडे जातात. व इमारतीला धोका उत्पन्न होतो.

हा वृक्ष तोडत नाहीत.

* याच्या मुळाशी श्रीविष्णूचा वास असतो असं म्हणतात.
* खरंतर पिंपळ वक्षामुळे वातावरण शुद्ध होते.
* या वृक्षाला प्रदक्षिणा घालण्यास सांगतात, यांचे हेच कारण असेल की ऑक्सिजन चांगला मिळतो.

याची नावे... अश्वत्थ, अक्षय, बोधीवृक्ष, पिंपळ

या झाडाखाली मारूतीचे मंदिर असेल तर अश्वत्थ मारूती असं म्हणतात.
म्हणजेच याचे नाव अश्वत्थ हे आहे.
या वृक्षाला भरपूर आयुष्य असते म्हणून अक्षय वॄक्ष म्हणतात.

भगवान गौतम बुद्ध यांना ज्ञानप्राप्ती याच वृक्षाखाली झाली म्हणून याला बोधीवृक्ष म्हणतात.

बिहार येथील बोधीगया येथे भगवान बुद्धांनी पिंपळवृक्षाखाली बसून तपश्चर्या केली होती.
(या वृक्षाचे पाच वृक्ष निरनिराळ्या ठिकाणी लावले 
त्यातील एक वृक्ष आम्हाला बघायला मिळाला पण तो बोन्साय केला आहे.)




 हा बोन्साय पिंपळ 



:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::



Friday, 8 April 2016

|| श्रीरामाचा नवरात्रोत्सव ||


गुढी पाडवा ते रामनवमी....

रामाचा नवरात्रोत्सव साजरा करतात.
आमच्या येथे रात्री साडेनऊ ते दहा पर्यंत देवाची स्तोत्रे म्हटली जातात.
बारा वर्ष पूर्ण झाली आहेत या रामनवरात्राला.!
आता हे वर्ष तेरावे आहे.
★ प्रणम्य शिरसा देवं..
★ रामरक्षा
★ भीमरुपी महारुद्रा..
★ महारुद्र अवतार हा सुर्यवंशी
★ संसारसंगे बहु शिणलो..
★ करूणाष्टके
दररोज अकरा श्लोक क्रमाने
★ हाचि सुबोध गुरूंचा..
★ श्रीराम जयराम जय जय राम एक माळ जप
★ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ... एक माळ जप
★ निःशक हो निर्भय ....
★ सदा सर्वदा योग तुझा...
★ शुकासारिखे पूर्ण...
★ ज्या ज्या ठिकाणी...
 *उडाला उडाला...

•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•

काल रात्री मी यासाठी बाहेर पडले.
 मस्त थंडगार झुळका आणि त्याचबरोबर प्राजक्ताचा सुगंध....

व्वा.!

आणि म्हणायला सुरुवात केली आणि सुख सुख म्हणजे काय???
 याचा अनुभव येऊ लागला...
मंद शीतल झुळका आणि जोडीला कुणी डोक्यात घातलेल्या गजऱ्याचा सुगंध..
आणि मुखी रामनाम, स्वामीनाम....
सर्वांनी एकत्र म्हणण्याचा जो आनंद आहे... तो तर मिळतोच....
डोळे मिटून देवाचे नाव... स्तोत्रं म्हणणे, जप करतांना डोळे मिटून देवाला नजरेसमोर आणणे.....
यासारखे दुसरे कोणते सुख आहे..???

❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀

''देवाचं'' आणि ''आपलं" एक सुंदर नातं असतं
आपण जास्त काही मागू नये.
आणि देव आपल्याला कधीच कमी पडू देत नाही..!

हो ना......

❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀

Thursday, 7 April 2016

||卐|| पृथ्वीचा नववर्षारंभ दिन ||卐||


सुप्रभात.....

हिंदू नववर्षाचे स्वागत.!

 

 

 

 

.ツ.....ツ.....ツ.... .ツ....

निळ्या आभाळी उभारूनी
उंच गुढी ....
घेऊनी आली ... 
आमरस, जिलेबी, आणि श्रीखंडाची गोडी.!

असं जरी असलं तरी आज कडुनिंबाचा प्रसाद दाखवला जातो.

 व सेवन केला जातो.

यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

❀ ❀ ❀❀ ❀ ❀❀ ❀ ❀

दाराला झेंडू व आंब्याच्या पानांचे तोरण,
 घरासमोर सुंदर रांगोळी.!
लाडक्या माहेरवाशीणीच्या रुपाने चैत्रगौर पुजली जाते.
देव्हाऱ्यातील अन्नपूर्णा... तिचे पूजन करतात.
आता चैत्रगौरी हळदीकुंकू होतील.
आंबाडाळ व आंबापन्हं करून नेवैद्य.!

देवासमोर चैत्रांगण रांगोळी काढली जाईल.


मनात अनंत विचार सुरू झाले....

❀ ❀ ❀❀ ❀ ❀❀ ❀ ❀

        मॉर्निंग वॉकला बाहेर पडले.
 सुखद, शीतल वाऱ्याच्या झुळका स्वागत करत होत्या.
फाटकाबाहेरचा लॅबर्नम फुलु लागलाय.
कोकिळ सुंदर ताना देत
 नववर्षाचे, नव्या दिवसाचे स्वागत करत होता.
अंबामातेचे दर्शन घेतले. मला वाटतं देवीचे नवरात्र आहे.

काही ठिकाणी रामाचे नवरात्र साजरे करतात.

   शांत सुंदर आल्हाददायक वातावरण.!
 कधी पोहोचलो नेहमीच्या ठिकाणी कळलंच नाही.
पारंपारीक पोषाखात सगळे गिरगावात जातांना दिसत आहेत. 
आज शोभायात्रा आहे. एकदम उत्साहाचे आनंदाचे वातावरण.
ताडदेव रोडला सुद्धा शोभायात्रा असते.

 सुंदर भगव्या पताका लावल्या आहेत आणि 

थोड्या थोड्या अंतरावर गुढ्या उभारल्या आहेत.

चैत्र शके १९३८....

हिंदू नववर्षाचे मनःपूर्वक स्वागत..!!

卐  卐  卐  卐  卐  卐  卐  卐  卐  卐

संकलन...

۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞

जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞

गुढी सूर्योदयानंतर लगेचच उभारायची असते.
 अपवादात्मक स्थितीमध्ये (उदा. तिथीक्षय) पंचांग पाहून गुढी उभारावी.
मोठ्या बांबूच्या उंच टोकास पिवळ्या रंगाचे भरजरी कापड बांधतात.
 त्यावर साखरेच्या गाठी, कडुनिंबाची कोवळी पाने, 
आंब्याची डहाळी आणि लाल फुलांचा हार बांधून वर
 चांदीचा किंवा तांब्याचा कलश यांनी सजवून गुढी उभी केली जाते.
 गुढी उभी करतांना
 ती मुख्य द्वाराच्या बाहेर परंतु उंबरठ्यालगत उजव्या अंगाला
 (घरातून पाहिल्यास) भूमीवर पाट ठेवून त्यावर उभी करावी.
 गुढी सरळ उभी न करता पुढील अंगाला थोडीशी कललेल्या स्थितीत उभी करावी. 
गुढीपुढे सुंदर रांगोळी घालावी.
 सूर्यास्ताच्या वेळी गुळाचा नैवेद्य दाखवून गुढी उतरवावी.

卐  卐  卐  卐  卐  卐  卐  卐  卐  卐

 

 

Tuesday, 5 April 2016

आज ५ एप्रिल २०१६....आता एक वर्षाचा झाला माझा blog.....


    गेल्या वर्षी  याच दिवशी मला झालेलं सुंदर सूर्यदर्शन...

 आणि ते तुम्हाला सांगावं असं वाटलं...
त्यावर तुमचे आलेले छान रिप्लाय.!
मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने  छोटं छोटं लिहू लागले.
 चालतांना मनाचा मनाशी संवाद,
★तुमच्याबरोबर होणारा संवाद....
★तुमच्याबरोबर लिखाणांनी होणारी भेट, तुमचे सुंदर रिप्लाय,
स्वतःच्या शब्दातले... त्यातुन मिळणारे विषय....
★एखाद्या दिवशी लिहिलं नाही तर ...
आज लिहिलं नाहीस का????
काहीतरी लिहि आणि पाठव.!
अशी प्रेमळ मागणी,
★हल्ली तू काही लिहलं नाहीस का खूप दिवसात?
अगं blog वरच लिहिते.
असं नको, इथेच पाठव... लगेच वाचून रिप्लाय देता येतो.
★पाऊस सुरू झाला की जाणार ना..... आम्हाला तु लिहिलेलं हवंय...
★म कुठेही गेले तरी काय बरं लिहिता येईल ....
★अशी एक छान नजर मिळाली.
आणि मॉर्निंग वॉक एक आनंददायी सोहळाच झाला.
★पाऊस सुरू झाल्यावर निरनिराळे पर्याय सुद्धा समोर दिसू लागले.
पण चालायला जाण्याचा नियम सोडला नाही.
मग निरनिराळे विषय सुचत गेले.
* प्रथम सुर्योदय..
* चांगले काम करणाऱ्या व्यक्ती,
फुलं, पक्षी, पुतळे, यात्रा वर्णन, प्रवास...
कोणाचे चांगले विचार, एक ना दोन..
तू खरंच का गं इतक्या देवळात गेली आहेस??
तुला मोर दिसला होता का???
एक ना दोन... इतके विषय सुचत गेले.!

अगं हे वाचून असं वाटतंय आपण ही सुरू करावं मॉर्निंग वॉक.!!!!!

********************************

असंही....

 काही चांगलं वाचलं, ऐकलं की कोणाला तरी सांगावं असं वाटतंच.!

********************************

तर हे माध्यम आहे हातात.!
आणि तुम्ही सगळे प्रोत्साहन देणारे....
आता एक वर्षाचा झाला माझा blog.....
आणि लिहिलेली लिखाणं...
२१५ जवळपास.!

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

आता काही आलेसे रिप्लाय.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

अभिनंदन!!!!

खूप सातत्याने लिहिणे साधे नाही.
खूप विषय सहज सुंदर शब्दबद्ध झाले.
त्याला शोभेशी चित्रे टाकली गेली.
हे खरचं मनापासून व्हावं लागतं

 ते अथक परिश्रमांनी साध्य केल्या बद्दल कौतुक आणि अभिनंदन,!!!!!!!

<><><><><><><><><>

काकू 

तुमचा blog असाच बहरत राहो म्हणून खूप खूप शुभेच्छा...

 लेखनाबरोबर बरोबर आयुष्यातले अनुभव सुद्धा बहरत राहतात..
आणि एकदा आपण लिहायला लागलो की प्रत्येक गोष्ट आपण बारकाईने पाहतो.
.जे सामान्य डोळ्यांना  दिसत नाही ते आपल्याला दिसत
 ...अरे यावर आपण लिहू शकतो असं वाटत...

.म्हणूनच म्हणतात जे न देखे रवी ते देखे कवी...

सोप्या भाषेत सांगू काकू लिखाण एक नशा आहे...
एकदा ती जडली की रोज काहीतरी लिहावच लागत

 आणि कमाल म्हणजे रोज नवं सुचतं.!

*********************

Wow congrats

चांगला उपयोग केलास या माध्यमाचा

***********************

फार सुंदर पद्धतीने मांडलंय
तुम्ही एकवर्षाच्या blog बद्दल

∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞

ह्या लिहिण्यामुळे आपल्याला एक शोधक नजर मिळते.
 अर्थात चांगल्या गोष्टी शोधण्याची.!
 ते सुद्धा तु थोडक्यात मांडतेस. 
चित्र अगदी डोळ्यासमोर उभे करतेस.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••

मस्त.... खरंच काकू..

 खुप छान लिहिता तुम्ही आणि
 तुम्हाला आम्ही कोणीही काही सुचवलेलं आवडतं.
त्याचा तुम्हाला कमीपणा नाही वाटत.
हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे.
 तुम्ही लिहिता त्यामुळे आम्हाला खुप छान असं .. 

आपल्या रोजच्या घडामोडीतलंच अधिक जवळचं ... 

असं वाचायला मिळतं..

 

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

Keep it up

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

Great!.....

❀ ❀ ❀❀ ❀ ❀❀ ❀ ❀ ❀❀ ❀ ❀❀ ❀ ❀

२५० झाले की एक print out घेऊन ठेवीन.

म्हणजे मनात आले की वाचता येईल. 
 त्यासाठी भ्रमणध्वनीवर अवलंबून रहायला नको. 
माझ्यासारख्यांना वाचायला सोपे.

❀ ❀ ❀❀ ❀ ❀❀ ❀ ❀

 wow.....superb !!!!!!

 काकू , असंच लिहीत राहा 

 वाचून खूपच छान वाटतं 

 सुरेख , अप्रतिम, झक्कास !!!!!

۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞