Thursday, 8 October 2015

मायादेवी- कलियुगातली

मायादेवी-

मी यावर एक सत्य सांगते.
मला २.३० वाजता जाग आली म मी whatsapp open केले
एक गोष्ट शोधत होते.
शोधता शोधता नको असलेले delete करत होते. असा एक तास गेला....
 म मी ब्रह्म मुहुर्तावर ....
श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.... असा जप सुरू केला. तर ……
जांभया यायला लागल्या.
म मी नेटाने दोन माळांच्या ऐवजी चार माळा जप केला. 
पण तरीही मायादेवी आपले काम करीतच होती.
पण मी सुद्धा जप करणे सोडले नाही आणि चार माळा जप पूर्ण केला
पण.... जांभया येतच होत्या ना.....
ठरलंय ना.... ब्रह्ममुहुर्तावर जाग आली की जप करायचा, म करायचाच
है ना…
हो.... मला वाटतं स्वामींनी त्या पूर्ण करून घेतल्या.
मजा म्हणजे whatsapp बघत असतांना एकही जांभई नव्हती.
असाच अनुभव प्राणायाम, आसनं करतांना पण येतो.
तेव्हा सुद्धा जांभया येतात.
यावरून मात्र एक शिकले!
ज्यावेळी अशी जांभई येईल ते म्हणजे चांगले काम
ते करतच राहायचं!!!!!

√√√√√√√√√√√√√√√√√√√√√√√√√√√√√√√√√√√√√√√√√√√√√√√√√√√√√√√√√√√√

No comments:

Post a Comment