Friday, 16 October 2015

अंबामाता


फिरायला जातांना अंबामातेचं दर्शन घेते.
बरेच जण स्कूटरवर बसूनच, गाडीत बसूनच दर्शन घेतात.
रस्त्यावर तर काहीवेळा गाड्यांची रांग पण असते.
(तीनचार गाड्या एकामागोमाग उभ्या असतात, एरव्ही सुद्धा)
     सध्या नवरात्र आहे तर ते मंदिर छान सजवलंय, लांबूनही दिसणारी विद्युत रोषणाई, कमान आपले लक्ष वेधून घेते. मंदिरात गेल्यावर एक गोष्ट लक्षात येते
 ती म्हणजे देवदर्शन आपण शांतपणे घेतोय.....
कारण आपली पादत्राणे सांभाळण्यासाठी तेथे चारपाच लोक बसले आहेत.

     आता यांत काय नविन आहे????
तर हे लोक फक्त या दिवसापुरतेच हे काम करतात.
पुर्वी असं म्हणत असत...
.देवदर्शन करताना मंदिरात जरी आपण हात जोडून उभे असलो तरी मनात असा विचार असतो की...
 बाहेर चप्पल चोरीला तर जाणार नाही ना???
बरं ही चप्पल चोरीला गेली तर मनाचं असं समाधान मानायचं की जे काही वाईट होतं ते ह्या चपला गेल्या त्याच्यारुपाने गेलं!!!!
    असंच दाभोळकरांचं दत्त मंदीर आहे ते फक्त दत्तजयंतीला दर्शनासाठी खुलं असतं. तेव्हाही पादत्राणे सांभाळणारे तेथे असतात.
एरव्ही हे लोक काय बरं काम करतात??? असा प्रश्न पडतो.
पण देवदर्शन मात्र आपण निश्चिंत मनाने घेतो हे नक्की!

     आजचा सुर्योदय....

आकाश अगदी स्वच्छ !
 आकाश आकाशी आणि पांढऱ्या ढगांचे पुंजके आणि त्याला सुंदर सोनेरी किनार..
दूरवर तर सगळे आकाश सोनेरी .....
 एकदम फ्रेश वाटत होते. इतक्यात आपण चित्रात काढतो ना तसे सुर्याचे किरण.. 
 पण ते पांढरे दिसू लागले.
सुंदर दृश्य.... मस्त बघत उभी राहिले.
पण अजून सूर्य दर्शन झाले नव्हते.
 पण पुढे आल्यानंतर झाडातून सोनेरी तेजस्वी सूर्य दर्शन झाले.
 सुर्याला अभिवादन केले.
(प्रत्यक्ष सुर्याकडे बघता आले नसते.)

No comments:

Post a Comment