Tuesday, 31 January 2017

आज माघी गणेश चतुर्थी



मन बालपणात गेले

आमचे अण्णा... गणेश भक्त

पण म्हणून पूजा, सोवळे, मंदिरात रांग लावून जाणे असे काहीच नव्हते.!

     रविवारची दुपार.! 

आम्ही भावंडे खेळत होतो,
अण्णा दुपारी वामकुक्षी घेत होते, 
ते झोपेतून एकदम उठले 
आणि बाहेर जायचे कपडे घालून निघाले,
 कोणाशी काहीही बोलले नाहीत.
 साधारण एक तासाने ते घरी आले.
 हातात रुमालात झाकलेले काही होते 
आणि ते त्यांनी फळीवर तसेच ठेवले.. 
कोणाशी काहीच बोलत नव्हते.
म आईने त्यांना विचारले

आई : असे अचानक कुठे गेलात... भर दुपारी???

आणि काय आणलय???
कोणाशी काहीच बोलत नाही???

अण्णा : अगं मला एक स्वप्न पडले... 

आपल्या दादर चौपाटीवर एक पांढरी साडी नेसलेली बाई रडत आहे 
आणि ती मला म्हणते कि तू मला तुझ्या घरी घेऊन चल.
म्हणून मी बघायला गेलो कि खरंच कोणी अस आहे का???

तर...... नेमके त्याच ठिकाणी हा गणपती बाप्पा.!

म घरी घेऊन आलो.

आई : अहो अस काही नसत

कोणी विसर्जन केलेल्या मूर्ती किनाऱ्यावर येतात ना... तशीच हि मूर्ती.!
आणि हि तर मातीची पूर्ण भाजलेली रंगहीन मूर्ती आहे ती पाण्यात विरघळणारी नाही.
 ( मंगलोरी कौले असतात तशी )

समुद्र आपल्या पोटात काही ठेवत नाही म्हणतात

 ते खरंच
 कुठल्या ना कुठल्या किनाऱ्यावर वस्तू सापडतात.
असो... काही दिवसांनी अण्णांनी त्या मूर्तीचे विसर्जन केले..

पण परत काही दिवसांनी अण्णांना तसेच स्वप्न पडले...

आता मात्र त्यांना माहित होते  कि... गणपती मूर्ती....

पण यावेळी एक उजव्या सोंडेचा लहान आणि एक डाव्या सोंडेचा थोडा मोठा असे दोन गणपती बाप्पा मिळाले.! 

मागच्या वेळेप्रमाणे.. घरी आणले. 

आणि काही दिवसांनी विसर्जन केले.

तिसऱ्या वेळी जेव्हा असे स्वप्न पडले 
 तेव्हा आई म्हणाली ... तुम्हाला माहित आहे कि अशी बाई कोणी नाही गणपती आहेत, 
आणि ते कोणी विसर्जन केले आहेत आता जाऊ नका...
पण ते त्यांना पटले, ते चौपाटीवर गेले नाहीत

या मूर्ती अगदी लहान असत साधारण १२ इंच.!


असो...

आमचे गाव महाड.! 

येथे एक सुंदर गणपती मंदिर आहे.. 

 

 

तेथे होणाऱ्या उत्सवात  पाणिग्रहण या नाटकात अण्णांना काम करण्याची संधी मिळाली.!

No comments:

Post a Comment