आज हाजीअली जवळ दिसणारे आकाश बघून मनात अनेक विचार आले.
या वेळेला कातर वेळ म्हणतो.
मन थोडं उदास होत
घरी सगळे असावेत अस वाटतं
तेच सकाळी उगवतीला केशरी रंग तेजस्वी....
सगळे उत्साहित....
~~~~~~~~~~~~~~
पहाट आपल्याला ईश्वराच्या प्रेमाची आठवण करून देण्यासाठी उगवत असते.
~~~~~~~~~~~~~~
आता मात्र .....
रवी गेला रे सोडून आकाशाला....
यावेळी आपल्याला
उदास उदास वाटू लागते...
कुणी अस म्हटलेलं आठवतय.!
जस सकाळ हा उभारी चा काळ...
तर संध्याकाळ ...
तिन्ही सांजा हा उतरणीचा काळ...
.ツ.....ツ.....ツ.... .ツ....
भा. रा. तांबे म्हणून गेलेत
संध्या छाया भिवविती हृदया
.ツ.....ツ.....ツ.... .ツ....
कुणी काव्य केलंय...
ह्या कातरवेळी पाहिजेस तू जवळी.!
**********************
○ संपूर्ण दिवस काम करून थकले भागले जीव घराच्या ओढीने येतात...
○ पाखरे घराकडे परततात...
○ प्राणी पक्षी पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी जातात.
( जंगलात )
दिवेलागणीची,
तिन्ही सांजेची वेळ.!
देवासमोर दिवा लावतो.
दिव्याची प्रार्थना करतो.
अशा शांत, मंद तेवणाऱ्या ज्योतीकडे बघत राहावे वाटते.
देवाला प्रार्थना करण्याची योग्य वेळ.!
घराघरातून बालगोपाळ मंडळी परवाचा म्हणतात.
घरातील थोरामोठ्याना नमस्कार करतात.
खरतर ब्रह्म मुहूर्त ....
यावेळी सगळीकडे शांतता असते.
झोपही पूर्ण झालेली असते.
म पूजा, नामस्मरण करण्यास उत्तम वेळ.!
मन एकाग्र होते.
तस संध्याकाळी....
प्रार्थना केली जाते.
खरतर नामस्मरण केव्हाही आणि कुठेही घ्यावे.
.............................. .....
संकलन: ↓↓↓
.............................. ......
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
प्रार्थना:
दोन वेळा महत्वाच्या
दोन प्रहर प्रार्थनेसाठी फार महत्वपूर्ण आहेत.
पहिला प्रहर सकाळचा, जेव्हा रात्र सरलेली असते.
परंतु दिवस मात्र अजून उगवलेला नसतो.
तर दुसरा प्रहर संध्याकाळचा
जेव्हा
दिवस मावळलेला असतो अन रात्र मात्र नुकतीच सुरु झालेली असते.
हे दोन क्षण
प्रार्थनेसाठी सर्वाधिक महत्त्वपूर्ण आहेत.
कारण या दोन समयी आपण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून सर्वाधिक मुक्त असतो.
या वेळी आपण आपल्या सर्वाधिक निकट असतो.
परमेश्वर आपल्या निकट
असतो.
आपण थोडासा हात पुढे करायचा अवकाश, कि तो आपल्या हाती लागू शकतो.
म्हणून आपण या वेळी प्रार्थना करतो.
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
तुकड्यादास म्हणे .........
पूर्वी प्रातःकाळी मध्यान्हा
आणि सायंकाळी जाणा
होती त्रिकाल संध्याप्रार्थना
संस्कारास्तव लाविली !!
ते सर्वकाळची उचीत
म्हणोनी प्रातर्ध्यान नियमित
आणि सायंप्रार्थनाही नेमस्त
करित जावी सर्वांनी !!
निद्रेचीये आदिअंती
दिवस रात्रीच्या संधीप्रती
आणि भोजनसमयी संकल्प होती
ते बनती दृढ संस्कार !!
जय गुरूदेव !!!
❀ ❀ ❀❀ ❀ ❀❀ ❀ ❀
रात्री म्हणावे.
पड पड कुडी धरणीवरी
धरणीमाता कृपा करी
अस्तिक कस्तिक काळभैरव दंडपाणी
कफल्लक कफल्लक कफल्लक
अस्तिक अस्तिक काळभैरव दंडपाणी
माझ्या पाठीमागुन येईल त्याला अस्तिक ऋषींची शप्पथ शप्पथ शप्पथ!!
।।श्रीगुरूदेव दत्त।।
।।श्रीगुरूदेव दत्त।।
। श्रीगुरूदेव दत्त।।
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
No comments:
Post a Comment