श्लोक म्हणताना ......
आठ अक्षरे झाली कि आपण किंचित थांबतो
हे आठवे अक्षर ऱ्हस्व असेल तर ते दीर्घ होण्याची शक्यता असते
त्याकडे लक्ष द्यावे.
ष याचा उच्चार व्यवस्थित करावा
जिथे अक्षराला *य* जोडला असेल तेथे तो नीट उच्चार करावा
संप्रेक्ष्य
वक्ष्यामी
◑◐◑◐◑◑◐◑◐◑◑◐◑◐◑
तसेच जेथे *ष्ठ* असतो तेथे ठ चा उच्चार ट असा होण्याची शक्यता असते
तो ठ असा करावा
काही शब्द ज्याच्या उच्चारकडे नीट लक्ष द्यावे
जा+ह् + न + वी = जाह्नवी
गृ+ह् +णा+ ति = गृह्णाति
ब+ह् +म = ब्रह्म
६|४४
ह्रियते ह्+रि = ह्रि
हृदय hrudy ह् + रु = हृ
ऱ्हस्व
ऱ् + ह= ऱ्ह
प्रह्लाद
प्+र+ ह् + ला+द
⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘
मार्गदर्शन...
श्लोक म्हणताना शब्द जर शब्द कठीण वाटत असेल तर...
तो शब्द म्हणताना स्पीड कमी करायचा.
ʕʔ ʕʔ ʕʔ ʕʔ ʕʔ ʕʔ ʕʔ
६|१६
नात्यश्नतस्तु ...
शब्द योग्य म्हणायचा आहे तर सावकाश म्हणावा
प्रत्येक श्लोक एकाच स्पीड मध्ये म्हटला पाहिजे असे नाही.
आपण म्हणताना योग्य आणि न चुकता म्हणायचं आहे.
मला श्लोक पाठ करायचे म्हणून मी केले
आपण स्पर्धेत आपल्या आनंदासाठी भाग घेतलाय
त्याने काही लाभ होणार म्हणून भाग घेतला नाही.
आपल्याला आनंद झाला कि बाकी गोष्टी दुय्यम असतात.
स्पर्धेचे परीक्षक हे संस्कृत पंडित असतात.
त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो.
आपण आपल्या आनंदासाठी श्लोक म्हणतो हे लक्षात ठेवले कि आपल्याला आनंद मिळतो.
आणि जर समोरच्याला आनंद झाला तर...
आपला आनंद द्विगुणित होतो.
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
असे वेळोवेळी गीता वर्गात सुंदर मार्गदर्शन होते.
हे दहावा अध्याय सुरु असताना ....
आणि स्पर्धेसाठी सहावा अध्याय म्हटल्या नंतर मिळालेले मार्गदर्शन आहे.
दहावा अध्याय हा विभूतीययोग अध्याय आहे.
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
८। ७
*एकश्लोकी गीता*
तस्मात्सर्वेषु कालेषु
मामनुस्मर युध्य च ।
मय्यर्पितमनोबुद्धिर्
मामेवैष्यस्यसंशयम् ।।
✧✧✧✧✧✧✧✧✧✧
अर्थ:
हे अर्जुना!
तू सदैव माझे ( कृष्ण या रूपाचे ) स्मरण केले पाहिजे
आणि
त्याच बरोबर तुला आपल्या युद्धरूपी स्वधर्माचेही आचरण केले पाहिजे.
तुझी
कर्मे मला अर्पण केल्याने आणि
तुझ्या मनाला आणि बुद्धीला माझ्या ठायी स्थिर
केल्याने
तुला निःसंदेह माझी प्राप्ती होईल.
✿✿ ✿✿ ✿✿ ✿✿ ✿✿
९।२२
अनन्याश्चिन्तयन्तो मां (य् )
ये जनाः पर्युपासते ।
तेषां(न् ) नित्याभियुक्तानां(य्
योगक्षेमं(वँ) वहाम्यहम्
❀ ❀ ❀❀ ❀ ❀❀ ❀ ❀
अर्थ:
जे लोक अनन्य भक्तिभावाने
माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करीत माझी उपासना
करतात,
त्यांच्या गरजा मी पूर्ण करतो
आणि त्यांच्याकडे जे आहे त्याचे मी
रक्षण करतो.
ॐ♤ॐ♤ॐ♤ॐ♤ॐ♤ॐ
स्वामी समर्थ....
यांनी शेवटी हा श्लोक म्हटला आणि.......
समाधी लिलेचे निमित्त करून पृथ्वीतलावरून गुप्त झाले.
चैत्र वद्य त्रयोदशी ..सहवद्य
चतुर्दशी.. शके १८००,
सन १८७८ ....
समर्थ निजानंदी निमग्न झाले.
No comments:
Post a Comment