साहित्य:
सुरती पापडी, कंद, बटाटे (छोटे), तुरीचे दाणे, रताळी, वांगी,
हिरव्या मिरच्या,(बोटा एवढ्या लांबीच्या),
केळी, मेथी मुठिया...
(उंधियु करताना याच क्रमाने भाज्या घालायच्या)
हिरवा मसाला:
कोथिंबीर १ मोठी जुडी,
ओली लसूण १ जुडी,
कांदा लसूण १
आले, मिरच्या, धने जिरे पावडर, गोडा मसाला, तिखट, हळद, मीठ.
मिरची मसाला :
डाळीचे पीठ, मीठ, साखर, लिंबू रस, तेलाचे मोहन.
सर्व साहित्य एकत्र करावे
मिरच्यांना छेद द्यावा आणि वरील साहित्य त्यात घट्ट भरावे.
मेथी मुठिया :
मेथी धुवून बारीक चिरावी, व मीठ लावून ठेवावी मग त्याचे पाणी
काढावे.
त्यात तिखट, मीठ, ओवा, हळद, तेलाचे मोहन, डाळीचे पीठ.
(आवडत असेल तर थोडी साखर घालावी)
नंतर त्याच तेलात उंधियु करावा.
वांगी मसाला :
कांदा बारीक चिरून, कोथिंबीर, गोडा मसाला, चिंच, गूळ, धने जिरे पावडर. सगळे एकत्र करून वांगी भरावी.
कृती:
तेलात ओवा हळद घालून प्रथम सुरती पापडी हिरवा मसाला लावून टाकावी.
मग
क्रमाने प्रत्येक भाजी हिरवा मसाला लावून टाकावी,
अगदी मुठीयांना सुद्धा
मसाला लावावा.
तयार होण्यासाठी वेळ लागतो
वालाचे दाणे काहीजण घालतात
उंधियु काविलथ्याच्या उलट बाजूने ढवळावा.
साहित्य आपल्याला हवे तेवढे घ्यावे.
बटाटे स्वच्छ धुवून सालासकट घ्यावे,
सुरती पापडी जास्त घ्यावी.
आवडत असलास वेलची केळी घ्यावी ती अख्खी घालावी
नाहीतर हिरवी केळी तुकडे करून घ्यावे
उंधियु करताना पाणी वापरू नये, तेलातच करावा.
भाजी धुण्यासाठी जेवढे पाणी असेल तेवढेच.!!!!!
सगळ्यात शेवटी मुठिये....
आधीच घातले तर सगळा रस मुठिये शोषून घेतात.
उंधीयो फारच सुरेख झाला आहे.
ReplyDeleteउंधीयो फारच सुरेख झाला आहे.
ReplyDelete