मनुष्याचा जन्म होतो तेव्हा....
प्रथम तो रडतो त्या वेळी त्या बाळाचा प्रथम आवाज येतो तो असतो
सोSहम....
कोSहम...
मी कोण? मी कोण?
आणि पुढील प्रवास हा मी कोण मला काय व्हायचंय यात जातो.
एक गोष्ट आली आणि ..पुढे मनात आलेले विचार लिहिले गेले. आलेली
गोष्ट.. थोडक्यात...
°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°• °•°•°•°•
एका चित्रकाराने चित्र काढले,
बघता क्षणीच कळत नव्हते... पांढऱ्या कागदावर काळा ठिपका.!
आपले आयुष्य या काळ्या ठिपक्या प्रमाणे आहे.!
या जगात आपले आयुष्य म्हणजे एक टिम्ब .!
•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•° •°•°•°•°
आलेला विचार.....
जगज्जेता सिकंदर म्हणाला होता ना....
की मला शेवटी दफन कराल तेव्हा साऱ्या जगाला कळू दे की
जगज्जेता असूनही हा जातांना बरोबर काही घेऊन गेला नाही याचेही हात रिकामेच होते.
म्हणूनच .......
♂♂♂♂♂♂♂♂♂♂♂♂♂♂♂♂♂♂♂♂♂♂
आयुष्यभर कशाची हाव धरु नये.
आणि संचय करू नये.
◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎
खाली हाथ आया है
खाली हाथ जायेगा...
◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎
मनुष्य जन्माला येतो तेव्हा कोणतेही वस्त्र नसते.
मनुष्याचे पहिले वस्त्र लंगोट
त्याला खिसा नसतो.
आणि शेवटच्या प्रवासाला निघतो तेव्हा असते पांढरे कफन...
त्यालासुद्धा खिसा नसतो...
या मधील प्रवासात बरीच लोकं इतके खिसे भरण्याच्या मागे असतात....
आताच नोट बंदी आली त्यावेळी आपण बघितलेच कि किती संपत्ती जमा केली माणसाने.!
खरतर पोटाची खळगी किती असते...
माणसाला जेवायला ओंजळभर जेवण पुरते आणि ओंजळभर पाणी.!
आणि झोपायला, व्यायाम करायला सहा फूट जागा
कि दोन हात.....
असच काहीसं म्हणतात.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
मोठे मोठे लोक सांगून गेलेत कि
*कोणतीही गोष्ट जास्त असेल तर ते विष.!
म त्याचे व्यसन लागते.
* संचय करण्यापेक्षा वाटायला शिका...
* पैसा सुद्धा आणखीन हवे आणखीन हवे या लोभामुळे,
हव्यासामुळे कितीही मिळवला तरी कमीच वाटतो.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
वाडीतील एक मुलगी येथून कल्याणला जाणार होती
तेव्हा मी तिला असेच सांगितले होते कि... आता तू येथून जात आहेस
तर एक गोष्ट लक्षात ठेव.
जग फार मोठे आहे.
जर तू नकाशा बघितलास तर
तुझ्या लक्षात येईल कि आपली वाडी म्हणजे एक टिम्ब आहे.
आणि त्यातील एक व्यक्ती म्हणजे.....
ती काही दिवसांनी मला भेटायला आली तेव्हा ती म्हणाली
कि खरंच काकू तुम्ही म्हणालात ते खरंय हो.!
कित्ती वेगवेगळी लोकं भेटली... खरंच जग खूप मोठे आहे....
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°° °°°°°
असो...
तरीही आपण पण मात्र काहींना काही केलेच पाहिजे स्वतःच्या समाधानासाठी
पैसे मिळवले तर कुणाला मदतीचा हात देता येईल.
चांगलं नाव मिळवलं तर.... लोकांना प्रेरणा घेता येईल.
कायम पाय मात्र जमिनीवर हवे.!!!
.............................. ......................
No comments:
Post a Comment