Tuesday, 28 February 2017

वसंत ऋतू आला...

सुप्रभात....

वसंत ऋतू सुरु झाला आहे कधीच पण... 

आज फिरायला बाहेर पडलो आणि गावदेवी जवळ

 अगदी ज्या झाडापाशी आम्ही होतो तेथेच कोकिळ कुजन ऐकू आले...

 सहज शब्द आले.

आला वसंत ऋतू आला...


कोकिळ कुहू कुहू बोले.!

कोकिळ कुहू कुहू बोले....


आता नवीन पालवी फुटेल...
निसर्गाचा सृजनाचा काळ..
उन्हाळा हळूहळू वाढत जाईल, 
आणि उन्हाळी फळांची मज्जा अनुभवता येईल,
 आता जरी परीक्षांचा काळ असला तरी
 त्यानंतर येणारी मोठी उन्हाळ्याची सुट्टी, ....
सुट्टीत कुठे कुठे जायचे बेत सुरु असतील.!

एक कोकिळ पक्षी त्याचे कुहू कुहू, 

मनात अनंत विचार येऊन गेले.

 घरी आले तर 
सकाळची चिमण्यांची चिव चिव, किलबिल.... 
मधेच कावळ्याचे ओरडणे...

आणि हो.... अजूनही सकाळच्या वेळी हवेत छान गारवा आहे.

(याचा अनुभव गजबजणाऱ्या मुंबईत घेतोय. मुंबई म्हणजे.. खरतर कोकणच)

    खरतर माघ शुद्ध पंचमीला वसंत ऋतू सुरु झालाय.

हा निसर्गाचा उत्सव आहे.

(वसंतोत्सव) 

काही ठिकाणी तो कला सादर करून, सरस्वतीचे पूजन करून साजरा करतात.
सतत सुंदर भासणारा निसर्ग वसंत ऋतूत सोळा कलांनी फुलून उठतो. 

 भगवान श्रीकृष्णानेही गीतेत 

ऋतूनां कुसुमाकरः

असे म्हणून ऋतुराज वसंताचे वर्णन केले आहे
 ( अध्याय १० | ३५ )

भरपूर फळे, सुगंधी फुले, कोकिलेचे कुजन... 
अशा अनेक गोष्टींनी उन्हाळा सुसह्य होतो.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••

Monday, 27 February 2017

काल झालेल्या मराठी भाषा दिनानिमित्ताने.....



मी आणि मैत्रीण छान संवाद झाला. 

आपल्या लाडक्या व्हाट्सअँप वर...

◆ मैत्रीण
◇ मी

◆ सौंदर्य मराठीचे हे तुम्ही लिहिलं आहेत का.?

◇ हो.
◆ सावरकर यांनी कित्ती शब्द दिले आहेत मराठी भाषेला.!

◇ आताच ब्लॉग वर लिहिताना यातील काही शब्द लिहिले.
काही शब्द
संचलन (परेड)
टपाल (पोस्ट)
प्राचार्य (प्रिन्सिपॉल) इत्यादी.
◆ किती ग्रेट आहेत सावरकर , किती चपखल प्रतिशब्द सुचवले आहेत त्यांनी, मला वाटते झरणी सोडून बाकी सगळे शब्द छान प्रचलित झाले आहेत.
 ◇ हो

पण इंग्लिश च्या हट्टापायी...
मराठी बाजूला पडेल
ब्रिटिशांचे राज्य १५० वर्ष!
हे प्रमुख कारण.
◆ इंग्लिश हि आपल्यासाठी पोटार्थी भाषा आहे ना ,
काय करणार?
◇ आणि त्याचे रुबाबदार दिसणे, पैसा, स्वछता हि कारणे झाली.
आपण इंग्रजीकडे वळायला.
कारकून घडवत होते हे लक्षात घेतले नाही.
 आणि आपला भारत...
अनेक भाषा बोलणारा देश
त्यामुळे सर्वमान्य झाली हि एक भाषा! इंग्रजी!!!
 जोडला जातो माणूस
या भाषेमुळे.!
◆ इस्त्रायल देशाची स्थापना १९४८ साली झाली, जगातील वेगवेगळ्या देशातून इस्त्रायल मध्ये माणसे स्थलांतरित झाली. त्या देशाची एक भाषा नव्हती, 
त्यांनी हिब्रू हि भाषा स्वीकारली, 
त्या भाषेत शालेय पुस्तके तयार केली, 
हिब्रू चे वर्ग सुरु केली ,
ते अजिबात इंग्लिश वर अवलंबून नाहीत,
जपान मध्येही तसेच आहे,
 फ्रान्स ,जर्मन ह्याही देशात तसेच आहे, ते सगळे व्यवहार त्यांच्या स्वतःच्या भाषेत करतात
◇ हो.
आता तुम्हाला तेच म्हणणार होते.
तेवढ्यात फोन आला.
म आपलं बोलणं राहिलं.
 ◇ आणि आपला भारत...
अनेक भाषा बोलणारा देश!
त्यामुळे सर्वमान्य झाली हि एक भाषा.
जोडला जातो माणूस
या भाषेमुळे
 हे कारण असू शकेल
◆ हो तसेही आहे
◇ आमच्या वाडीत चार पाच जण केवळ संस्कृत बोलण्यासाठी दिंडीत जमत असत.
◆ मला असे वाटते 
हिंदी हि आपल्या सगळ्यांना जोडणारी भाषा होऊ शकली असती, 
पण दक्षिणेतल्या लोकांचा तीव्र विरोध होता ना.....
◇ हो.....
प्रत्येकाला आपली भाषा प्रिय असते हेच खरं.!
त्यानंतर अजून एक मला मेसेज आला त्याला उत्तर देताना....
मी म्हटलं...

खरंय...
आपण कुणीही भेटलं कि भय्या ... नेच सुरुवात करतो.

मुलांना मराठी मिडीयम मध्ये घालत नाही.

तरी माध्यम कुठलंही असलं तरी शिकवणी हवीच.!

तरी आग्रह... इंग्लिश मिडीयम, आणि शाळेचा प्रवास तर थक्क करणारा..
इंग्लिश मिडीयम, कॉन्व्हेंट स्कूल, ICSC , CBSC
इंटर नॅशनल स्कूल... 

असो.... जग ज्या मार्गाने जातंय त्या मार्गाने जावं लागत हेच खरं.

 आणि आता या माध्यमाबाबत..whatsapp

यावर रिप्लाय देताना

खूप त्रास होतो म्हणे... मराठीत लिहिताना.!

वाचताना त्रास झाला तरी चालेल 
मिंग्लिश मध्ये .... लिहिणार!
अस लिहिलेलं वाचताना अर्थ बदलला तरी चालेल.

आणि म्हणे...
मी मराठी !!!!!

बघा... कसा बदलतो अर्थ,

( हा आहे आलेला मेसेज )


काही वेळेला इंग्रजी अक्षरं वापरून मराठी लिहायचा केलेला प्रयत्न पाहून हसू येते. 
अर्थ बदलतो. 

गैरसमज होतो, कसा ते पहा...


एकानं कॉमेंट मध्ये लिहिलं होतं,
 paus padat (पडतंच म्हणायचं असंल) hota, 
Mi bhaji (भजी का भाजी) khau shakalo nahi. 


एकानं एका कॉमेंट मध्ये लिहिलं, 
janu tuch kelas. वाचणाऱ्या लेडीजला वाटलं 
हा आपल्याला जानू (janu) म्हणतोय. 

त्याला ‘जणू’ म्हणायचं होतं. 


Vadhdivas हा शब्द तर वधदिवस वाटतो. 

Vadhdivasachya shubhechha. वाचा जरा. 


Ghan ghan mala nabhi datlya 

सुरुवातीस वाचताना घाण घाण माळा असं वाटतं..



आणि काही वाक्य सुचतायत का तुम्हाला? 
म्हणून  म्हणतेय   मराठीचा   वापर  करा.

๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑


Sunday, 26 February 2017

सौंदर्य मराठीचे.!


✽  ✽✽  ✽✽  ✽✽  ✽✽ ✽✽ ✽✽  ✽

आज मराठी भाषा दिन.!  



किती जणांना वर्णमाला येत असेल???

◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎

मराठी स्वर...

अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अं अः...

ऋ श्र 


व्यंजने... क्  ख् असं असतं

यात अ मिसळला कि पूर्ण अक्षर., क असं होतं.

क ख ग घ ङ
च छ ज झ ञ
ट ठ ड ढ ण 
त थ द ध न
प फ ब भ म 
य र ल व श
ष स ह ळ 
क्ष ज्ञ 
ही  दोन जोडाक्षरे
क्ष ... क् + ष 
ज्ञ.... ज् + ञ
तस श्री हे जोडाक्षर आहे ना
  श् + र श्र

 बाराखडी...
अकार, ्
आकार,  ा
इकार   ि
ईकार  ी
उकार   ु
ऊकार   ू
एकार  े
ऐकार   ै
ओकार   ो
औकार ौ
अंकार ं
अःकार  ः

क का कि की कु कू के कै को कौ कं कः
याप्रमाणे.... ज्ञ पर्यंत.

एक अक्षरी शब्द ज्याचा वापर आपण वाक्यात करतो.

कि  उ  ए ओ ऑ
छू  छे 
जी जू जे जो
ढ  ती  तू  ते  तो 
धू   नि  ने 
पू   पि  बा  बी 
मी  यू  ये 
व  वा  शी  शू
सू  सौ.
   ही  हे   हो  हं 

असे आहेत काही एकाक्षरी शब्द.!

----------------------------------
जोडाक्षर... दोन अक्षरे एकत्र केली कि होते जोडाक्षर

यातील र हे अक्षर वेगळ्या वेगळ्या प्रकारे दिसते जोडल्यावर

ऱ्ह ... ऱ्हस्व

कृ ... कृष्ण

क्र ... क्रम

र्क .... अर्क

ष्ट्र ..... राष्ट्र

त्र .... पत्र

~~~~~~~~~~~~~~
ँ 
ॅ ... ऑ
ं ..अंतर
____________________

ळ हे मराठीतील स्वतःचे वेगळेपण दाखवणारे अक्षर
तर त्याच्या जवळचे वाटणारे अक्षर  'ल'

पण ल जिथे हवा तिथे ळ लिहून चालत नाही.

अर्थच बदलतो.

लाल .... रंग
लाळ.... 
ओल... जमिनीला भिंतीला येते 
ओळ... रांग
दल... पोलीस दल
दळ... दळणे
::::::::::::::::::::::::::::::::::::::::
घननीळा लडिवाळा या गाण्यात बरेच वेळा 
आला आहे.

 कवी: गदिमा.!

***********************

ळ, ण या अक्षराने सुरु होणारे शब्द नसतात.

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

शब्दाला जोर येण्यासाठी काहीवेळा 'च' वापरला जातो.


नाही करणार

पण ते नाहीच करणार...

म्हणजे नक्की करणार नाही.
**********************
च चा उच्चार दोन प्रकारे  होतो...

चमचा, चांदी, चूक, चला चावी.


चड्डी, चिवचिव, चिंता, चिमटा, चिमणी....

**********************

असंच ज .
जहाज, जन्म, जग, जवळ,
जर...

जिराफ, जिंकणे, जीवन...
०००००००००००००००००

झ... झबले, झगा, झोंबणे

आणि... झिंग, झिंगाट
०००००००००००००००००

ष हा उच्चार नीट करावा लागतो.

••••••••••••••••••••••••••••
ऋषी ऋता ऋत्विक ऋजुता ऋत्विका 
ऋग्वेद ऋजु ऋषिकेश ऋग्वेदी
••••••••••••••••••••••••••••

तसं... शब्द एक आणि अर्थ दोन तीन असतात...


चाळ... एकाच मजल्यावर अनेक खोल्या असलेली इमारत
आणि 
चाळ म्हणजे नर्तकीच्या पायातले घुंगरू!
~~~~~~~~~~~~~~
शिरा... गोड पदार्थ,
आणि
 दुसरा अर्थ रक्तनालिका.

~~~~~~~~~~~~~~
असे अनेक शब्द असतात
••••••••••••••••••••••••••••

तसं ं अनुस्वार

प्रत्येक वेळी त्याचा उच्चार करत नाही पण अनुस्वार देतो.

जसं... तसं, रागवयाचं,
नसायचं, गाणं, नवं 
नांव...

अनुस्वार नसेल तर... कसं वाचलं जाईल???


आणि
 हाच अनुस्वार जर वेगळ्याच ठिकाणी आला तर कसा अर्थ बदलतो....

हे कुणीतरी लिहिलेलं आहे.!

↓↓↓

××××××××××××××××××

.....टिंब कविता

एकदा एक टिंब
इकडे तिकडे हिंडले......

             शब्दांच्या बागेमध्ये
              फुलपाखरु झाले!

'नदीचा केला नंदी'
'माडीची केली मांडी'

             'बाबुचा केला बांबु'
                  'कुडी'ची कुंडी'

'शेडी'ची केली 'शेंडी'
'अग' झाले 'अंग'

             'भाडे' बनले 'भांडे'
                 'रग' बनला 'रंग'

 हिंडुन हिंडुन असे
 टिंब अगदी दमले

       वाक्याच्या शेवटी येऊन
                पुर्णविराम बनले.
................................................

कोणतीही भाषा चार कोसावर बदलते म्हणतात.

वऱ्हाडी, कोंकणी, वैदर्भीय, अहिराणी, खान्देशी, नागपुरी.... 
कित्ती भाषा...  तरीही कानाला गोड वाटतात.
::::::::::::::::::::::::::::::::::::::::
चक्रधर स्वामी यांनी लिहिलेले.. मराठी
ज्ञानेशवरी चे मराठी, 
शिवाजी राजांच्या काळातील मराठी.... 
असे बदल होत होत आताचे मिंग्लिश मराठी.!

इंग्रजीमधील शब्द चपखल येऊन बसले मराठीत.


स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी तर कित्तीतरी प्रतिशब्द दिले आहेत इंग्लिश शब्दाऐवजी.
बोलपट, क्रमांक, चित्रपट, मध्यंतर मूल्य , निर्बंध विशेषांक इत्यादी

पण हळूहळू मराठी भाषा लोप पावेल कि काय???

असे वाटू लागले.
याची पहिली पायरी मराठी शाळेत कुणी प्रवेश घेईनासे झाले... 
आता मराठी शाळा ओस पडू लागल्या, 
बंद होण्याच्या मार्गावर.!

मी महाराष्ट्राची, मुंबईची.!
मी मराठी, माझी मातृभाषा मराठी
तरीही प्रत्येक भाषेचे महत्व जाणते.!
 प्रत्येक भाषेला मान दिलाच पाहिजे.


मराठी भाषा दिन 
या निमित्त.....
मराठीचे सौंदर्य जपले पाहिजे
पण.... इंग्लिश हि जगाची भाषा... डिग्री मिळवण्याची, नोकरी व्यवसायाची भाषा.!
आणि हिंदी आपली राष्ट्रभाषा.!
तर गुजराथी व्यवसायाची भाषा. 
यांचे स्थान महत्वाचे आहे हे विसरून चालणार नाही.
*******************************************

 एक आलेला मेसेज

मला एकदा एका
 इंग्रजाळलेल्या माणसाने हिणवण्याच्या स्वरात म्हटलं
 "अरे काय त्या मराठीत टाइप करता रे तुम्ही. 
किती वेळ लागतो. 
बोअरिंग काम. 
इंग्रजीत कसं पटापट टाईप होतं. 
तुमचं मराठी म्हणजे......"
मी त्याला सांगितलं, 
"अरे बाबा श्रीमंत आणि गरिबामध्ये तेवढा फरक असणारच". 
तो खुश होऊन म्हणाला "चला म्हणजे मराठी गरीब हे तू मान्य केलंस तर".
 मी म्हटलं "मित्रा चुकतोयस तू. 
इंग्रजी भाषेत वर्णाक्षरं किती?". 
तो म्हणाला २६.

 मी म्हटलं "मराठीत याच्या दुप्पट ५२ आहेत.

 इंग्रजीच्या दुप्पट मालमत्ता आहे आमची. 
आता सांग, कोण गरीब आणि कोण श्रीमंत? 
केवळ एखादी साडी गुंडाळून बाहेर पडणारी स्त्री पटकन तयार होऊ शकते 
*पण भरजरी कपडे घालून सर्व दागदागिने घालून बाहेर पडणारी स्त्री जास्त वेळ घेणारच.* 

आमची मराठी भाषा काना, मात्रा, वेलांट्या, उकार यांचे दागदागिने लेऊन समोर येते. 

म्हणुनच ती समोर आल्यावर तिला यायला लागणारा वेळ कोणी बघत नाही,
 तिचं सौंदर्य बघून सर्व धन्य होतात."
✽  ✽✽  ✽✽  ✽✽  ✽✽ ✽✽ ✽✽  ✽

वरील मेसेज आला आणि हे लिहावसं वाटलं .!!!!!

Monday, 20 February 2017

आज खटकलेले...

 

   मी आणि काका, followup साठी भाटिया हॉस्पिटल मध्ये गेलो होतो.

आमच्या मागच्या ओळीत दोन तरुणी साधारण १८/१९ वय असेल, मोबाईल मध्ये ..... बघत होत्या.  
इतक्यात एक कुबडी घेतलेला माणूस, बसण्यासाठी तिकडे वळला,
 मी त्या मुलींचे लक्ष वेधले आणि म्हटले त्यांना बसायला जागा द्या. 
त्या मुलीने आपली खुर्ची तर सोडली नाही फक्त पाय जवळ घेतले, 
ती व्यक्ती म्हणाली.... असुदे मी बसेन तिकडे.! 
आणि ती व्यक्ती त्या तिसऱ्या खुर्चीकडे कुबड्या सावरत, स्वतःला सांभाळत जाऊन बसली.
आणि या मुली मात्र पुन्हा मोबाईल मध्ये रममाण झाल्या.... 
ना कसली खंत ना कसला खेद... 
खरंच माणुसकी लोप पावत चालली आहे कि... 
समजत नाही कि संस्कार कमी पडत आहेत? कि बेफिकिरी....
कि मोबाईलचे व्यसन????

मनात अनेक प्रश्न निर्माण झाले या एका घटनेने.!!!

★ मैत्रीण

★फार वाईट वाटलं वाचून...आमची पिढी अस कस वागू शकते
पण मी असं नक्कीच वागत नाही आणि वागणार नाही.
हे माझ्याकडून प्रॉमिस आहे तुम्हाला!!!
☆ हे छान .
पण ...
आणि मला खात्री आहे तू असे कधीच नक्कीच वागणार नाहीस.
★ येस, तुमचं एकदम खरंय!
पण यासाठी संस्कार वर्ग घ्यायला हवेत. अस मला वाटतं.
☆नाही ग
संस्कार वर्ग काहीच करू शकणार. 
कोणावर निष्ठा नाही,
आई वडिलांचं ऐकायचं नाही,
मॉडर्न मॉडर्न म्हणून सगळं  सोडून देतात...

आता शाळेत असताना शिकलोय ना... 

अंध व्यक्तीला रस्ता ओलांडण्यास मदत करावी.

--☉☉---☉☉---☉☉---☉☉---☉☉---


हो पण हि एकच घटना नाही 
अशा अनेक घटना बघतो आपण.!
तिकडून निघाले ती व्ही एम

( ए.सी. मार्केट जवळ असलेली अंध विध्यार्थी शाळा ) 

मध्ये जायला बस मध्ये बसले स्टॉप वर उतरले 
आणि नेहमी प्रमाणे लक्ष...
 कोणाला क्रॉस करून हवा आहे का???
तर एक मुलगा चाचपडत चालला होता.

असे चित्र बऱ्याच वेळा बघायला मिळते.! 

प्रत्येक जण असा काही घाईत असतो कि..... 
आपल्या आजूबाजूने, पुढे कोणी ब्लाइंड जात असेल तर दुर्लक्ष करतात...
एक मध्यम वयाची बाई... या मुलाच्या मागून पुढे गेली
पण... तिने काही रस्ता क्रॉस करून दिला नाही.
मी माझा वेग वाढवला आणि मागून आवाज दिला.. 

व्ही. एम. मध्ये जायचय ना.?

हो. असे म्हणून तो थांबला...
आणि आम्ही रस्ता क्रॉस केला..
मनात नाना प्रश्न आले

लागोपाठ घडलेल्या या दोन घटना.... 

तरुण आणि मोबाईल ... पण 

इकडे तर मध्यम वय आणि फक्त आपलं काम झालं पाहिजे हा विचार?????


अशा अनेक घटना... आपल्या आजूबाजूला घडताना बघतो, 
कधी आपल्या कडूनही अस होत असेल. 
पण... खरंच ज्यांना मदत हवी असेल त्यांना मदत करायला हवी..

या शाळेच्या शेजारीच एक पेट्रोल पंप आहे, 
तेथे तर... गाड्या टॅक्सी गॅस भरण्यासाठी ओळीत उभ्या असतात.
 तर मुलांना जाताना त्रास होतो, पण....
ना तिकडे कोणी लक्ष देत, ना कोणी मदत करत.

मुले मात्र स्वावलंबी आहेत,

 त्यातूनच मार्ग काढत व्यवस्थित संस्थेत येतात.



हे अजून एका मैत्रिणीबरोबर शेअर केलं

तिचा अनुभव वेगळाच.....
ठिकाण वेगळे, आणि व्यक्ती थोडी ज्येष्ठ.
● मैत्रीण
● एक आज्जी चर्चगेटला रस्ता क्रॉस करत होत्या,
 वेळ रात्रीची. मी ऑफिस मधून येत होते.
 जवळपास ८.३० वाजले होते.
     त्या आजीना रस्ता क्रॉस करायला जमत नव्हतं.
 म्हणून मी आपलं जाऊन विचारलं.... 
मी तुम्हाला मदत करू का???? रस्ता ओलांडायला???
 आजी : ( ओरडून) मला काय जमत नाही अस वाटतय का??
● म मी तेथून सरळ निघून गेले.
● आपलं समाधान कि आपण मदत हवी का हे विचारायला गेलो.

☆ यावर मी :- पण... परत कोणाला मदत हवी असं वाटलं 
तर मदतीचा हात पुढे करावा.

☆ अगं मला काही वेळा शाळेत जायचं नसतं/ बोलवत नाहीत म्हणून...
तर असं वाटत कि दोन तास त्या स्टॉप वर उभे राहावे. 
आणि अगदी एका मुलाला जरी रस्ता क्रॉस करायला मदत केली
 तरी दोन तास सार्थकी लागतील.

♤♤♤♤♤ ♤♤♤♤♤ ♤♤♤♤♤

Wednesday, 15 February 2017

आज १५ | २ | २०१७

गेल्यावर्षी १६ | २ | २०१६

यादिवशी गीता वर्ग सुरु झाला होता.

आज १५ | २ | २०१७

आज गीतावर्गाला 
एक वर्ष पूर्ण झाले...

कसे वर्ष गेले हे कळलेच नाही.

मंगळवार व बुधवार...
संध्याकाळी ६ ते ७ नेमाने आणि ठरल्यावेळी सुरु आणि ठरल्यावेळी सुटणारा वर्ग..
संथा देण्याची पद्धत.
अनुष्टुप छंद ... १६ अक्षरांची एक ओळ
(भीमरूपी प्रमाणे)
यातील ८ अक्षरांचा एक गट करायचा.
 तो सात वेळा म्हणायचा नंतर दुसरा गट सात वेळा म्हणायचा
म पूर्ण ओळ ५ वेळा म्हणायची. 
अशीच दुसरी ओळ
म पूर्ण श्लोक ३ वेळा म्हणायचा. 
तसेच त्रिष्टुप छंद... २४ अक्षरे
१२ अक्षरांचा गट करून चालीत म्हटले जाते


हि संथा देण्याची पद्धत.
असे पाच श्लोक संथा देतात.
या वर्गात ओघाओघाने काही श्लोकांचा अर्थ अगदी थोडक्यात सांगतात.
फक्त गीता कशी म्हणायची याचे मार्गदर्शन होते.
तरीही गीता वर्गाची ओढ लागली आहे.
तर... आज एक वर्ष पूर्ण झाले ... त्या निमित्ताने एक छोटासा कार्यक्रम केला..
काही जण घरी जाऊन किंवा वर्गाला येण्यापूर्वी अर्थ बघतात.

वर्गातील काही सदस्यांनी आपले मनोगत व्यक्त केले

यामुळे छान मार्गदर्शन झाले. 

१) या सदस्यांनी सांगितले कि...
 पु.ल. म्हणतात कि 

काय  सांगितलं यापेक्षा कोणी सांगितलं याला महत्त्व आहे.

अर्थ बघितल्यावर काही शोध लागले
 म शोध म्हणजे काय तर अनेक गोष्टी वडीलधारी सांगत असतात. 
त्या आपण दृष्टीआड करतो.

गीता म्हणजे प्रत्यक्ष श्रीकृष्णांनी दैनंदीन गोष्टींवर काही  भाष्य केलंय.

६ | १७
युक्ताहारविहारस्य
युक्तचेष्टस्य कर्मसु ।

युक्त स्वप्नावबोधस्य
योगो भवति दुखःह।।

अर्थ: हा योग फार खाणाऱ्याला, 
अजिबात न खाणाऱ्याला, 
फार झोपळूला तसेच 
नेहमी जागरण करणाऱ्यालाही साध्य होत नाही.
२ | ६३
क्रोधाद्भवति सम्मोहः (स)
सम्मोहात्स्मृतिविभ्रमः ।

स्मृतिभ्रंशाद् बुद्धिनाशो
बुद्धी नाशात्प्रणश्यति ।।

अर्थ: रागामुळे अत्यंत मूढता अर्थात अविचार उत्पन्न होतो.
 मूढतेमुळे स्मरणशक्ती भ्रष्ट होते.
 स्मरणशक्ती भ्रष्ट झाली कि बुद्धीचा म्हणजे ज्ञान शक्तीचा नाश होतो.

(हे भगवंतांनी सांगितलंय म्हणून आपण विचार करायला प्रवृत्त होतो)

आपण जे काही काम करत असतो, त्याला पाच कारण आहेत,

ज्या माणसाला असे वाटते कि मी काम करतो तो माणूस मूर्ख आहे.


१८ | १६
तत्रैवं (व्ँ ) सती कर्तार
मात्मानं (ङ् ) केवलं (न् )
तु यः ।
पश्यत्यकृतबुद्धित्वान् 
न स पश्यति दुर्मतिः ।।

३ | २७ 
प्रकृतेः क्रियमाणानि
गुणैः (हि) कर्माणि सर्वशः

अहङ्कारविमुढात्मा
कर्ताह मिति मन्यते ।।

कुठल्याही कर्माचा अहंकार न बाळगता कर्मे करावीत.

अर्थ: वास्तविक सर्व कर्मे सर्व प्रकारे प्रकृतीच्या गुणांमार्फत केली जातात. 
तरीही ज्याचे अंतःकरण अहंकाराने मोहित झाले आहे, असा अज्ञानी पुरुष
' मी कर्ता आहे ' असे मानतो.
~~~~~~~~~~~~~

२) ब्रह्मविद्येची जननी गीता आहे.

 म्हणून या
गीतारुपी गंगा आपल्या दारात येत आहे.
यात जर आपण सहभागी झालो नाही तर आपल्या सारखे दुर्दैवी आपणच.
आपण वर्गाला नियमित येतो याचा आनंद शिक्षकाला होतो.

पाठांतराची आपल्यात क्षमता असते.

~~~~~~~~~~~~~

३) गीता वर्ग हा आनंद दायी सोहळा आहे...

~~~~~~~~~~~~~

४) श्री. श्रीकृष्ण जोशी सर

 गीतेचे विनामूल्य ,

पण अमूल्य मार्गदर्शन करत आहेत.

शाळेत संधी सोडून गीता म्हणत होतो.
पण काही ठिकाणी संधी सोडवला नाही तर निरर्थक शब्द येतात..

नपुसक लिंगी...
महिंसा, मराग, 

गीता पठण प्राणायाम घडवते.

 जिभेवर नियंत्रण आणते.

.................................

पण या वर्गात उच्चार नीट करायला शिकलो.
सरांनी कागद दिलेला आहे
जेणेकरून उच्चार कसा करायचा ते समजते.
५|८
दुसरी ओळ

पश्यञ्   श्रृण्वन् 

स्पृशञ्   जिघ्रन्

नश्र्नन्    गच्छन्

स्वपञ्   श्र्वसन्

असे उच्चार करायचे आहेत
५|९

पहिली ओळ

प्रलपन्   विसृजन्

गृह्णन्   नुन्मिषन्

नुमिषन्   नपि




✿✿ ✿✿ ✿✿ ✿✿ ✿✿
५) गीता म्हणताना योग्य आघात दिले, 
अनुस्वाराचा योग्य उच्चार केला, 
एका तालासुरात म्हटली तर....
छान वाटते.
पाठ करायला सोपे वाटते
~~~~~~~~~~~~~
काही अध्याय पाठ करत आहोत.
 पाठ होत आहेत.
~~~~~~~~~~~~~~

हे भगवंताचे प्रत्यक्ष शब्द आहेत.

********************
पाठांतर अशा स्पर्धेत कधी भाग घेतला नव्हता, 
पण गीता पाठांतर स्पर्धेत भाग घेतला..
एक नवीन शिकले .!
उगाच भीत होते...असे वाटले...आणि 
असेही लक्षात आले कि आपण जर योग्य करत असू
 परफेक्ट असू पूर्ण माहिती असेल तर धीटपणे म्हणू शकतो. 

आता गीता चांगली म्हणता येईल याचा आनंद होतो.


प्रथम जेव्हा गीता म्हणू असे वाटले 
तेव्हा पहिलेच दोन शब्द वाचून पुस्तक खाली ठेवले होते,

 पण आज मात्र सुयोग्य मार्गदर्शनमुळे रोजच गीता पुस्तक हातात घेऊन ती वाचते..


११ | २६

अमी च त्वां धृतराष्ट्रस्य पुत्राः
सर्वे सहैवावनिपालसङ्घैः|

भीष्मो द्रोणः 
*सूतपुत्रस्तथासौ*

सहास्मदीयैरपि योधमुख्यैः ।।

अर्जुनाने कर्णाचा उल्लेख सूतपुत्र असा केला आहे,

पण श्रीकृष्णाने आणि धर्मराज युधिष्ठर यांनी 

कधीही कर्णाचा उल्लेख सूतपुत्र असा केला नाही.


अशा काही गोष्टी कळत आहेत.!

✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽

गीता साध्या गोष्टीतून 



 Awesome Read. Don't miss this. 

Bhagavad Gita 

Why do we read Gita, even if we can't understand or remember ????

Story:
An old Farmer lived on a farm in the mountains with his young grandson. 

Each morning Grandpa was up early sitting at the kitchen table reading his Bhagavat Gita. His grandson wanted to be just like him and tried to imitate him in every way he could.

One day the grandson asked, "Grandpa! I try to read the Bhagavat Gita just like you but I don't understand it, and what I do understand I forget as soon as I close the book. What good does reading the Bhagavat Gita do?"

The Grandfather quietly turned from putting coal in the stove and replied,
"Take this coal basket down to the river and bring me back a basket of water."

The boy did as he was told, but all the water leaked out before he got back to the house. The grandfather laughed and said, "You'll have to move a little faster next time," and sent him back to the river with the basket to try again. This time the boy ran faster, but again the basket was empty before he returned home. Out of breath, he told his grandfather that it was impossible to carry water in a basket, and he went to get a bucket instead.

The old man said, "I don't want a bucket of water; I want a basket of water. You're just not trying hard enough," and he went out the door to watch the boy try again.

At this point, the boy knew it was impossible, but he wanted to show his grandfather that even if he ran as fast as he could, the water would leak out before he got back to the house. 

 The boy again dipped the basket into river and ran hard, but when he reached his grandfather the basket was again empty. Out of breath, he said, "See Grandpa, it's useless!"

"So you think it is useless ?" The old man said, "Look at the basket." 
The boy looked at the basket and for the first time realized that the basket was different. It had been transformed from a dirty old coal basket and was now clean, inside and out.

"Son, that's what happens when you read the Bhagavat Gita. You might not understand or remember everything, but when you read it, you will be changed, inside and out. That is the work of Krishna in our lives."

Jai Shri Krishna

हि गोष्ट सारांश रुपाने मराठीत एका सदस्याने सांगितली
आणि मग हे...

 मनोगत....

मी नुसतीच गीता पाठ करत होते, पोपटपंची करत होते.
आणि हि गोष्ट वाचनात आली आणि लक्षात आले कि...
 जरी नुसती वाचली पाठ केली तरी काहींना काही कळतेच,
 आपल्यात काहीतरी बदल होतो 
असा मला अर्थ लागला आहे

✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽


यानंतर सरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

सर : विद्यार्थी असं म्हणतात कि आम्हाला गीता म्हणता आली पाहिजे.

low aim is crime

रामदास स्वामी मनाच्या श्लोकात म्हणतात ....

मना अल्प संकल्प तो हि नसावा.



शृंगेरीला जाऊन तेथे मानधन किती मिळते याला महत्व नाही तर 

शंकराचार्यांच्या हस्ते प्रसाद प्रशस्ती पत्रक व मानधन  मिळवायचे लक्ष ठेवा.

आपल्याला आनंद मिळवायचा आहे.

याकरिता शृंगेरीला जायचं.

**********************

आमच्यात काही त्रुटी आहेत....

********************

दीर्घ उच्चार नीट करा.

गीता... भीष्म ... भीम

दीर्घ ..ई कार वर लक्ष ठेवा.
::::::::::::::::::::::::::::::::::::::

असाच उत्साह ठेवा.

प्रत्येक गीता प्रेमीने

आणखी एक गीता प्रेमी तयार करावा 

अशी प्रत्येकाला विनंती आहे. 

✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽

Monday, 6 February 2017

टिंंब.....


मनुष्याचा जन्म होतो तेव्हा.... 

प्रथम तो रडतो त्या वेळी त्या बाळाचा प्रथम आवाज येतो तो असतो

 सोSहम....

कोSहम...

मी कोण? मी कोण? 

आणि पुढील प्रवास हा मी कोण मला काय व्हायचंय यात जातो.

एक गोष्ट आली आणि ..पुढे मनात आलेले विचार लिहिले गेले. आलेली 
गोष्ट.. थोडक्यात...
°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•
 एका चित्रकाराने चित्र काढले, 
बघता क्षणीच कळत नव्हते... पांढऱ्या कागदावर काळा ठिपका.! 
आपले आयुष्य या काळ्या ठिपक्या प्रमाणे आहे.! 
या जगात आपले आयुष्य म्हणजे एक टिम्ब .!

•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°

आलेला विचार.....

जगज्जेता सिकंदर म्हणाला होता ना....

की मला शेवटी दफन कराल तेव्हा साऱ्या जगाला कळू दे की 

जगज्जेता असूनही हा जातांना बरोबर काही घेऊन गेला नाही याचेही हात रिकामेच होते.

 म्हणूनच ....... 
♂♂♂♂♂♂♂♂♂♂♂♂♂♂♂♂♂♂♂♂♂♂

आयुष्यभर कशाची हाव धरु नये. 

आणि संचय करू नये.

◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎

खाली हाथ आया है 
खाली हाथ जायेगा...
◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎

मनुष्य जन्माला येतो तेव्हा कोणतेही वस्त्र नसते.

मनुष्याचे पहिले वस्त्र लंगोट

त्याला खिसा नसतो.

आणि शेवटच्या प्रवासाला निघतो तेव्हा असते पांढरे कफन...

त्यालासुद्धा खिसा नसतो...


या मधील प्रवासात बरीच लोकं इतके खिसे भरण्याच्या मागे असतात....

आताच नोट बंदी आली त्यावेळी आपण बघितलेच कि किती संपत्ती जमा केली माणसाने.!


खरतर पोटाची खळगी किती असते... 
माणसाला जेवायला ओंजळभर जेवण पुरते आणि ओंजळभर पाणी.!
आणि झोपायला, व्यायाम करायला सहा फूट जागा
कि दोन हात.....
असच काहीसं म्हणतात.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
मोठे मोठे लोक सांगून गेलेत कि

 *कोणतीही गोष्ट जास्त असेल तर ते विष.!

म त्याचे  व्यसन लागते.

* संचय करण्यापेक्षा वाटायला शिका...

* पैसा सुद्धा आणखीन हवे आणखीन हवे या लोभामुळे, 
 हव्यासामुळे कितीही मिळवला तरी कमीच वाटतो.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
वाडीतील एक मुलगी येथून कल्याणला जाणार होती
तेव्हा मी तिला असेच सांगितले होते कि... आता तू येथून जात आहेस
तर एक गोष्ट लक्षात ठेव.
जग फार मोठे आहे.
 जर तू नकाशा बघितलास तर
 तुझ्या लक्षात येईल कि आपली वाडी म्हणजे एक टिम्ब आहे.
 आणि त्यातील एक व्यक्ती म्हणजे.....
ती काही दिवसांनी मला भेटायला आली तेव्हा ती म्हणाली 
कि खरंच काकू तुम्ही म्हणालात ते खरंय हो.!
कित्ती वेगवेगळी लोकं भेटली... खरंच जग खूप मोठे आहे....
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
असो...

तरीही आपण पण मात्र काहींना काही केलेच पाहिजे स्वतःच्या समाधानासाठी

पैसे मिळवले तर कुणाला मदतीचा हात देता येईल.

चांगलं नाव मिळवलं तर.... लोकांना प्रेरणा घेता येईल.

कायम पाय मात्र जमिनीवर हवे.!!!


....................................................

Friday, 3 February 2017

ज्ञान


☞ नाटक सिनेमाला जाताना बरोबर बॅटरी ठेवावी.

☞ काहि खाऊ घेतला असेल तर तो सर्वाना पुरेल एवढा असेल तर वाटावा.

अन्यथा बाहेर काढू नये.

☞ देवळात जाताना काही ठिकाणी चपला ठेवण्याची सोय नसेल तर... उजवी चप्पल डाव्या ठिकाणी व डावी चप्पल उजव्या ठिकाणी ठेवावी.

किंवा थोड्या दूरवर दुसरी चप्पल ठेवावी.

☞ सुप्रसिद्ध मंदिरे.... जेथे खूप गर्दी असते तेथे जास्त पैसे देऊन दर्शन घेऊ नये..

अशी सवय आपणच लावतो आणि सगळ्यांना सांगतो...

पैसे जास्त घेऊन दर्शन मिळते.


☞ रस्त्याने चालताना उंच सखल असेल किंवा जिने उतरताना... एखादी पायरी तुटकी असेल तर मागून येणाऱ्याना तसे सांगावे.

☞ एखादे जनरल औषध असेल त्याने चांगला उपयोग झाला असेल तर त्याची नोंद करावी म्हणजे कोणाला सांगता येते.

☞  जुने पण चांगल्या स्थितीत असलेले कपडे कोणती संस्था घेत असेल किंवा काही वस्तू बनवून देत असेल तर त्यांचा फोन नंबर पत्ता लिहून ठेवावा म्हणजे कोणाला सांगता येईल.

☞ संग्रही असावी अशी पुस्तके बाईंडिंग करून मगच वापरावी.

☞ आपल्या कडे पुस्तके असतील आणि ती कोणाला वाचायला देत असू तर...

एक वही करावी त्यात पुस्तक कधी दिले आणि परत कधी आले याची नोंद ठेवावी.

☞ असेच इतर वस्तूंच्या देवाण घेवाण विषयी करता येईल.

☞  घरात अनेक वस्तू घेतो

त्याची गॅरंटी किंवा वारँटी असते ती बिले एकाच फाईल लावावी

☞ सगळ्यांच्या संपर्कात राहावे मीच का फोन करू किंवा नेहमी मीच का जाऊ

असे न म्हणता आपल्याला वेळ असेल तेव्हा आपण संपर्कात राहावे



☞ कोणाकडे जाण्यापूर्वी फोन करावा, जेवायला जाणार असू तर तसे सांगावे.

नुसत्याच गप्पा साठी जाणार असू तर तसे सांगावे.


☞ आजारी व्यक्तीला भेटायचे असेल तर... काहीतरी खाऊ असा न्यावा कि त्या घरातील व्यक्तींना पोटभर खाता येईल.


☞ कोणत्याही कार्यक्रमाचे आमंत्रण आले कि....

घरातील किती व्यक्ती येणार?? ते सांगावे...

उगाच लगेच सांगणे बरे दिसत नाही... म्हणून सावकाश कधीतरी सांगू...

असे करू नये.


☞ दिलेली वेळ जरूर पाळावी... कारण वेळ अनमोल आहे, गेलेली वेळ परत येत नाही.


☞ कोणाच्या घरी जेवायला जात असू तर अगदी आयत्या वेळी जाऊ नये

आधी गेले तर मदत करता येते.


☞ एखाद्या मैत्रिणीकडे कोणी जेवायला येणार असेल तर... आपल्याला जमेल तो पदार्थ करून द्यावा


☞ जवळपास ची व्यक्ती बाहेरून येणार असेल तर त्या कुटुंबाकरिता भाजीपाला किंवा दूध आणून ठेवावे


☞ गणपती, नवरात्र या सारखे सण... आपल्याकडे नाहीत आणि जवळच्या व्यक्तीकडे असेल तर...

अशी छोटी मदत सहज करू शकतो. ( न बोलता, गाजावाजा न करता मदत करता येईल )




☞ काही गोष्टी ....


☞ पेन, हे बाहेर पडताना घ्यायला विसरतो आणि ते हवे तर असते म आजूबाजूला कोणाकडे तरी मागावे लागते, 

पेन हे हरवते ज्याला दिले तो द्यायला विसरतो आणि आपण मागायला.!


☞ रुमाल.! अती आवश्यक गोष्ट. आणि कुठेतरी राहून 

जाते. म रुमाल हि विसरण्याचीच वस्तू आहे असे म्हटले जाते.


☞  छत्री... पावसाळ्यात हमखास विसरली जाणारी वस्तू....

म छत्री हि विसरण्यासाठीच असते असे म्हटले जाते.


☞  पैशाचे पाकीट, पर्स या वस्तू मारण्यासाठीच असतात.

काही वेळा गडबडीत हरवतात किंवा चोरी होते.


अशावेळी म्हणतात कि कुणाला आपल्या हाताने दिले असते तर आनंद झाला असता पण....

पण अस होत नाही.! अस उगाच कोणाला दहा रुपये देत नाही, देवासमोर ठेवताना सुद्धा एखादे नाणे ठेवतो पटकन ५०/१०० रुपये ठेवत नाहीत....

तर मला काय वाटत कि, आपली वस्तू अशी हरवली, विसरली गेली तर हळहळ व्यक्त करण्यापेक्षा ज्याला मिळाली त्याला वस्तू मिळाल्याचा आनंद घेऊ दे.

एखाद वेळेस खरंच आपल्या पेक्षा त्या व्यक्तीला त्याची गरज जास्त असू शकेल.

××××××××××××××××××

काही अशा गोष्टी... विसरल्या जातात, टाळल्या जातात.

कुठे कोणाकडे जायचे नसेल तर... oh त्यावेळेला मला वेळ नाही.


स्वतः साठी औषध आणायचं,

 घरात काही दिवसांनी लागणारी वस्तू आधी आणू म्हटलं तर नेमकी ती वस्तू आणणे विसरले जाते.


कधीही या आमच्याकडे.......  यात आग्रहाचे आमंत्रण असते किंवा बोलवायचे म्हणून म्हटले जाते.




बँक पासबुक, पेन, पाकीट, चाव्या, अशा वस्तू डाव्या उजव्या हाताने इकडे तिकडे कधीतरी ठेवल्या जातात.


::::::::::::::::::::::::::::::::::::::::

Thursday, 2 February 2017

शुभ सकाळ मठात जाण्याची.!

✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ 


ओढ स्वामी दर्शनाची


シ  श्रीस्वामी  シ  

シ  स  シ  म  シ र्थ  シ  シ


आज १०.०० वाजता मठात जाऊ या असे ठरवले.

आणि दुधात साखर म्हणजे आज तू पूजा करशील का???

असे यांनी विचारले..!

आज गुरुवार... म अशी संधी मी थोडीच सोडणार???

मस्त पूजा, आरती केली 

तोपर्यंत घड्याळ १० वाजत आले अशी वेळ दाखवत होते.!

 म मुलाला म्हटले.... माझं एक काम करतोस???
तर त्याने अगदी मनातलेच ओळखले.!

 मठात जायचय ना? चल, आज मी पण येतो मठात.... 

लगेच त्याच्या दुचाकीने मठात गेले..

 तर... 

मठाजवळच अक्कलकोटचे 

श्री. श्री. गजानन महाराज यांच्या तस्वीरीचे व पादुकांचे दर्शन झाले.. 
मनात अनेक आठवणी आल्या... 
आणि मठात त्यांच्या पादुका घेऊन एक गुरुजी.... छान दर्शन.!
म तेथे विचारले कि आज काय आहे???
 नाही काही पण महाराजांच्या पादुका येतात मधून मधून.! असे सांगितले.
मला वाटतं कि या बाणगंगा येथे असतात पादुका....
अक्कलकोटचे गजानन महाराज...
 हे आमच्या वाडीत अगदी शेजारच्या घरात येत असत छान दर्शन पूजा सोहळा होत असे. आणि मध्ये दरवाजा आहे तो उघडला कि थेट आमच्या घरीच महाराज आले आहेत असे वाटत असे... सगळ्यांची बसण्याची सोया होत असे. असे दरवर्षी होत असे. 

अशाच मला माझ्या बाई माझ्या घरी भेटल्या...

बाई महाराजांच्या दर्शनासाठी आल्या होत्या.
१९८७ च्या जुलै मध्ये.
त्याच दिवशी मी माझ्या १० दिवसाच्या  बाळाला घरी घेऊन आले होते...
मी तर त्यांना पाठमोरे बघितले आणि आनंदाने भेटले.... त्या तर इतक्या खुश झाल्या..
आता गेली काही वर्ष अक्कलकोटच्या गजानन महाराजांच्या  पादुका येतात आणि त्या पादुकांना औक्षण करून हॉल मध्ये या असे  करण्याचे भाग्य मला लाभत आहे. हा दिवस म्हणजे श्रावण शुद्ध प्रतिपदा.!
मी काही वर्षांपूर्वी यात्रा केली तेव्हा मला त्यांच्या घरी जाण्याचे भाग्य लाभले आहे.

तसेच जेव्हा अक्कलकोट येथे जाते तेव्हा शिवपुरी येथे जाऊन पादुकांचे दर्शन, गुरुमंदिर येथे दर्शनासाठी जात असते.!

अशी हि दुधात साखर.! छोटी वाटणारी मोठी गोष्ट.! 

सहज आनंद, सुख देणारी.!
या महाराजांचा फोटो
गिरगाव मठात आहे.

नेरळ येथील अवसरे गावात स्वामींचा मठ आहे
 तेथे या महाराजांचा फोटो आहे.

✽  ✽✽  ✽✽  ✽✽  ✽✽ ✽✽  ✽✽ ✽✽ ✽✽  ✽✽ ✽