Saturday, 6 February 2016

कल्पवृक्ष... नारळ


श्रीफळ...

सुमुद्रकिनारी दिसणारी ही नारळाची, माडाची झाडं.!
सरळसोट उंच असणारी,
 तसंच जसा वारा असेल तशी झुकणारी 
आणि शेंड्याला अनेक झावळ्या,
वाऱ्यानी मस्त डोलणाऱ्या झावळ्या आणि
वर नजर टाकली तर दिसणारी शहाळी/नारळ
माडाच्या झाडाला
 किंवा

 नारळाच्या झाडाला कल्पवॄक्ष कल्पतरू का म्हणतात???

हा प्रश्न प्रत्येकानेच लिहिला असेल.

(मुळापासुन शेंड्यापर्यंतच्या प्रत्येक भागाचा उपयोग होतो)

—————————————————

कोककणातील माणूस आपली श्रीमंती सांगतांना झाडं-माडं किती हे सांगतो.

—————————————————

नारळ, श्रीफळ......

 

 प्रत्येक भागाचा उपयोग होतो म्हणून तर श्रीफळ म्हणत असतील का???

तर.....

देवाची करणी आणि नारळात पाणी.!

किंवा....

कोकणची माणसं साधी भोळी,

काळजात त्यांच्या भरली शहाळी.

वरून टणक पण आतून गोड.....
असं गाण्यात दिसणारं वर्णन
खरंच खारी हवा असलेल्या ठिकाणी ही झाडं असतात. 
पण हे शहाळ, नंतर होणारा नारळ... 
किती गोड पाणी असतं...
 काही वेळा तर सहज शब्द येतात की अमृतासारखं गोड पाणी आहे.

नारळाचं पाणी, नैसर्गिक म्हणूनच शुद्ध
आणि म्हणूनच अमृतासमान.!!!!

* बरं नसेल तर .... शहाळ्याचं पाणी प्यालं जातं.
एरव्ही सुद्धा शहाळ्याचं पाणी आवडीने प्यालं जातं.
शहाळं,
 सुखड,






नारळ,
गोटा नारळ, 







मोहाचा नारळ,
मोदकांसाठी खास नारळ असतात.
सुकं खोबरं,
डेसिकेटेड कोकोनट..... सजावटीसाठी,
लाडू करण्यासाठी.....
उपयोगी.!

..................................................................................................

* नारळात काही वेळा आतल्या बाजूने कोंब असतो, (मस्त लागतो).

 

 

* काही वेळा नारळाला कोंब येतो (बाहेरून) आणि घरीच नारळाचं झाड वाढतांना बघता येतं.





* काही हॉटेल मध्ये देव्हाऱ्यात असं छोटं नारळाचं झाड असतं, ज्याची पूजा केली जाते.
* देवासमोर नारळ वाढवला जातो.
(म्हणजे नारळ फोडतात)
* देवीची खणानारळाने ओटी भरली जाते.

* कोणतेही धार्मिक कार्य असेल तर देवासमोर विडा सुपारी नारळ ठेवतात.

* लग्नमुंजीचं निमंत्रण करायला आले की मानाचा नारळ देण्याची पद्धत आहे.
* आहेर करतांना पण दिल्या जाणाऱ्या भेटी बरोबर नारळ दिला जातो.
 देतांना त्याची शेंडी समोरच्या व्यक्तीकडे ठेवतो.

* सत्कार करतांना... शाल श्रीफळ देऊन  सत्कार करतात.

* जावयाला मांडवात घेऊन येताना छान सजवलेला नारळ देतात.

* नवरीमुलीची सुखड, असोला नारळाने ओटी भरतात.
* प्रवासाला निघतांना देवासमोर नारळ ठेवतात, 
तसंच गाडीला ओवाळुन तो नारळ फोडतात, 
मग प्रवासाला सुरूवात करतात.

❀ ❀ ❀❀ ❀ ❀❀ ❀ ❀

* हे फळ बाराही महिने मिळतं
* नारळाला तीन डोळे आणि शेंडी असते.
* शेंडी ठेवुन नारळ फोडला जातो.

.ツ.....ツ.....ツ.... .ツ.....ツ.....ツ.....ツ.... .ツ....

* माडावरून नारळ काढणं कठीण असतं, 
माडाला काही अंतरावर खाचे पाडले जातात आणि
 तेथे पाय ठेवत वरवर चढतात आणि नारळ पाडले जातात.
(खाचे एकदाच पाडतात.)
★ पण आता सिंगापुरी नारळाची झाडं लावतात,
 ज्याची उंची कमी असल्याने झाडावर चढून नारळ काढावे लागत नाहीत, 
सहज हाताने काढता येतात. शहाळ्याचा रंग केशरी असतो.
* शहाळं सोलणं सुद्धा कठीण, खूप धारदार सुरी लागते.
शहाळं -  नुसतं पाणी, पतला मलई, जादा मलई अशा स्वरूपात मिळतं
* शहाळं कसं हे बघण्यासाठी बोटाने टिचकी वाजवून परीक्षा घेतली जाते.
तर नारळ चांगला आहे ना हे पाहण्यासाठी
 विशिष्ट प्रकारची अंगठी बोटात घालून ती नारळावर वाजवून बघतात.

.ツ.....ツ.....ツ.... .ツ.....ツ.....ツ.....ツ.... .ツ....

* जेव्हा शहाळ्याचं
रुपांतर नारळात होतं तेव्हा वरील सोडण काढणे खूप शक्तीचे काम असते. 
नंतर त्याच्या किशा काढून नारळ मिळतो. 
* पुर्वी या किशा भांडी घासण्यासाठी,
बीडाचा तवा असतो त्यावर घावन घालतांना तेल लावण्यासाठी करत.
* वरील टणक भाग म्हणजे करवंटी. मग आत खोबरं आणि पाणी.
* नारळ विकत घेतांना त्यात पाणी आहे ना हे नारळ हलवून बघितलं जातं.
* जर त्यात पाणी नसेल तर गोटा आहे असं म्हटलं जातं.
* तसंच करवंटीपासून खोबरं अलग करून ते वाळवतात, तेच सुकं खोबरं.
* नारळ खूप दिवस चांगला राहतो, मात्र थंडीत नारळ तडकतात.

☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆

卐卐卐卐卐卐卐卐卐卐卐卐卐卐卐卐卐卐卐卐

* शुभ कलश... तांब्यावर केळीची पानं आणि नारळ ठेवला जातो
असा कलश करवलीच्या हातात,
 सत्यनारायणाच्या पुजेच्या वेळी चौरंगावर ठेवतात.
* देवीस्वरूप मानून, सजवून मार्गशीर्ष महिन्यात पूजा करतात.
* कुणाकडूनही शुभ कार्यासाठी, चौरंग, पाट, भांडी...
आणली तर परत देतांना नारळ देण्याची पद्धत आहे.

卐卐卐卐卐卐卐卐卐卐卐卐卐卐卐卐卐卐卐卐

* नारळ फोडण्यासाठी कोयता वापरला जातो.

* दोन छान भाग होण्यासठी मध्यभागी पाण्याची रेघ केली जाते, 

मग होणारे दोन भाग छान होतात.

 यालाच कवड किंवा नारळाच्या वाट्या म्हणतात.

* नारळ खोवतांना ते दोन भाग जर धुवुन/ ओले केले तर त्याचे कण खाली पडत नाहीत.
* नारळ थोडा कोरडा झाला तर खोवतांना त्रासदायक होतो.
* विळीची खवणी जशी असेल त्याप्रमाणे खोबरे खोवले जाते.
* आता फूड प्रोसेसर वर नारळ खोवला जातो.
* वेगळं यंत्र पण मिळतं.
* कोकणातले, राजापुरचे नारळ, व साऊथ कडचे केरळकडचे नारळ वेगळे वाटतात.
* देवस्थानात मिळणारे नारळ हे पूर्ण सोललेले नसतात.
नारळाचे तेल... केसांसाठी छान असते.
 तसेच काही पदार्थ खोबरेल तेलात करतात. (फणसाचे गरे तळतात)
पदार्थ सजावट, पदार्थाला चव येण्यासाठी खोबरे वापरतात.....

♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡

* खोबऱ्यापासून खास पदार्थ बनवले जातात.
∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞

* नारळाच्या नावाचा सण....

नारळी पौर्णिमा, सागराला नारळ अर्पण करतात,
 समुद्राची पूजा करतात आणि मग आपल्या होड्या समुद्रात सोडतात.

♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡

हा आहे कल्पवृक्ष....

याबद्दल किती लिहावं तेवढं थोडं....

सहज सुचलेलं लिहिलंय.

.ツ.....ツ.....ツ.... .ツ.....ツ.....ツ.....ツ.... .ツ....

००••००••००••००••००••००••००••००••००••००••०००••

एक आलेला रीप्लाय....

खूप छान माहिती......नारळाची
सर्वांग उपयोगी.

★गावाला पाण्याच्या ओहोळावर नारळाच्या  झाडांची खोडे टाकून 

 तात्पूर्ता ब्रीज,साकव केला जातो.

★करवंटीच्या शोभेच्या वस्तू बनवतात.

★करवंटीचे तेल औषधी आहे.


♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡

  अमावास्येला वास्तुपुरुषाला नारळ देण्याची प्रथा आहे … 

 

 

 

 

 


  अमृततुल्य ……. 

  

2 comments: