मला नाही आवडत काही गोष्टी....
मी टीव्ही बघत नाही....
फावला वेळ आहे म्हणून घेतला रिमोट आणि लावला टीव्ही.....
आठवावंच लागेल... ही गोष्ट मी कधी केली????
टीव्ही लावला असेल आणि वेळ असेल तर.... थोडं काही बघितलं तर.....
फावला वेळ आहे म्हणून घेतला रिमोट आणि लावला टीव्ही.....
आठवावंच लागेल... ही गोष्ट मी कधी केली????
टीव्ही लावला असेल आणि वेळ असेल तर.... थोडं काही बघितलं तर.....
काहीवेळा मात्र मैत्रिणींमध्ये एखाद्यावेळी सिरीअल बद्दल
चर्चा होते
तेव्हा मात्र मी स्पष्ट सांगते... मी अगदी अडाणी आहे मला यातलं
काहीच माहिती नाही....
सिरीअल बघावी, उत्तम संवाद, सुंदर अभिनय.!
पण नंतरच्या चर्चा...
आता काय होईल आणि काय व्हायला हवं होतं
याची खुप चर्चा....
सिरीअल बघावी, उत्तम संवाद, सुंदर अभिनय.!
पण नंतरच्या चर्चा...
आता काय होईल आणि काय व्हायला हवं होतं
याची खुप चर्चा....
चित्रपट...
आता आता मराठी चित्रपट वेगनेगळ्या विषयांवर येऊ लागले आहेत
ते मात्र चित्रपटगृहात जाऊन बघते... कधीतरी.!
बातम्या...
बातम्यासुद्धा क्वचित ऐकते.
पेपर सुद्धा ....
राजकारणाबद्दलच्या बातम्या वाचत नाही.
सकाळी तर अजिबातच नाही
कारण.... मग तेच तेच मनात घोळत राहते...
असं एक आजोबा म्हणत असत..
पेपर सुद्धा ....
राजकारणाबद्दलच्या बातम्या वाचत नाही.
सकाळी तर अजिबातच नाही
कारण.... मग तेच तेच मनात घोळत राहते...
असं एक आजोबा म्हणत असत..
तसंच कोणतीही निवडणूक..
कोण जिंकलं, कोण हरलं??
काय करायचंय आपल्याला.
असं एक मित्र म्हणतो....
तो म्हणतो... कोणताही पक्ष सत्तेवर आला तरी
कोण जिंकलं, कोण हरलं??
काय करायचंय आपल्याला.
असं एक मित्र म्हणतो....
तो म्हणतो... कोणताही पक्ष सत्तेवर आला तरी
आपलं पाणी आपल्यालाच भरायचं आहे सकाळी उठुन!
आणी दुपारच्या व रात्रीच्या जेवणाची सोय आपली आपल्यालाच करायची आहे.
तर उगाच आपलं नको त्या विषयावर चर्चा कशाला??
आणी दुपारच्या व रात्रीच्या जेवणाची सोय आपली आपल्यालाच करायची आहे.
तर उगाच आपलं नको त्या विषयावर चर्चा कशाला??
क्रिकेट....
मॅच बघावी... पण त्यावर तासंनतास फालतू चर्चा... कशाला
या गोष्टी माहित नसल्या तरी काही अडलंय का कोणाचं?
मनाचा मनाशी संवाद करावा,
वेळ सत्कारणी लावावा.
शांत बसावं.
काही मनात असेल ते लिहावं.
कोणाचं चांगलं ऐकावं.
भाषेची शब्दसंपत्ती वाढवावी.
रेडिओवरील चांगले कार्यक्रम ऐकावेत.
अगदी लहान मुलं खेळतात ते बघावे.
या गोष्टी माहित नसल्या तरी काही अडलंय का कोणाचं?
मनाचा मनाशी संवाद करावा,
वेळ सत्कारणी लावावा.
शांत बसावं.
काही मनात असेल ते लिहावं.
कोणाचं चांगलं ऐकावं.
भाषेची शब्दसंपत्ती वाढवावी.
रेडिओवरील चांगले कार्यक्रम ऐकावेत.
अगदी लहान मुलं खेळतात ते बघावे.
तर... महत्त्वाचं काय??
आपण आनंदी असणं आणि दुसऱ्यांना आनंद देणं....
ज्या गोष्टींमुळे आपल्याला आनंद मिळतो त्या चांगल्या गोष्टी कराव्यात.
:) :) :) :) :)
No comments:
Post a Comment