Wednesday, 18 July 2018

गीता अठरा अध्याय

श्रीमद्भगवद्गीतेत एकूण ७०० श्लोक आहेत.

गीता  अठरा अध्याय

।। ॐ श्रीपरमात्मने नमः ।।

        अध्याय १ 
     धृतराष्ट्र उवाच

अर्जुनविषाद योग
                 श्लोक ४७
--------------------------------------------------

          अध्याय २ 
       सञ्जय उवाच

सांख्ययोग
                 श्लोक ७२
--------------------------------------------------

          अध्याय ३ 
        अर्जुन उवाच

कर्मयोग 
                श्लोक ४३
--------------------------------------------------
           अध्याय ४
       श्रीभगवानुवाच

 ज्ञानकर्मसंन्यासयोग               
                श्लोक ४२
------------------------------------------------
         अध्याय ५
       अर्जुन उवाच
 
कर्मसंन्यासयोग
                  श्लोक २९
------------------------------------------------
           अध्याय ६
       श्रीभगवानुवाच

 आत्मसंयमयोग
                  श्लोक ४७
--------------------------------------------------
      
          अध्याय ७
      श्रीभगवानुवाच

 ज्ञानविज्ञानयोग
                   श्लोक ३०
-------------------------------------------------
           अध्याय ८ 
         अर्जुन उवाच

अक्षरब्रह्मयोग
                    श्लोक २८
-------------------------------------------------
          अध्याय ९ 
      श्रीभगवानुवाच

राजविद्याराजगुह्य योग                    

                  श्लोक ३४
-------------------------------------------------
          अध्याय १० 
        श्रीभगवानुवाच

विभूतियोग
                  श्लोक ४२
--------------------------------------------------
        अध्याय ११
       अर्जुन उवाच
  
विश्वरूपदर्शन योग                  

                  श्लोक ५५
--------------------------------------------------
         अध्याय १२ 
        अर्जुन उवाच

भक्तियोग
                   श्लोक २०
--------------------------------------------------

        अध्याय १३
     श्रीभगवानुवाच
 
क्षेत्रक्षेत्रज्ञविभाग योग                 
                  श्लोक ३४
--------------------------------------------------
       अध्याय १४ 
     श्रीभगवानुवाच

गुणत्रयविभाग योग             
                    श्लोक २७
--------------------------------------------------
        अध्याय १५
      श्रीभगवानुवाच
  
पुरुषोत्तमयोग
                  श्लोक २०
--------------------------------------------------
        अध्याय १६ 
      श्रीभगवानुवाच

 दैवासुरसम्पद्विभागयोग
                   श्लोक २४
--------------------------------------------------
         अध्याय १७
         अर्जुन उवाच
 
श्रद्धात्रयविभागयोग
                    श्लोक २८
--------------------------------------------------
         अध्याय १८
        अर्जुन उवाच

 मोक्षसन्न्यासयोग
                  श्लोक ७८

♤ॐ♤ॐ♤ॐ♤ॐ♤♤ॐ♤ॐॐ♤ॐ♤

।।अध्याय समाप्ती सूचक।।

ॐ तत्सदिति श्रीमहाभारते शतसाहस्त्र्यां( व् )
 संहितायां ( व् )
वैयासिक्यां ( म् )
भीष्मपर्वणि श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां (य् ) योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे - - - - -
नाम - - - - - - ध्यायः । 
         हरये नमः । 
   श्रीकृष्णार्पणमस्तु ।
          श्रीरस्तु । 
        शुभंभवतु ।

⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘

अध्याय ७, ९, १३, १५, १६.

हे संपूर्ण भगवंतांनी सांगितले आहेत..


ॐ♤ॐ♤ॐॐ♤ॐ♤ॐ♤ॐ♤ॐॐ♤ॐ♤

Tuesday, 17 July 2018

भगवद् गीता .... सराव करताना



नोव्हेंबर मध्ये गीता पाठ झाल्यानंतर...

१७ नोव्हेंबर २०१७ या दिवशी गीता पाठ झाली.

पाठांतराचा सराव करताना....
शृंगेरीला कंठस्थ... अशी स्पर्धा घेतली जाते.
यादृष्टीने सराव सुरु केला.
 यासाठी गीता
मुखोदगत असणे आवश्यक आहे.

अशावेळी मनाचा काही वेळा संचार होतो 
आणि चांगले पाठ असून काही बाही म्हटले जाते...
-------------------------------------------------

आमचा वर्ग हा संथा वर्ग.!
संथा म्हणजे एकाने सांगणे आणि दुसऱ्याने म्हणणे.!
यामध्ये उच्चार व्यवस्थित असणे याला महत्त्व असते.
-------------------------------------------------
तर कंठस्थ म्हणजे 
घडान् घडा म्हणणे.!
-------------------------------------------------

दोघी तिघी चौघी असे एकत्र म्हणू लागलो जमेल तसे.!

मी म्हणताना... एकटीच समोर *यांना* बसवून म्हणते.

दोघी असताना एक म्हणते आणि
 मी पुस्तक समोर ठेऊन उच्चार बरोबर करतात ना/
 आणि माझा कुठे उच्चार नीट होत नाही, 
याकडे लक्ष ठेवते,
-------------------------------------------------

उच्चार...

☆ अनुस्वार उच्चार

☆ विसर्ग उच्चार
(वाक्याच्या शेवटी, आणि मध्येच येतो तेव्हा)
☆ विसर्ग नंतर स, क्ष  ष, श,
असेल तेव्हा.!
☆ ऱ्हस्व  दीर्घ उच्चार याकडे नीट लक्ष द्यायचे.
------------------------------------------------

सराव कसा करतो?


• श्लोकाची सुरुवात करून दिली कि पुढे श्लोक म्हणायचा.
निदान चार पाच श्लोक म्हणायचे.. म पुढचा म्हणेल.

• सम विषम श्लोक म्हणायचे...

• जर श्लोकाची सुरुवात करून दिली तर 

तो श्लोक कोणी म्हटला असेल तर... 

तशी सुरुवात करायची
दुसरा अध्याय... ४था श्लोक
उदा. 
कथं भीष्म....
अशी सुरुवात करून दिली तर...
अर्जुन उवाच...
कथं भीष्म 
असे म्हणायचे.. आणि पुढे श्लोक म्हणायचा.!

• दोन श्लोक थोडे सारखे वाटतात ते सारखे नसतात...
पण सारखे वाटल्याने थोडे चुकण्याचा संभव असतो,
ते श्लोक पुन्हा पुन्हा म्हणून चुकू नये अशी खबरदारी घ्यायची.
 
• काही श्लोक म्हणताना गडबड होते म आधीचा श्लोक, 
तो श्लोक आणि त्यानंतरचा श्लोक असे जोडून म्हणायचा, अनेकवेळा...

• एकटे गीता म्हणताना

पुस्तकात बघूनच गीता म्हणायची.


• प्रत्येक अध्यायाची सुरुवात... कोणी केली आणि
 पहिला श्लोक कोणता??? ते नीट करायचे, 
• अध्यायाच्या शेवटचा श्लोक कोणता
आणि अध्यायाचे नाव पक्के लक्षात ठेवायचे....

• श्लोक म्हणत असताना
कोणी आलेगेले, 
कोणी मोठ्याने बोलले
 तरी आपण श्लोक पुढे चालू ठेवायचा...
-------------------------------------------------

अध्याय अठरावा..
अतिशय छान पाठ असला पाहिजे..
पाठांतरच्या वेळी ..

चला झाली गीता पाठ असे होऊ नये.!

----------------------------------------------
अध्याय पहिला सुरुवात धुतराष्ट्र उवाच
हा एक श्लोक यांचा आहे फक्त.!

संजय यांचे अधेमधे श्लोक आहेत... 

तर ते नीट करायचे,


-------------------------------------------------
सञ्जय उवाच
१ | २४
एवमुक्तो ऋषीकेशो गुडकेशेन भारत ।
सेनयोरुभयोर्मध्ये 
स्थापयित्वा रथोत्तमम् ।।
-------------------------------------------------
१ |४७
एवमुक्त्वार्जुनः सङख्ये 
रथोपस्थ उपविशत्
विसृज्य सशरं चापं 
शोकसंविग्नमानः
(शेवटचा श्लोक)
--------------------------------------------------
२ | ९
एवमुक्त्वा हृषीकेशं
गुडकेशः परंतपः
न योत्स्य इति गोविन्द
मुक्त्वा तूष्णीं बभूव ह ||
--------------------------------------------------

११ | ९

एवमुक्त्वा ततो राजन्
महायोगेश्वरो हरिः
दर्शयामास पार्थाय
परमं रूपमैश्वरम्
--------------------------------------------------
११ | ३५

एतच्छ्रुत्वा वचनं केशवस्य
कृताञ्जलिर्वेपमानः किरीटी ।
नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णं –
सगद् गदं भीतभीतः प्रणम्य ।।

हे श्लोक चांगले लक्षात ठेवावे...

 थोडी गडबड होण्याची शक्यता असते...
--------------------------------------------------
तसे शेवटचे पाच श्लोक संजय यांचे आहेत,
 ते छानच म्हणता आले पाहिजेत.!
--------------------------------------------------
प्रत्येकाची म्हणण्याची पद्धत वेगळी असते,
कुणी वेगात म्हणते,
 कुणी हळू म्हणते, 
कुणाची चाल वेगळी असते, 
कुणी आठ अक्षरानंतर किंचित pause घेते,
 कुणी सोळा अक्षरे एका दमात म्हणते,
या बरोबर आपल्याला जुळवून घ्यावे लागते.!
--------------------------------------------------

मी रोज गीता म्हणण्यापूर्वी...


ॐ पार्थाय प्रतिबोधितां...

ध्यानम् श्लोक
गीतामाहात्मम्
असे म्हणते.!
--------------------------------------------------

गीता पाठ झाली.
आता काही श्लोक अर्थ,
काही शब्द अर्थ बघते.

सकाळी उठल्यानंतर..
गीतामहात्म्य वाचते, 
संपूर्ण अध्यायाचा अर्थ वाचते....
--------------------------------------------------

गीता वाचताना काही गोष्टी लक्षात येऊ लागल्या
(इतके दिवस पाठांतर एवढेच ध्येय होते)

--------------------------------------------------

Monday, 16 July 2018

गीता पाठ झाल्यानंतर...



गीता पाठ झाल्यानंतर...

काही ठिकाणी अडखळले जाते...
का?? काही साम्य?
असे बघितले
तर थोडे साम्य आढळले
तर ते श्लोक पॉईंट आऊट केले
आणि एका वहिवर लिहून काढले... ते पुढील प्रमाणे.

१ | २८  , ११ | ५१
१ | ३८ , १ | ३९
२ | ३३ , २ | ३९
२|४८ , १८|२६ , ४|२२
२ |५८ ,२ | ६८
३ | २३ , ४ | ११
४ | ६ ,  ९ | ८
४ | ३१ , ४ | ४०
६ | २९ , १२ | ४
६ | २९ , ६ | ३१
६ | २४ , १२ | ४
६ | १४ , ६ | २७
६ | १५ , ६ | २८
६ | ७ , १२ | १८
८ | ८ , १२ | ९
८ | ७ , १८ | ६८
९ | ३४ , १८ | ६८
९ | १६ , ९ | २४
१२ | १६ , १४ | २५
१६ | २३, १७ | १
१६ | ७ , १८ | ३०

असे काही श्लोक आहेत
जे मी वहीत पाच पाच वेळा लिहिले आहेत.

अजून एक आहे
५ |९ आणि १३ | ८
खरे साम्य काही नाही तरी माझा सध्या गोंधळ होतोय

असे मी श्लोक अनेक वेळा म्हणते.
गीता..

        श्रीभगवानुवाच

कालोऽस्मि लोकक्षयकृत्प्रवृद्धो

  लोकान्समाहर्तुमिह प्रवृत्तः ।

ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे 

  येऽवस्थिताः प्रत्यनीकेषु योधाः ।।

११| ३२


श्री भगवान म्हणाले,
जगतांचा विनाश करणारा काळ मी आहे. 
आणि सर्व लोकांचा संहार करण्यासाठी
 मी या ठिकाणी आलो आहे. 
तुझ्या व्यतिरिक्त 
(पांडवांव्यतिरिक्त)
 दोन्ही सैन्यातील 
सर्व योद्ध्यांचा विनाश होणार आहे.

------------------------------

गीता वाचत असताना

 सुप्रभात... 

आज गीता वाचत असताना एक गोष्ट लक्षात आली...


१. जेव्हा जेव्हा आपण देवाय तस्मै नमः ...
असे म्हणतो , 
देवळासमोर  आतील मूर्तीला नमस्कार करतो तेव्हा तेव्हा... 
बहुतेक उजव्या हाताने नमस्कार करतो तेव्हा

 स्वाभाविकपणे हात हृदयाकडे जातो, 

म्हणजे 
एकतर तो मनापासून नमस्कार असतो 
आणि दुसरा विचार..  
आपल्या अंतरात स्थित असलेल्या परमेश्वराला नमस्कार असतो, 
असे असेल का?

गीता महात्म्य .. वाचताना

पक्षी आपल्या पिलांचे संगोपन केल्या नंतर 
विसरून जातात कि हि आपली पिले आहेत, 
आणि पिलांनी एकदा भरारी घेतली कि 
आपले आई वडील,
 यांनी आपले संगोपन केले हे विसरून जातात... 
( प्राणी सुध्दा)

जसे आपण बाळ असताना आपला आधीचा जन्म विसरतो.!

त्यासाठीचा काळ झोपेत जातो.. 
झोपेत आपण हसतो, रडतो
 काहीवेळा चेहऱ्यावर भाव येतात...
असे असेल का???
असे विचार मनात आले..

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Friday, 13 July 2018

तुर्तुक. ... येथे जाताना...



या सुंदर गावाबद्दल ऐकले होते, कधी येथे जातो असे होऊन गेले होते,
वाटेत जे काही दिसते ते डोळ्यात साठवून ठेवत होतो, काही ठिकाणी फोटो, चालत्या गाडीतून कधी गाडीचालक म्हणाला उतरायच का... तर उतरून फोटो काढत होतो... 
माझी खूप इच्छा प्रबळ होती लेह लडाख बघण्याची.!
 हिमालय दर्शन. 
मिलिटरीच्या गाड्या ओळीने जाताना बघण्याची, 
जवानांबरोबर बोलण्याची, काय आहे सियाचीन.. 
 काराकोरम डोंगर रांग बघण्याची ,
 येथील लहरी निसर्ग बघण्याची.! 
येथील काय असेल जनजीवन हे जाणून घेण्याची...
लेह येथून निघालो आणि सुंदर असे ठिकाण नुब्रा व्हॅली..  हुंडर येथे आलो,
 जेथे उतरलो तेथून सियाचीन डोंगर दिसत होता, 
मागेच हेलिपॅड
विमान लँडिंग दिसणार
.. हे गाव पायी फिरताना छान वाटले... 
अनेक गोष्टी ऐकत, कानात साठवत मस्त वाटत होते...

 हुंडार हे ठिकाण (cold desert) थंड वाळवंट, 

तसेच अतिशय सुंदर (sand dunes) वाळूच्या देवता

  या साठी प्रसिद्ध. 
दूरवर एकीकडे पाकिस्तानचे डोंगर तर
 दुसरीकडे चीनचे.
आज तापमान किती असे विचारता त्यांनी सहज सांगितले...

 ज्यादा नही 5 है .... नॉर्मल.!!

 मधोमध असलेल्या व्हॅलीत आम्ही.
 जेथे उतरलो तेथे समोरच सुंदर शेती
 आणि जेवणामध्ये येथील भाजा, भाज्यांचे सुंदर असे सूप.!

सकाळी तुर्तुकच्या दिशेने निघालो. 
  
निघाल्या पासूनच वाटेत 
 इंडियन आर्मीचे ट्रक जरा जास्तच संख्येने दिसू लागले होते.  
 जे मी सिनेमात बघितले तसे.!
 जसजसे पुढे जाऊ लागलो तसतसे
 रस्त्याच्या कडेने

 photography prohibited area

 ह्या आशयाच्या पाट्या दिसू लागल्या. 


 Strickly no stopping area , Tresspassers will be shot dead  ह्या पाट्या दिसायला लागल्या. 
 तो होता सियाचिनला जाण्यायेण्या साठीचा एअरपोर्ट. 
अतिशय सेन्सिटिव्ह एरिया. 
आणि गाडीचालक सूचना देत होताच

. अभी फोटो खिंचना मना है.!

 किधर भी रुकनेका नही.!


    हळूहळू तुर्तुक गाव जवळ येऊ लागलेले
. सोबतीला वहात होती ती Shyok नदी अगदी तुर्तुक पर्यंत.

 Shyok?

 कधी शाळेत असताना वाचल्याचे आठवत नाही.!
 होय shyok हेच नाव ह्या नदीचं.
 It's a river of death.
 तिचं नाव हे का ते इथून जाताना कळते.
 कडेने उंचच उंच डोंगर,
 कधी अख्खा कोसळून संपूर्ण परिसर एका क्षणात बदलून जाईल माहीत नाही.
 एकही झाड नाही की सभोवताली चिटपाखरू नाही.
 नदीचा वेग असा की भारतातून थेट पाकिस्तानातच जाऊन पोचते....
गाडी चालक याना विचारले कि 
या नदीतून प्रवास करतात का?? 
किती वेळात पाकिस्तान.! 
ते म्हणाले आधा घंटा .!

लोक मासेमारी करतात पण 

कोणी तिकडे जाण्यासाठी उपयोग करत नाहीत.! 
(आपले लोक तिकडे जात नाहीत, कदाचित हालहाल करून मारत असतील)

 “Your Lifetime Experience Is Our Daily Routine”


हे khardung La येथे 
 लिहिलेल्या वाक्याचा अर्थ येथून गाडी जात असताना
 आणि गाडीचालक माहिती देत असताना आला.

आम्ही गाडीतून हा परिसर बघितला
गाडीचालक माहिती देत होता... सगळी

कानात साठवत होतो.
एक किमी वर पाकिस्तान बॉर्डर...
धस्स होत होते,
पाषाण हृदयीं माणसे
उगाच त्यांना काफर नाही म्हणत.
युद्धाचे नितिनियम न पाळणारे..

यासाठी आपले जवान किती अलर्ट राहतात...

किती आणि काय बघायला ऐकायला मिळाले...
किती खडतर प्रशिक्षण पूर्ण करून असे जोखमीचे काम करतात...
लडाखी लोक सैन्यात जाण्यासाठी किती धडपड करतात,
ज्यांना काही कारणाने सैन्यात भरती होता येत नाही
 ते तरुण जवानांना रसद पुरवण्याचे काम करतात,
 काही आपल्याला या भागात फिरवण्याचे काम करतात.
 गाडीतून, किंवा गाईड म्हणून.!
******************************

तुरतुक भागात 500 घरे आहेत  ते स्वतःला बाल्टी म्हणतात.
 त्या गावाचे भागाचे नाव बाल्टीस्तान आहे.!
तेथे प्रत्येक घरातील तरुण आपल्या सैन्यासाठी काहींना काही काम करतो,
सर्व घरे मुस्लिम आहेत.
तरी त्यांना आपल्या हिंदुस्थान बद्दलच प्रेम आहे.

१४ डिसेंबर १९७१ च्या रात्री ते पाकिस्तानी होते

(हा भाग पाकिस्तान चा भाग होता)

१५ डिसेंबर सकाळी ते भारतीय झाले

आपल्या आर्मीने हा भाग जिंकला...

 (आता ते आपलेच आहेत, आपल्या जवानांसाठीच काम करतात)
 जेव्हा आपल्या आर्मी ने हा भाग जिंकला तेव्हापासून.! 
आर्मी बद्दल गौरवोद्गार काढतात.!
येथे NGO काम करतात... कुणीही येथे जाऊन काम करू शकते
********************************
त्यांचे नातेवाईक जे पाकिस्तान मध्ये राहतात
 ते म्हणतात तुम्ही कधीही इकडे येऊ नका,
येथील लोक चांगले वागत नाहीत.

आपल्याकडे मॅरेथॉन होते तेव्हा 30 जवान त्यात भाग घेतात
 1 महिना सराव करण्यास येतात 
त्यांना मुंबईचे आकर्षण नाही, 
त्यांना येथील हवामान आवडत नाही.
ते इथे रमत नाही.
आपण या भागांना भेट देतो तेव्हा... 
आपल्याला हवामान केव्हा सूट होईल ते बघून जातो, सहल ट्रिप म्हणून.! 
पण जेव्हा प्रतिकूल हवामान असते तेव्हा ...
 कसे काय काम करत असतील???
असो...
वाटेत काही स्मृती स्तंभ/ शीला दिसत त्या वीर जवान यांच्या स्मृती साठी
त्यांनी जेथे कामगिरी केली तेथे स्मृती , कोणती कामगिरी केली...
ते लिहिलेले असते

असे वाटेत दिसत होते... गाडीचालक तेथे माहिती देत..

आपोआप नतमस्तक व्हायला होत होते.!

 डोळ्यातून अश्रू येत.

मनोमनी सलाम करत होतो,

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

 जय हिंद म्हणत होतो...

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::: 

बडा बुद्ध

 




हुंडर 

तुर्तुक  उतरलो ते ठिकाण

Monday, 2 July 2018

गुलमोहोर...


      उन्हाळ्यात, पाणी कमी असलेल्या जागी, समुद्रकिनारी फुलणारा गुलमोहोर.!

याची कोवळी पाने फारच सुंदर रंगाची असतात, आता लॅबर्नम वाळू लागला डार्क चॉकलेटी शेंगा दिसू लागला.. (या शेंगा आकाराने छोट्या असतात.) 

     आणि गुलमोहोर मात्र फुलू लागला , फुलाला पाच पाकळ्या असतात.. मध्येच केशरी पिवळी छटा असते. फुले गळतात, असे म्हणण्यापेक्षा  याच्या पाकळ्या गळतात आणि सडा पडतो, फुलांना कोणताही वास नसतो, नाही देवाच्या पायाशी, नाही फ्लॉवर पॉट मध्ये... पण रस्ता कडेने ओळीने असणारे हे झाड याच्या खास रंगाने लक्ष वेधून घेते. जसा लालभडक रंग तसा केशरी रंगाची फुले असलेली झाडे बघितली आहेत. अगदी शेंड्यावर फुले असतात, आणि इतका बहरतो तेव्हा पाने आहेत कि नाहीत असे वाटते. आणि जेव्हा बहर ओसरतो तेव्हा मस्त कोवळी पोपटी पाने दिसतात... पाने छोटी छोटी असतात.. चिंचेच्या किंवा गुंजेच्या पानांसारखी.!!!

याच्या शेंगा चॉकलेटी रंगाच्या साधारण दीड दोन फूट लांब असतात त्या खुळखुळ वाजतात, पूर्वी ट्रिप मध्ये गाणी म्हणताना वाजवल्याचे स्मरते.! 

या शेंगा मागील वर्षाच्या फळापासून बनतात.

याची मुळे जमिनीवर उथळ असतात...

 त्यामुळे वादळ वारा सुटला तर झाड उन्मळून पडते...

रस्त्याच्या कडेने नैसर्गिक फ्लॉवर पॉट.!

आता बाकी उन्हाळी फुलांचा सिझन संपला आहे आणि गुलमोहोर बहरू लागला आहे....

अगदी लक्ष वेधून घेतोय.!!

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::