ईमेल, व्हाट्सअप्प, फेसबुक, सब पर सरकरकी नजर रहेगी, मतलब साफ है,
बंद लिफ़ाफ़े में
चिठ्ठी भेजना शुरू करो!
डाक विभाग पे
भरोसा रखो.!!
आता असेही दिवस आले, सावध करण्याचे.!
पूर्वी साध्या पोस्टकार्डवर खुशाली पाठवली जायची.
पत्र येणार आहे, याची हुरहुर असे,
बरेच दिवसात पत्र आले नाही तर काळजी असायची.
गावाला कुणी जात असेल तर...
स्टेशन वर निरोपाचे हात हलत व
पोहोचलास कि पत्र पाठव असे आवर्जून सांगितले जाई.
नोकरी लागणार याचे पत्र येई,
होतकरू अशावेळी पोस्टमन येण्याच्या वेळी वाट बघे.
दोन वेळा ठरलेल्या असत.
ज्यांना लिहिता वाचता येत नसे त्यांना वाचून दाखवण्याचे काम पोस्टमन करायचा.
पत्र
लिहून देण्याचे काम असेच.. वेतन कमी पायपीट जास्त.!
मधल्या काळात लिफ्ट
नव्हती तर जिने चढ उतार करावे लागे..
. पण तो त्यांच्या कामाचा भाग होता..
आता कुरिअर वाले यांची मदत होत असेल.!
आता इतके कुणी पत्र पाठवणारे नसावेत.
यांच्याशी
घरोब्याचे संबंध असायचे.!
रोजच भेट होणारे, आपल्या बरोबर नेहमीचे सबंध.
एखाद्या दिवशी चांगली बातमी घेऊन येणारे पत्र आणले कि खुशीने काहीजण
बक्षिसी देत असत...
(तुटपुंजा पगार असतो हे सर्वश्रुत आहे)
या सेवेत महिला असतात
पोस्ट वूमन किंवा पोस्ट पर्सन.!
पूर्वी पोस्टातील मुलगी नावाचा चित्रपट आल्याचे स्मरते.!
रस्त्यात पुटपाथ वर लाल रंगाची पेटी असते.
यात दोन कप्पे असतात एक मुंबईतल्या मुंबईत असलेली पत्रे, तर दुसरा मुंबई बाहेरील पत्र.!
पोस्टात अनेक सोयी सुविधा असतात.
पोस्टकार्ड,
अंतर्देशिय पत्र तिकिटे पाकिटे मिळतात.
पैसे गुंतवता येतात,
हमखास पत्र
मिळावे म्हणून थोडे पैसे जास्त घेऊन सेवा मिळते.
पाकिटातून काही महत्वाचे
कागद असतील तर
वजन करून जास्त पैशाचे तिकीट लावून ते पोहोच होते...
काहीजण मुद्दाम जास्तीचे तिकीट लावत नसत.
म्हणजे हमखास असे तिकीट न लावलेले पत्र मिळत असे
कारण दुप्पट आकार घेत असत (असे म्हणत)
आंगडिया सर्विस फेमस आहे.
तसेच इतर हि कुरिअर सेवा आहेतच.
पण पोस्टकार्ड.!
कमीतकमी पैशात खुशाली कळवता येत असे
पण काही गोपनीय असे तर मात्र अंतर्देशिय पत्र हि छान सोय.!
आजही यापैकी पत्र आले तर....
कुणाचे असेल?? हा विचार येतो...
कारण प्रत्येकाच्या हातात फोन आहे,
पटकन जगाच्या कोणत्याही भागात क्षणात पोहोचता येते,
आज पत्र, हे परीक्षेत मार्क मिळवण्यासाठी, एवढाच भाग राहिला असेल....
किंवा गणित विषयात गणित सोडवणे एवढेच असेल.
(शाळेत असताना हमखास एक प्रश्न असायचा)
फार कमी वेळा पोस्टात जाण्याची वेळ येत असेल.
आता कोणीही असे म्हणत नसेल पत्र पाठवून खुशाली कळवा,
तुमच्या पत्राची वाट बघेन,
बरेच दिवसात तुमचे पत्र नाही,
काळ पुढे चालला आहे,
निरनिराळ्या क्षेत्रात प्रगती होत आहे,
काही गोष्टी काळाच्या पडद्याआड जात आहेत.
पण अजूनही पोस्ट ऑफिस दिसतात,
काही अजूनही जुनी, काहीच सुधारणा नाही....
खाकी युनिफॉर्म, खाकी पिशवी खांद्याला,
ठरलेल्या वेळी पोस्टमन काका येतात
पण त्यांच्या पिशवी मध्ये पत्र, आंतर्देशिय पत्र असतील??
No comments:
Post a Comment