आपले अगदी घट्ट नाते असते जन्मापासून ते मृत्यू पर्यंत..
श्वास घ्यायला शिकायला हवे ???
कि शिकायला हवा प्राणायाम???
असे काही असते???
खरतर जन्म घेतानाच हि क्रिया... येतच असते
लहान मुलं श्वास घेताना बघा...
लागते का, शिकवायला???
काही दिल्याशिवाय काही मिळत नाही.
एक श्वास सोडला कि दुसरा श्वास मिळतो.
श्वास.. कधी अडकतो,
कधी रोखून धरला जातो,
कधी मंद होतो,
कधी दीर्घ घेतला जातो,
कधी कोंडतो,
कधी धाप लागते...
कधी भराभर घेतला जातो,
कधी थांबतो..( संपेलच सगळं)
घरघर लागते, आचके दिले जातात..
कधी एकमेकात गुंफतो
तर कधी सुटकेचा श्वास टाकला जातो.
जर शरीराला ऑक्सिजन कमी पडला तर...
★ धावल्यामुळे आपले श्वास जोरात होतात.
वेगाने आपण प्राणवायू घेतो आणि कार्बन डाय ऑक्साईड सोडतो...
हातपाय गळणे,
पायात गोळे येणे,
डोके जड होणे,
भीती वाटणे,
जीव नकोसा होणे,
एखादा आजार होणे,
असे काहीसे होते.
श्वास... आपोआप घडणारी क्रिया...
याकडे लक्ष दिले तर....
निदान वेळ असेल तेव्हा, किंवा खास वेळ काढून..!!
(झाला कि प्राणायाम)
सावकाश संथ लयीत पुरेसा श्वास घेतला आणि पूर्ण बाहेर सोडला तर...
म्हणूनच प्राणायाम शिकवा लागतो, प्रयत्नपूर्वक करावा लागतो.
दीर्घश्वसन:
चार अंक श्वास आत घेतला तर...
आठ अंक सोडताना घ्यावेत..
दीर्घ श्वास... हा एक रामबाण प्राणायाम आहे.
यालाच साध्या भाषेत जरा डोकं शांत ठेव.
( राग आला, तणाव वाटला तर एक ते दहा अंक म्हण... अर्थात हे म्हणताना... आपण हळूहळू शांत होतो..)
अर्थात आपले श्वास संथ होऊ लागतात.
~~~~~~~~~~~~~~~
कपालभाती... पृथ्वीवरील संजीवनी
पण करण्यास वेळ द्यावा लागतो.
धीर धरावा लागतो विश्वास असावा, श्रद्धेने करावे लागते.
करून बघते/ बघतो हे कामाचे नाही.
जसे गोळी घेतली कि आराम मिळतो तसे यात होत नसल्याने कोणी विश्वास ठेवत नाही.
घे गोळी वाटले बरे...
असे हल्ली झटपट हवे असते.
सातत्य आवश्यक आहे.
ज्याचा हल्ली अभाव असतो.
करायचे स्वतःसाठी तरीही आळस असतो...
करू लागले कि पटकन बरे वाटावे असे असते.
एक ओळखीतल्या बाई
शुगर खूप
इन्सुलिन घ्यावे लागत होते...
तिने निश्चय केला कि कपालभाती करेन
नियमाने रोज एक तास स्वतःसाठी/ प्राणायामसाठी देऊ लागली...
आणि
एक वर्षात इन्सुलिन गोळी असे क्रमाक्रमाने कमी झाले...
आलेगेले, बाहेरगावी
गेले तरी तिने प्राणायाम करणे सोडले नाही...
तिच्या माणसाना माहित होते हि
ठरलेल्या वेळी प्राणायाम करते...
असा निश्चय हवा
~~~~~~~~~~~~
अनुलोम विलोम...
अनेक गोष्टी साध्य होतात
अर्थात यात सुद्धा आहे दीर्घ श्वसन...
~~~~~~~~~~~~~
जे आपल्याकडे कायम आहे ते गृहीत धरतो
किंवा या श्वासाकडे लक्ष देत नाही...
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
काही घेतले कि ते भरते
जसे रिकामा डबा आहे त्यात काही भरले तर...
तो डबा भरेल... तसेच
जसे श्वास घेतला तर.... तो पोटात घ्यावा...
यामुळे पोटातील अवयवांना व्यायाम मिळेल..
. ते मजबूत राहतील.
श्वास पोटात घेतला तर पोट पुढे आले पाहिजे..
किंवा छातीत भरला तर.. छाती पुढे आली पाहिजे..
हो ना.!
यामध्ये बरगाड्यांना व्यायाम मिळेल आणि छातीचा पिंजरा मजबूत होईल.
*******************
म हेच तर लक्ष द्यायचे आहे.
आपण कसा श्वास घेतो?? याकडे...
एरवी कसाही घेतो आणि कसाही सोडतो.
********************
श्वासाबरोबर करूया घट्ट मैत्री.!!!!!
<><><><><><><><><>
सातत्याने करू प्राणायाम
स्वस्थ असू तेव्हा तरी देऊ श्वासाकडे लक्ष.!!
<><><><><><><><><>
जन्म मृत्यू यात एका श्वासाचे अंतर असते..
( श्वास सोडतो, तो पुन्हा घेतला जात नाही )
अस म्हणतात कि
माणूस किती श्वास घेणार हे ठरलेले असते
तेव्हढे घेऊन झाले कि जीवनयात्रा संपते...
*********************
पूर्वी ऋषीमुनी... प्राणायाम, ध्यान करताना
सावकाश श्वास घेत त्यामुळे त्यांचे आयुर्मान भरपूर असे...
*******************
योगा, प्राणायाम, करतो का आपण???
कि यात देव आहे, अध्यात्म आहे
हे आम्ही वय मोठे झाले कि करू... आत्ता काय उपयोग म्हणून सोडून देतो?
कि फुकट आहे म्हणून काही किंमत नाही.!
वेळ नाही हे सुंदर वाक्य असतेच आपल्याला....
है ना
हे मी लिहिले, पण कधी काही ऐकले वाचले होते, अनुभव... जे माझ्या लक्षत आहे... ते आहे हे लिखाण.!!!
No comments:
Post a Comment