Tuesday, 24 April 2018

आता ह्या शुभेच्छा राहिल्या होत्या.


शुभेच्छा.!!

आता ह्या शुभेच्छा राहिल्या होत्या.


ऊन्हा-तान्हाच्या हार्दीक शुभेच्छा
आपला दिवस सावलीत जावो!

ए सी मध्ये असेल तर....
अजून काय हवे...
आहेतच अच्छे दिन.!!


यावर मैत्रीण म्हणाली:

 घरातून बाहेर पडल्यावर ही AC हवे तर  आता पासूनच खूप कष्ट घ्यायला हवेत भरपूर झाडं लावून, जगवून वाढवायला हवी. पुढच्या पिढीला तरी "गारवा" मिळो.!!
मी:  हो ना...
अगदी झाडे लावली नाहीत तरी आहेत त्या झाडांना पाणी घातले... खत घातले तरी.....
 अशी अनेक फुलझाडे, ज्याची फुले...
 ना डोक्यात, ना देवाच्या पायाशी,
 ना फ्लॉवर पॉट मध्ये...
पण नेत्रसुख, भरपूर सावली देणारे,
 आपल्याकडे हि झाडे पाणी मागत नाहीत.
पाऊस पडेल तेव्हा हि झाडे भरपूर पित असतील पाणी....
अशी झाडे सध्या नजरेत येतात..

लॅबर्नम, गुलमोहोर

हे तर जमिनीवर गालिचा अंथरतात... 
पिवळा लाल रंगाचा....

 Pink Tabebuia tree..

 हा वृक्ष तर ... आपल्यावर सतत फुलांचा वर्षाव करत असतो.
नैसर्गिक पुष्प वृष्टी.!!
अर्थात गुलाबी गालिचा जमिनीवर अंथरला जातो.

आता अशी  झाडे दळवी हॉस्पिटल जवळ ओळीने पाच सहा आहेत.
आणि स्टर्लिंग जवळ..
मला वाटतं मी फेब्रुवारी मध्ये गेले होते तेव्हा झाडाला अजिबात पाने नव्हती, होती हलक्या गुलाबी रंगांची फुलं.!
असे वृक्ष लावावेत... कि नेत्रसुख मिळेल...
बघ बाहेर पडलो तर... लॅबर्नम...
 छान मोठे डेरेदार वृक्ष, पिवळे सोन्याचे माणि भासतात फुले म्हणजे..
 रस्त्याच्या कडेने झाडे

बहावा... औषधी, नेत्रसुख लाकूड पण उपयोगी


गुलमोहोर,  लाल, केशरी फुले


आणि एक झाड माहित नाही नाव
अगदी वर गुलाबी नाजूक फुले

आणि आकार नैसर्गिक छत्री... भरागच्चं


केनेडी ब्रिज सेंट कोलंबा शाळा अगदी ओळीने आहेत हे वृक्ष
आणि जिकडे तिकडे दिसतात.... कोणत्याही ब्रिज वर आपली गाडी असेल तर हि गुलाबी फुले लक्ष वेधून घेतात. आणि झाडाचा आकार अगदी छत्री....

बोगनवेल... याचा वेल जर एखाद्या वृक्षावर चढला तर...

 त्या वृक्षाचीच फुले कि काय असे वाटते.! 

पिंपळ ... 

कोवळी नाजूक तांबूस पाने आपले लक्ष वेधून घेतात. आणि रोज जाण्या येण्याच्या मार्गावर पिंपळ असेल तर... पानांचा बदलत जाणारे रंग, आकार , याचे उपयोग, पाने वाळली कि त्यांची सळसळ... धीरगंभीरपणे  तटस्थपणे उभा असलेला वृक्ष, याच्या मुळाशी विष्णूचा वास असतो म्हणतात, मारुतीचे मंदिर असते .... 

 अगं मला काय वाटते हे आहेत नैसर्गिक फ्लॉवर पॉट...

अगदी सगळ्यांसाठी....
आपल्या घरात असतात ते फक्त आपल्यासाठी आपल्याकडे येणाऱ्या साठी.... 
या फुलझाडांची मजा घ्यायची ती उन्हाळ्यात.!!! 

उन्हाळा सुसह्य करतात हि फुले.... 

एरव्ही हे वृक्ष नुसतीच पाने असतात...
 रस्त्याच्या कडेने ओळीने उभे असतात... 
सावली देतात.... आणि कधी फुले आली ती...
 लोकांना कळते का... बघतात तरी का मान वर करून?
 कि फुलंणे बहरणे हळूहळू रिते होणे,
 रस्त्यावर सडा, गालिचा अंथरणे, 
आणि शेवटी कचरा होणे....
 हेच या फुलांच्या नशिबी असते...

जी फुले देवाला वाहिली जातात त्यांचे शेवटी निर्माल्य होते.... 

आणि हि सुंदर फुलं शेवटी कचरा.!!!!


Monday, 23 April 2018

केळी....


आज भरदुपारी बाहेर गेले होते.
 गेट बाहेर रस्त्याचे काम सुरु आहे.
 सर्वच कामगार थोडी विश्रांती घ्यायला थांबले असावेत,

 त्यांच्या हातात केळे, 

प्रत्येक जण केळे खात होता...
मनात विचार येऊ लागले

गरिबांचे खाणे... 
परवडेल असे, 
बाराही महिने मिळते.... 
खाताच थकवा घालवण्याचे सामर्थ्य या छोट्या दिसणाऱ्या फळात आहे...
वजन वाढीसाठी उपयुक्त.!
कोणतीही प्रक्रिया न करता खाता येते ना....

*******************

याचे प्रकार तरी किती???

भाजीची केळी.. हिरवी थोडी बुटकी.. 
वेलची केळी,
आंबट वेलची थोडी मोठी असतात.
हिरव्या सालीची, 
लाल सालीची, 
गोल्डन केळी

राजेळी केळी... याचा हलवा छान होतो.

राजेळी ची पुढे सुकेळी करतात...
^^^^^^^^^^^^^^^^^^^^

केळीचे पीठ करतात

यापासून घावन भजी केली जातात
वर्षभर हे पीठ टिकते.. उपवासाला चालते.

गावाकडे विहिरीजवळ झाड असे.! 
म्हणजे पाणी जास्त लागत असेल!!

केळीचे फुलं, केळफुल.! 

याची भाजी सुंदर होते.

आजतर या फुलाची सुंदर रांगोळी काढली आहे कुणी.!
*******************
शुभकार्याच्या वेळी

घराला केळफूल असलेले खांब बांधतात...

:D:D:D:D:D:D:D:D:D:

''''चार बाजूला 
चार पायीला 
केळीचे खांब
चौरंगावरी मध्ये 
बैसले सत्यनारायण''''

कोणतीही पूजा असेल तर केळीचे खांब बांधून तो सजवतात.


<><><><><><><><>

आता प्लास्टिक बंदी येत आहे...
 तर केळीच्या बुंध्यापसून,
 किंवा खोडापासून मशीन ने
 वाट्या, ताटल्या, डाव, चमचे

 अशा वापरा आणि फेका अशा वस्तू बनवल्या जातात.

<><><><><><><><><>

केळीचे पान जेवणासाठी उत्तम असते...

<<<<<<<<<<<<<<<<<

बिन फांद्यांचे झाड म्हणजे केळी

>>>>>>>>>>>>>>>>

या झाडापासून डेकोरेशन मस्त होते, 

बहुतेक ठिकाणी सत्यनारायण पूजेसाठी मंदिर करतात.


*******************
लहानपणी एक कविता वाचलेली आठवते..
 पूर्ण नाही , थोडी

आंब्याची आमराई आजोळी असावी
आढी असलेल्या खोलीत स्वारी आमुची बसावी

केळीची बाग असावी

 मावशीच्या दारात

 शाळेत येता जाता 

चार चार दप्तरात...


अशा गाण्यातून लहानपणी  केळीचे महत्त्व सांगितले गेले.
*******************

केळ्यापासून किती पदार्थ


शिकरण... दुधातून किंवा नारळाच्या दुधातील..

केळीचा पाक

केळीच्या पुऱ्या
(बनाना बन)

बनाना केक

केळ्याचे तऱ्हेतऱ्हेचे वेफर्स...

आणि हो... सत्यनारायण प्रसाद... केळी घालूनच करतात.

अनेक लोक प्रसाद म्हणून देवासमोर केळी ठेवतात.

बनाना मिल्क शेक.!!

केळे पोळी सुद्धा अनेक जण आवडीने खातात

केळ्याची दही घालून कोशिंबीर??? 
छान होते
तसेच.. केळी+टोमॅटो
दही घालून कोशिंबीर छान होते..

काहीजण उंधियु मध्ये छोटी वेलची अख्खी केळी घालतात...
::::::::::::::::::::::::::::::::::::


केळी, स्वास्थ्यासाठी उत्तम.! 

ऍसिडिटी झाली तर वेलची केळे खावे
थंडावा मिळतो.
___________________

वनवासाला केळे

उपवासाला रताळे


असे काहीसे म्हटले आहे.
【】【】【】【】【】【】

एक डझन केळी... असे म्हटले तरी घडात १३ केळी असतात बहुतेक.!

【】【】【】【】【】【】

 केळे, केळी केळं असे म्हणतात

केळ असे म्हणत नाहीत

===============
प्रत्येक केळ्यात ८९ कॅलरी असतात.
===============
बहुतेक पहिलवान लोक केळी खातात 
~~~~~~~~~~~~
माकडे... आनंदाने केळी खातात
 पण केळीच्या बागेची नासधूस करतात.
•••••••••••••••••••••••••

हत्ती जसे ऊस आवडीने खातो तशी केळी खातो.


(एकदा मी हत्तीला केळ्याचा घड दिला आहे)
::::::::::::::::::::::::::::::::::::

कोठली केळी प्रसिद्ध


जळगाव, वसई


::::::::::::::::::::::::::::::::::::


Sunday, 22 April 2018

वाहव्वा वाहव्वा बहावा.!!



अगदी वाहव्वा वाहव्वा म्हणावा असा बहावा.!!

अगदी राजवृक्ष.!!

 

 

सोनेरी पिवळ्या धम्मक घोसानी फुले असतात...
प्रथम जेव्हा कविता या माध्यमातून आली तेव्हाच याच्या प्रेमात पडले...
 म शोध घेतला आणि फुले चित्रात बघितली..
खरंच सुंदर.!

आताआताच... 
मुलुंड येथून गाडी ऐरोली कडे वळली
 आणि ओळीने पाचसहा बहरलेली झाडे बघून अगदी हरखून गेले, 
आनंदित झाले मन...

हि ती कविता... जिने फुलांचा शोध घ्यावा वाटला


मन बहावा बहावा...
      डोळे भरून पहावा...
जसे मायेचे तोरण...
    मिळे त्याखाली विसावा
..मन बहावा बहावा...
  डोळे भरून पहावा..

खाली उतरूनी येई...
   सूर्यकिरणांची हि माया
मन बहावा बहावा....

ग्रीष्म ऋतूचे फुलणे...
   लाल पिवळे ..तांबडे.
देई मनास ओलावा....
  हिरवे पान ते सोनुले...

मन बहावा बहावा....

आहे ना सुंदर.!!
(कोणी केली त्याला सलाम)
 हि अजून एक कविता...

बहावा


बहाव्याने किती फुलावे,     
अंगोपांगी हळद लेवून.

सोनसकाळी ऊन कोवळे,
खुलले कांचन अजूनच थोडे.

फांदी फांदी झुकली खाली,
फुले हळदुल्या रंगात न्हाली.  

हिरव्या हिरव्या देठात नव्याने,
लहर अनावर धावत आली.     

मत्त सुखाची लाट चहूकडे.
रंगबावरे माझेही मन.

अंगोपांगी फुलता कोणी.
खुणावते मज वेडे होऊन.

असे खुलावे, असे फुलावे,
देहाचे अवघे भान हरावे.                              

रंध्रात उमटले फुलणे, झुलणे.
वेड तयाचे मला लागले.


 चैत्राची चाहुल बहाव्याच्या पिवळ्या फुलांच्या घोसांनीच लागते.
बहावा शिशिरात पानगळीमुळे शुष्क होतो. 
आपल्याकडे चैत्राला ग्रीष्माची जोड असते. 
एप्रिलमधे प्रत्येक फांदीला कळ्यांचे घोस धरतात. 
मग जो बहराला येतो
 तो पहिल्या पावसाच्या काही सरी अंगावर घेऊनच थांबतो.
 त्याच काळात त्याला पालवीही फुटते. 
ही फुले पिवळीधम्मक, पाच पाकळ्यांची असतात.
फुलांचे ओघळणारे घोस फांद्याफांद्यांवर दिवाळीतल्या कंदिलांप्रमाणे दिसतात. 
पुढे याला शेंगा धरतात. 
शेंग एखाद्या नळीप्रमाणे लांब असते.
 सुरूवातीला हिरवी असणारी शेंग हिवाळ्यापर्यंत पिकून काळपट होते. 
यात बिया व गोड गर असतो.  
हा गर माकडं, अस्वलं कोल्हे यांना फार आवडतो.

हा गर पोटासाठी गुणकारी आहे.

बियांचे चूर्ण मधुमेहावर उपयुक्त आहे.

या गराला एक सुगंध असतो. 
तो तंबाखू बनविण्यासाठी वापरतात. 

बहाव्याची साल व पाने कफनाशक असतात.

ही पाने त्वचाविकार व सर्पदंशावर वापरतात.
एका संशोधनानुसार बहावा हा कर्करोगावरही उपयुक्त आहे.

बहाव्याचं लाकूड

 टणक व टिकाऊ असुन घराचे खांब , शेतीची अवजारे यासाठी वापरतात.
याचे लाकूड उत्तम असते.

शेंगा औषधी असतात.

सोन्याच्या दागिन्यांनी भरलेले झाड.!!!
राजवृक्ष असेही म्हणतात
बिग बाजार जवळ एक आठ दिवसापूर्वी बघितला
आता आताच फुलतोय.
गीर जंगल गुजराथ येथे सुद्धा अधेमधे दोन तीन झाडे बघितली होती.

 बहावा फुलला की ६० दिवसांनी पाऊस पडतो. याला पावसाचा 

"नेचर इंडीकेटर" असेही म्हणतात,

या वर्षी हा लवकर फुलला आहे. 
आता साधारण २५ मे नंतर पाऊस पडेल. 
या झाडाला 

"शाॅवर आॅफ द फाॅरेस्ट" असेही म्हणतात. 

आणी या वृक्षाचा अंदाज अचुक असतो.

Saturday, 21 April 2018

श्वास...


आपले अगदी घट्ट नाते असते जन्मापासून ते मृत्यू पर्यंत..
श्वास घ्यायला शिकायला हवे ???
 कि शिकायला हवा प्राणायाम???
 असे काही असते???

खरतर जन्म घेतानाच हि क्रिया... येतच असते

लहान मुलं श्वास घेताना बघा... 
लागते का, शिकवायला???
काही दिल्याशिवाय काही मिळत नाही.
एक श्वास सोडला कि दुसरा श्वास मिळतो.

श्वास.. कधी अडकतो,
कधी रोखून धरला जातो, 
कधी मंद होतो, 
कधी दीर्घ घेतला जातो,
कधी कोंडतो, 
कधी धाप लागते... 
कधी भराभर घेतला जातो,
कधी थांबतो..( संपेलच सगळं)
घरघर लागते, आचके दिले जातात.. 
कधी एकमेकात गुंफतो
तर कधी सुटकेचा श्वास टाकला जातो.

जर शरीराला ऑक्सिजन कमी पडला तर...
★ धावल्यामुळे आपले श्वास जोरात होतात.
वेगाने आपण प्राणवायू घेतो आणि कार्बन डाय ऑक्साईड सोडतो...

हातपाय गळणे, 
पायात गोळे येणे, 
 डोके जड होणे, 
भीती वाटणे, 
जीव नकोसा होणे,
 एखादा आजार होणे,
 असे काहीसे होते.

श्वास... आपोआप घडणारी क्रिया... 

याकडे लक्ष दिले तर.... 

निदान वेळ असेल तेव्हा, किंवा खास वेळ काढून..!!

(झाला कि प्राणायाम)



सावकाश संथ लयीत पुरेसा श्वास घेतला आणि पूर्ण बाहेर सोडला तर...
म्हणूनच प्राणायाम शिकवा लागतो, प्रयत्नपूर्वक करावा लागतो.
दीर्घश्वसन:
चार अंक श्वास आत घेतला तर... 
आठ अंक सोडताना घ्यावेत..

दीर्घ श्वास... हा एक रामबाण प्राणायाम आहे.


यालाच साध्या भाषेत जरा डोकं शांत ठेव.
( राग आला, तणाव वाटला तर एक ते दहा अंक म्हण... अर्थात हे म्हणताना... आपण हळूहळू शांत होतो..)
अर्थात आपले श्वास संथ होऊ लागतात.
~~~~~~~~~~~~~~~

कपालभाती... पृथ्वीवरील संजीवनी

पण करण्यास वेळ द्यावा लागतो.
 धीर धरावा लागतो विश्वास असावा, श्रद्धेने करावे लागते.

करून बघते/ बघतो हे कामाचे नाही.


जसे गोळी घेतली कि आराम मिळतो तसे यात होत नसल्याने कोणी विश्वास ठेवत नाही.
घे गोळी वाटले बरे... 
असे हल्ली झटपट हवे असते.
सातत्य आवश्यक आहे.
ज्याचा हल्ली अभाव असतो.
करायचे स्वतःसाठी तरीही आळस असतो...
करू लागले कि पटकन बरे वाटावे असे असते.


एक ओळखीतल्या बाई
शुगर खूप 
इन्सुलिन घ्यावे लागत होते... 
तिने निश्चय केला कि कपालभाती करेन
नियमाने रोज एक तास स्वतःसाठी/ प्राणायामसाठी देऊ लागली... 
आणि एक वर्षात इन्सुलिन गोळी असे क्रमाक्रमाने कमी झाले...
 आलेगेले, बाहेरगावी गेले तरी तिने प्राणायाम करणे सोडले नाही...
 तिच्या माणसाना माहित होते हि ठरलेल्या वेळी प्राणायाम करते...

असा निश्चय हवा
~~~~~~~~~~~~


अनुलोम विलोम...

अनेक गोष्टी साध्य होतात
अर्थात यात सुद्धा आहे दीर्घ श्वसन...
~~~~~~~~~~~~~

जे आपल्याकडे कायम आहे ते गृहीत धरतो 

किंवा या श्वासाकडे लक्ष देत नाही...

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
काही घेतले कि ते भरते
जसे रिकामा डबा आहे त्यात काही भरले तर...
 तो डबा भरेल... तसेच

जसे श्वास घेतला तर.... तो पोटात घ्यावा...

यामुळे पोटातील अवयवांना व्यायाम मिळेल..
. ते मजबूत राहतील.
 श्वास पोटात घेतला तर पोट पुढे आले पाहिजे.. 

किंवा छातीत भरला तर.. छाती पुढे आली पाहिजे..

हो ना.!
यामध्ये बरगाड्यांना व्यायाम मिळेल आणि छातीचा पिंजरा मजबूत होईल.

*******************
म हेच तर लक्ष द्यायचे आहे.
आपण कसा श्वास घेतो?? याकडे...
एरवी कसाही घेतो आणि कसाही सोडतो.
********************


श्वासाबरोबर करूया घट्ट मैत्री.!!!!!

<><><><><><><><><>

सातत्याने करू प्राणायाम

स्वस्थ असू तेव्हा तरी देऊ श्वासाकडे लक्ष.!!

<><><><><><><><><>
जन्म मृत्यू यात एका श्वासाचे अंतर असते..
( श्वास सोडतो, तो पुन्हा घेतला जात नाही )

अस म्हणतात कि 

माणूस किती श्वास घेणार हे ठरलेले असते

 तेव्हढे घेऊन झाले कि जीवनयात्रा संपते...

*********************
पूर्वी ऋषीमुनी... प्राणायाम, ध्यान करताना
सावकाश श्वास घेत त्यामुळे त्यांचे आयुर्मान भरपूर असे...
*******************

योगा, प्राणायाम, करतो  का आपण???

कि यात देव आहे, अध्यात्म आहे
हे आम्ही वय मोठे झाले कि करू... आत्ता काय उपयोग म्हणून सोडून देतो?

कि फुकट आहे म्हणून काही किंमत नाही.!
वेळ नाही हे सुंदर वाक्य असतेच आपल्याला....

है ना

हे मी लिहिले, पण कधी काही ऐकले वाचले होते, अनुभव... जे माझ्या लक्षत आहे... ते आहे हे लिखाण.!!!

Thursday, 5 April 2018

प्लास्टिक बंदी

प्लास्टिक प्लास्टिक प्लास्टिक

अशी एक पोस्ट आली आणी विचारचक्र सुरु झाले...
( आलेला लेख खाली देईन )

कोलगेट दंतमंजन (पावडर)  पत्र्याच्या डब्यात मिळण्यापूर्वी राखुंडीने दात घासत होतो
कागदी वेष्टनात... गुलाबी गोडसर चवीची राखुंडी मिळत असे.
✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽
खाकी फेस पावडर खोक्यात मिळे.

गावाकडे तांबे पितळच्या घागरी कळशा वापरत
पण काही वर्षापासून प्लास्टिक कळशा बघितल्या तेव्हा मी आश्चर्यचकित झाले होते.
✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽
पूर्वी खाद्यपदार्थ घरीच करण्याची पद्धत होती.
त्यामुळे बाहेरून पदार्थ आणले जात नव्हते.
आता बाहेरून पदार्थ आणतो ते प्लास्टिक पिशवीतून देतात.

*******************

अगदी नारळ पाणी सुद्धा पार्सल म्हटले कि प्लास्टिक पिशवीतून देतात...

 त्याचे कसब फार छान असते

पाणी न सांडता तो शहाळे... 
पिशवीच्या तोंडाला लावून पाण्याचा थेंब वाया न घालवता ते ओततो 
आणि straw ने पिशवीचे तोंड बांधतो.
(जर मलई असेल तर वेगळी प्लास्टिक पिशवी, आणि या दोन पिशव्यांना मिळून एक मोठी प्लास्टिक पिशवी)

********************

इडली, डोसा, दहीवडे, पीठ घरी तयार केले जात होते.
आता दर पाच मिनिटांवर माटुंगा.. येथील स्पेशिल
पीठ मिळते... 
सोय म्हणून दे अर्धा किलो... 
असे म्हणून आपण प्लास्टिक पिशवितील बांधलेले पीठ घेतो...

::::::::::::::::::::::::::::::::::::

उपमा, पोहे, शिरा, खिचडी, 
इडली, चटणी, सांबार, पार्सल घेतले कि चम्मच नाही का असे विचारतो 
आणि प्लास्टिक चमचा सुद्धा घेऊन येतो
आणि प्लास्टिक पिशव्या उघडून ते, प्लास्टिक चमच्याने खातो...

✧✧✧✧✧✧✧✧

पूर्वी चहा कॉफी चांदीच्या कप बशीतुन दिली तर श्रीमंती कळायची पण...
 घरात उंची क्रोकरी शोकेस मध्ये दिसते 
आणि पाहुण्याच्या हाती 

use and throw कप...

 दिले जातात
अगदी थर्माकोल, प्लास्टिक किंवा कागदी.!

✧✧✧✧✧✧✧✧

पूर्वी काचेच्या बाटलीत टोमॅटो सॉस मिळत असे आता...

 रिफिल पॅक.!!


अशा अनेक गोष्टी रिफिल पॅक मध्ये उपलब्ध आहेत.

✧✧✧✧✧✧✧✧

तेल सुद्धा किटली मधून घाणीवरून आणत होतो.

चुकून एखादी वस्तू प्लास्टिक मधून आली तर.. 
ती जपून ठेवत होतो
जस कि मिठाई, 

पाणी तर ... आता आम्ही बिसलरी पितो

 म्हणून घरून पाणी नेत नाहीत.
मिनिटा मिनिटांवर बिसलरी बाटली हव्या त्या प्रमाणात मिळते.
तरी आपली तहान भागल्यावर
समजा थोडे पाणी त्यात उरले तर... 
पाण्यासकट ते फेकून देतो...
असो..

♤♤♤♤♤♤♤♤♤♤

जसे जिभेला जे चविष्ट लागते ते बेताने, कमी खावे म्हणतात 
तसे हे प्लास्टिकचे म्हणावे लागेल...
सुंदर रंगीबेरंगी, टिकाऊ
पण... त्याचे दुष्परिणाम???

तर काही वेळा 
use N throw..

अशा या प्लास्टिक पासून दूरच राहा असे होणार..

::::::::::::::::::::::::::::::::::::


 काजू ...गावाहून कागदाच्या पुडीतून भेट म्हणून येत
आता नं 1 काजू प्लास्टिक मध्ये बांधलेले विकत घेतो...
अशी प्रत्येक गोष्ट... 

प्लास्टिक नेच सुरु होते...

::::::::::::::::::::::::::::::::::::

अगदी भाजी आणायची आहे??? 
देईल पिशवी भाजीवाला
निरंजन लावतो पूजेच्या वेळी...
 त्यासाठी तुपात भिजवलेली फूलवात.. 
ती सुद्धा तयार मिळते ती वापरतो.. 
अगदी प्लास्टिकच्या डबीत.!
न भिजवलेल्या वाती सुद्धा प्लास्टिक पिशवीत मिळतात

(पूर्वी घरी वाती करून तुपात भिजवून वापरत)


ʕʔ ʕʔ ʕʔ ʕʔ ʕʔ ʕʔ ʕʔ

तसे पानपट्टी... 

सणासुदीला... पानपट्टी आणली तर... पानात बांधून देत असत.
आता आमच्याकडे प्लास्टिक पिशवीतून देतात.
पण एके ठिकाणी खास मघई पान छोट्या प्लास्टिक डबीतून देतात...
पूर्वी पानाचा डबा तोही पितळेचे चकचकीत घरोघरी असत... 
घरचे दारचे स्वतः हवे तसे बनवत... आणि खात..

ʕʔ ʕʔ ʕʔ ʕʔ ʕʔ ʕʔ ʕʔ


प्लास्टिक हेच जीवन झाले आहे...

 प्लास्टिक हा श्वास आहे असे झाले आहे..

प्लास्टिक नाही अशी कल्पनाच करता येत नाही.

❦❧❦❧❦❧❦❧❦❧

आंघोळीसाठी अगदी पूर्वी तांब्याचे घंघाळ होते..
म पितळेची बादली, अल्युमिनिअम ची बादली
पत्र्याची बादली... आता प्लास्टिक बादली...
❦❧❦❧❦❧❦❧❦❧
फुलझाडे, शोभेची झाडे लावायची आहेत????
अहो छान छान आकारात आणि वेगवेगळ्या साईज मध्ये, रंगात उपलब्ध आहेत कुंड्या.!!

--☉☉-----☉☉-----☉☉-----☉☉---

पूर्वी कसे काय लोक विना प्लास्टिक जगत होते असा प्रश्न पडतो..

♤♤♤♤♤♤♤♤♤♤


जसे टीव्ही नव्हता तर वेळ कसा जात होता??? 
मुले संध्याकाळी काय करत असा प्रश्न पडतो तसे....

प्लास्टिक नव्हते तर... असा प्रश्न पडू लागलाय

--☉☉-----☉☉-----☉☉-----☉☉---

 प्लास्टिक नाही
पण अजून एक...

सॅनिटरी नपकिन्स...

अगं असे रस्त्यात पडलेले बघितलेत..

गटार साफ करणारा 
गटारात जेव्हा उतरतो तेव्हा... असे नापकिन्स काढताना बघितलंय.!

सोय म्हणून बाळाला आणि मोठ्यांना...
आपण शी शु साठी पॅड्स वापरतो... त्यामुळे संडास तुंबतात.
आणि डस्ट बिन मध्ये टाकले तर.....

कचरा नेणाऱ्यांना घाण...

थोडा या सफाई कामगारांचा विचार करायला हवा
अर्थात यावर आलेला सिनेमा मी बघितला नाही.

केरसुणी... 

पूर्वी सगळे एकत्र सुतळी बांधून करत आता.... 
प्लास्टिक ने बांधतात

खराटा...

 माडाच्या झावळ्या पासून तयार करत... 
आता प्लास्टिक पासून वेगवेगळे झाडू बनतात....

सकाळी उठले कि हातात प्लास्टिक ब्रश... 
पूर्वी बोटाने किंवा बाभळीच्या काडीने दात घासत होतो...

अमृतांजन बाम, व्हिक्स... आयोडेक्स
 हे काचेच्या बाटलीत मिळत असे...

 आता सोय म्हणून प्लास्टिक बाटलीत मिळते....


*******************
एका मैत्रिणीला प्रश्न पडला...
आता सगळा भार
 कागदावर येणार!
 म्हणजे परत वृक्ष तोड आलीच
 परत पर्यावरण हानी होणारच.
यावर मी तिला म्हटलं
 प्लास्टिक राक्षस झालाय
*******************
आपल्याकडे पूर्वी एकच पेपर येत होता.
आता अनेक वर्तमानपत्र येतात... 
स्कीमच्या नावाखाली.... 
किती जण ती वाचतात
अनेकजण रद्दी म्हणून घेतात 
आणि विकून पैसा करतात....
खरतर आज आपल्या प्रत्येकाच्या हाती e पेपर आहे ना!
टीव्ही वर बातम्या बघतो ऐकतो ना!
म इतके वर्तमानपत्र हवीत कशाला

त्यासाठी किती वृक्षतोड होत असेल???

::::::::::::::::::::::::::::::::::::


हा तो आलेला लेख/ पोस्ट


बघता बघता प्लॅस्टिकबंदी लागू झाली की ....
प्लास्टिक म्हटलं की आपण फक्त कॅरी बॅग्ज एवढाच विचार करतो किनई पटकन. 

आणि आता या प्लॅस्टिकची आपल्याला इतकी सवय झालीये की त्या व्यतिरिक्त जगण्याची आपण कल्पनाच करू शकत नाही.

पण मग, आमच्या लहानपणी कुठे होतं हे प्लास्टिक? त्यानिमित्ताने जरा उजाळा देऊया हं आपण त्या दिवसांना 
तेवढंच नॉस्टॅल्जिक ....

सकाळी सकाळी दूध यायचं ते बाटल्यांमधून. दुधाच्या बाटल्यांचा एक स्पेशल स्टँड असायचा. रिकाम्या बाटल्या बाहेर ठेवायच्या त्यात. दूधवाला आला की तो रिकाम्या बाटल्या घेऊन जायचा आणि भरलेल्या ठेवायचा स्टँडमध्ये. तो आल्याची वर्दी त्याच्या पिशवीतल्या बाटल्यांची नाजूक किणकिण द्यायचीच. 
त्या बाटल्यांची ती चंदेरी झाकणं काढली की तोंडाशी जमलेलं चमचाभर क्रीम गट्ट करायला मजा यायची.

डबा भरताना ओलसर भाजी असेल तर मुद्दाम घट्ट झाकणाचा (स्टीलचाच) डबा असायचा. त्याच्या झाकणात एक कागदाचा चौकोन टाकायचा आणि मग डबा बंद करायचा. (जुन्या कॅलेंडरचे असे चौकोन करून ठेवलेले असायचे घरात.) 
मग एक मोठ्ठा रुमाल घ्यायचा. त्यावर तो डबा नीट रचायचा आणि मग त्या रूमालाची चारी बाजूंनी अगदी घट्ट गाठ बांधायची. एवढा बंदोबस्त केल्यावर काय बिशाद डब्यातून काही बाहेर येईल. आलंच तरी ते तो रुमाल टिपून घ्यायचा. जेवणानंतर हात आणि धुतलेला डबा पुसायलाही तो उपयोगी यायचा. येताना त्या डब्यातून हमखास अबोली किंवा मोगऱ्याचा गजरा आणि रुमालात भाजी बांधून यायची. 

त्यावेळेस अंडीसुद्धा कशी द्यायचे? तर एक कागदी पिशवी किंवा पुठ्ठ्याचा बॉक्स घ्यायचा. त्यात राख घालायची आणि त्यात अंडी खुपसून ठेवायची. एकही अंडं त्यामुळे कधी फुटायचं नाही आणि शिवाय ती राख भांडी घासायच्या कामाला यायची. 

भांडी घासतानासुद्धा ही राख आणि नारळाच्या शेंड्या, वीटकरीची पूड किंवा तुकडा असं वापरलं जायचं. उगीच साबण नको की फेस नको. अंगणात एखाद्या झाडाजवळ भांडी घासली की ते पाणी, ती राख आणि खरकटे वगैरे सगळं झाडाला अर्पण. उत्तम खत व्हायचं.

अंजीर, करवंद, जांभळं, द्राक्षे वगैरे पळसाच्या (की अजून कसल्या) मोठाल्या पानांच्या द्रोणात बांधून द्यायचे. बाकी भाज्या आणि सामानासाठी जवळ कापडी पिशव्या तर अगदी हमखास असायच्याच. 

किराणा माल बांधायला आधी रद्दीचे कागद आणि त्याचे पुडे होते. नंतर त्याच रद्दी कागदाच्या पिशव्या आल्या. पुडे बांधण्यापेक्षा सोप्या आणि कामही भरभर व्हायचं. गहू/तांदूळ/ रेशनची साखर वगैरेसाठी तर मोठी ताडपत्री पिशवी न्यायला लागायची.

चक्का, गुलाबजाम वगैरे मिठाई आणायला आम्ही मुद्दाम घरून डबा न्यायचो. 

पावसाळ्यात झाप, आच्छादन ताडपत्रीचं असायचं. रेनकोट रबराचे असायचे बहुतेक. पावसाळी चपलाही रबरीच असायच्या. कधी चामडी वस्तूंचाही वॉटरप्रूफ म्हणून उपयोग व्हायचा.

स्वैपाकघरात तर फक्त धातूचं साम्राज्य असायचं. प्लॅस्टिकला तिथे जराही वाव नव्हता. 

प्रवासात प्यायचं पाणी नेण्यासाठी फिरकीचे तांबे असायचे. 

अगदी भातुकली किंवा खेळणीसुद्धा स्टील, पितळी किंवा लाकडी असायची. 

केसांना रिबिनी, अंबाड्यांना पिना आणि आकडे, कानातले-गळ्यातले-बांगड्या वगैरे सगळं सगळं प्लास्टिक विरहीत.

अजून कुणाला आठवतंय का काही?
खरंच, ठरवलं तर सोप्पय नाही का प्लॅस्टिकवाचून जगणं ....

आज कुठेही शहराबाहेर किंवा रेल्वे रुळाच्या कडेला जाण्याचा योग आला की तिथल्या प्लास्टिकच्या चिंध्या, कचरा, थर्मोकोल sheets/प्लेट्स, पाण्याच्या बाटल्या वगैरे अस्ताव्यस्त मोठमोठे ढीग, त्यामुळे साचलेलं पाणी, त्यावर घोंगावणारे डास आणि माशा आणि त्यामुळे एकूणच परिसराचे बकाल दृष्य पाहून माणूस म्हणून स्वतःचीच लाज वाटते.

आपण दिवसभरात किती प्लास्टिकचा कचरा तयार करतो याला काही हिशेबच नाही. खरंतर सरकारने ही बंदी आणण्याआधी आपणच आपणहून ही बंदी स्वीकारायला हवी नाहीतर पुढच्या पिढ्यांच्या नशिबी आपणच नरक लिहून ठेवला असं होईल.

आजकाल भांडी घासायला बाई मिळत नाही म्हणून बहुतांश पार्टीमध्ये Disposable म्हणून थर्मोकोल किंवा प्लास्टिकचे कप किंवा प्लेट वापरल्या जातात.

परवा आपल्या Snehal Malegaonkar च्या दुकानात (पुण्यात, राजाराम पुलाजवळ) खूप छान पर्याय पहिला. तिच्याकडे केळीच्या सोपटाच्या प्लेट वगैरे उपलब्ध आहेत. ते पाण्यात टाकून ठेवल्यावर तासा-दोन तासात पूर्ण विरघळून त्याचा लगदा तयार होतो आणि तो मातीत मिसळून जातो.

असे काही सोपे पर्यावरण स्नेही पर्याय शोधून काढायला हवेत.

- स्वाती जोशी.


Wednesday, 4 April 2018

उन्हाळी फुले


निसर्ग फुलाची उधळण करतोय 

लॅबर्नम ..... अगदी सोने मणी मणी 

याची उधळण होत आहे 

गडद हिरवी पाने आणि पिवळी धम्मक फुले तुऱ्यातुऱ्याने येतात 

नाजूक फुले वाऱ्याच्या झुळकीबरोबर 

अलगद खाली येतात जमिनीवर पिवळा गालिचा अंथरला आहे असे वाटते. 

ग्रॅन्टरोड येथे या नावाचा रस्ताच आहे. प्रवासात दिसतात ती हीच फुले. 

हि फुले ना कोणत्या देवाच्या पायाशी, ना कोणत्या फ्लॉवर पॉट मध्ये 

नाही याचे गाजरे करत, ना डोक्यात माळत नाही त्याला वास 

रस्त्याची शोभा वाढवतात, सावली देतात हे वृक्ष 

 आणि नेत्रसुख देतात 

 

हा अगदी आमच्या गेट वर 

अहो डाळिंब फुले आणि अगदी छोटी डाळिंबे 

शंकासुर लाल आणि पिवळी दोन्ही रंगात
शोभेची फुले रंगीत पाने वाटतील अगदी 

तीन रंगात 



रुई
अजून एक बहरलेले झाड आणि 

 

ओळीने चारपाच रंग म्हणाल तर हलका पोपटी 

त्यातील मध खाताना एक छोटा पक्षी 

 

बिट्टीची असतात तशीच फुले पण थोडी नाजूक 

कोणी याना टिटू म्हणतात 

आंब्याचा मोहोर 

पिवळी बोगन वेल 

Sunday, 1 April 2018

यावर्षीचा संकल्प...


  गीता लिहिणे

संपूर्ण गीता बघून लिहिणे...
या प्रमाणे १ जानेवारी २०१८ या दिवशी लिहिण्यास सुरुवात केली
त्याप्रमाणे मार्च मध्ये गीता लिहून झाली..
हनुमान जयंती ३१ मार्च यादिवशी लिहून पूर्ण झाली.
पण गीतेची तर खूप पुस्तके आहेत.
*******************

○ आम्हाला सरांनी दिलेले मूळ मोठा टाईप पुस्तक

22 नंबर चे पुस्तक.!


○ दुसरे पुस्तक आहे ते 
*भगवद गीता*
*जशी आहे तशी*
कृष्णकृपामूर्ती
स्वामी प्रभूपाद यांचे 
भाषांतर आणि विस्तृत तात्पर्यासहित.!

○ जे घरोघरी असते... छोटे. पॉकेट म्हणावे असे
यात श्लोकाचा मराठी अर्थ आहे.

○ अजून एक पुस्तक. 
जे पद्म पुरणान्तर्गत
 प्रत्येक अध्यायाच्या माहात्म्य सहित
 15 नंबर
मोठया अक्षरात...
 मराठी श्लोकांचा अर्थ... 
(मराठी – टिकासहित)

○ आणि सगळ्यात महत्वाचे
मोबाईलमध्ये असलेली भगवदगीता.... 
(PDF फाइल आहे..)
जी अतिशय उपयोगी

जी ऑफलाईन वाचता येते.

म्हणजे कोठेही जा
गीता आपल्या हातात, 
 आणि केव्हाही वाचू शकतो.!

तर अशी अनेक पुस्तके असताना

 मी गीता लिहिली आणि त्यात काय अजून आहे???

तर...
 त्यात गीता शिकताना नियम सांगितले गेले
 उच्चार कसा करायचा ते सांगितले ते लिहिण्याचा प्रयत्न केलाय
अजूनही काही लिहीन...

आता गीता पाठ तर झाली 

पण काही वेळा एका पुस्तकाची सवय होते,

 कदाचित ओळीवरून नजर फिरते

असे होऊ नये म्हणून रोज गीता वाचताना वेगवेगळ्या पुस्तकातून वाचते

आता सरांनी दिलेल्या पुस्तकावर खुणा आहेत
बाकीच्या पुस्तकात नाहीत
म पाठ असल्यामुळे सहज वाचता येते.

<><><><><><><><><><><><><>