मोरपिसे मनातील हि पोस्ट वाचत असताना
मला माझी आई दिसू लागली
अलीकडे असच होत
कोणतीही गोष्ट करताना
मेसेज वाचताना आईच दिसते...
सुंदर, शांत, हसतमुख...
सौज्वळ...
• कामावे तो सामावे
• मी हात धरून काहीच शिकवणार नाही... बघून शिक म्हणणारी....
• पण माझ्याघरी आली कि पडेल ते काम करणारी
सतत कामात राहणारी आई...
• काम नसेल तर निवड टिपण करणारी,
लादी घासून पुसून चकचकीत करणारी
• कधीही रडगाणं न गाणारी...
• माझ्या मैत्रिणीत सामावणारी...
ओह... किती लिहिलं
विषयाला सोडून
2
संध्याकाळी आमच्या घरचे वातावरण खूपच छान असे....
शांत, स्वच्छ...
अगं वडील एस टी मध्ये
बदलीच्या गावी असत.
म आम्ही तिघे, आमचे मित्रमंडळ...
रूम एकच..
तरी 8,9 जण असायचो
परवाचा म्हणायला
3
दिवेलागण...
संध्याकाळ झाली कि आईची सर्व कामे झालेली असत
म देवदिवा लावण्यापूर्वी आई...
शुभम करोति म्हणा
मुलांनो शुभम करोति म्हणा...
हे गाणे म्हणत असे
आणि
एकीकडे उदबत्ती निरंजन लावत असे
तोपर्यंत आमचे मित्रमंडळ जमा होई.
हे सगळे माझ्या आईला
शांताबाई, किंवा रेखाच्या आई म्हणत
आम्ही कलावती आई यांची बालोपासना म्हणत असू.
आईने त्याला स्वतःची चाल लावली होती.
तिच्या बरोबर म्हणत असू
(कलावती आई यांना मी प्रत्यक्ष बघितले आहे)
अजूनही मी म्हणते...
म पाढे म्हणत होतो
बहुतेक मित्रमंडळ
त्यांच्याकडे अशी परवाचा
म्हणायची पद्धत नव्हती..
आपण देवापुढे दिवा, किंवा देवदिवा लावला,
निरांजन लावले, ज्योती उजळवल्या...
असे म्हणतो
त्यांच्याकडे बत्ती लावली असे म्हणत..
पण सगळे जसे खेळायला जमत तसे शुभम करोति म्हणायला जमत होतो...
अजूनही ते आईची आणि दिवे लागणीच्या वेळेची आठवण काढतात....
आणि तरीही माझी आई अजिबात देव देव करणारी नव्हती...
पण आलेले सण
तिन्हीसांजा.... अगदी आनंदाने करत असे...
कोणालाही कसलीही जबरदस्ती न करता...
असो
पुढे इकडे आल्यावर मी देखील...
आई सारखेच करत आहे..
तिच्याच चालीत बालोपासना म्हणते.
पण कधी सप्ताहाला गेले नाही
मुलांनी म्हटलेच पाहिजे असा आग्रह धरला नाही.
मला वाटते कि म्हण, कर असे म्हटले तर
मुले बंडखोरी करतात आणि त्याविरुद्ध वागतात.
मुलांना येत नाही
( बालोपासना)
माहित पण नाही
पण पाढे इतर श्लोक म्हणत असत.
ते मात्र छान शिकले.
आई हे सगळे म्हणताना...
आमटी भात, एखादी कोशिंबीर
किंवा तळण तळत असे...
म्हणजे लवकर जेवणे होत.
म अभ्यास करायला वेळ मिळे.
माझा अभ्यास 4 थी पर्यंत आणि छोट्या भावाचा अभ्यास 7वी पर्यंत घेतला...
आम्ही कधी क्लासला गेलो नाही
पण छोट्या भावाला मात्र आठवीत क्लास लावला होता...
मोरपिसे मनातील याचा हा काही भाग
( ज्यामुळे मलामाझ्या आठवणीत नेले )
देवापुढे दिवा लावायला उठले. आणि नेहमी प्रमाणे समई च्या प्रकाशात आई चा चेहरा देवीच्या जागी दिसला.
रोज संध्याकाळी देवा पुढे दिवा लावून माझी वाट पहात बसायची .
नेहमी म्हणायची माझे हे वाट पाहणे कधी संपणार काय माहीत.
No comments:
Post a Comment