प्रार्थनेच्या दोन वेळा महत्वाच्या
दोन प्रहर प्रार्थनेसाठी फार महत्वपूर्ण आहेत.
★ पहिला प्रहर सकाळचा,
जेव्हा रात्र सरलेली असते.
परंतु दिवस मात्र अजून उगवलेला नसतो.
तर
★★दुसरा प्रहर संध्याकाळचा
जेव्हा दिवस मावळलेला असतो
अन रात्र मात्र नुकतीच सुरु झालेली असते.
हे दोन क्षण प्रार्थनेसाठी
सर्वाधिक महत्त्वपूर्ण आहेत.
कारण या दोन समयी आपण
पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून सर्वाधिक मुक्त असतो.
या वेळी आपण आपल्या सर्वाधिक निकट असतो.
आणि परमेश्वर आपल्या निकट असतो.
आपण थोडासा हात पुढे करायचा अवकाश,
कि तो आपल्या हाती लागू शकतो.
म्हणून आपण या वेळी प्रार्थना करतो.
हे संकलन आहे...
****************************** *
आता मला जे सुचलं, वाचलं, ऐकलं ते लिहित आहे
****************************** *
प्रत्येकाची प्रार्थना वेगळी असते...
स्वतःचे शब्द असतात
त्यामध्ये श्रद्धा असते.!
प्रत्येक क्षणी प्रार्थनेचे शब्द वेगळे असतात
जसे
सकाळी... कराग्रे वसते लक्ष्मी...
आंघोळीच्या वेळी.. गंगे च यमुने चैव
गणपती स्तोत्र
कुलदेवता स्तोत्र
या कुन्देन्दु तुषार हार धवला
कुणी सतत नामसमरण करतात
संध्याकाळी शुभम करोति
रामरक्षा, मारुती स्तोत्र
रात्री कालभैरव स्मरण.
पड पड कुडी धारणीवरी..
काही देवाकडे मागत असतात.
काही देवाबरोबर भांडतात...
असे माझेच का??
माझ्या नशिबी हे भोग का???
काही नुसतेच नतमस्तक होतात,
आणि म्हणतात...
देवा तुला माहित आहे
माझ्यासाठी काय योग्य काय अयोग्य...!!!
जे काही माझ्याजवळ आहे ते तू दिलेले आहे.
तू दिलेल्या घरात आम्ही राहतो...
अगदी लहान असताना...
बोबड्या बोलात...
बाप्पा मला चांगली बुद्धी दे...
असे म्हणतो
मोठे झाल्यावर मात्र...
काही मनासारखे झाले नाही तर....
देवाला दोष देतो...
घरातून, मनातून देवाला बाहेर काढतो.
पण.... स्वतः मध्ये डोकावत नाही...
आज घरातील देवासमोर का उभे राहिलो नाही.?
याचा विचार करत नाही.
असे कोणते कर्म केले कि...
आज देवळात गेलो नाही?
घरातील देवासमोर उभे राहता आले नाही???
याचा विचार करत नाही..
घरातून बाहेर पडताना देवाला नमस्कार करत नाही,
फक्त..
परीक्षेच्या वेळी,
शुभ कार्य असताना
संकटात असताना देवाची आठवण होते..
मात्र यश मिळाले कि फक्त "मी" असतो
'मी' कष्ट केले
'मी' मेहनत घेतली
'मी' पैसे खर्च केले
'मी' रक्ताचं पाणी केलं,
पण कर्ता करविता परमेश्वर आहे हे त्यावेळी विसरतो....
आनंदाचे दिवस पटकन संपतात...
असे वाटते..
आपण सर्व या जगन्नियनत्याच्या हाती सोपवून निश्चिंत राहावे,
आपल्यावर
जी जबाबदारी सोपवली आहे ती करावी,
फळाची अपेक्षा न धरता,
नेहमी खरे बोलावे,
कोणाचे मन दुखावणार नाही याची काळजी घ्यावी,
दुसऱ्याच्या सुखात सहभागी होता नाही आले तरी एकवेळ चालेल
पण.. दुःखात मात्र आवर्जून जावे
व पाठीवर आश्वासक हात ठेवावा...
मी तुझ्याबरोबर आहे याची खात्री द्यावी.
दुःख पर्वता एवढे
सुख जवा एवढे ...
असे वाटते.
* रात्रीनंतर दिवस उजाडतो..
* नाण्याला दोन बाजू असतात....
* नेहमी चांगला विचार करावा..
* खरे बोलले कि आपण काय बोललो हे लक्षात ठेवावे लागत नाही.
असो..
****************************** **
No comments:
Post a Comment