Tuesday, 13 March 2018

भगवद् गीता...




कोणीतरी विचारले... 

झाली का गीता पाठ???

 आणि माझ्याकडून सहज लिहिले गेले.
नोव्हेंबर 2017 मध्ये गीता पूर्ण पाठ झाली.
१६ फेब्रुवारी २०१६ या दिवसापासून गीता संथा वर्ग सुरु झाला 
आणि मे २०१७ मध्ये गीता  संथा देऊन झाली..

आता मी एक नवी छान वही घेऊन त्यात अध्याय लिहित आहे...

 ( नवीन वर्षाचा संकल्प )


या वहीत अध्याय व्यतिरिक्त अजूनही गीतेसंबंधीत लिहीन.!

बघू कसे काय सुचते..
सावकाश सावकाश लिहीन.
○ उच्चार कसे करावेत?
○ अनुस्वार उच्चार
○ विसर्ग उच्चार
*श्लोकांच्या मध्ये आला
* अकार, आकार इकार एकार ऐकार यानंतर येतो तेव्हा...
○ आघात केव्हा देतात
○ अवखंड चिन्ह


एकूण ७०० श्लोक आणि १८ अध्याय आहेत...


१८ वा अध्याय हा सर्वात मोठा म्हणजे ७८ श्लोकांचा आहे
आणि सर्वात लहान १२ व १५ वा अध्याय... २० श्लोक आहेत.

बहुतेक रोज २५० /३०० 
श्लोक म्हणते,

प्रत्येक एकादशीला संपूर्ण गीता म्हणते...

म्हणजे महिन्यातून दोन वेळा....

आता ज्या श्लोकाला अडखळते तो पुन्हा पुन्हा म्हणते... 
म्हणजे उत्तम पाठ होईल.

काहीवेळा पूर्ण अध्यायाचा अर्थ वाचते...
म्हणजे काय म्हणतो त्याचा अर्थ कळेल

मोबाईल मध्ये एक अध्याय तीन वेळा म्हटला आहे
 म्हणजे काम करत असताना ऐकता येते.
 श्लोक बरोबर म्हणता येतो. 

बाहेर जाताना अध्याय म्हणते.

पूर्वी श्लोक पाठ करताना       
  तो पाठ झाला कि पाच वेळा लिहित असे.

संथा वर्ग सुरु असताना

 सर जे काही सांगतील ते ब्लॉग वर लिहिले आहे.


पहिल्यांदाच
 गीता १८ वा अध्याय ४० श्लोक म्हणण्याची स्पर्धा झाली. 
आणि मला तिसरे पारितोषिक मिळाले
 तेव्हा मला खूप आनंद झाला.
पण यासाठी दोनतीन जणांनी छान सांगितले होते, 
त्याचा उपयोग झाला
त्यामुळे धीटपणे माईक समोर उभे राहून म्हणू शकले.

गीता पाठ करत असताना
एक मैत्रीण म्हणाली... 
कसे पाठ करू हे कोणाला विचारू नको
आपली एक स्वतःची पद्धत असते..
खरंच माझ्या पद्धतीने पाठ करत गेले.

मी सुरुवातीपासून...
सरांनी संथा दिली पाच श्लोकांची कि
 घरी आले कि ते श्लोक मी लगेच लिहित असे
त्यातील काही शब्द अनेक वेळा म्हणून तोंडी बसवत असे...
 म तो श्लोक पाठ करत असे..
सकाळी उठले कि एक श्लोक ...
 प्रथम पहिले आठ अक्षरे सात वेळा
 नंतरची आठ अक्षरे सात वेळा 
म पूर्ण ओळ पाच वेळा 
त्यानंतर दुसरी ओळ याच प्रमाणे...
आणि पूर्ण श्लोक तीन वेळा म्हणत असे..
. म वॉकला जाताना तो श्लोक सतत म्हणत असे, 
म दिवसभर तोच श्लोक वेळ असेल तेव्हा म्हणत असे...

असे करत करत मी गीता पाठ केली

आता सराव करताना मधेच कधीतरी कोणताही एक अध्याय घेते, 
प्रत्येक श्लोक सात वेळा म्हणते असा सर्व अध्याय म्हणते..
म सर्व अध्याय चा अर्थ वाचते...


एक मैत्रीण म्हणाली
सर संथा देऊ लागले कि तो अध्याय रोज म्हण...
 पण जेव्हा स्वतः खुणा करू लागल्यावर म्हणता येऊ लागले, 
तो पर्यंत संथा दिल्यावरच संथा दिलेले श्लोक म्हणत असे...
तसे केले आणि मला चांगला अनुभव आला.
 ते शब्द तोंडी बसू लागले

अजून एक म्हणाले...
 एक श्लोक शंभर वेळा म्हणा म्हणजे तो श्लोक नक्की पाठ होईल
याचा फायदा पण छान झाला.

नंतर नंतर वर्गात, 
संथा दिलेले श्लोक वाचत असू 
त्यामुळे कुठे कसे चुकते ते कळत असे...
यामुळे थोडी धिटाई आली

आताच फेब्रुवारी मध्ये 
आमच्या सरांना भेटून गीता पूर्ण पाठ झाली 
असे सांगितले तेव्हा शृंगेरीला जाण्याचे नक्की झाले.
.. बहुतेक नोव्हेंबर मध्ये जाणार, 
वाडीतून अजून दोघीजणी आहेत...

त्यासाठी गीता मुखोद्गत  करावी लागेल,
कोणताही श्लोक म्हणायला सांगतील तो यायला हवा...
असा सराव करावा लागेल.
२०१७ च्या (एप्रिल शेवट शेवट)
अक्षय तृतीया पासून बहुतेक रोज तोंडपाठ श्लोक घेतात हे.!!



अजून चांगली धिटाई यायला हवी.

गीता पाठांतर करत असताना.. 
जेव्हा जाग येईल तेव्हा पाठ करायला घेत असे.
 अडीच साडेतीन वाजता सुध्दा जाग येत असे...
जाग येई ती कोणता तरी श्लोक मी म्हणते असे झाले होते..
********************************
वर्ग सुरु झाला तेव्हा बऱ्याच जणांना वाटत होते कि मी नक्की पाठ करेन... 
हा त्यांचा विश्वास 
आणि सगळ्यांच्या सदिच्छा...
 देवाची कृपा,
  थोरामोठ्यांचे आशीर्वाद..., 
 रोजच नेमाने माझे श्लोक न कंटाळता घेणारे हे,
अनेकांचे मार्गदर्शन..
यामुळेच हे शक्य होत आहे....

********************************


सध्या गीतेमधील काही श्लोक .... 

जे काही ठिकाणी शब्द समान आहेत...
 असे श्लोक लिहित आहे
त्यामुळे या अध्यायातील श्लोक 
दुसऱ्या अध्यायात म्हटला जातो...

असे बरेच श्लोक म्हणताना.... होते
आता ते श्लोक पण अनेकवेळा म्हणते...

सहाव्या अध्यायात आहे 
प्रशांतात्मा....
आणि त्याच्या नंतरचा श्लोक....
तिसरा अध्याय आणि चौथा अध्याय
यातील
दुसरा अध्याय....

असे बरेच श्लोक आहेत..


No comments:

Post a Comment