माध्यमातून आला आणि मन मागे गेले.
गण गण गणात बोते
हे भजन सद्गुरुते....
जानेवारी २०१६ मधली गोष्ट.!!
एकाच दिवशी दोन स्नेही वेगवेगळ्या वेळी आले होते,
सहज बोलता बोलता त्यांनी असे म्हटले..
कि तू गजानन विजय हा ग्रंथ रोज संपूर्ण म्हणजे २१ अध्याय का वाचत नाहीस???
२१ दिवस वाच.!
मला हा एक संकेत वाटला.. महाराजच
तर हि सेवा माझ्याकडून करून घेत असतील
असे वाटले.
पहाटे जाग आली कि सर्व आटपून पोथी वाचत असे...
(अर्थात यासाठी घरच्यांचे साहाय्य, पाठिंबा होता)
जाग येई ती कुठल्यातरी अध्यायातील ओळी वाचत असे..
माझ्या सासूबाई रोज नेमाने एक अध्याय वाचत असत.
महाराजांनी त्याना पहाटे दर्शन दिले होते...
(प्रत्यक्ष) पण त्यावेळी त्या ते ओळखू शकल्या नाहीत.!
नंतर सकाळी त्यांच्या लक्षात आले.
या पूर्वी मी काही दिवस १५ वा अध्याय रोज वाचत असे..
★ २१ दिवस रोज एक अध्याय असे वाचन केले होते.
★★ ७ दिवसात संपूर्ण पोथी असे वाचन केले होते.
★★★३ दिवस पोथी संपूर्ण असे वाचले होते..
इतके दिवस मी सासूबाईंची पोथी वाचत असे...
अचानक योगायोगाने शेगाव येथे जाण्याचा योग बरेच वर्षानंतर आला..
आणि ज्यांच्या बरोबर गेलो
त्यांनी गजानन विजय हि पोथी भेट स्वरूपात दिली
आता माझी नवी कोरी पोथी आहे.. तीच मी २१ दिवस २१ अध्याय रोज अशी वाचली...
माहीम येथील मठ, आणि झावबा राम मंदिर येथे कधीतरी महाराजांच्या दर्शनासाठी जाते...
★★★★गुरुपुष्यामृत योग साधून शेवटचे तीन अध्याय
दशमी एकादशी द्वादशी असे अध्याय वाचले होते.
★★★★★ गुरुपुष्यामृत या दिवशी संपूर्ण पोथी असे हि वाचले आहे.
कोणी म्हणत मी साडेतीन तासात पूर्ण पोथी वाचते.
कोणी म्हणे मला पाच तास लागतात.
मला मात्र साताठ तास लागतात.
खरतर यास पारायण असे म्हणतात
पण... पारायण असे न म्हणता वाचन असे म्हणते...
कारण पारायणाचे काही नियम असतील ते मला माहित नाहीत...
~~~~~~~~~~~~
त्यावेळी
मला सातवा अध्याय वाचतांना खुपच वाईट वाटत असे..
महाराजांशी लोक असे वाईट का वागत...
पण.... त्यातच एक छान वाक्य आहे....
म थोडं बरं वाटे.
सगळे पाटील खरंतर भक्त झाले नंतर...
तसंच भास्कर सुद्धा.. पाणी देत नाही आणि वाटेल तसं बोलतो...
त्यावेळी
मला सकाळी जाग येई तीच मुळी घडघडा पोथी वाचते अशी.....
म्हणतात ना.... जे आपण करतो तेच आपण होऊन जावं
तसं झालं होत
माझं.....
<><><><><><><><><>
त्यावेळीच गीता वर्ग सुरु होणार असे कळले
आणि
एक गीता म्हणायला शिकण्यासाठी द्वार खुले झाले.!
◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇
फक्त आशीर्वाद मिळवण्यासाठी आपण प्रार्थना करणे आवश्यक आहे.
कारण ......
आपल्यासाठी चांगले काय आहे, हे ईश्वराला माहीत आहे.
------------------------------
खरंच महाराजांची लीला अगाध आहे
जशी श्रद्धा तसे फळ...
मला वाटते
कोणतीही गोष्ट आपण करून बघू म्हणून करू नये.
मला एकदा प्रश्न विचारला
तुम्हाला महाराजांचा काय अनुभव आहे....
मी म्हटले मी परिक्षा घेणारी कोण???
जे आहे ते सगळे महाराजांच्या कृपेने आहे
मी मठात गेले तरी फक्त दोन हात तिसरे नतमस्तक
काही मागण्याचे लक्षात सुद्धा येत नाही.
कुणी म्हणते देवाकडे मागावे
कुणी म्हणते.. देवाशी भांडावे....
मला मात्र असे काहीच करावे वाटत नाही
✺✺✺✺✺✺✺✺✺✺✺✺✺✺✺
महाराजांच्या विषयी...
काही कोणी लिहिलेले...
गण गण गणात बोते
हे भजन प्रिय सद्गुरुते
या श्रेष्ठ गजानन गुरू ते
तुम्ही आठवीत राहा या ते
हे स्तोत्र नसे अमृत ते
मंत्राची योग्यता ह्याते
हे संजीवनी आहे नुसते
व्यवहारिक अर्थ न ह्याते
मंत्राची योग्यता कळते
जो खराच मांत्रिक त्याते
या पाठे.दुःख ते हरते
पाठका अती सुख होते
या खचित अनुग्रह केला
श्री गजानने तुम्हाला
घ्या साधूनी अवघे याला
मनी धरूनि भाव भक्तीला
कल्याण निरंतर होई
दुःख ते मुळी न च राही
असल्यास रोग तो जाई
वासना सर्व पुरतील ही
आहे याचा अनुभव आला
म्हणून या कथित तुम्हाला
तुम्ही बसून क्षेत्र शेगावी
स्तोत्राची प्रचिती पहावी
हि दंतकथा ना लवही
ह्या गजाननाची ग्वाही
ही दंतकथा ना लवही
ह्या गजाननाची ग्वाही
✺✺✺✺✺✺✺✺✺✺✺✺✺✺✺
*माझे शेगांव*
काय आहे माझे शेगांव
तुम्हासी नाहीं ठावे
ज्यानी जावे तेथे
गजानन नाम घ्यावे
समाधि दर्शन ज्याने घ्यावे
त्याने समाधान पावे
भजनी बसता त्याने
आनंद डोही न्हावे
महाप्रसाद जो चाखे
तृप्त त्याने व्हावे
शेगांव सोडता त्याच्या
डोळा पाणी यावे
भक्त म्हणे ये स्थळी
जावे तुम्ही एक तरी वेळी
तेंव्हा गोष्ट कळेल तुम्हा खरी ....
जय गजानन
✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽
महाराज म्हणत
गण गण गणात बोते...
याचा छान अर्थ आला होता...
∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞
गण गणात बोते.!!
पहिला गण म्हणजे जीव किंवा जीवात्मा
दुसरा गण म्हणजे शिव
आणि गणात म्हणजे स्वतः किंवा हृदयात
बोते म्हणजे ...
पहा किंवा बघा.!
स्वतःच्या हृदयात शिवाला बघा....
असा आपण लावलेला अर्थ...
No comments:
Post a Comment