Sunday, 11 June 2017

प्रवाशांच्या सेवेसाठी सदैव तत्पर

वाह.!!!

मस्त dp.....

 St मध्ये झालेले कालानुरूप बदल.....

माझ्या आजोबांची स्वतःची  ट्रान्स्पोर्ट सेवा होती...
जसे महाराष्ट्र स्टेट ट्रान्स्पोर्ट सुरु झाले तसे त्यांनी आपल्या गाड्या त्या सेवेला दिल्या...
पण त्यांची दोन मुले मात्र त्या सेवेत रुजू झाली.
मोठ्या  काकांनी सेवा पूर्ण केली.. त्यांची तिन्ही मुले याच सेवेत रुजू झाली..... 
आपले अण्णा.... हे या सेवेत असताना... लहान वयात आपल्याला सोडून गेले....
आता माझा लहान भाऊ.. या सेवेत आहे. आणि सगळ्यात जास्त सेवा देणारा आमचा भाऊ आहे...

मी नेहमी असे म्हणते... आम्ही एस. टी. च्या पैशावर लहानाचे मोठे झालो...

मला मात्र कोणी  "लाल डबा" असे म्हटले तर आवडत नाही.....

पण वाद घालता येत नाही.
असो...
आज माझा भाऊ या सेवेत आहे.... आणि आज माझ्या दोन्ही भावांकडे स्वतःची गाडी आहे...
खऱ्या अर्थाने पटवर्धन गाडीवाले.... आणि आज माझा भाचा उत्तम गाडी चालवतो.... उद्या भाची  पण छान गाडी चालवेल.!
~~~~~~~~~~~~

     तुझे वडील काय करतात असा प्रश्न आला आणि जर एस टी त आहेत असे सांगितले तर...
कंडक्टर कि ड्रायव्हर?? असे विचारत.... 
ट्रान्स्पोर्ट म्हणजे हे दोनच जॉब असा समज... असावा... पण इतरही भरपूर कामे, पोस्ट असतात हे पटकन लक्षात येत नाही.

पण माझे वडील ऑफिस मध्ये क्लार्क होते...

निरनिराळ्या ठिकाणी बदल्या होत असत..
माझ्या आठवणी प्रमाणे..
पालघर, महाड, पेण, पनवेल, कुर्ला आणि शेवटी मुंबई सेंट्रल या ठिकाणी ऑफिस होते.
पूर्वी लोक मे महिना होळी सण, गणपती उत्सव यावेळी तिकीट काढून द्या म्हणत... आणि अण्णा आनंदाने तिकीट काढून देत असत...
या सेवेत असताना निरनिराळे अनुभव येत.
गावाला गेलो असताना... 

● कनेक्टेड एस टी निघून गेली कि खूप वेळ बसावे लागे... 

वडील म्हणत कि अशी सेवा लोकांना दिली तर कसे लोक एस टी कडे येतील???


● येणारे प्रवासी "देव" आहेत त्यांना उत्तम सेवा दिली पाहिजे. 

     या सेवेचे आपल्याला पैसे मिळतात.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~
वडिलांना पास मिळत असे.

★ पहिली पाच आसने राखीव असत पण..

जर कोणी प्रवासी आला तर 
वडील स्वतःचे आसन रिकामे करून देत व स्वतः उभे राहत.

★ ऑफिस मध्ये कोणी एकटा घरापासून दूर राहणारा कोणी असेल तर लागेल ती मदत ते करत.

★ कधी कधी एस टी बंद होणार.... 

☆कधी खासगी सेवा... 

☆कधी लोक जास्त पैसे देऊन खासगी वाहन करून जातात ... 

पैसे जास्त गेले तरी चालतील पण आरामदायी सेवा हवी म्हणून लोक येथे आकृष्ट होतात

 पण अगदी खेडोपाडी हि आवश्यक सेवा आहे...
"रस्ता तेथे एस टी हे ब्रीद वाक्य आहे"..
 आणि त्याप्रमाणे खरोखरच ही सेवा खेडोपाडी आहे.. 
लाल धुरळा उडवत... गाडी येते.. 
सगळी गाडी लाल मातीने भरलेली असते.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~

रातराणी, परिवर्तनीय बस, शिवनेरी, हिरकणी... 

उत्तम आसने, चांगले एस टी डेपो.... 

असे हळू हळू बदल होत गेले आता तर 

टी व्ही वर जाहिरात... 

असे हि असेल कि नवी सेवा सुरु झाली म्हणून हि टी व्ही वर जाहिरात.


काळ बदलतोय आपण नाही बदलले तर...

 खरंच हि सेवा बंद होईल.

पण सुंदर बदल होत आहेत आताच झालेला बदल....

↓↓↓
मुंबई - रत्नागिरी मागाॆवर धावणार 

एसटीची पहिली " शिवशाही "


 

मुंबई : (दि.9 जुन)
मा.परिवहन व खारभुमी विकास मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून साकारलेली " शिवशाही " हि अत्याधुनिक सुविधानी सुसज्ज अशी वातानुकूलीत बस सेवा कोकणवासीयांच्या सेवेसाठी १० जून (शनिवार) पासून मुंबई ते रत्नागिरी  या मार्गावर सुरू होत आहे.

' प्रवाशांच्या सेवेसाठी ' 
सदैव तत्पर असणाऱ्या एस. टी. महामंडळ दर वेळी नवनवे प्रयोग करत असते. ह्याचाच एक भाग म्हणून येत्या शनिवार पासून म्हणजेच १० जून पासून मुंबई सेंट्रल ते रत्नागिरी मार्गावर *" शिवशाही "ह्या नवीन वातानुकूलित बस सुरु करण्यात येणार आहे. कोकण आणि एस. टी. ह्यांचे एक अतूट नाते आहे; तसेच कोकणातील चाकरमान्यांचा एस. टी. म्हणजे जिव्हाळ्याचा विषय! म्हणूनच एस. टी. महामंडळाने हि गाडी सुरु करण्याचा बहुमान हा रत्नागिरीकरांना दिला आहे.

सदर बस मध्ये एकूण ४५ पुश बॅंक आसने असून संपूर्ण बस हि वातानुकुलीत आहे. प्रत्येक सीटला ह्यात व्यकितिगत मनोरंजनासाठी एल. सी. डी. स्क्रीन दिली असून ह्याद्वारे प्रवाशांचे मनोरंजन होणार आहे. सोबतच हेडफोन्स द्वारे एफ. एम. ऐकण्याची सुविधा देखील उपलब्ध असणार आहे. अशा प्रकारचे नाविन्य घेऊन आलेली हि बस म्हणजे एस. टी. च्या शिरपेचात खोवलेला एक तुरा आहे. 

शिवशाही बसेस लवकरच महाराष्ट्रभर नवनव्या मार्गांवर सुरु होणार असून लोकांचा ह्यांना उत्तम प्रतिसाद मिळेल अशी आशा यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यश व व्यवस्थापकिय संचालक रणजीत सिंह देओल यांनी व्यक्त केली आहे. सध्याच्या ' हिरकणी ' म्हणजेच  " निम आराम" प्रकारातील गाडीच्या भाड्याच्या जवळच ह्या शिवशाही बसेसचे तिकिट्स असल्याने तेवढ्याच दरांत वातानुकुलीत सेवा देण्याचा महामंडळाचा निर्णय कौतुकास्पद आहे. ह्यामुळे खाजगी कडे वळलेला प्रवासी वर्ग पुन्हा एस. टी. कडे ओढला जाण्यास खरोखर मदत होईल. कारण, ' एस. टी. चा प्रवास, सुरक्षित प्रवास तर आहेच, त्याचबरोबर तो आता आरामदायी व किफायतशीर बनला आहे.

मुंबई ते रत्नागिरी मार्गावरील शिवशाहीचे एकूण तिकीट दर व इतर माहिती: 

मुंबई सेंट्रल ते रत्नागिरी ( मार्गे दादर, कुर्ला नेहरू नगर, पनवेल, रामवाडी, माणगांव, महाड, भरणा नाकाम चिपळूण, संगमेश्वर )

वेळ: मुंबईहून रात्री ९:४५ वाजता, रत्नागिरीला पोहोचण्याची वेळ: 
सकाळी ७  
रत्नागिरीहून रात्री १० वाजता, मुंबईला पोहोचण्याची वेळ: सकाळी ७ वाजता 

तिकीट दर : मुंबई ते रत्नागिरी : रु. ५५६ 
मुंबई ते संगमेश्वर : रु. ४८३ 
मुंबई ते चिपळूण: रु. ४२०
जनसंपकॆ अधिकारी, एसटी महामंडळ
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
 आणि हि सेवा सुरु झाली
गाड्या सुद्धा मस्त आहेत.

No comments:

Post a Comment