Monday, 26 June 2017

सोळा सोमवार व्रत... अण्णांचे


शंभो... ओम नमः शिवाय।

शिव हर शंकर नमामि शंकर

शिव शंकर शंभो

हे गिरिजा पती भवानी शंकर

शिव शंकर शंभो.!

 एक व्हिडिओ आला आणि तो व्हिडिओ बघताना...
    आज मला आठवण झाली ती आमच्या अण्णांनी केलेल्या सोळा सोमवार व्रताची....
आम्ही खूपच लहान होतो.
अण्णा बदलीच्या गावी म्हणजे महाड येथे होते.
 पण स्वतःच्या घरी.
येथेच जन्म आणि सोळाव्या वर्षापर्यंत लहानाचे मोठे झाले होते.
तर... ते तिकडे आपली एस.टी मधील नोकरी सांभाळून हे कडक व्रत करत होते. सगळे एकटेच मॅनेज करायचे.. हे खरतरं व्रताच्या दृष्टीने खूपच महत्वाचे आहे.
सोमवार कसा करायचा?
खडीसाखर... म्हणजे दिवसभर व्रतस्थ संध्याकाळी स्नान संध्या देवपूजा  करून तेथील विरेश्वर दर्शन तिन्हीसांजेला जाऊन घ्यायचे. नेवैद्य खडीसाखरेचा दाखवायचा. त्याचे तीन भाग करायचे, एक भाग देवळात ठेवायचा, एक भाग वाटायचा आणि एक भाग स्वतः ग्रहण करायचा.
असे सोळा सोमवार केले

सतराव्या सोमवारी उद्यापन.!

यासाठी आम्ही सगळे महाडला गेलो होतो.
आमचे मूळ मोठे घर तेथे असल्याने,
 या मोठ्या घरी मोठे काका त्यांच्या मोठ्या कुटुंबासह, आणि माझी आज्जी .. अण्णांची आई असे राहत.
पण वडील मात्र समोर असलेल्या दोन रूम मध्ये राहत. सर्व भावंडांमध्ये अण्णा लहान होते. 
 हे घर सुद्धा त्यांचेच होते.
तर मी लहान असले तरी या उद्यापनाची खूप छान आठवण आहे.
आईने इकडून खूप तयारी केली होती आमचे पांढरे शुभ्र सुंदर कपडे...
आणि तिकडे गेल्यावर खूप काम भरपूर नातेवाईक... सगळे कामात व्यस्त असत.
आम्ही मुले खेळत असू.
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
        तर यादिवशी देवघरातील कोनाड्यात

 एक नागाचे पिलू दिसले.. 

कोणी मारू म्हणत होते.

 पण अण्णा म्हणाले कि आज शंकर या रुपात दर्शन देत आहेत. 

मारू नका, आल्या वाटेने ते जाईल...
सगळ्यांची ते पिलू बघण्यासाठी गर्दी झाली.
काही वेळाने ते निघून गेले...
संध्याकाळी आम्ही सगळे पांढरे कपडे परिधान करून विरेश्वर मंदिरात गेलो.
जसे शंकराचे मंदिर असते तसेच मंदिर... तळ्याकाठी... अण्णांनी शंकराची पूजा केली.
आणि नंतर पुढील सोहळा सुंदर झाला.
आजही तो माझ्या स्मरणात जसाच्या तसा आहे. माझी आई इतकी सुंदर दिसत होती....
अण्णांना दोन बहिणी आणि चार भाऊ... 
सगळे आपल्या कुटुंबासह आले होते 
आणि माझे दोन्ही मामा मावशी...  आईची आई, माझी आज्जी,
अण्णांचे तेथील मित्र त्यांच्या कुटुंबियांसह असा खूप मोठा सोहळा... 

जसे मोठ्ठे घर, 

तसेच खूप सारे नातेवाईक

आणि तसेच मोठ्ठे व्रत.!

आज यावर सहज लिहिले गेले.
आज सोमवार, वेळ तिन्ही सांजेची,
व्हिडिओ मधील
 शंकर पिंडीवरील नागोबा बघितले 
आणि लिहिले गेले...
सगळेच जुळून आले.
****************************
अशाच सोळासोमवार व्रत उद्यापन ...
 मी गेले आहे
अगदी घरातील ते... ओळखीतल्या लोकांकडे...
आणि जे लहानपणी केले गेले नाही अशी कामे करण्याची संधी पण मिळाली
माझ्या मावस सासूबाई, शेजारी
आणि एके ठिकाणी, सुप्रसिद्ध गायिका होत्या त्यांच्या कडे जाण्याचा योग आला....
आता इतके हे व्रत केले जात नाही....

कारण ते खूप कडक व्रत आहे.

******************************

 हे व्रत श्रावणातील पहिल्या सोमवार पासून करतात.

कथा पुस्तकात वाचायला मिळेल...
सोळा सोमवार ...
 याचा प्रसाद गाकर करून त्याचे लाडू... 
चुर्मा लाडू...

म्हणून त्याबद्दल काहीच लिहिले नाही.
◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇

Sunday, 18 June 2017

एक आठवण... बालपणीची.!

त्रिमूर्ती...


 पेणचे सुप्रसिद्ध मूर्तिकार राजाभाऊ देवधर.!
आमच्या आत्याचे यजमान.!
सुप्रसन्न व्यक्तिमत्व.!
कलाकाराचा, बोलका चेहरा,
     माझ्या लहानपणीची एक सुंदर आठवण....
मी चारपाच वर्षाची असेन, गेले होते राहायला पेणला. आत्याकडे.!
     सकाळी उठले कि  उंबरठ्यावर बसत असे. 
आणि दादा बंदिस्त गॅलरी मध्ये त्रिमूर्ती घडवत होते.
 रोज दादांना विचारत असे .... 

मी : दादा कधी करणार डोळे???? 

डोळे करा ना आधी.!

 दादा :  म्हणत करतो हं.! 

पण... डोळे नंतर करतात हे माझ्या बाल जीवाला कस सांगणार आणि समजणार.!
ती त्रिमूर्ती आजही लक्ष वेधून घेते आणि हा लहानपणीचा संवाद आठवतो...
आणि हे सगळं दादा भेटीत  आवर्जून सांगत असत अगदी हसत हसत.!

दादा कवी मनाचे... दादांचा आनंदपक्षी  हा काव्य संग्रह.!
यातील कविता त्यांच्या तोंडून ऐकल्या आहेत.
तशी मला हळद उशिराच लागली..... 
इतकं छान वाटलं ना... कविता ऐकताना! 
आणि कवीच्या हातून त्यांचे कवितांचे पुस्तक घेताना....
::::::::::::::::::::::::::::::::::::
तर हि त्रिमूर्ती...


हि त्रिमूर्ती...
माझी बालपणीची आठवण


दादांनी घडवलेली.

५२/५४ वर्ष झाली.
अशीच आहे.
आणि पुन्हा आहे त्याच जागेवर.!
आणि ओपन आहे.
बंदिस्त काचेत नाही.

प्रथमदर्शनी
लक्ष वेधून घेते त्रिमूर्ती.!!!
येथे सुंदर कलादालन आहे.
बरेच दिवस लिहीन.
 लिहीन म्हणत होते या आठवणीबद्दल..
. तर आज योग आला 

Sunday, 11 June 2017

प्रवाशांच्या सेवेसाठी सदैव तत्पर

वाह.!!!

मस्त dp.....

 St मध्ये झालेले कालानुरूप बदल.....

माझ्या आजोबांची स्वतःची  ट्रान्स्पोर्ट सेवा होती...
जसे महाराष्ट्र स्टेट ट्रान्स्पोर्ट सुरु झाले तसे त्यांनी आपल्या गाड्या त्या सेवेला दिल्या...
पण त्यांची दोन मुले मात्र त्या सेवेत रुजू झाली.
मोठ्या  काकांनी सेवा पूर्ण केली.. त्यांची तिन्ही मुले याच सेवेत रुजू झाली..... 
आपले अण्णा.... हे या सेवेत असताना... लहान वयात आपल्याला सोडून गेले....
आता माझा लहान भाऊ.. या सेवेत आहे. आणि सगळ्यात जास्त सेवा देणारा आमचा भाऊ आहे...

मी नेहमी असे म्हणते... आम्ही एस. टी. च्या पैशावर लहानाचे मोठे झालो...

मला मात्र कोणी  "लाल डबा" असे म्हटले तर आवडत नाही.....

पण वाद घालता येत नाही.
असो...
आज माझा भाऊ या सेवेत आहे.... आणि आज माझ्या दोन्ही भावांकडे स्वतःची गाडी आहे...
खऱ्या अर्थाने पटवर्धन गाडीवाले.... आणि आज माझा भाचा उत्तम गाडी चालवतो.... उद्या भाची  पण छान गाडी चालवेल.!
~~~~~~~~~~~~

     तुझे वडील काय करतात असा प्रश्न आला आणि जर एस टी त आहेत असे सांगितले तर...
कंडक्टर कि ड्रायव्हर?? असे विचारत.... 
ट्रान्स्पोर्ट म्हणजे हे दोनच जॉब असा समज... असावा... पण इतरही भरपूर कामे, पोस्ट असतात हे पटकन लक्षात येत नाही.

पण माझे वडील ऑफिस मध्ये क्लार्क होते...

निरनिराळ्या ठिकाणी बदल्या होत असत..
माझ्या आठवणी प्रमाणे..
पालघर, महाड, पेण, पनवेल, कुर्ला आणि शेवटी मुंबई सेंट्रल या ठिकाणी ऑफिस होते.
पूर्वी लोक मे महिना होळी सण, गणपती उत्सव यावेळी तिकीट काढून द्या म्हणत... आणि अण्णा आनंदाने तिकीट काढून देत असत...
या सेवेत असताना निरनिराळे अनुभव येत.
गावाला गेलो असताना... 

● कनेक्टेड एस टी निघून गेली कि खूप वेळ बसावे लागे... 

वडील म्हणत कि अशी सेवा लोकांना दिली तर कसे लोक एस टी कडे येतील???


● येणारे प्रवासी "देव" आहेत त्यांना उत्तम सेवा दिली पाहिजे. 

     या सेवेचे आपल्याला पैसे मिळतात.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~
वडिलांना पास मिळत असे.

★ पहिली पाच आसने राखीव असत पण..

जर कोणी प्रवासी आला तर 
वडील स्वतःचे आसन रिकामे करून देत व स्वतः उभे राहत.

★ ऑफिस मध्ये कोणी एकटा घरापासून दूर राहणारा कोणी असेल तर लागेल ती मदत ते करत.

★ कधी कधी एस टी बंद होणार.... 

☆कधी खासगी सेवा... 

☆कधी लोक जास्त पैसे देऊन खासगी वाहन करून जातात ... 

पैसे जास्त गेले तरी चालतील पण आरामदायी सेवा हवी म्हणून लोक येथे आकृष्ट होतात

 पण अगदी खेडोपाडी हि आवश्यक सेवा आहे...
"रस्ता तेथे एस टी हे ब्रीद वाक्य आहे"..
 आणि त्याप्रमाणे खरोखरच ही सेवा खेडोपाडी आहे.. 
लाल धुरळा उडवत... गाडी येते.. 
सगळी गाडी लाल मातीने भरलेली असते.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~

रातराणी, परिवर्तनीय बस, शिवनेरी, हिरकणी... 

उत्तम आसने, चांगले एस टी डेपो.... 

असे हळू हळू बदल होत गेले आता तर 

टी व्ही वर जाहिरात... 

असे हि असेल कि नवी सेवा सुरु झाली म्हणून हि टी व्ही वर जाहिरात.


काळ बदलतोय आपण नाही बदलले तर...

 खरंच हि सेवा बंद होईल.

पण सुंदर बदल होत आहेत आताच झालेला बदल....

↓↓↓
मुंबई - रत्नागिरी मागाॆवर धावणार 

एसटीची पहिली " शिवशाही "


 

मुंबई : (दि.9 जुन)
मा.परिवहन व खारभुमी विकास मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून साकारलेली " शिवशाही " हि अत्याधुनिक सुविधानी सुसज्ज अशी वातानुकूलीत बस सेवा कोकणवासीयांच्या सेवेसाठी १० जून (शनिवार) पासून मुंबई ते रत्नागिरी  या मार्गावर सुरू होत आहे.

' प्रवाशांच्या सेवेसाठी ' 
सदैव तत्पर असणाऱ्या एस. टी. महामंडळ दर वेळी नवनवे प्रयोग करत असते. ह्याचाच एक भाग म्हणून येत्या शनिवार पासून म्हणजेच १० जून पासून मुंबई सेंट्रल ते रत्नागिरी मार्गावर *" शिवशाही "ह्या नवीन वातानुकूलित बस सुरु करण्यात येणार आहे. कोकण आणि एस. टी. ह्यांचे एक अतूट नाते आहे; तसेच कोकणातील चाकरमान्यांचा एस. टी. म्हणजे जिव्हाळ्याचा विषय! म्हणूनच एस. टी. महामंडळाने हि गाडी सुरु करण्याचा बहुमान हा रत्नागिरीकरांना दिला आहे.

सदर बस मध्ये एकूण ४५ पुश बॅंक आसने असून संपूर्ण बस हि वातानुकुलीत आहे. प्रत्येक सीटला ह्यात व्यकितिगत मनोरंजनासाठी एल. सी. डी. स्क्रीन दिली असून ह्याद्वारे प्रवाशांचे मनोरंजन होणार आहे. सोबतच हेडफोन्स द्वारे एफ. एम. ऐकण्याची सुविधा देखील उपलब्ध असणार आहे. अशा प्रकारचे नाविन्य घेऊन आलेली हि बस म्हणजे एस. टी. च्या शिरपेचात खोवलेला एक तुरा आहे. 

शिवशाही बसेस लवकरच महाराष्ट्रभर नवनव्या मार्गांवर सुरु होणार असून लोकांचा ह्यांना उत्तम प्रतिसाद मिळेल अशी आशा यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यश व व्यवस्थापकिय संचालक रणजीत सिंह देओल यांनी व्यक्त केली आहे. सध्याच्या ' हिरकणी ' म्हणजेच  " निम आराम" प्रकारातील गाडीच्या भाड्याच्या जवळच ह्या शिवशाही बसेसचे तिकिट्स असल्याने तेवढ्याच दरांत वातानुकुलीत सेवा देण्याचा महामंडळाचा निर्णय कौतुकास्पद आहे. ह्यामुळे खाजगी कडे वळलेला प्रवासी वर्ग पुन्हा एस. टी. कडे ओढला जाण्यास खरोखर मदत होईल. कारण, ' एस. टी. चा प्रवास, सुरक्षित प्रवास तर आहेच, त्याचबरोबर तो आता आरामदायी व किफायतशीर बनला आहे.

मुंबई ते रत्नागिरी मार्गावरील शिवशाहीचे एकूण तिकीट दर व इतर माहिती: 

मुंबई सेंट्रल ते रत्नागिरी ( मार्गे दादर, कुर्ला नेहरू नगर, पनवेल, रामवाडी, माणगांव, महाड, भरणा नाकाम चिपळूण, संगमेश्वर )

वेळ: मुंबईहून रात्री ९:४५ वाजता, रत्नागिरीला पोहोचण्याची वेळ: 
सकाळी ७  
रत्नागिरीहून रात्री १० वाजता, मुंबईला पोहोचण्याची वेळ: सकाळी ७ वाजता 

तिकीट दर : मुंबई ते रत्नागिरी : रु. ५५६ 
मुंबई ते संगमेश्वर : रु. ४८३ 
मुंबई ते चिपळूण: रु. ४२०
जनसंपकॆ अधिकारी, एसटी महामंडळ
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
 आणि हि सेवा सुरु झाली
गाड्या सुद्धा मस्त आहेत.

चला पेंग्विन बघायला.!!


हम्बोल्ट  पेंग्वीन
दोन दिवसापूर्वी सहज मनात विचार आला....
खूप दिवस झाले

 भायखळा राणी जिजामाता उद्यान येथे पेंगविन  आले त्याला.!

खरतर शाळा आता सुरु होतील,
 आज शेवटचा रविवार, गर्दी असेल... 

तरी त्या गर्दीचा एक भाग होऊ पण आज जाऊच.!

निघालो... 
 घराच्या दारातूनच बस जाते ते थेट उद्यानापर्यंत. 
तिकीट खिडकीवर पन्नास तरी लोक उभे होते... 

तो पर्यंत चौकशी केली...

 पेंगविन बघायला वेगळे तिकीट आहे का???? 

नक्की कुठच्या बाजूला आहेत.???

आणि म फोटो पण काढले. 

तेथील खोट्या खोट्या प्राण्यांचे.








धबधबा... आर्टिफिशीअल.!!!!


:-) :-) :-) :-)  :-) :-) :-) 
:-) :-)

तिकीट अवघे पाच ₹.

शनी. रवी. ३.०० वाजता तिकीट देणे बंद करतात.

बुधवारी उद्यान बंद असते.

*******************
भर मुंबई मध्ये इतकी 
 ● छान झाडे... आणि 
● गवत/ lawn, हिरवळ बघूनच छान वाटत होते
● झाडावर त्याचे नाव... आणि इतर माहिती.
 
● सेल्फी काढण्यासाठी खास जागा केल्या आहेत





● सुंदर पुतळा...



राणी जिजामाता आणि बाल शिवाजी...

● सदाफुली छान रंगात...






● तशी अनेक झाडे फुले आहेत



.  सुंदर कारंजे 



 पण... आज आम्हाला फक्त पेंगविन बघायचे होते....

 


म आम्ही त्याठिकाणी पोहोचलो...

 फोटो काढण्यास मनाई... 

थोडी नाराज झाले पण बरोबरच आहे..

 नियम हवाच. 

कारण प्रत्येकजण तेथे फोटो काढत बसेल .

शांतता भंग होईल..

हा पक्षी शांतता प्रिय आहे 
याला गोंगाटाचा त्रास होतो.
येथे एकूण सात पेंगविन आहेत यातील ३ मोठे आणि बाकी मादी आणि पिल्ले...
मस्त वाटत होते बघताना.!
मत्स्यालय मध्ये जसे मासे असतात तसे येथे पेंगविन.
छान बर्फ आहे आणि खाली पाणी.
 या पाण्यात एक पेंगविन मस्त पोहत होता.. 
दोन मोठे पेंगविन अंग स्वच्छ  करत होते.
आणि बाकीचे उभे राहिले होते...

 हा ध्रुवीय प्राणी... 

चक्क आपल्या मुंबई मध्ये आणि ते सुद्धा राणी बागेत बघायला मिळाला.
त्यामागे कोणाची खूप मेहनत आहे हे नक्की.!!!!
याबद्दल असे ऐकले किंवा वाचले आहे कि...…

बेटावर यांची संख्या वाढली कि

 यातील बुजूर्ग आपण होऊन समर्पण करतात.

मुलांचा एक लहानपणी एक खेळणे होते... 
घसरगुंडी वरून पेंगविन घसरत येतात.. 
मस्त वाटत असे.

या निमित्ताने सुंदर हिरवीगार राणीबाग बघून आलो.

बाकी कोणतेही प्राणी बघितले नाहीत..
पण बाहेर पडताना मात्र बगळे, करकोचे, असे पक्षी बघितले...



खूप सारे होते. मस्त वाटले....

हम्बोल्ट पेंग्विन चे प्रवेशद्वार 




राणी बाग बाहेर पडतानाचे गेट 


Thursday, 8 June 2017

स्वामी विश्रांती स्थान


आज गुरुवार...

ओढ स्वामी दर्शनाची

मठात जाण्याची.!



आज सकाळी स्वामी चरितामृत वाचत असताना... 
वाडा-जव्हार येथील दिवेकर वाडी च्या जवळच असलेल्या 
स्वामी विश्रांती स्थान येथील खूप आठवण आली.
काही वर्षांपूर्वी अचानक दिवेकर वाडी येथे दोन दिवसासाठी गेलो होतो. 
गाडी वळताना समोर बोर्ड दिसत होता... 

स्वामी विश्रांती स्थान.!!!

म विचारत विचारत तेथे गेले... 
हा मठ आत आत आहे. आजूबाजूला शेती आहे. 
बरोबर असलेले कुणी यायला तयार नव्हते सगळे झोपण्यात मज्जा मानणारे.! 
पण होते ते चांगल्या साठी.
 मला ओढ लागली मठात जाण्याची. 
मी निघाले एकटीच, 
भर दुपार, अनोळखी परिसर, वाटेत कुणीही माणूस नाही, 
 पण बरोबर स्वामी आहेत हि खात्री होती. हळूहळू मार्ग कापत पोहोचले.
त्या मठात एक कल्याण येथील शिक्षक, पेपर तपासत होते.! 
त्यांच्या बरोबर छान गप्पा .. म्हणजे मठाबद्दलच्या झाल्या.

येथे स्वामी विश्रांती घेत आहेत अशी मोठी फोटो फ्रेम आहे..!!!

सुंदर अशी छोटी गणपती मूर्ती. 

आणि मठात जाताना तीन/ पाच (नक्की आठवत नाही) 

वृक्ष एकत्र होऊन जणू काही शेज 

म्हणजे झोपण्याचे साधन तयार व्हावे असे खोड तयार झाले आहे

वृक्ष बहुतेक वड, पिंपळ, आंबा असे वेगवेगळे आहेत...
स्वामी कुणाच्या स्वप्नात येऊन म्हणाले, इकडे माझे विश्रांती स्थान करा...
आणि असा तो मठ आहे.
आड वळणावर असल्याने जास्त लोक जात नसावेत....
 एकदा का होईना मला हे विश्रांती स्थान बघायला मिळाले..
गिरगावात प्रेस आहे तेथे पुस्तिका छापल्या जातात... 
या मठात होणारे सण उत्सव, लोकांचे अनुभव... असे त्याचे स्वरूप होते....
हे कुटुंब बऱ्याच वेळा तिकडे जाते असेही समजले....
मनात आलेले तुमच्या बरोबर शेअर केले

श्री स्वामी समर्थ.!

|| जय जय श्रीस्वामी समर्थ ||


८.०० च्या दरम्यान गिरगाव मठात जाण्यास निघालो..
बरोबर ८.३० च्या दरम्यान पोहोचलो.
 आरतीसाठी भक्तमंडळी उभीच होती, आम्हीपण उभे राहिलो.

आरती.... आर्ततेने घातलेली साद.!!

आणि टाळ्या वाजवणे म्हणजे सुंदर व्यायाम पण... 

आरती झाली आणि आम्ही निघालो.!



गुरुविण जीवनात कोण येईल कामी 

खडतर पुढे रस्ता पण पाठीशी स्वामी 

जीवनाच्या वाटेवर नको मन भ्रांती 

गुरुपदी घेऊ चला क्षणभर विश्रांती !!!!!

मला वाटतं हे एका सिरीयल चे गीत होते

Sunday, 4 June 2017

ऋतू हिरवा.. ऋतू बरवा




पहिला पाऊस...

आला आला पाऊस आला 

बघा बघा हो  पाऊस आला


    आताच अगदी बारीक पाऊस पडून गेला...
मॅच बघत होतो म पाऊस  बघितला नाही.

 (भारत पाकिस्तान)

पण...

मूठभर तिखट जाड शेव आणि

 मस्त गरम कॉफी ...

 आणि सोबत पाऊस 

वाह क्या बात है.!


असा अनुभव गोव्याला जाताना 

अंबा घाट संपल्यावर घेतला होता.

आमचा पूर्ण कुटुंब,
आणि सुंदर अशी चहा कॉफी करून देणारे...
 एक कुटुंब.. ज्यांचे स्वतःचे दुकान आहे.
 आणि सोबत चहा कॉफी करून देतात.
आणि विशेष म्हणजे शिकलेली सून आणि 
संपूर्ण दागिने घातलेली सासू आणि 
स्वतः चहा देणारे सासरे....

आणि सुंदर अशा कपबशी मधून चहा कॉफी..

(हल्ली चहा थर्माकोल ग्लास, किंवा प्लास्टिक, काचेचे किंवा कागदी ग्लास मधून देतात)

 अंबा घाट आणि तेथील आठवणी.!


खरतर कांदा भजी चहा आणि पाऊस हे समीकरण
पण मॅच बघत होते आणि अंबा घाट येथील आठवण....!

मुंबईत राहतो तरी मातीचा सुगंध घेता येतोय...

दारी पाऊस पडतो 
राणी पारवा  भिजतो 
आला ग सुगंध मातीचा

कुंडीतील माती आणि
 कुठे डांबरी रस्ता नाही तेथे असलेली माती 
यावर पडलेले पावसाचे थेंब.!
*******************************
✽ आता पावसाळी लिली फुलेल..



हि छान छोटी गडद गुलाबी रंगाची छोटी फुले

✽ उन्हाळी लिली केशरी आणि मोठी असतात फुले...




  
✽ आषाढ़, श्रावण मध्ये ब्रह्मकमळ फुलते.!




❁❁❁❁❁❁❁❁❁❁❁❁

पाऊस पडू लागला कि सृष्टी सौंदर्य.... 
सगळे स्वच्छ होते झाडे सुस्नात होऊन मस्त दिसतात...

पानावर पावसाचे थेंब .... 

 

 

जणू काही मोतीच !!!

डांबरी रस्ते धुतले जातात आणि त्यात सुंदर प्रतिबिंब दिसते, 
अगदी सकाळच्या वेळी.
तसे मारिन ड्राईव्हला मैदानात पाणी साचले तर
 माडाच्या झाडाची प्रतिबिंबे सुंदर दिसतात...
पावसाळा आवडता ऋतू.!

तसे प्रत्येक ऋतूचे वेगळे वैशिष्ट्य.!!!! 

पण पावसाळा... नवनिर्मिती, वेगळे कपडे... सुंदर रेनकोट्स..
पावसाचा अंदाज घ्यायचा आणि बाहेर पडायचे...

छत्री नाही घेतली तर पाऊस पडतो असा अनुभव.

आणि छत्री हि हरवण्यासाठीच असते.
(खरतर कुणाला तरी ती सापडते)

वर्षा सहल, ट्रेकिंग... धबधबे...

 नव्या गर्दी नसलेल्या ठिकाणी जायचे...
ʕʔ ʕʔ ʕʔ ʕʔ ʕʔ ʕʔ ʕʔ

 पाऊस...


उन्हाळा आणि रोजच आमरस.!
पण खरा पाऊस सुरु झाला कि आंबे बंद करणार खायचे... 
म्हणजे हापूस पायरी...
पण दशहेरी, केशर, तोतापुरी असे वेगवेगळे आंबे येतात ते खायचे अधून मधून.!

 पहिला पाऊस 
मी भिजतेच.!
अगदी सुरुवातीच्या पावसात.


पण... आषाढात नाही भिजत

तो पाऊस आजारपण देतो.
असं म्हणतात

श्रावणात पण अधून मधून पडणारा पाऊस मस्त वाटतो.


श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे  चोहीकडे...




म अशी धरित्री मखमल अंथरलेली बघायला... 

* धबधबे बघायला कर्जत बदलापूर नेरळ माथेरान येथे एक दिवसाची वर्षा सहल... 
* अमावस्या अष्टमी अशा तिथींना पाऊस पडतो साधारण. 
तेव्हा जायचे..
* समुद्राची मोठी भरती... बघायला जायचे...
आणि धो धो पाऊस कोसळत असेल तर 

* समुद्र किनारी जाण्याची मज्जा अनुभवायची,
*  भाजलेले आयते कणीस खायचे.
येता येता 
* एखाद्या हॉटेल मध्ये शिरून कांदा भजी आणि गरम गरम चहा कॉफी प्यायची.!
* कुणी केलेल्या कविता चारोळ्या वाचायच्या.
आणि
*  वाडीतच थोड्या साठलेल्या पाण्यात कोणी लहान मुलासोबत होडी सोडायची.


 हो....
पावसाळा....
म येणारे सण....
आनंदी उत्साही वातावरण...
> पावसात जरीची साडी नेसली कि जर चुरगळते म्हणत म्हणत सणावारा निमित्ताने जरीच्या साडया नेसायच्या...
> नेवैद्य म्हणून गोडधोड पदार्थ करायचे,
 स्त्री च्या कलागुणांना वाव.... श्रावण भाद्रपद...
> मंगळागौरी खेळ खेळायचे... 
> झाडांना झोके बांधायचे आणि झोके घ्यायचे....
> नागाची पूजा... म्हणून..
वारूळ शोधून नागोबाची पूजा करायची...
> सवाष्ण बोलवायची.. ती शक्यतो माहेरवाशीण.!

असा हा पावसाळा मस्त एन्जॉय करायचा ....!!!!


✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧