पाण्याची टंचाई आताच जाणवू लागली आहे..
अनेक उपाय शोधले जात आहेत, सुचवले जात आहेत....
चला आज पासुन नविन सुरवात करूया
छोट्या ग्लासाने पाणी पिऊया
पाणी कमी पडले तर
परत पाणी घेऊ शकतो
पण
तहान कमी असेल तर मोठ्या ग्लासमध्ये
उरलेले पाणी फेकुन द्यावे लागते
आज वाचवणार तर उद्या मिळ्णार.
पाणी पण जपून वापरा.!
पाण्यामुळे तुमचा "भविष्यकाळ"
सुरक्षीत राहणार आहे.
पाण्यासाठी.....
मला काही सुचलंय....
★आपण डाळ तांदुळ धुतो,
कडधान्य, भाजी धुतो ते पाणी जमा करून झाडांना घालू शकतो
कडधान्य, भाजी धुतो ते पाणी जमा करून झाडांना घालू शकतो
★कपडे धुतल्यावर ते पाणी घरासमोरील अंगणात शिंपडले तर .... धूळ उडणार नाही
पाण्याचा सदुपयोग होईल.
पाण्याचा सदुपयोग होईल.
★तोंड धुतांना तपेलीने पाणी वापरले तर....
★घासलेली भांडी विसळतांना नळ थोडासा लहान ठेवून भांडी विसळता येतील.
★लादी पुसतांना अर्धी बादली पाणी घेऊन पुसता येईल.
★स्वयंपाक घरातील सिंकमधे एखादं पातेलं, टब ठेवला तर...
.सतत हात धुतो, कपबशा विसळतो ते पाणी.. झाडांना घालता येईल.
पाणी वाचवायचं म्हटलं की अनेक गोष्टी लक्षात येतील पाणी वाचवण्याच्या.!
आपण मुंबईत राहतो...
त्यामुळे आपल्याला पाणी टंचाईची कल्पना येत नाही,
नळ सुरू केला की पाणी मिळतं आपल्याला.
पण अजुनही खुप लांबून पाणी आणतात लोक.
पण अजुनही खुप लांबून पाणी आणतात लोक.
कुठे दोन दिवसांनी पाणी येतं.
तर कुठे आठ दिवसांनी पाणी येतं.
असं ऐकलं की वाटतं...
पाणी कसं जपून वापरावं हे शिकावं यांच्याकडून.!
कष्ट न करता जेव्हा एखादी गोष्ट मिळते तेव्हा त्याची किंमत कळत नाही..
तसंच आहे पाण्याच्या बाबतीत.!
पुर्वी विहिरीवरून पाणी आणत.
म मशीन बसवलं आणि घरात नळ बसवले.
पाणी कष्ट न करता मिळू लागलं.
पुर्वी विहिरीवरून पाणी आणत.
म मशीन बसवलं आणि घरात नळ बसवले.
पाणी कष्ट न करता मिळू लागलं.
मुंबईत घरात पाणी साठवण्याच्या टाक्या बसवल्या. नळावरची भांडण, रांगा संपल्या.
सहज तोंड धुतांना नळ चालुच ठेवून तोंड धुतो.
नळाला पाणी आलं की अगोदर भरलेलं पाणी ओतून ताजं पाणी सहज भरू लागलो.
दहापंधरा रुपयात पिण्याचं पाणी विकत मिळू लागलं
म घरून
पाण्याची बाटली भरून नेणं बंद झालं
आणि
पाणी बाटलीत शिल्लक असलं तरी ती
तेथेच फेकून देणं वाढलं....
मुंबईत जेथे अजूनही विहिरी असतील तेथील पाणी नक्कीच वापरता येईल...
त्यावर मशीन बसवुन इमारतीला पाणी पुरवठा करता येईल.
मे महिन्यात आपण गावाला जातो...
तेथे जर आपण पाणी भरलं...
विहिरी कशा कोरड्या होतात...
किती लांबून पाणी आणावं लागतं हे अनुभवलं
तर....
पाणी किती जपून वापरलं पाहिजे हे कळेल.
आणि पाण्याला जीवन का म्हणतात ते समजेल.!
आताच नद्यांचं पाणी आटलंय!
(कृष्णा नदी अगदी कोरडी... नदीचे पात्र चालत ओलांडले.. असं परवाच कुणीतरी सांगत होतं.)
नद्या अगदी कोरड्या आहेत असं कळलं...
तर मे महिन्यात काय होईल??
(कृष्णा नदी अगदी कोरडी... नदीचे पात्र चालत ओलांडले.. असं परवाच कुणीतरी सांगत होतं.)
नद्या अगदी कोरड्या आहेत असं कळलं...
तर मे महिन्यात काय होईल??
आताच वेळीच पाणी टंचाईचा धोका ओळखून उपाय योजा...
मी एकट्याने करून काय होणार म्हणून दुर्लक्ष करू नका...
नाहीतर डोळ्यातून पाणी यायची वेळ येईल.
.....……………….……………
︶ ︶ ︶ ︶ ︶ ︶…………………………………..
︶ ︶ ︶ ︶ ︶ ︶
………...…………………………
︶ ︶ ︶ ︶ ︶ ︶…………………………………..
︶ ︶ ︶ ︶ ︶ ︶
………...…………………………
No comments:
Post a Comment