Sunday, 27 March 2016

कोकणमेवा....

मज्जा उन्हाळ्याची

कोकणमेवा....
उन्हाळ्याला जशी सुरुवात होते आणि
उन्हाळा सुसह्य करणारी फळं मिळू लागतात.

जाम,

थोडं पोपटीहिरवं, 
पाण्याने भरलेलं मस्त फळ,
 झाड तर या फळांनी भरलेलं असतं...
 किती हवीत तेवढी घ्या...
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

करवंदं,...

 हातांनी तोडून खाण्यात मजा आहे.
पण तोडतांना काटे ... सांभाळावे लागतात.
कोंबडाकोंबडी चा खेळ आठवतो ना...





इटुक मिटुक
चिंचेचे बुटुक
लाल लाल चिंच 
तोंड झाले चुटुक 
मीठ मसाला 
कैरीची फोड 
चन्या मन्या 
आंबट गोड
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

चिंच... 

 

गाभुळलेली, आंबटगोड... 

बघितली तरी तोंडाला पाणी सुटते.
कच्ची अगदी आंबट लागते.

अजून एक
...............................................................

विलायती चिंच..

वरून हिरवीलालसर साल आणि 
आतील गर पांढरा, बी मात्र काळी.. ही गोडच असते.








•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

रातांबे.. 

लालकाळसर फळ..
याचच बनतं कोकम सरबत.!
आणि आणि कोकमं/आमसुलं
आणि
 या आमसुलाचीच सोलकढी

अगदी रोज दुपारी प्यावी अशी.!

००००००००००००००००००००००००००००००००

काजू...

 हे फळ जरा जपून खावं....
 पण फळाची बी म्हणजेच काजू...
 सर्वांनाच प्रिय... 
वेगवेगळ्या रुपात समोर येतात.











****************************************

कैरी...

 


आंबट पण तिखटमीठ लावून खा...

काही गोडकैऱ्या..

 अगदी खोबऱ्यासारख्या आहेत खाऊन बघा असं विक्रेता सांगतो.
यांचंच पन्हं, आंबाडाळ, लोणच्याचे तर अनेक प्रकार करता येतात.
★★★★★★★★★★★★★★★★★★★★

जांभळं... 




जीभ जांभळी होते
.मधुमेहींसाठी अगदी वरदान... 
 यातसुद्धा बदलापुर कर्जतची जांभळं लोकप्रिय...
 मीठाच्या पाण्यात टाकून खाल्ली तर एकदम लाजवाब.!
<><><><><><><><><><><><><><><><><>

ताडगोळे... 

 

रस्त्यांवर ताडगोळेवाला हातगाडी घेऊन उभा असतो...
 छान ताडगोळे फळातून काढून देतो.
 पाण्याने भरलेले कोवळे ताडगोळे खाण्याची मजा काही वेगळीच आहे.
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

शहाळी....

कोकणची ओळखच आहे ही...
अमृततुल्य नारळपाणी...

शुद्ध नैसर्गिक.... कोणतीही भेसळ नसलेलं गोड पाणी.

 

 

 

{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}


रायआवळे...

 

एवढेसे दिसणारे हे फळ...
 पण खाण्यास मस्त... जरा मीठ लावलं की मस्तच...
=================================

मोठे आवळे....

मीठाच्या पाण्यात मुरवून खा, 
नुसतेच खा... लोणचं, सरबत, ज्यूस.....
~×~×~×~×~×~×~×~×~×~×~×~×~×~×~

रांजणं....

आपण मुंबईत अहमदाबादी मेवा या नावाने ओळखतो.
छान पिवळी लांबट फळं -
 पण याला चिक खूप असतो.
 बी काळी पण त्यामानाने मोठी असते....
[•] [•] [•] [•] [•] [•] [•] [•] [•] [•] [•] [•] [•] [•] [•] [•]

कलिंगड ...

 पाण्याने पूर्ण भरलेले... 
एक जरी फोड खाल्ली तरी तहान भागते व पोट भरते.
 मला वाटतं यात पाण्याचा अंश ९०℅ असतो.








ÖÖÖÖÖÖÖÖÖÖÖÖÖÖÖÖÖÖÖÖÖÖÖÖÖÖÖÖ

टरबूज,खरबूज...

यातसुद्धा अनेक प्रकार असतात.
ही सुद्धा गोड, पाणी असलेली फळं.!
OOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOO

फणस...

 कापा बरका....

 

वरून काटेरी आणि आतून गोड पिवळेधम्मक गोड गरे, 

त्यातील बी आठळी, भाजी करा किंवा उकडून, भाजून खा,
 किंवा आठळ्या वाळवून डब्यात ठेवा पावसाळ्यात भाजी करता येते.
बरका फणस... सांदणं.. मस्त लागतात.
कापा फणस...तळलेले गरे, वर्षभर खाऊ शकतो.

 हो याच्या इडल्या पण मस्त होतात.

()()()()()()()()()()()()()()()()()()()()()()()()()()

आंबा.... 

अनेक जाती असलेलं..

 फळांचा राजा 

 

 ज्याची अगदि आतुरतेने वाट बघतो...

हापूस पायरी... खास फळं
आमरस काढला जातो.

रायवळ आंबा... चोखुन खाण्याचा मस्त आंबा...

आणि अनेक जाती... 
अशाच गोड, 
प्रेमातच पडतो आपण आंब्याच्या....
********************************

Saturday, 26 March 2016

२६ मार्च १९८१...


अण्णा..

ती संध्याकाळ... आम्ही कधीच विसरू शकत नाही.

अचानक.. हो बोलताबोलता

तुम्ही आम्हाला दुःखसागरात लोटून गेलात

तुम्हाला सुद्धा कल्पना नसेल की तुमचा अंतकाळ आलाय.!
वय पण लहान होतं अवघे ५२ 





कितीतरी आठवणी आहेत तुमच्या..
सुर्योपासना करणारे,
घरात खडावा घालून फिरणारे...
एस.टी. मधे नोकरी करणारे नेहमी रात्रपाळी करणारे..
पोस्टाचे काम आवडीने करणारे...
राष्ट्रिय स्वयंसेवक संघाचे काम करणारे (तिकडे मामा म्हणून ओळखले जाणारे)
जनसंघाचे काम सुद्धा किती करत होतात.!
स्वतःच्या आईला वहिनी म्हणणारे....
तिची ढगाळ वातावरणात काळजी करणारे...( तिला दम्याचा त्रास होता)
मुलांना चांगली नोकरी मिळावी यासाठी खटपट करणारे...
मला सुद्धा किती छान सांगितलं होतंत...
वेळप्रसंग आला तर हातात कुठलं तरी सर्टिफिकेट हवं..
.म्हणजे नोकरी मिळण्यास अडचण येणार नाही.
म्हणून मी टायपिंग पूर्ण केलं होतं.
तसंच पदवीधर....
आपल्या घराण्यात कोणी मुलगी पदवीधर नाही...
मला वाटतं तू कमीतकमी पदवीधर व्हावस....
अण्णा... मी पदवीधर झाले पण... ते पहायला.. तुम्ही नव्हतात.
तसंच लग्नाचं बघत असतांना..
तुम्हाला वाटत होतं की मुलीला स्थळ इतकं जवळचं हवं.. 
की मुलीच्या आवडता पदार्थ घरी बनला की तो तिला नेऊन देता आला पाहिजे.!
बहिणीभावांवर खुप प्रेम करणारे...
बहिणीला माहेरी आणायचं तर...
 तिच्या सासुला, नवऱ्याला सांगुन माहेरी आणणारे तुम्ही..
( दादा, चार दिवस पाठवा राहायला आमच्याकडे..)
कोणीही अडचणीत असेल तर त्यांना मदत करणारे.

होळी गोकुळाष्टमी... या सणांना जन्मगावी धाव घेणारे

नोकरी बदलीची असल्यामुळे
वेळच्यावेळी कोणाबरोबर पगार पाठवणारे...

जातीधर्माचा भेद तुम्ही कधीच मानला नाहीत.
वयाच्या पन्नास वयापर्यंत भावाकडे जाण्याचा योग आला नाही... पण मनानेच तिकडे पोहोचणारे....
मामाच्या घरी म्हणजे आजोळी सुद्धा वयाच्या पन्नासाव्या वर्षी गेलात ते आठवतंय....
भाच्यांना भाचेजावयांना अगदी मित्र वाटावेत असे संबंध होते तुमचे.
तसेच साडू- साडू कसे संबंध असावेत ते तुम्हाकडे पाहून शिकावे.
तुम्ही नोकरी निमित्त कोणाकडे फारसे गेला नाहीत पण...
तुमची मावसमामे.. सगळी भावंडं कुटुंबासह येत होती.. यातच सगळं येतं....
तुमचं तसंच प्रेम  होतं त्यांच्यावर...
मुक्या भावाची काळजी करणारे... 
नुसती काळजी नाही तर त्याला जेवणाचा डबा लावून देणारे..
आणि त्याचे शेवटचे कार्य करणारे..

पत्नीला नऊवारी साडी आवडते म्हणून दरवर्षी साडी घेणारे..

मदनबाण, मोगरा.. यांचा गजरा आवडतो म्हणून तो आठवणीने आणणारे...
वाडीतील प्रत्येकाबरोबर छान मैत्रीचे संबंध असणारे....

अगदी चहाबाज म्हणजे काय हे तुमच्याकडे पाहून समजले असते,

 इतका तुम्हाला चहा प्रिय होता.

तुम्हाला पिवळा हत्ती सिगारेट आवडत होती. 
पण ती तुम्ही कधी सोडलीत ते आठवत सुद्धा नाही....
तसंच गावाला माघी गणेशोत्सवात पाणीग्रहण नाटकात...
 मला वाटतं काका साहेबांचं काम केल होतंत. मी खुपच लहान होते.
तसंच

सोळा सोमवार हे कडक व्रत तुम्ही केल्याचं आठवतं

अजून छान म्हणजे
 स्वतःचं एका खोलीचं बिऱ्हाड असलं तरी कोणी अडचणीत असेल तर 
त्याची आपल्या घरी नोकरी मिळेपर्यंत, पुढे जागा घेईपर्यंत सोय करणारे...
( आम्ही अगदी मोठे होईपर्यंत कुणीतरी असायचंच)
एका खोलीतून दोन खोल्यांच्या घरात येईपर्यंतचा प्रवास.... 
आम्ही बघितला आहे.... स्वतःचा फायदा होत होता तरीही सर्वांचा फायदा करून दिलात...
 असं कित्ती कित्ती आठवणी आहेत तुमच्या.! कधीच विसरता येणार नाहीत अशा.!

आपल्या कृतीतून कित्तीतरी गोष्टी शिकलो.

★ दिलेली वेळ पाळावी
★ पानात अन्न टाकू नये.
★ कपडे कसे वाळत टाकावेत.
★ आधी कष्ट मग आराम चांगला.
★ कोणाला उसने पैसे देऊ नये. पोटभर खायला घालावे.
★ मामा म्हणून भाचरांबरोबर
आणि काका म्हणून पुतण्याबरोबर कसे प्रेमाने वागावे.
★ नव्या आलेल्या सुनांबरोबर अगदी वडील या नात्याने तुम्ही वागत असत.

कित्तीतरी आठवणी....

न संपणाऱ्या....

ग्रंथ होईल नाही का...

*********************************

तुमची आठवण येतेच, 
असा एकही दिवस नाही की तुमची आठवण आली नाही.

**********************************

 

 

 

 

 

Thursday, 24 March 2016

धुळवड/ रंगपंचमी..

 

 

बुरा ना मानो

होली है.!!!!

असं म्हणत कपाळाला गुलाल किंवा रंग लावला जातो.

••००••००••००••००••००••००••००••

खरंतर मुंबईत मी तरी धुळवड बघितली नाही...
सुट्टीपण असते... मग रंगपंचमीच साजरी करतात...
शोले चित्रपटात जया भादुरी... टांग्याच्या मागे धावत धावत....
बुरा ना मानो होली है.... म्हणते
तो रंगाचा खेळ त्यावेळी खूप आवडला होता....
रंग एका तबकात कोरडे ठेवले होते.

००००००००००००००००००००००००

चित्रपटातून दाखवला जाणारा रंगपंचमी सण....

पांढरे शुभ्र कपडे घालून रंगपंचमी खेळतात....
का बरं असं???
आता उन्हाळा सुरू होणार! 
उन्हाळ्यात पांढरे कपडे वापरावेत म्हणजे उन्हाळा सुसह्य होतो..
तसंच थंडाई पिण्याची पद्धत आहे... 
म्हणजेच उन्हाळ्याचे आगमन अशा पद्धतीने केले जाते.
भांग प्याली जाते.
ती जर चढवली असेल आणि पिणाऱ्याला चढली तर ...
असे गमतीदार किस्से ऐकायला मिळतात.
~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~

आता आपण हा सण कसा साजरा करतो???

कपडे रंगीत आणि शक्यतो काळे घालतो, रंग ओले केलेले लावतो.
 आणि रंग पण कसा? तर त्वचेला हानी पोहोचेल असा.!
चंदेरी, काळा, एक अती गडद.... ज्याला मद्रासी रंग म्हणतात असा.... 
आणि लावायचा कसा... तर तोंडाला... 
केसांना.... म्हणजे व्यक्ती ओळखताच यायला नको.....

मग अनेकजण हा रंगांचा, उत्साहाचा सण साजराच करत नाहीत, 

लपून बसतात किंवा कुठेतरी निघून जातात

(मला तर असं वाटतं की.. 
अशी तोंडं रंगवून घ्यायची आणि तो रंग काढत बसायचा.... 
त्यासाठी एक तास घालवायचा)
असो...
तसंच मुकी जनावरं...
कुत्रा, गाय-बैल यांच्या अंगावर रंग टाकतात
वस्तुंवर... गाड्या, दुकानांच्या पाट्या, बसस्टॉप यावर रंग टाकतात.
काय म्हणायचं अशा लोकांना.
~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~

आता थोडी जागृती होऊ लागली आहे.

 आधी खोबरेलतेल किंवा एखादं क्रिम लावलं जातं,
 रंग सुद्धा हर्बल वापरले जातात,
 उगाच त्रासदायक वाटेल अशा ठिकाणी रंग लावले जात नाहीत, 
ओले रंग लावत नाहीत...
पण पूर्ण उत्साहात रंगपंचमी साजरी केली जाते..

पण लहान बालगोपाळ अगदी उत्साहीत असतात,

 बाजारात नव्या आलेल्या पिचकाऱ्या त्यांना हव्या असतात, 
होळी प्रज्वलीत झाली की... या पिचकाऱ्यांनी एकमेकांवर रंग उडवला जातो.
शाळेतील मुले मात्र हातात असलेल्या शाईपेनातील शाई
 एकमेकांच्या अंगावर उडवतात व आपला आनंद व्यक्त करतात.

.ツ.....ツ.....ツ.... .ツ....

गावाकडे कशी करत साजरी रंगपंचमी.?
तर कपाळाला गुलाल लावला जात असे. एकत्र बसुन गप्पा, पोहे खाणं.!
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••
 आज गोकुळात रंग खेळतो हरी 
राधिके जरा जपून 
जा तुझ्या घरी

मथुरा वृंदावन येथील होळी
येथे गावागावात होळी साजरी करतात.
 आज या गावात, तर उद्या दुसऱ्या गावात...
 अशी रंगपंचमी साजरी करतात.


आता नवविवाहितांचा सण होळी....

नवदांपत्य पांढरे कपडे परीधान करते,
केशर पाण्यात खलून ते त्यांच्या अंगावर शिंपडतात. 
केशराचा टिळा लावतात. गळ्यात साखरेच्या गाठी घालतात.
आणि वेगवेगळ्या तबकात रंग ठेवले जातात
 म ते एकमेकांना कपाळावर लावले जातात.
 खाऊ म्हणून उन्हाळी फळं देतात.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~

लहान मुलांचा सण....

शितळशिमगा.....

मुलांना पांढरे कपडे घालतात.
गळ्यात रंगीत साखरेच्या गाठी, द्राक्षाच्या माळा घालतात.
 औक्षण करतात.
़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं
होळी रंगपंचमी या सणाच्या निमित्ताने नातेवाईक, मित्रमंडळी एकत्र येतात.
 होळीला भेळ आईस्क्रिम किंवा कलिंगड खातात,
रंगपंचमीला
 पुरणपोळी, तूप, नारळाचं दूध, कटाची आमटी असा मेनू असतो.

  '°︶°'  '°︶°' '°︶°' '°︶°' '°︶°'


संकलन..!

मानवी जीवनातील रंगांचे महत्त्व.....
     पांढरा, निळा, हिरवा आणि फिकट रंग हे सात्विक प्रकृतीचे म्हणून ओळखले जातात.
 हे सर्व रंग आनंद, बुद्धी व स्पष्टता यांचे प्रतिक मानले जातात.
     गर्द लाल, नारंगी, गुलाबी हे रंग रजोगुणी मानले जातात.
 हे रंग मानवीय संवेदना आणि सक्रियता वाढविण्यात मदत करतात.
     तर काळा, भुरकट व पिवळट छटांचे रंग हे तामसी प्रवृत्तीचे म्हणून ओळखले जातात.
~•~•~•~•~•~•~•~•~•
गर्द लाल रंग - प्रसिद्धी प्रदान करतो.
पांढरा रंग - धारण केल्याने आपल्या मनात भविष्याची सोनेरी स्वप्ने जागृत होतात.
नारंगी रंग -  मंगळाचा रंग. अग्नी व आक्रमकतेचे प्रतिक आहे.
पिवळा रंग - हा गुरूंचा असून तो निर्मलता व साधुत्वाचे प्रतिक आहे.
हिरवा रंग - हा बुधाचा असून तो तुमच्या थाटामाटचे प्रतिक ठरतो.
निळा रंग - हा शनीग्रहासंबंधीत असून तो वृद्धी व संतुष्टीचे प्रतिनिधित्व करतो.
गर्द रंग - राहू ग्रहाचे प्रिय रंग.
चंदेरी रंग - केतूचा प्रिय रंग.!
********************************

रंग रंग रंग...

भिजू दे रंग अन् अंग स्वच्छंद
अखंड उठू दे मनी ...
रंग तरंग....
व्हावे अवघे जीवन दंग
असे उधळूयाज हे रंग.!
:-) :-) :-) :-) :-) :-) :-) :-) :-)







 नको रे कृष्णा रंग टाकू 
चुनरी भिजते …।

Wednesday, 23 March 2016

होळी.....फाल्गुन पौर्णिमा...


☆☆☆☆☆☆☆☆☆☆

हुताशनी पौर्णिमा....
होळी आणि धुळवड...

☆☆☆☆☆☆☆☆☆☆

 

   एक खड्डा खणून त्यात एरंडीची फांदी उभी करून
 त्याभोवती गोवऱ्या रचून ती कापराने प्रज्वलीत करतात. 
नंतर होलिकेची पंचमोपचारे पूजा करतात व 
पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात.
 स्त्रिया खणानारळाने ओटी भरतात.
पुरूष होळीमध्ये नारळ अर्पण करतात. 
नंतर उजव्या हाताने बोंबा मारून इडापिडा जळून
 नवा प्रकाश, नवी स्फुर्ती देण्याची विनंती करतात.
तसंच काही ठिकाणी फाग मागतात म्हणजे होळीसाठी लागणारे साहित्य.!
शेवरी, सुके गवत, सुरमाड..
यालाच फागोठी मागणे असेही म्हणतात.
०००००००००००००००००००००००००००००००००००

होळी पेटवल्यानंतर..

आयना का बायना..
घेतल्याशिवाय जाईना...
होलीका पोस्त मंगता है....

असे म्हणत नाचत, डबे वाजवत
 काहीनाकाही घेतल्याशिवाय ही मुलं घरासमोरुन जात नाहीत.
खाऊ, पैसे...
<><><><><><><><><><><><><><><><><><><>
     अगदी लहान असतांना भक्त प्रल्हाद हा चित्रपट बघितला होता.
 तेव्हा प्रल्हादाला  जाळण्यासाठी आलेल़्या ढुंढाराक्षसीचे उच्चाटन याच दिवशी झाले ते आठवते. 
यावेळी नारायण भक्त प्रल्हाद जिवंत राहतो. आणि त्या राक्षसिणीचे उच्चाटन होते.

त्यावरून कळते की सत्याचा भक्तीचा जय होतो.

बऱ्याच ठिकाणी ही होळी खुप सुंदर सजवलेली पाहिली आहे.
 होळी पेटवल्यावर लोक रात्री जागतांना देखील पाहिलं आहे.

मुंबईचे चाकरमानी गावाकडे या उत्सवासाठी अगदी हौसेने जातात.

 इतके की जादा एस.टी गाड्या सोडाव्या लागतात.
तसेच "बाले" खुप छान नृत्य करतात...
 याची तयारी मुंबईत करतांना रात्री या नृत्याचा सराव बघायला मिळाला आहे.
तसंच "खेळे" म्हणजे...निरनिराळी सोंगं घेतली जातात 
 आणि कथा सादर केल्या जातात..
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

होळीला करण्यात येणारी प्रार्थना....

होळीच्या पवित्र अग्निमध्ये,
निराशा, दरिद्र्य आळस यांचे दहन होवो, जे जे वाईट आहे ते दूर होवो
अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख-समाधान आरोग्य आणि शांति नांदो.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
होळीला पुरणपोळी....
त्यावर भरपूर साजूक तुप
आवडत असेल तर नारळाचा अंगरस
आणि कटाची आमटी ....

मग काय????? बहोत खूब....
तसंच होळी प्रज्वलीत झाल्यावर एकत्र बसुन भेळ आणि आईस्क्रिम....
******************************************

होळीच्या दुसऱ्या दिवशी असते ती धुळवड.!

म्हणजे दुसऱ्या दिवशी शांत झालेल्या होळीवर दूध शिंपडून होळीची रक्षा सर्वांगाला लावणे.
आपल्याकडे धुळवड नाहीच .... असते ती रंगपंचमीच.!

❀ ❀ ❀❀ ❀ ❀❀ ❀ ❀

गावाकडे गाऱ्हाणं घालण्याची पद्धत आहे....
तर हे कोणीतरी पाठवलेलं गाऱ्हाणं

❀ ❀ ❀❀ ❀ ❀❀ ❀ ❀

हे बारा गावच्या, बारा वेशीच्या, बारा बावडीच्या, बारा नाक्याच्या, बारा गल्लीच्या, बारा शहराच्या
 देवा महाराजा..........
होय महाराजा.............
आज जो शिमग्याचो सण सगळे पोरा टोरा, म्हातारे कोतारे, मिळान साजारो करतत,
 त्यांचो तू नेहमी सांभाळ कर आणि जी काय इडा पिडा, वाकडा नाकडा असात त दूर कर
 रे महाराजा....
होय महाराजा.....
कोणी काय कोणावर वाकडा नाकडा केला असात तर ता बाहेरच्या बाहेर निघाण जाऊं दे
 रे महाराजा..........
होय महाराजा..........
कोणाक पोर होत नसात तर त्याक पोर होऊ दे, 
काम धंद्यात सर्वानका यश दे, पोरा टोराक शिक्षणात यश दे,
 कोणाचा लग्न जुळत नसात तर ता तुझ्या कृपेनं जमानदे
 रे महाराजा......
होय महाराजा........
हे देवा महाराजा आज जो काय महाराष्ट्रात दुष्काळ पडलो हा, 
 त्याचो तू नाय नाट कर आणि तुझ्या कृपा दुष्टीने भरभरून पाणी दे
 रे महाराजा........
होय महाराजा.......
हे देवा महाराजा आणि जो काय आजकाल पोरी टोरीन वर अत्याचार होतंत
 आणि जे करतत त्याचो नाय नाट कर
 रे महाराजा.....
होय महाराजा....
ह्या बघा देवाक मी नारळ देऊन सगळ्यांच्या वतीने गराणा घातलाय.
 चला आता सगळ्यांनी पाय पडा आणि शिमगो खेळाक यवा 
आणि पाणी नाय वापरलास तर बरा व्हयत.

**********************************************************************

बोला… 

 होळी रे होळी,

पुरणाची पोळी ............

 

  पोळीची आहे अवीट गोडी 

  ताव मारू नका खा थोडी 

  घरच्या पोळीची चवच न्यारी 

 

 

 

❀ ❀ ❀❀ ❀ ❀❀ ❀ ❀❀ ❀ ❀❀ ❀ ❀❀ ❀ ❀


Tuesday, 22 March 2016

आज २२ मार्च.... जागतिक जल दिन


या निमित्ताने....

पाणी... जीवन

पृथ्वीवर जो जलसाठा आहे त्यातील पिण्यायोग्य साठा फक्त ३℅ आहे..
त्यातसुद्धा आताच्या काळात विहिरींचा वापर अतिशय कमी आहे.
तर....
जो पर्यंत आपल्याला पाण्यासाठी कष्ट पडत नाही तोपर्यंत पाणी मिळण्यासाठी काय हाल असतात ते आपल्याला कळणार नाही.
असं वाटतंय की पाण्यासाठी

रेशन सिस्टीम किंवा मीटर बसवावेत...

 जेणेकरून सर्वांना कळेल की पाण्याचा अपव्यय होतोय तो टाळला पाहिजे.
परवाच कुणीतरी सांगत होतं की.
.काकी आमच्याकडे नळाला पाणी आलं की..
 की कपड्याचा साबण जाईपर्यंत नळ चालू ठेवतात.! 
आणि बादलीत एखादाच कपडा असतो, बादली वाहत असते... आता काय करणार????
तसंच टोलेजंग इमारतीत सगळंच घर बंदिस्त.
 धुळ शिरायला जागा नाही.
 तरी दररोज स्वच्छतेच्या नावाखाली.........
 दररोज लाद्या पुसणे, काचा पुसणे, बाथरूम घासणे करतात
 तेच जर कोरड्या फडक्याने पुसले, झटकले तर चालेल व एक दिवस ओल्याने पुसावे.

तसंच मशीनमधे कपडे एकावेळी जेवढे धुता येतील तेवढे धुवावेत.

तसंच परभणी लातुर भागात जाण्याचा योग आला तर.......
 तेथे आठ दिवसांनी पाणी येते हे कळले....
 डोळ्यातून पाणी येण्याचेच बाकी होते...

आणि आपण इकडे मुंबईत पाण्याची ऐश करत आहोत.

जर आपल्याला पाणी कमी येऊ लागले तर.... 
चूक कशी लोकांची आहे ते आपण लगेच तावातावाने सांगू.!
 पण पाण्याची मुबलकता असतांना आपण याच चुका केल्या
 याचा मात्र आपल्याला विसर पडला असेल.
म्हणतात ना....

दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसतं..…

 पण स्वतःच्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही....

 

 

 

 

 

 

Sunday, 20 March 2016

आज जागतिक चिमणी दिवस....


आज २० मार्च

 

 या निमित्ताने बालपणात गेले ,

 एक घास चिऊचा, एक घास काऊचा... 
असं करत करत आई, आजी कधीच वरणभात, दूधभात भरवत असत.
मुल रडू लागलं की कुठे बरं गेली चिऊ.????
करत बाळाचं रडणं चिऊला शोधता शोधता कधीच थांबत असे.
इथे इथे बस गं चिऊ
दाणा खाऊ, पाणी पिऊ
बाळाच्या डोक्यावरून
भुर्रकन् उडून जाऊ...

मग थोडं मोठं झालं की,

एक होता काऊ आणि एक होती चिऊ.....
 काऊचं घर होते शेणाचं आणि चिऊचं घर होतं मेणाचं.....
म्हणजे चिऊ किती हुशार ना.... पावसात वाहून जाऊ नये म्हणून ती मेणाचं घर बांधते.!

थोडं मोठं झाल्यावर

ती किती धीट असते....
 आई तांदुळ निवडायला लागली की
 ती आईच्या जवळ येऊन भातगोटे, जरा काळे असलेले तांदुळ.... 
असं आईने टाकलेले भराभर टिपते.....
 ती मधेच चिव चिव असा आवाज काढते आणि दाणे टिपते.
ती सतत कामात असते.

 असं वेळोवेळी कळत गेलं …. 

मधेच या चिमणीला आरसा दिसला तर मात्र....असतं 

 ती त्या आरशावर चोच मारतच राहते. 
जणू तिथे तिचा प्रतिस्पर्धी आहे त्याला ती मारायचा प्रयत्न करते.
मग त्या आरशावर काहीतरी आच्छादन घालावेच लागते.
गवतात चिमणचारा असं एक फूल




ही चिमणी मातीत स्नान करते. पाण्यात आनंदाने खेळते. ते अगदी बघत रहावे असे.....

हिचं घरटं मात्र कौलाच्या, घराच्या वळचणीला, पिसांचं मऊ छोटंसं घरटं.....

चिमणाचिमणी मेहनत घेऊन घरटं बांधतात.
चिमणी आपल्या पिलाला उडणं शिकवतांना मी माझ्या लहानपणी बघितलं आहे.

कोंबडा पहिली बांग चार वाजता देतो.!

तर चिमण्यांचा चिवचिवाट, किलबिलाट पावणेसहाच्या दरम्यान सुरू होतो.

लहानपणचं एक गाणं....
चिवचिव चिमणी रबराची
कशी ओरडे गमतीची
चिमणाचिमणी वेगळे दिसतात.
चिमणी अळ्या तांदळाचे दाणे आवडीने टिपतात.
चिमण्यांची संख्या कमी होत आहे....
 कारणं शोधू लागता कोणी म्हणे...
 नेटचे जाळे हे एक कारण आहे. त्यांचे पाय त्यात अडकतात म्हणे.

पण मला अजून एक कारण वाटतं 

आणि ते म्हणजे गगनचुंबी इमारती.!

 कौलारू घरं आता फार कमी दिसतात. घरटं कुठे बांधणार???

❀ ❀ ❀❀ ❀ ❀❀ ❀ ❀

❀ ❀ ❀❀ ❀ ❀❀ ❀ ❀

असो... 

आज जागतिक चिमणी संवर्धन दिवसाच्या निमित्ताने काही करता येईल का??? 

तर....
योगायोगाने, आजच, टेकडीवरच्या पक्ष्यांसाठी कुणी तरी १२ लाकडी घरटी, खोक्याच्या आकाराची भेट पाठविली.
 ती आम्ही टेकडीवर पोहोचविली.
 दुसऱ्या कुणीतरी ती झाडांवर बांधली सुद्धा! आता बघू त्यात वस्तीला कोण येतं!

हा मेसेज वाचला....

☆☆☆☆☆☆☆☆☆☆
☆☆☆☆☆☆☆☆☆☆
तसंच हा चिमणी हा पक्षी का आवडतो???? ही गोष्ट वाचनात आली....
चिमणी हा पक्षी मला का आवडतो त्याला अनेक कारणं आहेत.
चिमणी ही नेहमी आपल्या उद्योगात असते. 
सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती कामातच असते.
गवताच्या काड्या गोळा करायच्या, त्या सुबक पद्धतीनं विणायच्या
 आणि सुंदर घरटं बनवायचं. अंड्यातून पिल्लं बाहेर आल्यावर त्यांचं संगोपन करायचं,
 त्यांना कुठून कुठून आणून खायला घालायचं... 
आणि ही सगळी कामं ती बिनबोभाट करत असते. 
आम्हांला म्हातारपणी मुलांनी सांभाळावे ही तिची अपेक्षा नसते की
 आपल्या मुलांनी आपलं नाव जगभर गाजवावं ही इच्छा नसते.
आपल्या मुलांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं, 
आकाशात झेप घ्यावी आणि स्वतःचं पोट स्वतः भरावे इतकीच तिची इच्छा असते.
 मूल स्वावलंबी झालं की त्याचा माझा संबंध संपला. त्याचं विश्व त्यानं उभारावं !
कर्तव्य करेन पण कुठल्या मोहपाशात अडकणार नाही.
 ही स्थितप्रज्ञता माणसात कधी येईल ?
आम्ही लहानपणी चिमण्यांची घरटी मोडत असू.
 सुगरणीचे घरटे अर्धे कापून आम्ही ते वासुदेवाची टोपी म्हणून डोक्यावर घालत असू.
 त्यात बऱ्याचदा अंडीही असत. आईचा मार मिळाला तेव्हाच आमचा हा खेळ बंद झाला. 
 आम्ही एवढ्या वेळा घर मोडले तरी कुठलीही चिमणी कधी निराश व्हायची नाही.
 ती नव्या जोमानं नवं घर बांधायची .
 ध्येयावर नजर. 
मी घर बांधणार आणि मुलांना वाढवणार एवढंच ध्येय. 
तिच्या जागी एखादी स्त्री किंवा एखादा पुरुष असता तर ?
 निराश होऊन त्यानं कधीच आत्महत्या केली असती.
चिमण्या पिकावर आल्या की आम्ही गोफणीने दगड मारायचो.
पण चिमण्यांना तो कधी अपमान वाटला नाही.
 त्या पुन्हा पिकावर बसायच्याच.
चिमण्यांकडून मी काय शिकलो ?
कष्ट करा. कष्ट केल्याने कुणी मरत नाही, मुलांना वाढवा, ते तुमचं कर्तव्य आहे.
मुलांवर कोणतंही अपेक्षाचे ओझे टाकू नका, त्यांना त्यांच्या इच्छेने जगू द्या.
आम्ही तुम्हांला वाढवतो तुम्ही आम्हांला सांभाळा असला व्यवहार नको.
अपयशानं खचू नका.
 नुकसान करणाऱ्याच्या ताकदीपेक्षा स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवा.
यश तुमचंच आहे.
स्वतःचं ध्येय गाठायचं असेल तर अपमान गिळायला शिका.
आहे ना चांगली शिकवण ?
म्हणूनच हा लहान पक्षी माझा मोठा गुरु झालेला आहे.

.ツ.....ツ.....ツ.... .ツ....
.ツ.....ツ.....ツ.... .ツ....

आता चिमण्यांची संख्या कमी होत आहे.
चिमण्यांना सहज पाणी मिळत नाही
घरटी बाधायला  जागा नाही म्हणून प्रयत्न केले जात आहेत 
जेणेकरून चिमण्यांची संख्या वाढायला हवी....
.              .*""*.          कृपया
             (   @  #>     मेरे लिए
       _.*".-'..,   )    अपने घर की छत
   .-" . ' _- ._,.-"        पर दाना और
   / ,,,/"   |  |        एक बर्तन में पानी
  / ,,,/     ^  ^           जरूर रखना
/ ,,,/N                    गर्मी बहुत है
                           आपकी चिड़िया..

असं विनंती करायची वेळ चिमणीवर आली आहे....

Wednesday, 9 March 2016

पाणी.... जीवन


पाण्याची टंचाई आताच जाणवू लागली आहे.. 

अनेक उपाय शोधले जात आहेत, सुचवले जात आहेत....
चला आज पासुन नविन सुरवात करूया
 छोट्या ग्लासाने पाणी पिऊया पाणी कमी पडले तर 
परत पाणी घेऊ शकतो
 पण
 तहान कमी असेल तर मोठ्या ग्लासमध्ये उरलेले पाणी फेकुन द्यावे लागते
 आज वाचवणार तर उद्या मिळ्णार.
पाणी पण जपून वापरा.!

पाण्यामुळे तुमचा "भविष्यकाळ"

सुरक्षीत राहणार आहे.
पाण्यासाठी.....

मला काही सुचलंय....

★आपण डाळ तांदुळ धुतो,
कडधान्य, भाजी धुतो ते पाणी जमा करून झाडांना घालू शकतो
★कपडे धुतल्यावर ते पाणी घरासमोरील अंगणात शिंपडले तर .... धूळ उडणार नाही
पाण्याचा सदुपयोग होईल.
★तोंड धुतांना तपेलीने पाणी वापरले तर....
★घासलेली भांडी विसळतांना नळ थोडासा लहान ठेवून भांडी विसळता येतील.
★लादी पुसतांना अर्धी बादली पाणी घेऊन पुसता येईल.
★स्वयंपाक घरातील सिंकमधे एखादं पातेलं, टब ठेवला तर...
.सतत हात धुतो, कपबशा विसळतो ते पाणी.. झाडांना घालता येईल.
पाणी वाचवायचं म्हटलं की अनेक गोष्टी लक्षात येतील पाणी वाचवण्याच्या.!
आपण मुंबईत राहतो... 
त्यामुळे आपल्याला पाणी टंचाईची कल्पना येत नाही,
 नळ सुरू केला की पाणी मिळतं आपल्याला.
पण अजुनही खुप लांबून पाणी आणतात लोक.
कुठे दोन दिवसांनी पाणी येतं.

तर कुठे आठ दिवसांनी पाणी येतं.

असं ऐकलं की वाटतं...

 पाणी कसं जपून वापरावं हे शिकावं यांच्याकडून.!

कष्ट न करता जेव्हा एखादी गोष्ट मिळते तेव्हा त्याची किंमत कळत नाही.. 
तसंच आहे पाण्याच्या बाबतीत.!
पुर्वी विहिरीवरून पाणी आणत.
म मशीन बसवलं आणि घरात नळ बसवले.
पाणी कष्ट न करता मिळू लागलं.
मुंबईत घरात पाणी साठवण्याच्या टाक्या बसवल्या. नळावरची भांडण, रांगा संपल्या.
सहज तोंड धुतांना नळ चालुच ठेवून तोंड धुतो.
नळाला पाणी आलं की अगोदर भरलेलं पाणी ओतून ताजं पाणी सहज भरू लागलो.
दहापंधरा रुपयात पिण्याचं पाणी विकत मिळू लागलं 
म घरून पाण्याची बाटली भरून नेणं बंद झालं 
आणि 
पाणी बाटलीत शिल्लक असलं तरी ती तेथेच फेकून देणं वाढलं....
मुंबईत जेथे अजूनही विहिरी असतील तेथील पाणी नक्कीच वापरता येईल...
त्यावर मशीन बसवुन इमारतीला पाणी पुरवठा करता येईल.

मे महिन्यात आपण गावाला जातो...

 तेथे जर आपण पाणी भरलं..
 विहिरी कशा कोरड्या होतात...
 किती लांबून पाणी आणावं लागतं हे अनुभवलं तर.... 
पाणी किती जपून वापरलं पाहिजे हे कळेल.

आणि पाण्याला जीवन का म्हणतात ते समजेल.!

आताच नद्यांचं पाणी आटलंय!
(कृष्णा नदी अगदी कोरडी... नदीचे पात्र चालत ओलांडले.. असं परवाच कुणीतरी सांगत होतं.)
नद्या अगदी कोरड्या आहेत असं कळलं...
तर मे महिन्यात काय होईल??
आताच वेळीच पाणी टंचाईचा धोका ओळखून उपाय योजा... 

मी एकट्याने करून काय होणार म्हणून दुर्लक्ष करू नका... 

नाहीतर डोळ्यातून पाणी यायची वेळ येईल.

.....……………….……………
︶  ︶   ︶  ︶  ︶   ︶…………………………………..
︶  ︶   ︶  ︶  ︶  ︶
………...…………………………

एक भयानक वास्तव....







Sunday, 6 March 2016

आज महाशिवरात्र



 माघ कृष्ण त्रयोदशी 

 सोमवार 

|| ॐ नमो कुणकेश्वराय नमः ||

 देवगड … कोकणची काशी 

 

दोन तीन वेळा येथे जाण्याचा आणि दर्शनाचा योग आला.
नजरेसमोरून हलत नाही येथील सौंदर्य.....
अरबी समुद्र आणि हे सुंदर मंदिर ...
पण प्रत्येकवेळी जरा घाई गडबडच झाली.
 प्रत्येकवेळी मनात येतं...
 परत शांतपणे येण्याचा योग नक्कीच असेल
असो.... 
धावती का असेना पण
 या आवडत्या ठिकाणी जायला तर मिळतंय.!
~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~

|| श्री देव कनकेश्वर ||

मंदिराबद्दल.....
अलिबागजवळील मंदिर.
हे ना माझ्या आजीच्या माहेरचं कुलदैवत.!
किहिम गावाजवळ आहे.
आम्ही काही वर्षापुर्वी जाऊन दर्शन घेऊन आलो... 
सुंदर निसर्ग सौंदर्याने नटलेला हा परिसर.....
चढ चढून जायचं
दमछाक होत होती.
जवळ जवळ सातशे पायऱ्या....
पण येथील मज्जा सांगते....
वाऱ्याचा मस्त आवाज ऐकू येत होता...
मंदिर एकदम सुरेख.!
पुन्हा पुन्हा जावं असं.!
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

         || रामेश्वर ||

मंदिर पेण जिल्हा रायगड
अगदी लहानपणापासून बघत आले आहे असं मंदिर
संपूर्ण काळ्या दगडाचं,
उत्तम कोरीवकाम केलेले...
भव्य असं हे शंकराचं मंदिर..
शंकराचं मंदिर कसं असावं?
अगदी तसंच.
मंदिरात काळोख, बाजुलाच खोल विहिर, मंदिरात हंड्या झुंबरं.... 
खुप शांतता....
वर्दळ अगदी कमी....

मंदिर बाहेरून बघताक्षणीच आपण प्रेमात पडतो....

०००००००००००००००००००००००००

       || महेश्वर ||

अहिल्याबाई होळकर यांचे नर्मदा तीरावरील शंकर मंदिर
मध्यप्रदेश.. महेश्वर
व्वा.... किती सुंदर मंदिर... 
अगदी शंकराचं मंदिर जसं हवं तस्संच... 
अगदी तेथून हलुच नये असं.
 पण येथे सुद्धा आम्ही संध्याकाळी गेलो होतो.
महेश्वर येथे.
अहिल्याबाई स्वत: शिवभक्त, शिवउपासक.
खुप सुंदर अनुभव आहे...
नर्मदा नदीवर सुंदर घाट आहे.
मंदिराचे प्रतिबिंब नदीमधे सुंदर दिसते.








{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}
तसं मी जी बारा ज्योतिर्लिंग आहेत त्यातील....
आंध्र प्रदेश श्रीशैल्य मल्लीकार्जुन
उज्जैन - महांकाल
मध्यप्रदेश - ॐकारेश्वर
परळी - वैजनाथ
पुण्याजवळ -भीमाशंकर
नाशिक - त्र्यंबकेश्वर
तामिळनाडू - रामेश्वरम्
वाराणसी - काशीविश्वेश्वर
औरंगाबाद - एलोरा घृष्णेश्वर
औंढ्या नागनाथ
याठिकाणी जाऊन आले आहे.

येथे मात्र खुप सुंदर शांतपणे दर्शन झाले आहे.

<><><><><><><><><><><><><>
तसेच

 गुहागर येथील व्याडेश्वर 

येथे थोडं गडबडीतच दर्शन झाले.

हे आमचे कुलदैवत....

हे समुद्रकिनारी असलेलं मंदिर.!
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
आणि अगदी लहान असतांना ....
 जेव्हा माझ्या वडिलांनी सोळा सोमवार व्रत केले होते.

 जे आमचं गाव..

 महाड (रायगड) येथील विरेश्वर मंदिर..

असंच संध्याकाळी गेलो होतो.
 तळ्याकाठी असलेलं मंदिर... 
वडिलांनी तेथे केलेली पूजा... 
आम्ही सगळे पांढरे शुभ्र कपडे परीधान करून गेलो होतो...
. कुटुंब मोठं असल्यामुळे खुप जण गेलो होतो. 
पुजेनंतर घरी आलो आणि 
 माजघरातल्या कोनाड्यात नागाने दर्शन दिले होते.
 एवढंच आठवतंय.
नंतर मात्र जाण्याचा योग आला नाही.
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••

जेजुरी येथे जाऊन आले दोन वेळा... 

एकदा तर नुसतंच कळस दर्शन ..
कारण महाशिवरात्रीच्या दिवशीच गेलो होतो..
 दिवसभर उभं राहूनही दर्शन झालं नसतं
आणि दुसऱ्या वेळी वेळच नव्हता....
फक्त खिडकी दर्शन.!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
अशा बऱ्याच ठिकाणी शिवाची मंदिरं.... 
 जेथे मी जाऊन आले आहे.

आणि हो... घराजवळच असणारं

भवानी शंकर मंदिर.









∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞

|| द्वादशज्योतिर्लिङ्गस्तोत्रम् ||

सौराष्ट्रे सोमनाथं च
श्रीशैले मल्लिकार्जुनम्
उज्जयिन्यां महाकालमोंकारम्
अमलेश्वरम् ||१||
परल्यां  वैद्यनाथं च डाकिन्यां भीमशंकरम्
सेतुबंधे तु रामेशमं नागेशं दारुकावने ||२||
वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमीतटे
 हिमालये तु केदारं घृषणेशं शिवालये ||३||
एतानी ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरः
 सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति || ४||
********************************

!! शंभो ॐ नमः शिवाय शिवाय नमः !!

********************************