छान गाणी ऐकत आहे.
चंद्र-चांदणे याचा उल्लेख असणारी.
आणि व्हाटसअप friends बरोबर गप्पा.
आयती भेळपुरी शेवपुरी आणली आणि
घरात असलेल्या (इन मीन तीन) तिघांनी खाल्ली.
चंद्र कधी दिसेल याची वाट बघत आहे.
आणि आठवणीतल्या कोजागिरीत चौपाटीवर चांदण्यात खेळलेले खेळ!
आई, अण्णा, मामा, मावशी, भाऊ, मावस भावंडे मित्र मैत्रीणी...पंचवीस तीस जण
तरी असू. एकत्र बसून भेळ, उकडलेल्या शेंगा, गोळ्या काकड्या....
खेळून दमल्यावर
गाण्याच्या भेंड्या...
कोजागिरी म्हणून पांढरे शुभ्र कपडे.!
घरी आल्यावर ....
घराच्या खिडकीतून येणाऱ्या चांदण्यात ठेवलेले आटीव मसाला दूध!!!
ते ब्रह्म मुहूर्तावर प्याले जायचे.
वाह...
काळ बदलला मोठे झालो
म दरवर्षी काहींना काही वेगळेपण येत गेले कोजागिरी साजरी करण्यात...
त्यातही मजा आनंद आहेच.
कधी भेळ पुरी आणि कलिंगड.
कधी पाणीपुरी ice-cream
कधी बटाटे वडे
पण मसाला दूध.... असणारच
मधल्या काळात अश्विनी साजरी करतात असे कळले.
औक्षण करणे म्हणजे औक्षवंत हो.!
म मुलांचे औक्षण करू लागले.
हे यांना झालेले चंद्र दर्शन!
उगवला कोजागिरीचा चंद्र
सांडलं टिपुरभर चांदणं
सुख-समृद्धीने भरोत
तुमच्या घरातील रांजण
मला मात्र प्रत्यक्ष दर्शन आताच झाले... मध्य रात्री
ढगाळ वातावरण
आणि अगदी डोक्यावर चंद्र..
बघू सकाळी वॉकला गेले तर....
कसे होते चंद्र दर्शन????
::::::::::::::::::::::::::::::::::::::::
आता माहितीपूर्ण आलेले मेसेज...
.जे कायम आपल्या जवळ असावेत(संग्रही) असे वाटते असे मेसेज......
::::::::::::::::::::::::::::::::::::::::
कोजागरी पौर्णिमा
(शरद पौर्णिमा)
★ कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ असतो.
या दिवशी रात्री लक्ष्मी आणि इंद्र यांची पूजा केली जाते. मध्यरात्री
लक्ष्मी पृथ्वीतलावर येऊन जो जागा आहे, त्याला धनधान्य आणि समृद्धी प्रदान
करते, अशी कथा आहे. या दिवसाचे महत्त्व आणि पूजाविधी या लेखातून समजून
घेऊया.
★ तिथी
● कोजागरी पौर्णिमा हा उत्सव आश्विन पौर्णिमा या तिथीला साजरा करतात.
★ इतिहास
● या दिवशी भगवान श्रीकृष्णाने व्रजमंडळात रासोत्सव साजरा केला, असे श्रीमद्भागवतात म्हटले आहे.
★ महत्त्व
● वर्षातील या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वांत जवळ असतो आणि त्यामुळे तो
मोठा दिसतो.
मूळ चंद्रतत्त्वाचे म्हणजे ‘चंद्रमा’चे प्रतिनिधित्व करणारा
आणि
आपल्याला दिसणारा चंद्र ‘चंद्रमा’प्रमाणेच शीतल आणि आल्हाददायक आहे.
साधकांना चंद्रासारखी शीतलता ईश्वराच्या अवतारांपासून अनुभवता येते,
म्हणूनच रामचंद्र, कृष्णचंद्र अशीही नावे राम-कृष्णांना दिली गेली.
चंद्राच्या या गुणांमुळेच
‘नक्षत्राणामहं शशी’ म्हणजे ‘नक्षत्रांमध्ये मी चंद्र आहे’,
असे भगवान श्रीकृष्णाने श्रीमद्भगवद्गीतेत (१०:२१) सांगितले आहे.
● मध्यरात्री श्री लक्ष्मी चंद्रमंडलातून भूतलावर येऊन ‘को
जागर्ति’ म्हणजे ‘कोण जागे आहे ?’, असे विचारून जो जागा असेल, त्याला
धनधान्याने संतुष्ट करते.
● या दिवशी ब्रह्मांडात आदिशक्तीरूपी धारणेतील
श्री लक्ष्मीरूपी
इच्छाशक्तीची स्पंदने कार्यरत असतात.
या दिवशी धनसंचयाविषयी असलेल्या सकाम
विचारधारणा पूर्णत्वाला जातात.
या धारणेच्या स्पर्शाने स्थूलदेह,
तसेच
मनोदेह यांची शुद्धी होण्यास साहाय्य होऊन मनाला प्रसन्नधारणा प्राप्त
होते.
या दिवशी कार्याला विशेष असे धनसंचयात्मक कार्यकारी बल प्राप्त होते.
● या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वांत जवळ,
म्हणजे कोजागरी पर्वतालगत आलेला
असतो.
त्यामुळे या पौर्णिमेला ‘कोजागरी पौर्णिमा’ म्हटले जाते.
● कोजागरी पौर्णिमेला वातावरणात प्रक्षेपित होणार्या लहरी
लहरी
प्रमाण (प्रतिशत)
भाव
२५
चैतन्य
२०
आनंद
३०
शांती
२५
एकूण
१००
४. भावार्थ
● कोजागरीच्या रात्री जो जागृत आणि सावध असतो,
त्यालाच अमृतप्राशनाचा लाभ मिळतो.!!!
कोजागर · को ± ओज ± आगर.
या दिवशी चंद्राच्या किरणांद्वारे सर्वांना आत्मशक्तीरूपी (ओज) आनंद,
आत्मानंद, ब्रह्मानंद भरभरून मिळतो;
परंतु हे अमृत प्राशन करण्यासाठी ऋषी
म्हणतात,
‘को जागर्ति ?, म्हणजे कोण जागृत आहे ? कोण सावध आहे ? कोण याचे माहात्म्य
जाणतो ?
जो जागृत आणि सावध आहे आणि ज्याला याचे माहात्म्य ठाऊक आहे,
त्यालाच या अमृतप्राशनाचा लाभ मिळेल !’ –
प.पू. परशराम पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
• उत्सव साजरा करण्याची पद्धत
●‘या दिवशी नवान्न
(नवीन पिकवलेल्या धान्याने) जेवण करतात.
श्री लक्ष्मी आणि ऐरावतावर बसलेला इंद्र यांची रात्री पूजा करतात.
पूजा झाल्यावर पोहे आणि नारळाचे पाणी
देव आणि पितर यांना समर्पून नंतर नैवेद्य म्हणून ग्रहण करतात
आणि मग आपल्याकडे आलेल्या सर्वांना देतात.
शरद ऋतूतल्या पौर्णिमेच्या स्वच्छ चांदण्यात दूध आटवून चंद्राला आटीव
दुधाचा नैवेद्य दाखवतात
आणि नंतर नैवेद्य म्हणून ते दूध ग्रहण करतात.
चंद्राच्या प्रकाशात एकप्रकारची आयुर्वेदिक शक्ती आहे.
त्यामुळे हे दूध
आरोग्यदायी आहे.
या रात्री जागरण करतात. करमणुकीसाठी निरनिराळे बैठे खेळ खेळतात.
दुसर्या दिवशी सकाळी पूजेचे पारणे करतात.
● कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी आणि इंद्र यांचे पूजन करण्याची कारणे
• या दोन देवतांना पृथ्वीवर तत्त्वरूपाने अवतरण्यासाठी चंद्र आग्रहात्मक आवाहन करतो.
•• लक्ष्मी ही आल्हाददायक आणि इंद्र ही शीतलतादायक देवता आहे.
यादिवशी वातावरणात या दोन देवता तत्त्वरूपाने येत असल्याने आणि त्यांचे
तत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत असल्याने त्यांची पूजा केली जाते.
••• लक्ष्मी आणि इंद्र यांचा पूजाविधी
•••• लक्ष्मी आणि इंद्र यांच्या पूजेत पोहे आणि नारळाचे पाणी वापरतात.
पोहे हे आनंद देणारे,
तर नारळाचे पाणी हे शीतलता प्रदान करणारे आहे.
त्यामुळे हे दोन घटक वापरून
जीव स्वतःकडे आनंद आणि शीतलता यांच्या लहरी आकर्षित करत असतो.
● चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवतात;
कारण या दिवशी दुधात चंद्राचे प्रतिबिंब पाहिल्याने त्यातून प्रक्षेपित
होणारे चंद्रतत्त्व आपल्याला मिळते.
या दुधात स्थूल आणि सूक्ष्म रूपांतून
चंद्राचे रूप अन् तत्त्व आकर्षित झालेले असते.
● जागरण :
मध्यरात्री लक्ष्मी चंद्रमंडलातून भूतलावर येते
आणि
जो जागा असेल, त्याच्यावर संतुष्ट होऊन त्याला कृपाशीर्वाद देऊन जाते.
त्यामुळे कोजागरीच्या रात्री जागरण केले जाते.
✺✺✺✺✺✺✺✺✺✺✺✺✺✺✺
कोजागरी पौर्णिमा
कोजागिरी पौर्णिमा काय सण आहे हे आजकाल कोणाला विचारले तर नक्कीच
७०% लोकांना सांगता येणार नाही ..(शोकांतिका) आणि ती चुकीच्या पद्धतीनेहि
साजरा करतात...बरेच जण दूधात दूध मसाला टाकून गरम करून पितात...म्हणजे
त्यांना वाटते कोजागिरी साजरी झाली. काही मंडळ तर हा दिवस सोडून सवडीनुसार
इतर दिवशी ती साजरा करतात , एंजॉय करतात.
आपल्या धर्मात आपल्या पूर्वजांनी
वैज्ञानिक दृष्ट्या विचार करून सण सुरु केले आहेत.
ते आपण योग्य पद्धतीने
साजरे केले तर नक्कीच त्याचा आपल्याला फायदा होईल.
कोजागिरी विषयी माहिती:-
--------------
आश्विन पौर्णिमा ही कोजागरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते.
यास 'माडी पौर्णिमा/(पुनेव)'असेही म्हणतात
ही शरद ऋतूतील आश्विन महिन्यात येते.
इंग्रजी महिन्याप्रमाणे कोजागरी पौर्णिमा बहुधा ऑक्टोबरमध्ये असते.
या दिवशी दूध आटवून त्यात केशर, पिस्ते, बदाम,चारोळ्या,
वेलदोडे, जायफळ वगैरे गोष्टी घालून, तसेच साखर घालून, लक्ष्मीदेवीला
नैवेद्य दाखविला जातो.
दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात
आणि ते दूध मग प्राशन केले जाते.
उत्तररात्रीपर्यंत जागरण केले जाते.
अशी
आख्यायिका सांगतात की उत्तररात्री साक्षात लक्ष्मीदेवी येऊन (संस्कृतमध्ये)
'को जागर्ति' (म्हणजे 'कोण जागत आहे') असे विचारते,
म्हणून या दिवसाला 'कोजागरी पौर्णिमा' म्हणतात.
या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो.
या दिवशी
दम्यावरचे आयुर्वेदिक औषध घेण्याची पद्धत आहे.
या दिवशी घेतलेले औषध लवकर
लागू पडते असा समज आहे.
कोजागरी पौर्णिमा
★ गुजरातमध्ये रास व गरबा खेळून शरद पुनम नावाने साजरी केली जाते.
★ बंगाली लोक याला लोख्खी पुजो म्हणतात व या दिवशी लक्ष्मीची पूजा करतात.
★ मिथिलेमध्ये या रात्री कोजागरहा पूजा केली जाते.
या दिवशी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ अपत्याला ओवाळून
त्याची किंवा तिची 'आश्विनी' साजरी करतात.
आश्विन महिन्यात मध्यरात्रीला असणाऱ्या पौर्णिमेला कोजागरी
पौर्णिमा म्हणतात.
तशी पौर्णिमा आली नाही तर दुसऱ्या दिवशीच्या पौर्णिमेला
कोजागरी पौर्णिमा समजले जाते.
ज्या दिवशी पौर्णिमा पूर्ण होत असेल त्या
दिवशी नवान्न पौर्णिमा साजरी केली जाते.
कोजागरी हा शब्द मराठीत, अनेकजण कोजागिरी असा उच्चारतात आणि लिहितात.
------------------------
# कोजागिरी.
को जा गरती,
म्हणजे कोण जागे आहे,
असे लक्ष्मी विचारते. म्हणजेच कोण जागे आहे,
कोण आपले
कर्तव्याला जागे आहे,
त्याला लक्ष्मी धन देते म्हणून आपण कोजागिरी सण
साजरा करतो.
कोजागिरी पौर्णिमा हा सण मोठ्या उत्सहाने साजारा करतात.
ही पौर्णिमा पावसा
नंतरची पहिली पौर्णिमा असते हिला अश्विन पौर्णिमा म्हणतात,
पावसात आकाश
स्वछ नसते परंतु या पौर्णिमेला आकाश खूप दिवसानंतर स्वछ आणि सुंदर दिसते.
त्यामुळे याचा आनंद घेता यावा व याचे स्वागत करावे म्हणून हा सण साजरा
करतात.
या दिवशी पोहे व शहाळ्याचे पाणी प्रसाद म्हणून वापरतात.
शेतकरी या दिवसात आपली सर्व कामे संपवून घरी बसून आराम करत असतो
या दिवशी
रात्री दुध गरम करून त्यामध्ये चंद्राला पाहतात.
कारण दुध ही पांढरा शुभ्र
असते व चंद्र ही त्या दिवशी ९९ . ९९ % प्रकाशित असतो,
त्यामुळे ही आपली
प्रथा आहे.
चंद्र या दिवशी ३ लक्ष ८५००० किलो मीटर अंतरावर असतो.
त्यामुळे
या रात्री वातावरण छान असते
आकाश खुले असते
म्हणून ही रात्र मौजमजा
करण्याची असते.
(मा.सोर्स-इंटरनेट. )
ㆁㆁㆁㆁㆁㆁㆁㆁㆁㆁㆁㆁ
कोजागिरी पौर्णिमा
को जागरति
को जागरवान्
को जागर्ति?
जागा कोण आहे?--
हा प्रश्न करीत प्रतिवर्षीं कोजागिरी येत असते.
मी व तुम्ही - आपण जागे आहोंत काय?
महा्राष्ट्र जागा आहे काय?
दसरा किंवा दीपावलि यांचेपेक्षांही
'कोजागिरी' अधिक प्राचीन आहे.
ऋग्वेदांतील ६० व्या मंडलांतील कांही उल्लेखांवरून एक न्याय्य अनु्मान निघतें.
अश्वयु्गमास म्हणजे अश्विन.
या महिन्यांतील पौर्णिमेला एक पाकयज्ञ करावयाचा
असतो.
नवे तांदुळ व गोदुग्ध यांची प्रस्तुत पाकयज्ञात हव्रिर्द्रव्य
म्हणून आवश्यकता असते.
सूत्रकारांनी व निबंधकारांनी सात सांवत्सरिक पाकयज्ञांचा निर्देंश केला
आहे.
अष्टक, पार्वण, श्राद्ध, श्रावणी, आग्रयण, चैत्री व अश्वयुजी.
धर्मसिंधु्कारांनी कोजागिरीच्या दिवशीं
लक्ष्मी व इंद्र यांचे पूजन,
नारिकेल-उदकपान,
नवान्न-भक्षण इ. विधींचे उल्लेख केलेले आहेत.
कोजागरी हा शब्द मराठीत, अनेकजण कोजागिरी असा उच्चारतात आणि लिहितात.
यास्तेषामं स्वैरकथा ता एव भवन्ति शास्त्राणि !!
ऋषीचे अवतारच जगत कल्याणाकरीताच होते
अंखङ मानव व
समाजावर अंतःकरणापासुन प्रेम होते
ऋषिमुनीना हे संपुर्ण विश्वच ईश्वराचे वाटत होते
जशी एखादी पतिव्रता स्री पतिचे घर स्वच्छ आणि चांगले ठेवण्याचा प्रयत्न करते
तसे ऋषीमुनीही सतत हे काम करत असतात
जगाचा कळवळा होता म्हणून त्यांना कधीकधी व्यथाही सहन करावी लागली.
त्यांची समाजाप्रती असलेली निष्काम भावना
व
बुद्धी ईश्वराला समर्पित केल्याने त्यातूनच भक्तिरूपी कन्येचा जन्म होतो
ऋषि सामर्थ्यवान असुनही स्वतःला मंत्रकर्ता न समजता मंत्रदृष्टा समजतात
ते खरे समजाचे आप्तजन आहेत
त्यांच्या सहज वाणीतून जगताच्या कल्याणाकरीता जे शब्दरूपी रत्न बाहेर पडले
हि जगतातील निर्विवाद घटना आहे
अशी ऋषींची महान परंपरा आपल्या देशाला लाभलीय
माऊली महावैष्णव या परंपरेच वर्णन करतात
वेदमार्गे मुनी गेले
तेची मार्गे चालीलो
अशी हि महान ऋषीपरंपरा!
๑๑✧๑́๑✧๑́๑✧๑́๑✧
वाटे मनास जेव्हा
घ्यावा जरा विसावा
खिडकीतुनी समोरी
शशी हासरा दिसावा
आभाळ तारकांचे ☆☆☆
खाली झुकुन यावे
ओढाळ आठवांचे
जमती मनात रावे.
ही रात्र धुंद वेडी
गंधात चिंब व्हावी
स्वप्नातल्या सुखांना
तेव्हाच जाग यावी !
चंद्राच्या साक्षीने मिळाली
आटीव मसाले दुधाची मेजवानी ….
कोजागिरीच्या रात्रीने लिहिली जागरणाची कहाणी.
!✿! कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !✿!
♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡