Saturday, 24 December 2016

सांताक्लॉज.....



Santa Clause ....

२३,२४ डिसेंबर.... घरात हे गाणे म्हटले जायचे

सांताक्लॉज सांताक्लॉज आमच्या घरी या.!

येताना खूप सारी खेळणी खाऊ घेऊन आमच्या घरी या.!

 

 

 

 

अस छोटे म्हणत

आणि रात्री मोजा बांधत.

आणि खरोखरच सॅन्टा यायचा






 आणि मुलांनी जे चिट्ठीत लिहिलेले असे ते त्याना बांधलेल्या मोजात मिळत असे.!

        आमच्या घरी हे आमचा मुलगा न कळत्या वयात असताना घडत असे
जवळ जवळ तीन वर्ष.! त्या पूर्वी आम्हीच मोजा बांधत असू असू खाऊ खेळणी त्यात ठेवत असू

तिसऱ्या वर्षी तो थोडा समजदार झाला. 
आणि रात्रभर जागरण करत होता कि खरच सॅन्टा येतो का....
 तो कसा दिसतो??
तो किती वाजता येतो???
तो आम्हाला विचारत होता
कि तुम्हीच ते ठेवता ना....

मला माहित आहे ... बाबा तुम्हीच ते माझ्यासाठी आणता.!

त्या वर्षी त्याने मोज्यात video गेम हवा असे लिहिले होते आणि गेमची त्याला हवी असलेली cd.!!!

तो गेम आम्ही आणला, पण...

हा काही झोपेना.!!!!!

आणि आम्हाला काही तो गेम मोज्याजवळ ठेवता येईना....
तरी हळूच बाहेर जाऊन तो दरवाजाजवळ ठेवला आणि ठेवताना मात्र त्याच्या लक्षात आले...

कि सॅन्टा म्हणजे माझे बाबाच आहेत.!!!!

पण video गेम मिळाल्याचा फार मोठा आनंद त्याला झाला होता... 

आणि santa म्हणजे माझे बाबाच.!

या पेक्षा दुसरा कोणता आनंद मोठा असणार??

आजही त्याने तो video गेम जपून ठेवला आहे.

(हे सगळे मुलं निरागस असे पर्यंत घडत असते.)



खरोखरच असा एक सांताक्लॉज
दर बुधवारी सकाळी 10 वाजता न चुकता येतो... टाळ चिपळ्यांचा आवाज आणि....
मुखाने येणारे शब्द....

माउली संताघरी साऊली
तुळस वंदावी वंदावी माउली.!





आणि सगळ्यांना आशीर्वाद देतो.!!

Tuesday, 13 December 2016

भगवद् गीता....१८ वा अध्याय


श्लोक १ ते ४०



आदित्यने सीए परीक्षा दिली त्यावेळी.... 
आई आता तू काय करणार ???
 आपण गीता पाठ करू या असे बोलणे झाले.

आमच्या मावशी या गीता खूप सुंदर म्हणतात.

म त्यांना दोन अध्याय पाठवा असे सांगितले
त्यांनी लगेच १२ वा १५वा असे साधारण सगळ्यांना येतात असे आणि  १ला असे तीन अध्याय निरूपणासह पाठवले. पुस्तक पाठवले...

पण.... 

पहिलाच अध्याय वाचायला घेतला आणि....
पहिले दोन शब्द 

धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे....

बघूनच कोणाच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाशिवाय गीता म्हणता येणार नाही हे समजले...

आणि लवकरच तो योग आला.

आपल्या दादर चे 
श्री. श्रीकृष्ण जोशी यांचे मार्गदर्शन मिळू लागले.
फार सुंदर संथा देतात.
म पहिला अध्याय सुरु झाला.

वर्गाची गोडी लागली आणि बघता बघता पहिला अध्याय संथा देऊन झाला.

आणि मी तो पाठ केला.

म सहावा अध्याय ..... 

कारण तो दादर विठ्ठल मंदिरात स्पर्धा होणार म भाग घेता यायला हवा म्हणून संथा द्यायला सुरुवात झाली
हा आत्मसंयम योगावर आहे.. तो पण पाठ करत होते, पण मधेच कुठेतरी गेले आणि पाठ करण्याचे राहिले

पुढे १८ वा अध्याय डिसेंबर मध्ये स्पर्धेसाठी असणार म्हणून त्याची संथा.!

ते पण पाठ करू लागले रोज १, ६, १८ असे म्हणू लागले.

२० श्लोक पाठ झाले.
तो पर्यंत २, ३, ४, ५, ७ असे अध्याय संथा देऊन झाले.
जमतील तसे श्लोक पाठ करत होते.
उच्चाराकडे लक्ष देत होते.

एक दिवस मार्गदर्शन करणाऱ्या ताई म्हणाल्या

तुम्ही योगा शिक्षक आहात,

तर तुम्ही सहावा अध्याय पाठ केला पाहिजे.

म सहावा अध्याय पाठ केला.

म १८ वा अध्याय थोडे श्लोक पाठ होते आणि रोज म्हणत होते त्यामुळे शब्द तोंडी बसले होते.

म वर्गात सूचना आली कि जे भाग घेणार आहेत

 त्यांनी सरांसमोर म्हणावे म्हणजे

 जे योग्य नसेल त्याचे मार्गदर्शन मिळेल आणि स्पर्धेची तयारी होईल....

सर खूपच सुंदर मार्गदर्शन करतात.!

आणि स्पर्धेचा दिवस आला.
१० डिसेंबर... २०१६

गीता जयंती

मी ब्राह्मण सभा गिरगाव येथे  गेले.! 
(आधीच म्हणजे मी पाठ केले तेव्हा  माझ्या voice  मध्ये कोणाला पाठवले होते त्यापैकी अजून दोनचार जणांनी सुंदर मार्गदर्शन केले होतेच.)

ते लक्षात ठेवले. आणि माईक समोर उभी राहिले.

* हे भगवंताचे शब्द आहेत.

* हे शांतपणे, म्हणायचे.!

* गोड आवाजात म्हणायचे.

त्याप्रमाणे भगवंताचे स्मरण करून, 
सरांना मनोमन नमस्कार करून अध्याय म्हणायला सुरुवात केली
अध्याय म्हटला....
समोर बसलेले स्पर्धक, आमचे मार्गदर्शक यांनी टाळ्या वाजवल्या आणि खूप छान म्हटल्याचे सांगितले....
मला तर खूपच आनंद झाला होता....
 आयुष्यात प्रथमच मी माईक समोर उभे राहून स्पर्धेत भाग घेऊन छान म्हटले.!
बघायला गेले तर सगळेच छान म्हणत होते.
पण काल result लागला तो आज मी बघितला


आणि मला तृतीय पारितोषिक मिळाले.

आज गीता वर्ग होता.... जरा उशिराच गेले वर्गात.... (बाहेर गेले होते)
सगळ्यांनी कौतुक केले.
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
आज दत्तजयंती.
आजचा दिवस खूप आनंदाचा आहे.

घरच्यांचे पाठबळ,

तुम्ही माझे सगळे... तुमच्या सदिच्छा.! 

सरांचे सुंदर संथा देणे, आमच्या मार्गदर्शक ताई.! 
यामुळेच मला धीटपणा आला, पाठ करावे वाटले आणि तेथे जाऊन म्हटले.....

मी म्हटलं ना मला दोनचार जणांनी छान मार्गदर्शन केले ते.....

आता पहिला मार्गदर्शन

कॉन्शसली उच्चार करू नकोस, सहजता आपोआप रोज म्हणून येईलच.
ब्राह्मणी अतिस्पष्ट उच्चार असावेतच पण थोडा गोडवा तुझ्या नेहमीच्या आवाजा सारखा आला तर .....
ऐकणारा खूष होईल आणि पठण संपूच नये असे वाटेल. 
तेव्हा रोज मुलांना गोड आवाजात म्हणून voice मधून पाठवतेस तसं म्हणायचा सराव कर.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~

आता दुसरा......

हिम्मत म्हणजे मन आणि डोके शांत
 ठेऊन स्टेजवर उभे राहायचे,
आणि आपण स्टेजवर कशासाठी उभे आहोत त्याकडेच एकाग्र व्हायचे.
आणि शांतपणे श्लोक म्हणायचे.!
••••••••••••••••••••••••••••••••••••••••
अजूनही काही... म्हणत होते तुम्ही छान म्हणाल बक्षीस मिळेल.
मला फक्त स्टेजवर उभे राहून छान म्हणायचे होते.

आपली चांगली इच्छा नेहमी पूर्ण होते. हेच देवाचे आशीर्वाद.!!!!!



°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
ब्राह्मण सभा
भगवद्गीता १८ वा अध्याय 
१ते ४० श्लोक स्पर्धा

मला तृतीय बक्षीस मिळाले.

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

Monday, 5 December 2016

चलनातून बाद झालेल्या नोटेचे आत्मवृत्त.!

एक मेसेज आला↓↓↓

आज आम्ही शाळेत असतो तर निबंधांचे विषय असते.....
१) ए.टी.एम्.च्या रांगेत दोन तास
२) मी भारताचा पंतप्रधान झालो तर
३) बँक-कॅशिअरचं मनोगत
४) चलनातून बाद झालेल्या नोटेचं आत्मवृत्त
५) मला पडलेलं स्वप्न, मी डेबीट कार्ड झालोय.
*******************************

हा मजेचा मेसेज आला आणि मनात आलं लिहावं काही यावर

*******************************
चला, लिहा निबंध.....
 निबंध लिहिला आहे↓↓↓

चलनातून बाद झालेल्या नोटेचे आत्मवृत्त...✍

     मी आहे 500 ची नोट

चलनातून बाद झालेली.!

तुम्हाला माहित आहे माझा जीव घुसमटत होता

कुठे आणि कसं ठेवलं जात होतं आम्हाला

काही जणींच्या बाबतीत मात्र पूजन... 
मानाची देवाण घेवाण.!
कोणी पास झालं, कुणाचा वाढदिवस, सूनमुख, नूतन बालकाचं दर्शन...
छान छान प्रसंगी पटकन मला देत असंत. हरी नोट असा छान उल्लेख केला जायचा.!
सहज खरेदी करताना पटकन 500 ची खरेदी.!

माझ्या छोट्या भावंडांना काही किंमतच नाही अस वाटायचं..!!!

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

आणि मी तर खूपच नशीबवान.... 

कारण आता मी नव्या स्वरूपात तुमच्या हाती आले आहे.
माझे नवे रूप सगळ्यांना आवडलं आहे...
★★★★★★★★★★★★★★★
पण...
तू तर नामशेष झालीस.....

ना नव्या रुपात ना नव्या ढंगात.!

एवढं काही स्वतःच कौतुक नको... तुझ्यापेक्षा माझा मान मोठा.... दुप्पट.!
कमी जागेत खोक्या खोक्याने राहत होते मी.!
माझं रंगरूप पण किती छान होतं.

भेट पाकीट उघडलं कि ओह.. 1000 ... कित्ती आनंद होत असे... लोकांना.!

सगळाच व्यवहार पटापट 1000 च्या नोटांनी होत होता. लपवून ठेवण्यास सोप्या..

 आणि तुला माहित आहे का 

पैसे ठेवण्यासाठी 1000 च्या प्रतिकृतीची पाकिटे / वालेट्स निघाली आहेत.

या रुपाने मी लोकांच्या हातात आहे. आणि काही जणांनी माझी स्मृती म्हणून मला घरात जपून ठेवलंय.!
     
     असं ऐकिवात आहे.....
जर या नोटांचा लगदा केला तर... हिमालय पर्वता सारखा पर्वत तयार होईल....

      अस ऐकलंय कि अगदी आम्ही चलनातून बाद झालो असलो तरी

 (आम्हाला) रिसायकल करण्यात येणार आहेत

त्यापासून कॅलेंडर, फाइल्स, बोर्ड इत्यादी तयार करण्यात येणार आहे.
म्हणजे जाळून अगदी कोळसा नाही करणार
हे आमचे नशीब....

मरावे परी कीर्ती रूपे उरावे.!

✽  ✽ ✽  ✽ ✽  ✽ ✽  ✽ ✽ ✽ ✽  ✽ ✽  ✽ ✽ ✽

Friday, 28 October 2016

आज धनत्रयोदशी....


देवांचे वैद्य... धन्वंतरी यांची जयंती....

 

 

 उत्तम आयुरारोग्य लाभावे ...

अशीच प्रार्थना प्रत्येकजण धन्वंतरींच्या चरणी करतात.

आता आरोग्याचा विचार कसा होतो???
सकाळी लवकर उठून सूर्योदयापूर्वी आंघोळ करावी हा विचार या सणाच्या निमित्ताने सांगितला आहे..

आंघोळ कशी करावी...

अभ्यंग स्नान... म्हणजे तेलाने मसाज करणे:
  हिवाळा हा ऋतू सुरु होतो , तिळाचे तेल उत्तम!!!
हवामान कोरडे होते, 
प्रथम जाणीव होते ती ओठ कोरडे पडतात, 
रात्री नकळत तोंडाने श्वास घेऊ लागतो..
नंतर त्वचा... ती कोरडी पडते त्यावर सहज ओरखडा दिसतो

म मसाज केल्याने त्वचेला  स्निग्धता येते

 ती तुकतुकीत होते आणि शरीराच्या प्रत्येक भागाकडे बारकाईने लक्ष दिले जाते.
• मसाजमुळे रक्ताभिसरण चांगले होते.

• असेही दररोज आपल्या

  शरीरात जी भोके आहेत त्याला रात्री झोपताना तेल घालावे... नाक कान बेंबी....
• ओठाला तूप, लोणी किंवा साय लावावी.
• पायाचे तळवे यांना सुद्धा तेल लावावे किंवा काशाच्या वाटीने तळवे चोळावेत.
• डोक्यावर तेल घातले तर अनेकांना शांत झोपेचा अनुभव येतो.

आणि जे पायाचे सांधे आहेत त्यांना तेल लावावे

आंघोळीपूर्वी.!

यामुळे आपोआपच हाताची बोटे, नखे यांना तेल मिळते.

आणि उटणे लावून आपण आंघोळ करतो दिवाळीत.!

यामुळे शरीराला मर्दन तर होतेच आणि सुगंध..! यामुळे मन आनंदी प्रसन्न होते.

आता आरोग्याच्या दृष्टीने विचार करता....

• प्राणायाम .! याला खूप महत्त्व आहे

यातील दीर्घ श्वसन....

 राग आला कि सोपा उपाय... एक ते  दहा अंक मोजा म्हणतात तर... अंक मोजू लागलो कि आपोआपच श्वास शांत होतो म्हणजेच दीर्घ श्वास घेतो. मन शांत होते. तर प्रत्येकाने पाच दहा श्वास तरी दीर्घ श्वसन केले पाहिजे.

रिकाम्या वेळी आपण श्वास कसा घेतो याकडे लक्ष दिले पाहिजे.

• चालणे... या सारखा सर्वांग सुंदर    व्यायाम दुसरा कोणताही नाही.
पण बदल म्हणून ....
• सायकल चालवणे, पोहणे काही आसने करणे करावेत

• सूर्यनमस्कार... रोज किमान दोन तरी नमस्कार घालावेत.

• सरळ जिने तर नेहमीच चढतो तर रोज एकदा तरी उलट जिने चढावेत.

• थोडे तरी उलट चालावे.

अशा साध्या सोप्या गोष्टी करता येणे सहज शक्य आहे.
धन्वंतरी जयंती निमित्ताने आणि अभ्यंग स्नान निमित्ताने जे मनात आले ते लिहिले...

हिवाळा.. या ऋतूत काहीही खावे, व्यायाम सुरु करावा,

शक्यतो स्निग्ध पदार्थ...
प्रत्येकाच्या प्रकृती नुसार स्वतःला झेपेल एवढे सातत्याने करावे.

:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:

 आज अश्विन कृष्ण त्रयोदशी 

धन्वंतरी जयंती. 

 

 

समुद्र मंथनापासून समुद्रातून आरोग्याची देवता मानल्या गेलेल्या धन्वंतरीचा पाचवे रत्न म्हणून 
 लाभ झाला. 
आज धनाची पूजा करतात. गूळ धने यांचा नेवैद्य दाखवतात . 
आपल्या आरोग्याची काळजी आपणच घ्यायला हवी. 
     सुख समाधानाचे आणि समृद्धीचे जीवन लाभावे अशी कामना दिवाळीच्या सणाच्या रूपाने आपण व्यक्त करतो. 
     असे जीवन लाभण्यासाठी बुद्धी आणि धन जितके महत्त्वाचे तितकेच आरोग्यही . 
धनत्रयोदशी हा दिवस आरोग्य देवतेचे स्मरण करण्याचा आहे 

तसेच दीप दान

यम हि मृत्यूची देवता 

त्याची अवकृपा होऊ नये म्हणून 

दक्षिणेकडे तोंड करून यमाला दीपदान करतात. 

काही जण असे मानतात कि हा यमाचा सत्कार आहे.

 


 

Thursday, 27 October 2016

दिवाळी...दिपावली...

दीपोत्सव.!


दिव्यांच्या ओळी...
दीप + आवली.. दिपावली

 

 
कुठे कुठे हे दीप लावावेत?? 

याचे सुंदर गीत लहानपणी म्हटल्याचे आठवते.

=================
पणती लावा
पुढच्या दारी
लक्ष्मी येईल
गोरी गोरी
पणती लावा
मागच्या दारी
नाही होणार
कधी चोरी
पणती लावा
तुळशी पाशी
धनधान्याच्या
पडतील राशी
अंगणात लावा
पणत्या साठ
देवदूतांना
दिसेल वाट.!


◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎

पूर्वी घरं मोठी असायची
काही भागात अंधार असे तर तिकडे आवर्जून पणती लावली जायची. (परसात)

      आता घरे कोणत्याही प्रकारची असली तरी विकत कंदील आणून विजेची तोरणे लावून, किंवा सेल वर असलेल्या पणत्या लावून हौस केली जाते आणि दिव्यांचा झगमगाट असतो.

**********************

गंगा नदीवर तर सुंदर सजवलेले दिवे मिळतात आणि ते गंगेत सोडतात.

सुंदर दृश्य.!

 छान अनुभव.

हा सोहळा दररोज असतो.
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
दीप उजळवले जाणे असे म्हणतात.
तर दिव्याची ज्योत किंवा वात खडीसाखरेने सरकावतात.
(अस एका कथेत वाचल्याचे आठवते)
या साठी तेलवात ही हाताने कापसाचा दोरा करून करतात
 किंवा सहाणेवर कापसाला पीळ देऊन करतात.

औक्षण करण्यासाठी फुलवात लागते 

आणि ती अगोदर तुपात भिजवली जाते.

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

कुंभार...

बारा बलुतेदार पैकी एक.! 
त्याच्याकडून खूप साऱ्या पणत्या घ्यायच्या
 आणि पाण्यात भिजवून वाळवायच्या. 
म त्या दिवाळीत छान ओळीत लावायच्या.!
अशा या दिव्यांच्या ओळी पाहून मन प्रसन्न होते.
पणत्या रंगवायच्या...

आता तर कित्ती तऱ्हेतऱ्हेच्या पणत्या मिळतात.

::::::::::::::::::::::::::::::::::::::::

असाही रोज देवासमोर सकाळ संध्याकाळी दिवा लावतो.
संध्याकाळी शुभम् करोति कल्याणम् म्हणतो त्यात
दिव्या दिव्या दिपोत्कार...
दिव्याला पाहून नमस्कार
असे म्हणतो.

तमसो मा ज्योतिर्गमय!...

हे ज्योती अंधःकार दूर कर
असच तर आपण सांगत असतो
कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने होते.
दिवाळीत पडणारी थंडी, 
रात्र मोठी दिवस लहान
 आणि या दिव्यांच्या ओळी... 
आपल्या पूर्वजांनी किती विचार केला असेल....

तसं आकाश कंदील...

हा उंचउंच बांधायचा. त्यात सुद्धा पणती लावायची.
आकाशात सुद्धा पतंगाच्या साहाय्याने आकाश कंदील सोडायचे, 
यात अगदी छोटी मेणबत्ती ठेवतात... हे खरे आकाश कंदील.!

कल्पकतेला, कलेला वाव म्हणजे दिवाळी हा सण..

मोठा सण. पाच सहा दिवस चालणारा सण

**********************

कुणी त्याच इतकं समर्पक काव्य केलंय...
दिन दिन दिवाळी
गायी म्हशी ओवाळी
. . . . वसुबारसेला ।।१।।
दिन दिन दिवाळी
आरोग्य सांभाळी
. . . . धनत्रयोदशीला ।।२।।
दिन दिन दिवाळी
दुःखाला पिटाळी
. . . . नर्कचतुर्दशीला ।।३।।
दिन दिन दिवाळी
लक्ष्मीला सांभाळी
..अश्विन आमावस्येला ।।४।।
दिन दिन दिवाळी
नववर्षाची नवाळी
. . . . बळीप्रतिपदेला
         (पाडव्याला)  ।।५।।
दिन दिन दिवाळी
भावाला ओवाळी
. . . . यमद्वितियेला

         (भाऊबीजेला) ।।६।।
सहा दिवसांची ही दिवाळी
आपणा सर्वांना
सुखासमाधानाची  आणि समृद्धीची जावो.

**********************
आहे ना मस्त...

घरातील गृहिणी निरनिराळे दिवाळीचे पदार्थ भरपूर प्रमाणात करते,
 सुंदर अशी रांगोळी रेखाटते, नटून सजून आलेल्याचे स्वागत करते.
मुले कंदील करतात. पूर्वी पायलीचा कंदील करत असत.
किल्ले तयार करणे,






 त्यावर नाचणी, अळीव, गहू असे पटकन येणारे धान्य पेरणे, 
 मावळे उभे करणे, अगदी मंदिर विहीर सुद्धा दाखवतात, गाव सुद्धा वसवितात..
आणि आवडते म्हणजे... फटाके फोडणे....
आता तर फटाक्यांची आतषबाजी आकाशात बघण्यासारखी असते.
हा थंडीची सुरुवात असा सण.
 तर स्निग्ध पदार्थ खाल्ले जातात.
 तेच बनवले जातात.
 गोडधोड तेल-तुपाचे पदार्थ केले आणि खाल्ले जातात.

{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}

मुली, स्त्रीया... रांगोळी काढतात. 

रांगोळी म्हणजे भूमी अलंकरण...

सडा सारवण झाले कि छोटीशी तरी रांगोळी काढायची.
औक्षण करताना पाटाखाली रांगोळी........
उंबरठा सकाळी पुसायचा आणि त्यावर रांगोळी.!
यासाठी पूर्वतयारी असते. अगदी ठिपक्यांचा कागद करण्यापासून.
निरनिराळ्या प्रकारे रांगोळी काढली जाते.

संस्कार भारती,









 एक मिनिट,













तयार रांगोळ्या. खडे मोती लेस लाऊन .... कित्ती प्रकार






 ओटीचे सामान वापरून केलेली रांगोळी 



रंगानाम + आवली= रंगावली

रांगोळी

कुठलीही रांगोळी असली तरी मन प्रसन्न होते. 
आणि

 या रांगोळी भोवती मध्यभागी पणत्या लावल्या कि ती रांगोळी खुलून दिसते.

 

 

 तेवत्या... दिव्याकडे बघून मन प्रसन्न शांत होते.

रांगोळी प्रदर्शन.... एकेच ठिकाणी अनेक कलाकारांची कला बघता येते.

हा फक्त स्त्रीया मुली यांच्या पुरेसा मर्यादित कला प्रकार नाही.

••••••••••••••••••••••••••••

दिवाळी ... येणाऱ्या हिवाळ्याचे स्वागत करण्याचा (हेमंत, शिशिर हे ऋतू)

•अभ्यंग स्नानाचा,

•घराची साफसफाई,

•घर रंगवण्याचा,

•रंगांचा,

•दिव्यांच्या ओळींचा,

•रांगोळी रेखाटण्याचा,

•कंदील दिव्यांच्या माळा लावण्याचा, 

 

 

 

 

•मस्त मस्त खाण्याचा,

 

 

 •एकमेकांना भेटण्याचा,

•ग्रीटिंग तयार करून पाठवण्याचा, 

• भेटवस्तू देण्याचा/ घेण्याचा.

• दिवाळी अंक वाचण्याचा

•कपडेलत्ते खरेदी,

• नवीन वस्तू खरेदी करण्याचा,

• केलेल्या कामाची बक्षिसी,(बोनस) मिळण्याचा आणि अशी बक्षिसी देण्याचा.

• मोठी सुट्टी, आणि भरपूर दिवस असणारा सण

सणांचा राजा....अर्थात दीपोत्सव...

☆☆☆☆☆☆☆☆☆☆

लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया

झळाळती कोटी ज्योती...

☆☆☆☆☆☆☆☆☆☆

★ एक दीप प्रज्वलित केला कि त्या दीपाने अनेक दीप प्रज्वलित करता येतात.
★ मंदिरात दीपमाळ लावतात.
★ त्रिपुरी पौर्णिमेला त्रिपुर लावतात.
★ दीपदान , याला खूप महत्त्व आहे

मोक्षासाठी.

.ツ.....ツ.....ツ.... .ツ....

करूया स्वागत शीतल ऋतूचे

~~~~~~~~~~~~~~
कोणी केलेले छान काव्य...
~~~~~~~~~~~~~~
आज पहाटे जाग येता
डोळे अर्धे निजलेले
दिसे तयातून बागे मधले
फूल दवांत भिजलेले
बाहेर येता असा बिलगला
मंद जरासा शीतल वारा
रवीकिरणांना शोधित शोधित
 उधळीत जाई पर्णपिसारा
मुग्ध स्वत:शी झाले सारे
कशी कुणाची पडली भूल
दंवात हसूनी पहाट सांगे
शीतल ऋतुची ही चाहूल
|| शीतल ऋतु आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा ||

۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞

Wednesday, 19 October 2016

गीता संथा वर्ग.... बुधवार... १९ ऑक्टोबर


आज गीता चौथा अध्याय कसा म्हणायचा ते शिकवून पूर्ण झाले.

आता पर्यंत १, २, ३, ४, ६, आणि १८ अध्याय पूर्ण झाले आहेत...
इतके दिवस मंगळवार बुधवार ५ श्लोक संथा देत होते.

आता पाचव्या अध्याया पासून 

सात श्लोक कसे म्हणायचे ते सांगणार आहेत.

(संथा)

तर...
आज आम्हाला श्लोक म्हणून न घेता ....
एक प्रश्न विचारला...
गीता म्हटल्यामुळे
किंवा गीता का शिकतोय?

गीता का म्हणता??

कोणी म्हणाले....
मनःशांती मिळते,
मला छान गीता म्हणायला यायला हवी,
आलेल्या प्रसंगात खंबीरपणे तोंड देता येते,
निर्णय घेता येतात.

प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातून निघाली आहे.

(गीता ही सर्व ग्रंथांची आई आहे.

गीता ही वेदांपेक्षा श्रेष्ठ आहे.

वेद हे देवाच्या निःश्वासातून निघाले.)

अगदी मी खूप आजारी असताना मला शिकायला सुरुवात करता आली
मला आजाराने डिप्रेशन आले होते , सगळे मळभ दूर झाले.
अशी छान उत्तरे मिळाली.
म आता एवढे दिवस सरांचे मार्गदर्शन मिळाले यातून कोणत्या गोष्टी लक्षात आल्या?

* शब्दावर आघात कसा आणि कुठे द्यायचा..

* अनुस्वाराचा उच्चार कसा करायचा..

* विसर्गाचा उच्चार कसा करायचा..

* श्लोक म्हणताना एक नाद, लयीत म्हणायचा.

(तालासुरात)१२३४; ५६७८
अशा अंकात म्हणायची.

(भीमरूपी महारुद्रा या प्रमाणे)

* हे श्रीकृष्ण भगवंताच्या मुखातून आलेले शब्द आहेत

 तर ते गोड आवाजात शांतपणे म्हणायचे.

::::::::::::::::::::::::::::::::::::::::

आपण स्पर्धेला का जायचं?

निरनिराळे लोक भेटतात.
त्यांचे विचार कळतात.
सभा धीटपणा येतो.

★★★★★★★★★★

आता अजून एक ताई आहेत त्यांनी केलेले मार्गदर्शन

*आघात*

जोडाक्षरापूर्वी,  उ 

ऱ्हस्व अक्षरे  असतील तर  

त्या ऱ्हस्व अक्षरावर आघात द्यावा

क्ष ज्ञ  त्र ही जोडाक्षरे आहेत.

~~~~~~~~~~~~~~
(बुद्धी, ब्रह्म , तस्य, यज्ञ, त्यक्त्वा ...यातील पहिल्या अक्षरावर नेहमीच आघात असतो)
~~~~~~~~~~~~~~

विसर्ग

विसर्गाचे उच्चारण.

विसर्गाच्या पूर्वीच्या स्वराच्या आधाराने केला जातो.

विसर्गोच्चार 'ह्' व्यंजना प्रमाणे पण अधिक कठोर करावा लागतो.
* विसर्गाच्या अगोदर आलेल्या ऱ्हस्व अथवा दीर्घ स्वराप्रमाणे विसर्गाचा उच्चार केला जातो.

श्लोकात मध्ये विसर्ग आला तर...

*ह्* प्रमाणे आणि अल्पकाळ करतात.
केशवः (ह् )

श्लोकाच्या शेवटचा शब्द असेल तर....

महारथः (हा)

इषुभिः (ह)
स्थितधीः (ही)

ए कार असेल तर उच्चार *हे* होतो.

ओ कार असेल तर *हो* असा उच्चार होतो.

ऐ कार असेल तर *हि* उच्चार होतो.

*विसर्ग जेव्हा श्लोकाच्या शेवटी येतो तेव्हाच त्याचा पूर्ण उच्चार केला जातो*

पितामहाः (हा)


विसर्गाच्या पुढे स, श, ष, श्र

असतील तर

हेच उच्चार करावेत.
१|९ बहवः (श) शूरा
भवन्तः (स) सर्व एव ही
६|३७ अयतिः(श्र) श्रद्धयोपेतो

_____________________

विसर्गाच्या पुढे आकार असेल तर....

ते अक्षर ओढावे

१|३३ राज्यं(म)
*भोगाःऽऽ(स)* सुखानि च

१|४० *कुलधर्माःऽऽ*(स)
सनातनाः
विसर्ग च्या पुढे *क्ष*आला तर...आणि ते अक्षर अकार असेल तर तो आकार करावा

२|३२ *सुखिनः* (सुखीनाहा) क्षत्रियाः

यातील हा थोडा पटकन म्हणावा.

*ऽ ऽ* हे विखण्ड चिन्ह आहे. 

असे चिन्ह असेल तर ते अक्षर ओढणे (लांबवणे)

----------------------------------

(् ) हे हलंत चिन्ह आहे.

  श्लोकात आठ अक्षरानंतर यति घेतो (pause)
 जर या आठ अक्षरानंतर जो पुढील शब्द आहे त्याची सुरुवात अर्ध अक्षराने म्हणजे हलन्त असेल तर ते अक्षर आधीच्या आठ शब्दांना जोडावे.

१|४६ धार्तराष्ट्रा रणे हन्युस्तन्मे
हन्युस् तन्मे... असे म्हणावे.

जर आठवे अक्षर जोडाक्षर असेल तर... 
त्यातील हलन्त अक्षर आधीच्या शब्दाला जोडून म्हणावे
 व पूर्ण अक्षर पुढील आठ अक्षराला पहिले जोडावे.

१८| १६

पश्यत्यकृतबुद्धित्वान्न

स पश्यति दुर्मतिः

पश्यत्यकृतबुद्धित्वान्
न स पश्यति दुर्मतिः

••••••••••••••••••••••••••••

( ं ) अनुस्वार...

यासाठी बाराखडी लक्षात ठेवावी

क  ख  ग  घ  ङ (ङ् )

च  छ  ज  झ  ञ (ञ् )

ट  ठ  ड   ढ  ण  (ण् )

त  थ  द  ध  न   (न् )

प  फ  ब  भ  म  (म् )

र  स  व  श  ष  ह ( वँ )

य  (यँ )

ल  (लँ )

क्ष (ङ् )

ज्ञ (ञ् )

या प्रमाणे अनुस्वाराचा उच्चार करावा.
तरी काही विकल्प आहेत

म्हणजे अनुस्वाराचा उच्चार 'म्' असाही करतात, 

ही पद्धत रुढ आहे.

•••••••••••••••••••••••••••

सञ्जय (ञ)

नरपुङ्गवः  (ङ)

कौन्तेय  (न् )

गाण्डिवं  (ण् )

सम्बन्धिनस्तथा  (म् )

म्हणजे अनुस्वार आहेत.

**********************

जोडाक्षर

 म्हणजे दोन किंवा अधिक व्यंजने (व्यञ्जने)
एकत्र आली असता त्यामध्ये स्वर मिसळून तयार झालेले अक्षर.
जोडाक्षरामध्ये जे व्यंजन प्रथम येते त्याचा उच्चार प्रथम करावा.

४ | २६  जुह्वति ( ह् + व )
२|२२  गृह्णाति  ( ह् + ण )
आणि दोनपेक्षा अधिक व्यंजने आली तर त्यांचा अनुक्रमाने उच्चार करावा
उदा. कृ *त्स्न* (१८|२२)

••••••••••••••••••••••••••••
आता पुढे  ज्या श्लोकाची संथा देतील ...
त्या श्लोकांना आघात व अनुस्वाराच्या खुणा करून आणा ....

शब्द उच्चार करताना...

त्याचा उच्चार कसा होतो ते कानावर हाताचा पंजा पोकळ ठेवून उच्चार ऐका...
शब्दा बरोबर खेळा....
अशा काही छान सूचना सांगितल्या...
पुण्यात गीता म्हणताना शुद्धच उच्चार असावे लागतात.
शृंगेरी येथे मात्र भारतातून लोक गीता म्हणण्यासाठी येतात तर....
 प्रत्येक प्रांता प्रमाणे लोक उच्चार करतात तर... पाठांतर असावे .
उत्तरेत.... थंड हवामान असल्याने लोक पूर्ण तोंड न उघडता उच्चार करतात.
महाराष्ट्रीयन तामिळ, कन्नड यांचे उच्चार चांगले असतात
या भाषा संस्कृत बेस आहेत.
अजूनही काही माहिती ऐकली, सांगितली आहे.
✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽
४|३९

श्रद्धावाँल्लभते

हे दोन शब्द
मूळ शब्द

श्रद्धावांन् लभते

न् आहे त्याचा ल् होतो
न् च्या अगोदरचे 'व' हे व्यंजन आहे त्यावर अनुस्वार आहे.
म्हणून न् चा ल् होतो
वा आणि ं त्यापुढे न् त्या पुढील अक्षर ल आहे असे असेल तर  न  चा  ल्  होतो
आणि वा वर (ँ ) आहे.
_____________________
तसाच शब्द
१८|१७
इमाँल्लोकान्न
यात दोन शब्द
इमाँन्  लोकान्न

Saturday, 15 October 2016

आजची कोजागरी

छान गाणी ऐकत आहे. 
चंद्र-चांदणे याचा उल्लेख असणारी.
आणि व्हाटसअप friends बरोबर गप्पा.
आयती भेळपुरी शेवपुरी आणली आणि 
घरात असलेल्या (इन मीन तीन) तिघांनी खाल्ली.
चंद्र कधी दिसेल याची वाट बघत आहे.
आणि आठवणीतल्या कोजागिरीत चौपाटीवर चांदण्यात खेळलेले खेळ!
आई, अण्णा, मामा, मावशी, भाऊ, मावस भावंडे मित्र मैत्रीणी...पंचवीस तीस जण तरी असू. एकत्र बसून भेळ, उकडलेल्या शेंगा, गोळ्या काकड्या....
खेळून दमल्यावर
गाण्याच्या भेंड्या...
कोजागिरी म्हणून पांढरे शुभ्र कपडे.!
घरी आल्यावर ....
घराच्या खिडकीतून येणाऱ्या  चांदण्यात ठेवलेले आटीव मसाला दूध!!!
 ते ब्रह्म मुहूर्तावर प्याले जायचे.

वाह... 

काळ बदलला मोठे झालो

 म दरवर्षी काहींना काही वेगळेपण येत गेले कोजागिरी साजरी करण्यात...

त्यातही मजा आनंद आहेच.

कधी भेळ पुरी आणि कलिंगड.
कधी पाणीपुरी ice-cream
कधी बटाटे वडे

पण मसाला दूध.... असणारच

   मधल्या काळात अश्विनी साजरी करतात असे कळले.
औक्षण करणे म्हणजे औक्षवंत हो.!
म मुलांचे औक्षण करू लागले.

हे यांना झालेले चंद्र दर्शन!

 

 

 

उगवला कोजागिरीचा चंद्र
सांडलं टिपुरभर चांदणं
सुख-समृद्धीने भरोत
तुमच्या घरातील रांजण

मला मात्र प्रत्यक्ष दर्शन आताच झाले... मध्य रात्री

ढगाळ वातावरण
आणि अगदी डोक्यावर चंद्र..
बघू सकाळी वॉकला गेले तर....
कसे होते चंद्र दर्शन????
::::::::::::::::::::::::::::::::::::::::

आता माहितीपूर्ण आलेले मेसेज...

.जे कायम आपल्या जवळ असावेत(संग्रही) असे वाटते असे मेसेज......

::::::::::::::::::::::::::::::::::::::::

कोजागरी पौर्णिमा

(शरद पौर्णिमा)

★ कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ असतो.
या दिवशी रात्री लक्ष्मी आणि इंद्र यांची पूजा केली जाते. मध्यरात्री लक्ष्मी पृथ्वीतलावर येऊन जो जागा आहे, त्याला धनधान्य आणि समृद्धी प्रदान करते, अशी कथा आहे. या दिवसाचे महत्त्व आणि पूजाविधी या लेखातून समजून घेऊया.

★  तिथी

● कोजागरी पौर्णिमा हा उत्सव आश्विन पौर्णिमा या तिथीला साजरा करतात.

★ इतिहास

● या दिवशी भगवान श्रीकृष्णाने व्रजमंडळात रासोत्सव साजरा केला, असे श्रीमद्भागवतात म्हटले आहे.

★ महत्त्व

● वर्षातील या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वांत जवळ असतो आणि त्यामुळे तो मोठा दिसतो. 
मूळ चंद्रतत्त्वाचे म्हणजे ‘चंद्रमा’चे प्रतिनिधित्व करणारा आणि 
आपल्याला दिसणारा चंद्र ‘चंद्रमा’प्रमाणेच शीतल आणि आल्हाददायक आहे. 
साधकांना चंद्रासारखी शीतलता ईश्वराच्या अवतारांपासून अनुभवता येते,
 म्हणूनच रामचंद्र, कृष्णचंद्र अशीही नावे राम-कृष्णांना दिली गेली. 
चंद्राच्या या गुणांमुळेच

‘नक्षत्राणामहं शशी’ म्हणजे ‘नक्षत्रांमध्ये मी चंद्र आहे’, 

असे भगवान श्रीकृष्णाने श्रीमद्भगवद्गीतेत (१०:२१) सांगितले आहे.

● मध्यरात्री श्री लक्ष्मी चंद्रमंडलातून भूतलावर येऊन ‘को जागर्ति’ म्हणजे ‘कोण जागे आहे ?’, असे विचारून जो जागा असेल, त्याला धनधान्याने संतुष्ट करते.

● या दिवशी ब्रह्मांडात आदिशक्तीरूपी धारणेतील
 श्री लक्ष्मीरूपी इच्छाशक्तीची स्पंदने कार्यरत असतात.
 या दिवशी धनसंचयाविषयी असलेल्या सकाम विचारधारणा पूर्णत्वाला जातात. 
या धारणेच्या स्पर्शाने स्थूलदेह,
 तसेच मनोदेह यांची शुद्धी होण्यास साहाय्य होऊन मनाला प्रसन्नधारणा प्राप्त होते. 
या दिवशी कार्याला विशेष असे धनसंचयात्मक कार्यकारी बल प्राप्त होते.

● या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वांत जवळ,

 म्हणजे कोजागरी पर्वतालगत आलेला असतो.

 त्यामुळे या पौर्णिमेला ‘कोजागरी पौर्णिमा’ म्हटले जाते.

● कोजागरी पौर्णिमेला वातावरणात प्रक्षेपित होणार्‍या लहरी
लहरी
प्रमाण (प्रतिशत)
भाव
२५
चैतन्य
२०
आनंद
३०
शांती
२५
एकूण
१००
४. भावार्थ

● कोजागरीच्या रात्री जो जागृत आणि सावध असतो,

 त्यालाच अमृतप्राशनाचा लाभ मिळतो.!!!

कोजागर · को ± ओज ± आगर.

या दिवशी चंद्राच्या किरणांद्वारे सर्वांना आत्मशक्तीरूपी (ओज) आनंद, आत्मानंद, ब्रह्मानंद भरभरून मिळतो; 
परंतु हे अमृत प्राशन करण्यासाठी ऋषी म्हणतात,
‘को जागर्ति ?, म्हणजे कोण जागृत आहे ? कोण सावध आहे ? कोण याचे माहात्म्य जाणतो ? 
जो जागृत आणि सावध आहे आणि ज्याला याचे माहात्म्य ठाऊक आहे, 

 त्यालाच या अमृतप्राशनाचा लाभ मिळेल !’ –

प.पू. परशराम पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

• उत्सव साजरा करण्याची पद्धत

●‘या दिवशी नवान्न

(नवीन पिकवलेल्या धान्याने) जेवण करतात.

श्री लक्ष्मी आणि ऐरावतावर बसलेला इंद्र यांची रात्री पूजा करतात.

 पूजा झाल्यावर पोहे आणि नारळाचे पाणी
 देव आणि पितर यांना समर्पून नंतर नैवेद्य म्हणून ग्रहण करतात
 आणि मग आपल्याकडे आलेल्या सर्वांना देतात.
शरद ऋतूतल्या पौर्णिमेच्या स्वच्छ चांदण्यात दूध आटवून चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवतात
 आणि नंतर नैवेद्य म्हणून ते दूध ग्रहण करतात. 

चंद्राच्या प्रकाशात एकप्रकारची आयुर्वेदिक शक्ती आहे.

 त्यामुळे हे दूध आरोग्यदायी आहे.

या रात्री जागरण करतात. करमणुकीसाठी निरनिराळे बैठे खेळ खेळतात. 
दुसर्‍या दिवशी सकाळी पूजेचे पारणे करतात.

● कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी आणि इंद्र यांचे पूजन करण्याची कारणे

• या दोन देवतांना पृथ्वीवर तत्त्वरूपाने अवतरण्यासाठी चंद्र आग्रहात्मक आवाहन करतो.

•• लक्ष्मी ही आल्हाददायक आणि इंद्र ही शीतलतादायक देवता आहे. 

 यादिवशी वातावरणात या दोन देवता तत्त्वरूपाने येत असल्याने आणि त्यांचे तत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत असल्याने त्यांची पूजा केली जाते.
••• लक्ष्मी आणि इंद्र यांचा पूजाविधी
•••• लक्ष्मी आणि इंद्र यांच्या पूजेत पोहे आणि नारळाचे पाणी वापरतात.

पोहे हे आनंद देणारे,

तर नारळाचे पाणी हे शीतलता प्रदान करणारे आहे. 

त्यामुळे हे दोन घटक वापरून जीव स्वतःकडे आनंद आणि शीतलता यांच्या लहरी आकर्षित करत असतो.

● चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवतात;

कारण या दिवशी दुधात चंद्राचे प्रतिबिंब पाहिल्याने त्यातून प्रक्षेपित होणारे चंद्रतत्त्व आपल्याला मिळते.
 या दुधात स्थूल आणि सूक्ष्म रूपांतून चंद्राचे रूप अन् तत्त्व आकर्षित झालेले असते.

● जागरण :

 मध्यरात्री लक्ष्मी चंद्रमंडलातून भूतलावर येते
 आणि
 जो जागा असेल, त्याच्यावर संतुष्ट होऊन त्याला कृपाशीर्वाद देऊन जाते.
 त्यामुळे कोजागरीच्या रात्री जागरण केले जाते.

✺✺✺✺✺✺✺✺✺✺✺✺✺✺✺

कोजागरी पौर्णिमा

       कोजागिरी पौर्णिमा काय सण आहे हे आजकाल कोणाला विचारले तर नक्कीच ७०% लोकांना  सांगता येणार नाही ..(शोकांतिका) आणि ती चुकीच्या पद्धतीनेहि साजरा करतात...बरेच जण दूधात दूध मसाला टाकून  गरम करून पितात...म्हणजे त्यांना वाटते कोजागिरी साजरी झाली. काही मंडळ तर हा दिवस सोडून सवडीनुसार इतर दिवशी ती साजरा करतात , एंजॉय करतात.
आपल्या धर्मात आपल्या पूर्वजांनी वैज्ञानिक दृष्ट्या विचार करून सण सुरु केले आहेत.
 ते आपण योग्य पद्धतीने साजरे केले तर नक्कीच त्याचा आपल्याला फायदा होईल.

कोजागिरी विषयी माहिती:-

--------------
       आश्विन पौर्णिमा ही कोजागरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते.
 यास 'माडी पौर्णिमा/(पुनेव)'असेही म्हणतात
 ही शरद ऋतूतील आश्विन महिन्यात येते.
 इंग्रजी महिन्याप्रमाणे कोजागरी पौर्णिमा बहुधा ऑक्टोबरमध्ये असते.
     या दिवशी दूध आटवून त्यात केशर, पिस्ते, बदाम,चारोळ्या, वेलदोडे, जायफळ वगैरे गोष्टी घालून, तसेच साखर घालून, लक्ष्मीदेवीला नैवेद्य दाखविला जातो.
दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि ते दूध मग प्राशन केले जाते.
उत्तररात्रीपर्यंत जागरण केले जाते.
 अशी आख्यायिका सांगतात की उत्तररात्री साक्षात लक्ष्मीदेवी येऊन (संस्कृतमध्ये)
'को जागर्ति' (म्हणजे 'कोण जागत आहे') असे विचारते,
 म्हणून या दिवसाला 'कोजागरी पौर्णिमा' म्हणतात.
या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो.
 या दिवशी दम्यावरचे आयुर्वेदिक औषध घेण्याची पद्धत आहे.
 या दिवशी घेतलेले औषध लवकर लागू पडते असा समज आहे.

कोजागरी पौर्णिमा

★ गुजरातमध्ये रास व गरबा खेळून शरद पुनम नावाने साजरी केली जाते.

★ बंगाली लोक याला लोख्खी पुजो म्हणतात व या दिवशी लक्ष्मीची पूजा करतात.

★ मिथिलेमध्ये या रात्री कोजागरहा पूजा केली जाते.

या दिवशी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ अपत्याला ओवाळून

 त्याची किंवा तिची 'आश्विनी' साजरी करतात.

आश्विन महिन्यात मध्यरात्रीला असणाऱ्या पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा म्हणतात.
तशी पौर्णिमा आली नाही तर दुसऱ्या दिवशीच्या पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा समजले जाते.

 ज्या दिवशी पौर्णिमा पूर्ण होत असेल त्या दिवशी नवान्न पौर्णिमा साजरी केली जाते.

कोजागरी हा शब्द मराठीत, अनेकजण कोजागिरी असा उच्चारतात आणि लिहितात.
------------------------

#   कोजागिरी.

को जा गरती,
म्हणजे कोण जागे आहे,
 असे लक्ष्मी विचारते. म्हणजेच कोण जागे आहे,
कोण आपले कर्तव्याला जागे आहे,
 त्याला लक्ष्मी धन देते म्हणून आपण कोजागिरी सण साजरा करतो.
कोजागिरी पौर्णिमा हा सण मोठ्या उत्सहाने साजारा करतात.
 ही पौर्णिमा पावसा नंतरची पहिली पौर्णिमा असते हिला अश्विन पौर्णिमा म्हणतात,
पावसात आकाश स्वछ नसते परंतु या पौर्णिमेला आकाश खूप दिवसानंतर स्वछ आणि सुंदर दिसते.
त्यामुळे याचा आनंद घेता यावा व याचे स्वागत करावे म्हणून हा सण साजरा करतात.

या दिवशी पोहे व  शहाळ्याचे पाणी प्रसाद म्हणून वापरतात.

शेतकरी या दिवसात आपली सर्व कामे संपवून घरी बसून आराम करत असतो
या दिवशी रात्री दुध गरम करून त्यामध्ये चंद्राला पाहतात.

 कारण दुध ही पांढरा शुभ्र असते व चंद्र ही त्या दिवशी ९९ . ९९ % प्रकाशित असतो, 

त्यामुळे ही आपली प्रथा आहे.

 चंद्र या दिवशी ३ लक्ष ८५००० किलो मीटर अंतरावर असतो. 

त्यामुळे या रात्री वातावरण छान असते 

आकाश खुले असते 

म्हणून ही रात्र मौजमजा करण्याची असते.

(मा.सोर्स-इंटरनेट. )
ㆁㆁㆁㆁㆁㆁㆁㆁㆁㆁㆁㆁ

कोजागिरी पौर्णिमा

को जागरति
को जागरवान्
को जागर्ति?
जागा कोण आहे?--
हा प्रश्न करीत प्रतिवर्षीं कोजागिरी येत असते.
मी व तुम्ही - आपण जागे आहोंत काय?
महा्राष्ट्र जागा आहे काय?

दसरा किंवा दीपावलि यांचेपेक्षांही

 'कोजागिरी' अधिक प्राचीन आहे.

ऋग्वेदांतील ६० व्या मंडलांतील कांही उल्लेखांवरून एक न्याय्य अनु्मान निघतें.
अश्वयु्गमास म्हणजे अश्विन.
 या महिन्यांतील पौर्णिमेला एक पाकयज्ञ करावयाचा असतो. 
नवे तांदुळ गोदुग्ध यांची प्रस्तुत पाकयज्ञात हव्रिर्द्रव्य म्हणून आवश्यकता असते.
सूत्रकारांनी व निबंधकारांनी सात सांवत्सरिक पाकयज्ञांचा निर्देंश केला आहे.
अष्टक, पार्वण, श्राद्ध, श्रावणी, आग्रयण, चैत्री व अश्वयुजी.
धर्मसिंधु्कारांनी कोजागिरीच्या दिवशीं 
लक्ष्मी व इंद्र यांचे पूजन,
नारिकेल-उदकपान,
नवान्न-भक्षण इ. विधींचे उल्लेख केलेले आहेत.
          


कोजागरी हा शब्द मराठीत, अनेकजण कोजागिरी असा उच्चारतात आणि लिहितात.

यास्तेषामं स्वैरकथा ता एव भवन्ति शास्त्राणि !!

ऋषीचे अवतारच जगत कल्याणाकरीताच होते
अंखङ मानव व
समाजावर अंतःकरणापासुन प्रेम होते
ऋषिमुनीना हे संपुर्ण विश्वच ईश्वराचे वाटत होते
जशी एखादी पतिव्रता स्री पतिचे घर स्वच्छ आणि चांगले ठेवण्याचा प्रयत्न करते
तसे ऋषीमुनीही सतत हे काम करत असतात
जगाचा कळवळा होता म्हणून त्यांना कधीकधी व्यथाही सहन करावी लागली.
त्यांची समाजाप्रती असलेली निष्काम भावना

बुद्धी ईश्वराला समर्पित केल्याने त्यातूनच भक्तिरूपी कन्येचा जन्म होतो
ऋषि सामर्थ्यवान असुनही स्वतःला मंत्रकर्ता न समजता मंत्रदृष्टा समजतात
ते खरे समजाचे आप्तजन आहेत
त्यांच्या सहज वाणीतून जगताच्या कल्याणाकरीता जे शब्दरूपी रत्न बाहेर पडले
हि जगतातील निर्विवाद घटना आहे
अशी ऋषींची महान परंपरा आपल्या देशाला लाभलीय
माऊली महावैष्णव या परंपरेच वर्णन करतात
वेदमार्गे मुनी गेले
तेची मार्गे चालीलो
अशी हि महान ऋषीपरंपरा!
๑๑✧๑́๑✧๑́๑✧๑́๑✧



वाटे मनास जेव्हा

घ्यावा जरा विसावा

खिडकीतुनी समोरी

शशी हासरा दिसावा

आभाळ तारकांचे ☆☆☆ 

खाली झुकुन यावे

ओढाळ आठवांचे

जमती मनात रावे.

ही रात्र धुंद वेडी

गंधात चिंब व्हावी

स्वप्नातल्या सुखांना

तेव्हाच जाग यावी !

चंद्राच्या साक्षीने मिळाली

आटीव मसाले दुधाची मेजवानी ….

कोजागिरीच्या रात्रीने लिहिली जागरणाची कहाणी.

!✿! कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !✿!

♡  ♡  ♡  ♡  ♡  ♡  ♡  ♡  ♡  ♡  ♡  ♡  ♡

Thursday, 6 October 2016

आज गुरुवार....६-१०-२०१६


आजची तारीख spl.

कुणी auspicious म्हणतात.

तर कुणी unique...

६-१०-२०१६...

चला मठात जाऊ..
वाटेत कामं करत करत गायवाडीला पोहोचलो.
तेथे एक स्नेही भेटले..
आज तुम्हाला उशीर झाला नेहमी लवकर येता...
होईल दर्शन.!
हं... असे चालता चालता झालेला संवाद.!
अरे बापरे ! म्हणजे साडेबारा होऊन गेले वाटतं (मनात)
घेऊ खिडकी दर्शन.!
आलोच कि मठाच्या आवारात. 
तुरळक लोक खिडकीतून दर्शन घेत होते. 
आम्ही सुद्धा दरवाजाला असलेल्या खिडकीतून दर्शन घेतले.!

वाह... अप्रतिम दर्शन.

खूप प्रसन्न वाटले मठात.
 दृष्टी स्वामींच्या चेहऱ्याकडे....
( मला नेहमी असे वाटते कि स्वामी म्हणतात काय? 
कोणते कर्म करून आलीस??? 
करारी भासतात मला स्वामी.!)

मग हळूहळू नजर स्वामी चरणावर.! म पादुका दर्शन.!

तेवढ्यात खिडकी वरील पडदा हळूच सरकवला...

मी: स्वामींना नेवैद्य दाखवायचा आहे म्हणून पडदा सरकवलाय...

चला ... आज दर्शन मात्र सुंदर झाले...

 म्हणून समाधानाने घरी आलो.

✽ ✽✽ ✽✽  ✽✽ ✽✽  ✽✽  ✽✽  ✽✽  ✽

श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ....
काही आलेले मेसेज.....
किती आणि काय काय सुंदर सुचत ना कोणाला.!

↓↓↓↓↓(संकलन)

۞ श्री  स्वामी समर्थ ۞

"भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे"  

।। श्री स्वामी समर्थ वचन ।।
                

।।ऊतु नका मातु नका घेतलेला श्री स्वामी भक्तीचा वसा  करा जतन।।  


।। नरदेह नश्वर आहे;
तो पर्यत श्री स्वामी समर्थाचे करा भजन. ।।  
कोणतेही  संकट असो; 
प्रथम घ्या श्री स्वामी समर्थ  दर्शन;             
संकटाचे होईल पतन।।  
सर्व काही मिथ्या आहे;  तारील फक्त.  
श्री स्वामी समर्थ चिंतन मनन.
।। मी कोणीहि नाही; 
श्री स्वामी समर्थ.आहेत; 
असे माना  मनोमन ।।    
।। तुम्हासाठी  श्री स्वामी समर्थांचे  वाक्य प्रमाण; 
मन करारे  प्रसन्न.            
 सर्वसिध्दीचे कारण.।।
झकास चाललाय संसार;  
म्हणून विसरू नका
श्री स्वामी समर्थ चरण।।
पाहिजे मनापासून
श्री स्वामी समर्थाचे चिंतन अनुभवा सुखशांती मनोमन।।
ठिकठिकाणी श्री स्वामीचे मठ आहेत  तरी
अक्कलकोट  मठाचे घ्या एकदा  दर्शन।।                                      
शीश झुकवा श्री स्वामी चरणी 
होईल आयुष्याचे  कल्याण ।।
आजच्या जगात फक्त
श्री स्वामी समर्थ देतील तुम्हाला आत्मिक समाधान. 
हे  सर्व मी तुम्हाला कां सांगतो  कारण
 हे  सर्व  साध्य झाले                        
श्री  स्वामी  समर्थ कारण ।।

•••••••••••••••••••••••••••••

||श्रीपादराजम् शरणम् प्रपद्ये||

◎o◎◎o◎◎o◎◎o◎◎o◎◎o◎

।।जय जय स्वामी समर्थ ।।

श्री - श्रीमंतीचा गर्व नको
स्वा - स्वाभिमानाने जगा
मी - मी पणा सोडा
- सर्वांशी प्रेमाने वागा
- मन परमेश्वराच्या चिंतनात गुंतवा
र्थ- थोरा मोठयांचा आदर राखा

     II श्री स्वामी समर्थ  II

●●●●●●●●●●●●●●●●

।।श्री स्वामी समर्थ।।

जो दौलत ही क्या मिलेगी
बादशाह के खजाने में.....
जो मैने पायी है

"स्वामी समर्थ महाराज

के सामने सर झुकाने मै" !!!!!

“ब्रम्हांडनायक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज 
 आपल्या सदैव पाठीशी असतात
 व त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचे भय किंवा संकट येत नाही.

श्री स्वामींवर अढळ विश्वास आणि नितांत श्रद्धा ठेवा…

“भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.” 

या त्यांच्या आधारवडाची प्रचीती भक्तांना आजही येतेच.

๑๑✧๑́๑✧๑́๑✧๑́๑✧๑

  ۞ श्री स्वामी समर्थ.۞

।। ॐ श्री स्वामी समर्थ ।।

जर कुणी विचारले की
जीवनामध्ये काय हरवलस
आणि काय मिळवलस तर बेधडक म्हणा....
जे काय हरवल
ती माझी नादानी होती.
आणि.....
जे काही मिळवले
ती माझ्या स्वामीची मेहेरबानी होती.
बाप आणि लेकाचे नाते आहे,
स्वामी आणि माझ्यात...
जास्त कधी मी मागत
नाही.
आणि....

माझा स्वामी मला काहीच कमी पडू देत नाही.

कारण तो म्हणतो भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे .

 

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

♤ ll श्री स्वामी समर्थ ll

जय जय स्वामी समर्थ
 भि......ती कशाची उरात धरतो
ऊ.......न सावली नियम जगाचा
न.......को अंतरु परमात्म्याला
को......णी नाही त्याविना तुजला
.......तत रहा तू नामस्मरणात
मी......पण नाही स्वामी चरणी
तू.......झे न काही माझे न काही
झ्या....गिरदारी कुणा दाखवतो
पा.......मर जीव हे सारे असती
ठी.......क समजुनी राहे जगती
शी.......घ्र धाव घे स्वामीपाशी
.......दरे वंदन करी स्वामीशी
हे.........ची विनवितो मी सर्वांशी

!!**!! श्री स्वामी समर्थ !!**!!

|| श्री स्वामी समर्थ ||

"भिऊ नकोस मी तुझ्या पाठीसी आहे "
वचन हे तुमचे गाठीशी।
भिऊ नको मी पाठीशी।।
मिळू दे नित्य तुमचा संग।
स्वामी तुमचा मला छंद।।

।। स्वामी समर्थ ।।

**********************

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे."
रोज प्रत्येक शब्दाच्या पुढे "च" लावा 
आणि
 तेच वाक्य म्हणा,
 बघा रोज वेगळा अर्थ लाभेल.

१.भिऊच नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.

२.भिऊ नकोसच मी तुझ्या पाठीशी आहे.

३.भिऊ नकोस मीच तुझ्या पाठीशी आहे.

४.भिऊ नकोस मी तुझ्याच पाठीशी आहे.

५,भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशीच आहे.

६.भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहेच.

।। श्रीस्वामी समर्थ ।।

ʕʔ ʕʔ ʕʔ ʕʔ ʕʔ ʕʔ ʕʔ

!!श्री स्वामी समर्थ !!

जब मुझे यकीन है के मेरे स्वामी मेरे साथ है।
तो इस से कोई फर्क नहीं पड़ता की कौन कौन मेरे खिलाफ है ।

तक़दीर बदल जाती है अक्कलकोट जाने के बाद,

दीवाने हो जाते है लोग स्वामी के दर्शन पाने के बाद

स्वामीगुरूमाऊली....

✺✺✺✺✺✺✺✺✺✺✺✺✺✺✺

Wednesday, 5 October 2016

चमत्कार..... कोरफडीच फुल..!!



आज आमच्याकडे असलेल्या कोरफडीला फुल आलेले बघितले..

आजपर्यंत कधी ऐकले किंवा पाहिले नव्हते.!
म गूगल सर्च केले... हो कोरफडीला फुल येते.

      गेली काही वर्षे आमच्याकडे कोरफड आहे.

एका स्नेहींकडून हे छोटसं रोप आम्ही आणलं....

 आणि बघता बघता ते छानच मोठं झालं.

याची अनेक छोटी रोपं कुणी कुणी घेऊन गेले. 

त्यांच्याकडे सुद्धा वाढ छान झाली आहे या कोरफडीची.!

पोपटी रंगाची त्यावर ठिपके असलेली, 

पानाच्या कडेने काटे असलेली हि कोरफड औषधी आहे.

 या कोरफडीचे पान गराने भरलेले असते.

 पान गरम करतात आणि तो गर थोडासा खाण्यास देतात, 

म्हणजे सर्दी खोकला बरा होतो.

म्हणून काही जण याची पाती/पान सर्दी खोकला झाला कि घेऊन जातात.

बाजारात अॅलोव्हेरा जेल,

अॅलोव्हेरा ज्युस मिळतोच.!

त्वचेसाठी, केसांसाठी, कफ-सर्दी खोकला यासाठी कोरफड उपयोगी आहे.

आणि कोरफड हे नाव काही आपल्याला नवीन नाही.

*******************************

पण....

आम्हाला कोरफडीला

फुल येते हे मात्र नवीन वाटले

तुम्हाला काही माहिती असेल तर सांगा.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~

★ असं म्हणतात बेडसोल्स कोणत्याही औषधाने बरी होत नाही

पण  कोरफडीचा ताजा गर त्यावर हलक्या हाताने रोज जिरवला तर बेडसोलही बरें होते.

★ एक उत्तम औषधी म्हणून कॉस्मेटिक्स मध्ये कोरफडीचा वापर होतो.

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••
अशी माहिती
दादर वाहिनीने दिली आहे.

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••

किती सुंदर दिसतंय फुल

✽  ✽  ✽  ✽  ✽ ✽  ✽ ✽  ✽ ✽  ✽ ✽ ✽  ✽  ✽  ✽





〆〆〆〆〆〆〆〆〆〆〆〆〆〆〆〆







आणि हे कोरफडी चे रोप



:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::