Tuesday, 23 July 2019

माझे गीता पठण...

माझे गीता पाठांतर / गीता प्रवास

कसा होता ?


१६-२-१६ 

या दिवशी गीता संथा वर्ग सुरू झाला... 
वर्ग मंगळवार बुधवार संध्याकाळी ६ ते ७.
रोज पाचपाच श्लोक.!संथ देत असत सर. 
आठवड्याला १० श्लोक.
श्री. श्रीकृष्ण जोशी सर दादर येथून येत.
 ते अगदी वेळ पाळणारे,
 वर्ग सहाला सुरू होई.
प्रथम तीन ॐ ॐ
प्रार्थना
ॐ पार्थाय प्रतिबोधितां
 अथ ध्यानम् ...चार श्लोक
।। गीतामाहात्म्यम् ।।
आणि पाच श्लोक संथा.!!
त्यानंतर मार्गदर्शक ताई आमच्याकडुन ते म्हणून घेत.
 कुठे अडत असेल,
 खुणा करायच्या राहिल्या तर त्या दाखवत.
 ६.५५ वाजता सर्व मिळून पसायदान म्हणत असू.
सात वाजले की सगळे घरी.!! 
वर्गात, गीता या व्यतिरिक्त कोणी काही बोलत नसे.
 वर्गाला छान शिस्त असे.!! 
वर्ग बुडवावा असे वाटत नसे.
घरी आले की जे शिकवले ते एका डायरी मध्ये लिही. 
म गीता अर्थ वाचत असे, हळूहळू श्लोक पाठ होत असत.
डिसेंबर जानेवारी मध्ये  
निरनिराळ्या संस्थात गीता अध्याय पाठांतर स्पर्धा होत्या 
म्हणून सरांनी त्याप्रमाणे अध्याय घेतले . 
पहिला नंतर अठरावा अध्याय.... मोक्षसंन्यास योगो नाम
हा सर्वात मोठा अध्याय,
कळसाध्याय.
 एकूण श्लोक ७८ .!!!
पण स्पर्धेसाठी ४० श्लोक.!!!
मग ते पाठ करू लागले.
पहिला करत होतेच
अठरावा अध्याय शिकवून झाला 
आणि सहावा संथा द्यायला सुरुवात झाली.
या अध्यायाची स्पर्धा दादर विठ्ठल मंदिर येथे होती. 
हा आत्मसंयम योग
संपूर्ण योगावर आहे.
याचे २० श्लोक पाठांतर करण्यासाठी होते.
पूर्ण अध्याय संथा देऊन झाला. 
आता हा पण पाठ करायला घेतला.

वर्गाला जाण्यापूर्वी

 जे श्लोक संथा देणार त्याचे शब्दार्थ बघणे 
आणि श्लोक अर्थ वाचून जाणे. 
आणि आल्यावर ज्या खुणा सांगितल्या त्या बघून एका डायरी मध्ये ते श्लोक लिहून काढणे,
 कठीण शब्द वाटत असतील तर ते पुन्हा पुन्हा म्हणणे रेकॉर्ड करणे 
आणि तो श्लोक पंचवीस वेळा म्हणणे रेकॉर्ड करणे
 म्हणजे काम करताना ऐकता येत असे.

ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये मार्गदर्शक ताई म्हणाल्या 

आता वर्ग सुरू होऊन झाले साताठ महिने आता खुणा करून आणा 
आणि योग्य आहेत का ते बघा.
खुणा योग्य आहेत हे कळले मग गीता अध्याय वाचता येऊ लागले. 
संथा देण्यास घेतलेला अध्याय वाचू लागले तोंडी शब्द बसू लागले 
आणि मग मात्र पाठांतर लवकर होऊ लागले.
हळूहळू श्लोक पाठ होऊ लागले.
वर्गासमोर म्हटले.
जसे वाचता येऊ लागले 

प्रत्येक एकादशीला संपूर्ण गीता वाचू लागले. 

अजूनही वाचते.
डिसेंबर २०१६ मध्ये ब्राह्मण सभा गिरगाव येथे 
अठरावा अध्याय ४० श्लोक मी प्रथमच माईक वर म्हटले 
सर्वांना खूप आवडले टाळ्या वाजल्या. 
(सगळ्यांसमोर उभे राहून आणि ते सुद्धा माईक समोर प्रथमच)
आणि दुसऱ्या दिवशी  रिझल्ट लागला 

मला तिसरे बक्षीस मिळाले.



 


आपण जर योग्य म्हणत आहोत,
पूर्ण माहितीसह येत 
आहे, तर धिटाई येते हे कळले,  
 मग भीती वाटत नाही याची खात्री झाली.

सरांनी अकरावा अध्याय शिकवायला घेतला.

 मार्च मध्ये.
 हा विश्वरूप दर्शन योग आहे.
यात बरेच श्लोक त्रिष्टुप छंदातील आहेत. 
श्लोक २४ अक्षरांचा, 
तर सर म्हणाले याची स्पर्धा ठेऊ.वर्गात, !!
तुम्ही पाठ करून वर्गात म्हणून दाखवा. 
मग ते पाठ करू लागले. 
आणि आधीचे पाठ करत होते, 
एक एक अध्याय.!!
असे करता करता मे मध्यात संपूर्ण गीता संथा देऊन झाली 
आणि
 मी अकराव्या अध्यायातील ते श्लोक वर्गात म्हटले.!
दिवस होता १६ मे २०१७
अजून दोघींनी ते श्लोक म्हटले.
 ( आम्ही तिघी शृंगेरी येथे गेलो. )
संपूर्ण वर्गात आम्ही तिघींनी सरांची इच्छा  पूर्ण केली.
पण अकरावा अध्याय पाठ झाला होता 
आणि २०१७ मे अखेर गीता संथा देऊन झाली.
तो पर्यंत माझे  १३ अध्याय पाठ झाले होते.
आता जे अध्याय पाठ करायचे राहिले ते करू लागले रोज एक श्लोक.!!!
आणि जो श्लोक पाठ झाला तो पाच वेळा लिहू लागले 
आणि पाठ झालेले अध्याय रात्री म्हणू लागले. 
रोज ९ अध्याय म्हणत असे. 
२७/२८ एप्रिल२०१७ या दिवशी अक्षय तृतीया होती.  

आणि यजमान म्हणाले, चल रोज मी तुझे पाठांतर घेईन.. 
त्याप्रमाणे रोज माझे पाठांतर घेत,
 सकाळी लवकर किंवा रात्री.!! 
म्हणता म्हणता माझी संपूर्ण गीता पाठ झाली. तारीख होती....

१५ नोव्हेंबर २०१७.!!!

   डिसेंबर महिन्यात... स्पर्धेवेळी सर भेटले.
 त्यांना सांगितले. माझी संपूर्ण गीता पाठ  झाली आहे. 
आता वेध लागले शृंगेरी येथे जाण्याचे.! 
पाठांतर, सराव जास्त करू लागले. 
मध्ये मध्ये विसरत असलेले, 
अडखळत असणारे श्लोक १०० वेळा सुद्धा म्हटले.
 लिहून काढले... पाच पाच वेळा. 

अधून मधून पूर्ण अध्याय अर्थ वाचन करणे, 
उच्चार लक्षपूर्वक करणे, कुठे स्पर्धा असेल तर भाग घेणे,
 दोघी मिळून म्हणणे, रोज संध्याकाळी.
 म्हणजे काही चुकत असेल तर त्याची दुरुस्ती करता येत असे.

२०१८ यावर्षी .... संकल्प केला .

१ जानेवारी पासून एक वही घेऊन त्यात
 गीता लिहिण्याचा संकल्प केला , 
जसा वेळ असेल तसे श्लोक लिहू लागले
मार्च , हनुमान जयंती
यादिवशी गीता लिहून झाली.... 
आता त्यात काही महत्त्वाचे लिहू लागले,
 रोज गीता म्हणत होतेच साधारण ३००/३५० श्लोक.!!!!

अधून मधून अर्थ वाचन वेगवेगळ्या पुस्तकातून.!

सरांनी शृंगेरी येथे सहा जणींचे फॉर्म भरून पाठवले ,


तारीख होती 
२६ नोव्हेंबर.२०१८..!!!
आता अधून मधून सरांकडे सरावासाठी  जमू लागलो.!
 कधी कधी माझ्या घरी.
 छान सराव होऊ लागला.
 एकदोनदा माहीम येथे.!

६ /५ / २०१९ या दिवशी शृंगेरी येथे जाण्याची तारीख कळली.

२१ जुलै २०१९.!!!!!

 उत्साह वाढला तसा सराव वाढला.!
 घरी आणि सरांकडे .!

जाण्याची तारीख कळली तेव्हाच तिकिटे बुक केली
आणि पुढील तयारी साठी लागलो.

असा गीता प्रवास छान झाला

खूप खूप आनंद झाला. आपल्याला आपला धर्मग्रंथ येतोय.
प्रत्यक्ष भगवंतांचे शब्द.!!!!
आता कुणी गीतेबद्दल चुकीचे, अपूर्ण , पाठवले तर ते सांगता येते.
कुणी गीता यावर विनोद पाठवला तर आवडत नाही.
आता हळूहळू... अर्थ वाचणे, निरनिराळी गीतेवरील पुस्तके वाचणे सुरू केले आहे.

ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ

 दादर विठ्ठल मंदिर 
येथे गीता आठवा अध्याय पाठांतर स्पर्धा झाली
२०१८ मध्ये 
 येथे मला दुसरे बक्षीस मिळाले. 

डिसेंबर २०१८
ब्राह्मण सभा गिरगाव येथे पहिला अध्याय  पाठांतर स्पर्धा झाली.
त्यात मला उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले
मला छान म्हणता आले.
धिटाई वाढण्यासाठी स्पर्धेत भाग घेत होते.

अध्याय म्हणताना

प्रमाणपत्र आणि बक्षीस

 हाती घेतले ते पूर्ण व्हावे म्हणून देवासमोर ठेवले. 



No comments:

Post a Comment