Sunday, 28 February 2016

सुर्योदय कर्जतचा..…


     इंद्रायणीमधे सकाळी बसलो.... चला प्रवासात सुर्योदय पाहू!
पावसाळा होवून पाच महिने झालेत,
 थंडीपण संपलीय आणि उन्हाळ्याची चाहूल लागू लागली.
 कोकिळेचे कूजन ऐकू येऊ लागलंय...
    सव्वासात वाजले तरी सुर्यनारायणाचे दर्शन नाही.
आकाशात तर कुठेही सूर्य दिसेल असं वाटत नाही इतकं आकाश दमटसर, धुकं युक्त..... 
असं दिसत असतांनाच

 सुंदर असं  सूर्यदेवांचे दर्शन.... जणू सोन्याचे तबकच...

 पण आजूबाजू मात्र किंचित केशरी-सोनेरी!
     सगळी जमीन मात्र रखरखीत दिसतेय. 
जे रान उगवलं होतं ते सगळं वाळलंय ... अर्थात त्याचं आयुष्यच तेवढं.....
 झाडं सुद्धा निस्तेज अशी दिसत आहेत.
कर्जत आलंच की.... चला गरम गरम वडा खात खात खंडाळ्याकडे निघालो
मस्त डोंगररांगा, दऱ्या, डोंगरमाथ्यावर सूर्य आणि हातात मस्त कॉफीचा कप...
खंडाळा स्टेशनजवळ छान हिरवी झाडी, छोटी सुंदर घरं....
∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞

एवढ्यात... एस.टी...लोकांच्या भाषेत लाल डबा.! 

तिचं दर्शन झालं हिचं महत्त्व आपल्याला वाटत नाही पण.... 
कानाकोपऱ्यात गावोगावी पोहोचणारी... हिचं महत्त्व खेडोपाडी आहे.

(रस्ता तेथे एस.टी)

आता फक्त साधी लाल गाडी नाही हं..
बदल झालेत ...
हिरकणी... निमआराम बस.
शिवनेरी... आरामदायी, वातानुकुलीत बस. लवकर पोहोचणारी.

∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞

लोणावळा आलंसुद्धा.!
      रेल्वेप्रवास मला फारच आवडतो. 
सारखे येणारे फेरीवाले.., किती विविधता असते....
चहा, ... त्यात सुद्धा मसाला, आलं घातलेला चहा आणि डीपडीप चहा, 
कॉफी,
 इडली-मेदूवडा, कटलेट, ऑम्लेट, चिकिवाले, जेलीगोळ्या, 
आणि पासकव्हर, पासपोर्ट कव्हर...इत्यादी इत्यादी.

मुलांसाठी खेळणी...

 कधी पुणे येतं कळतंच नाही..

«» «» «» «» «» «» «» «» «» «» «»

Friday, 26 February 2016

मराठी भाषा दिन....


ज्येष्ठ साहित्यिक, कवी, लेखक, नाटककार... वि.वा.शिरवाडकर यांचा जन्मदिवस...
मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो.
यांना मराठी साहित्याचा १९८९ या वर्षी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे.

۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞

मायभाषा...

मला वाटतं मराठी बोली भाषा.... शिकायला बोलायला अगदी सोपी आहे. 
 इतर भाषिक ती सहज बोलू शकतात. हे तिचं वैशिष्ट्य आहे.
 बोलतांना व्याकरण हा भाग जमला नाही तरी चालतो.
दर पाचसात मैलांवर थोडी थोडी भाषा बदलत जाते.
तरी सर्वसाधारण ती समजते.

या भाषेला मस्त गोडवा आहे.

इतर भाषिक मराठी बोलू लागले की लगेच कळतं की हे मराठी नाहीत.
मराठी बोलणारा महाराष्ट्रातील कोणत्याही भागातला असला तरी त्याचं बोलणं मस्त वाटतं.
सातारा, कोल्हापुर, वऱ्हाडी
कोकणातली, मराठवाडा, नागपुर....

आपल्या मराठीचं महत्त्व केव्हा कळतं???

माहिती आहे???
आपण महाराष्ट्र सोडून इतर प्रांतात जातो तेव्हा कानावर
 आपले... मराठी शब्द ऐकतो आणि चटकन वळून बघतो... कोण बरं बोलतंय मराठी???
म ओळखदेख नसतांना सुद्धा आपला थोडा तरी संवाद होतो.
आपले मराठी बांधव सर्वदूर पसरले आहेत, जिकडे तिकडे मराठी मंडळं आहेत.
छान आपले सणवार साजरे होतात. ऐकून सुध्दा छान वाटतं.

♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡

भाषा बदलत जाते, नवे नवे शब्द येतात, साहित्य वाढत जातं आणि 
 जुने लिखाण समजायला जड वाटतं.!
हळूहळू झालेला  बदल … आपण स्वीकारतो 
आताचं मराठी हे इंग्रजी शब्द मिश्रित होऊ लागलंय.!

याला मिंग्लिश म्हणायचं का?

मराठी म्हणणं टाईप करतांना इंग्रजी अक्षरांचा आधार घेऊन संभाषण करायचं...

Kase aahat sagle?

आणि मराठी टाईप करायचं पण.... इंग्रजी शब्द घ्यायचे...
आताच बघा ना... टाईप!
आहे ना मराठी शब्द.. टंकलेखन.
पण टाईप हा आपला सहज मराठीत येऊन बसला आहे
 जसा की मराठीच शब्द.. वाटावा
असो....
मी मराठी, मला अभिमान आहे मराठीचा... असं जरी असलं तरी

*इतर भाषांचा मान ठेवायलाच हवा.

आपल्या आजुबाजुचे प्रांत आहेत तेथील भाषा कामापुरेशा बोलता यायला हव्यात.
इतर भाषांमधील चांगले शब्द आणि महत्त्वाचं शिव्या माहिती असायला हव्यात
जर आपल्याला कोणी शिवी दिली तर ती आपल्याला कळली पाहिजे.... असं मला वाटतं.!
☆ ☆ ☆☆ ☆ ☆ ☆ ☆ ☆ ☆ ☆ ☆ ☆ ☆ ☆ ☆ ☆ ☆ ☆ ☆
इंग्रजी तर उत्तमच यायला हवी..... ती आज ज्ञानभाषा, शिक्षणाची भाषा आहे.
गुजराथी ही व्यापाराची भाषा आहे असं मला वाटतं
(निदान मुंबईत तरी)
जे मराठी माध्यमातून शिकतात त्यांना वाटतं...
आपलं थोडं नुकसान झालं!!
इंग्रजी माध्यमातून शिकतात,
  पण पुढे जाऊन मराठी भाषेचा अभ्यास केल्यावर त्यांना वाटतं... 
मराठी माध्यम असतं तर बरं झालं असतं....

❀ ❀ ❀❀ ❀ ❀❀ ❀ ❀❀ ❀ ❀❀ ❀ ❀❀ ❀ ❀

मोठे मोठे लोक जेव्हा म्हणतात की मुलांना मराठी माध्यमातून शिकवा...
पण यांची मुलं, नातवंड मात्र इंग्रजी माध्यमातून शिकतात.
तेव्हा लोक कसा विश्वास ठेवणार त्यांच्या विधानावर?
म मराठी माध्यमाच्या शाळांना गळती लागते.
 हळूहळू शाळा बंद पडू लागतात. म तो चिंतेचा विषय वाटू लागतो.

❀ ❀ ❀❀ ❀ ❀❀ ❀ ❀❀ ❀ ❀❀ ❀ ❀❀ ❀ ❀

मराठी माणूस कष्टाळु आहे ही जशी त्याची चांगली ओळख आहे 
तशी...
जो हजर नसेल त्याच्याबद्दल बोलणारा....
भाऊबंदकी, वारसाहक्क मागणारा.....
जर कुणी पुढे जात असेल तर त्याचे पाय खेचणारा... ही त्याची ओळख आहे
असं गमतीत म्हटलं जातं
आपण मराठी लोकच मराठी प्रांतात प्रथम हिंदीतून प्रश्न विचारतो... हो ना!
*********************************************************************
शेवटी काय तर आपण आपल्या मातृभाषेतून आपलं म्हणणं अधिक चांगलं मांडू शकतो हे खरं.
*********************************************************************
पण यातून एक छान आहे की स्मितहास्य, हास्याची जगाची एकच भाषा आहे.
.ツ.....ツ.....ツ.... .ツ.....ツ.....ツ.....ツ.... .ツ.....ツ.....ツ.....ツ.... .ツ.....ツ.....ツ.....ツ.... .ツ....

Thursday, 25 February 2016

नुकसान होतं ??


मला नाही आवडत काही गोष्टी....

मी टीव्ही बघत नाही....
फावला वेळ आहे म्हणून घेतला रिमोट आणि लावला टीव्ही.....
आठवावंच लागेल... ही गोष्ट मी कधी केली????
टीव्ही लावला असेल आणि वेळ असेल तर.... थोडं काही बघितलं तर.....
काहीवेळा मात्र मैत्रिणींमध्ये एखाद्यावेळी सिरीअल बद्दल चर्चा होते 
तेव्हा मात्र मी स्पष्ट सांगते... मी अगदी अडाणी आहे मला यातलं काहीच माहिती नाही....
सिरीअल बघावी, उत्तम संवाद, सुंदर अभिनय.!
पण नंतरच्या चर्चा...
आता काय होईल आणि काय व्हायला हवं होतं
याची खुप चर्चा....

चित्रपट...

आता आता मराठी चित्रपट वेगनेगळ्या विषयांवर येऊ लागले आहेत
 ते मात्र चित्रपटगृहात जाऊन बघते... कधीतरी.!

बातम्या...

बातम्यासुद्धा क्वचित ऐकते.
पेपर सुद्धा ....
राजकारणाबद्दलच्या बातम्या वाचत नाही.
सकाळी तर अजिबातच नाही
कारण.... मग तेच तेच मनात घोळत राहते...
असं एक आजोबा म्हणत असत..

तसंच कोणतीही निवडणूक..
कोण जिंकलं, कोण हरलं??
काय करायचंय आपल्याला.
असं एक मित्र म्हणतो....
तो म्हणतो... कोणताही पक्ष सत्तेवर आला तरी 
आपलं पाणी आपल्यालाच भरायचं आहे सकाळी उठुन!
आणी दुपारच्या व रात्रीच्या जेवणाची सोय आपली आपल्यालाच करायची आहे.
तर उगाच आपलं नको त्या विषयावर चर्चा कशाला??

क्रिकेट....

मॅच बघावी... पण त्यावर तासंनतास फालतू चर्चा... कशाला
या गोष्टी माहित नसल्या तरी काही अडलंय का कोणाचं?
मनाचा मनाशी संवाद करावा,
वेळ सत्कारणी लावावा.
शांत बसावं.
काही मनात असेल ते लिहावं.
कोणाचं चांगलं ऐकावं.
भाषेची शब्दसंपत्ती वाढवावी.
रेडिओवरील चांगले कार्यक्रम ऐकावेत.
अगदी लहान मुलं खेळतात ते बघावे.

तर... महत्त्वाचं काय?? 

आपण आनंदी असणं आणि दुसऱ्यांना आनंद देणं....

ज्या गोष्टींमुळे आपल्याला आनंद मिळतो त्या चांगल्या गोष्टी कराव्यात.
:) :) :) :) :)

Wednesday, 17 February 2016

भगवद् गीता संथा वर्ग


कालचा दिवस महत्त्वाचा,

तारीख पण SPL.

१६/२/१६

संध्याकाळी .....
श्रीमद्भगवद्गीता संथा वर्ग सुरू झाला.

संथा म्हणजे.....

कोणाकडूनतरी ऐकणं आणि कोणीतरी म्हणणं.!

यामध्ये गीता कशी म्हणायची ते शिकवणार आहेत.
हा वर्ग मंगळवार बुधवार असेल.
वेळ संध्याकाळी ६ ते ७

साधारण दीडवर्ष.
प्रत्येक श्लोकातील प्रत्येक ओळीत १६ अक्षरे असतात. 
त्यातील ८ अक्षरांचा एक गट ७ वेळा म्हणायचा
 मग पुढचा गट सातवेळा म्हणायचा.
८ अक्षरांनंतर यती... म्हणजे किंचित पॉज् घ्यायचा.
मग पूर्ण ओळ ५ वेळा म्हणायची याप्रमाणे दुसरी ओळ.
मग पूर्ण श्लोक ३ वेळा म्हणायचा.
ही पद्धत आहे .
एकावेळी सात श्लोक म्हणायचे कसे ते दाखवणार आहेत.

ं अनुस्वाराचा उच्चार कसा होतो?

कोणत्या शब्दावर जोर द्यायचा?

ऱ्हस्व शब्द असेल तर त्याचा उच्चार आणि दीर्घ शब्दाचा उच्चार....

जोडाक्षर आलं की आधीच्या शब्दावर जोर द्यायचा.
उदा. विघ्न...तर वि या अक्षरावर जोर येणार.

क्ष व ज्ञ ही जोडाक्षरे आहेत.

क्ष् = क् + ष्
ज्ञ = ज + ञ
म्हणून अनुस्वारापुढे क्ष किंवा ज्ञ हे व्यंजन आले तर 
अनुक्रमे क किंवा ज हे व्यंजन आले असे समजावे.
लक्ष या शब्दात ल वर जोर येणार.
धर्मक्षेत्रे या शब्दातया अक्षरावर जोर येणार.
तसंच अनुस्वारासंबंधी.....
अनुस्वाराच्यानंतर येणाऱ्या अक्षरावर, अनुस्वाराचा उच्चार कसा करावयाचा हे अवलंबून असतं.
बाराखडी माहित असणं आवश्यक आहे.
क ख ग घ  ङ
च छ ज झ ञ
ट ठ ड ढ  ण
त थ द ध  न
प फ ब भ  म
य र ल व
श ष स  ह ळ
क्ष ज्ञ
यातील जे शेवटचे अक्षर आहे त्याचा अनुस्वराच्या उच्चाराशी संबंध आहे.

( प च्या ओळीपर्यंत )

★त्यापुढील अक्षरे याबद्दल सगळ्यात शेवटी दिले आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------
पश्यैतां पाण्डुपुत्राणा
यामध्ये ता वर ं आहे.
पुढील अक्षर प आहे
तर प च्या ओळीतील शेवटचे अक्षर म आहे म्हणून तां हा उच्चार करतांना ताम असा उच्चार होणार
व्यूढां द्रुपदपुत्रेण
यामध्ये ढा वर अनुस्वार आहे त्या पुढील अक्षर द आहे
द च्या ओळीतील शेवटचे अक्षर न आहे म्हणून व्युढान असा उच्चार होणार.!

ooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooo
पाण्डवानिकं व्यूढां
यामध्ये क वर ं आहे
त्याचा उच्चार व असा होणार
(कव)
*****************************************************************
सञ्जय याचा उच्चार संजय
असा करायचा
तसंच ष चा उच्चार ष असाच आला पाहिजे, तो श सारखा वाटता कामा नये.
उदा. विशिष्ट
विराटश्च यातील श्च कडे नीट लक्ष दिले पाहिजे
ट या अक्षरावर जोर येणार.

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
तसंच शेवटी पसायदान म्हणणार....
यात..... दुरिताचे तिमिर जावो...
 हा शब्द दुरितांचे असा कधीही उच्चार करायचा नाही.
तसचं
चला कल्पतरूंचे आरव....
यातील च चा उच्चार चमचा सारखा करायचा नाही.
अचल मधे करतो तसा करायचा.

<><><><><><><><><><><><><><><><><><><><><><><><><><><>

विसर्ग :

अ नंतर
ओळीच्यामधे ऩः =  नहः
धृष्टकेतुश्चेकितानः (१।५)
आ नंतर विसर्ग असेल तर
द्रुपदश्च महारथः (१।४ )
महारथाहा
(शेवटी आला तर हा)
<><><><><><><><><><><><><><>
दीर्घ उच्चार नीट येण्यासाठी
इ, ईsss
उ, ऊsss
कु कूूsss
असा सराव करावा.
धीsssमता (१।३)
वीsssर्यवान् (१।४)
चमूsssम् (१।३)
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
हे जे खाली लिहिलंय ते उच्चाराचा कागद आहे त्यावरुन लिहिलं आहे.

अनुनासिक उच्चारासाठी   ँ   चंद्रकोर येते.

य य्ँ = हन्तारं यश्चै
          हन्तारय्ँ
ल ल्ँ  = हयेषां लुप्त
           हयेषाल्ँ लुप्त
व व्ँ  = पाञ्चजन्यं हृषी
           पाञ्चजन्यव्ँ
क्ष ङ् = न कांक्षे
           न काङक्षे
ज्ञ ञ् = आवृतं ज्ञान
           आवृतञ ज्ञान
श व्ँ = शस्त्रं शस्त्र
          शस्त्रव्ँ शस्त्र

           
ह व्ँ  = वयं हन्तु-
          वयव्ँ हन्तुं

ष व्ँ
याप्रमाणे उच्चार करावेत
क ङ् = हर्षं कुरु
           हर्षङ् कुरु

याप्रमाणे

∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞

 

 

 

 

 

 

Saturday, 13 February 2016

प्रसाद.....


°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

प्रभूचं साक्षात दर्शन.

किंवा

प्रत्यक्ष साक्षात दर्शन!!!

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

पुर्वीच्याकाळी यात्रा करणं खुप कठीण होतं.

साधारण वय मोठं झालं की यात्रेला जात असत.
प्रत्येकालाच यात्रेला जाता यायचंच असं नव्हतं.
प्रवासाची साधनं कमी होती,
बाहेर हॉटेलमधे, धाब्यावर खाण्याची पद्धत नव्हती.
म मिळणारा प्रसाद मोठ्या भक्तीभावाने हातात घेतला जायचा,
 तेवढ्याच श्रद्धेने खाल्ला जायचा..
आता मात्र प्रसाद... अगदी कणभर, गोड आहे , जास्त नको....
असं म्हटलं जातं
तरी सुद्धा...
नवरात्रात महालक्ष्मीला जातो...
प्रसाद असतो आपल्या हातात....
कंडक्टरला, वाहनचालकाला मी तो देते.

ते खुश होतात.

पोलीस असेल तर त्याला देते,
तो म्हणतो...ताई, कोणीच प्रसाद देत नाही. इथे १२-१२ तास ड्युटी करतो.
तुम्ही दिलात खुप बरं वाटलं.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

★ प्रसाद जास्तीतजास्त जणांना मिळावा.

★ज्याचा भाग त्या प्रसादात असतो, त्याच्यापर्यंत तो पोहोचतो.

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
पिठापुरम् येथे दत्तयाग केला,
पेढ्याचा प्रसाद वाटला.
बरोबरचे बरेच जण गोड... नको एक तुकडा द्या..
पण ६/७ आचारी... पेढा खाल्ल्या खाल्ल्या ... मस्त आहे प्रसाद. 
असं म्हणून आवडीने त्यांनी प्रसाद खाल्ला.
अजून देऊ का???
तर द्या म्हणाले.
आणि आनंदाने प्रसाद खाल्ला.

तसं आम्ही ना... 

कोणी प्रसाद दिला तर तो ज्याला दिला आहे तो सगळा खातो,
 घरच्यांसाठी ठेवत नाही,
 कारण तो नंतर खाल्ला जातोच असं नाही, म तो इकडे इकडे ठेवला जातो.
तसं अंगारा येतो तो.... कपाळाला लावून बाहेर फुंकरतो,
प्रसादाचा नारळ मिळाला तर
 त्याचा गोड पदार्थ करतो किंवा त्याचे तुकडे करून खातो.
<><><><><><><><><><><><><><><><><><><><><><><><><><>

कोणत्या देवाला कोणता प्रसाद दाखवतो???

गणपती... मोदक, बेसन लाडू....
देवी.... पुरणपोळी, चणेगुळ
विठ्ठल... कुरमुरे फुटाणे...
श्रीगजाननमहाराज... झुणका/ पिठलं भाकरी
कृष्ण... दही, लोणी
शंकर... दुधसाखर.
सत्यनारायण... शिरा
सत्यविनायक... खव्याचे तळलेले छोटे छोटे मोदक

सर्वसाधारण, फळं, करंजी, पेढे,बर्फी... 

असे गोड पदार्थ नेवैद्यासाठी दाखवले जातात.

<><><><><><><><><><><><><><><><><><><><><><><><><><>
आणि देवाला नेवैद्य दाखवतांना...

ताट कसं छान भरलेलं हवं.... हो ना.!

वरण, भात, तुप, लिंबू,
चटणी, कोशिंबीरी, दही
पुरण, खीर, तळण, गोड पदार्थ, पोळी किंवा पुरी
मसाले भात.!
वाटीत पातळ भाजी/आमटी, दोन भाज्या बहुतेक एक उसळ करतात.

नेवैद्य दाखवतांना.....

गणपतीला असेल तर दुर्वा ठेवतात.
तर बाकी सगळ्या नेवैद्याच्या वाढलेल्या ताटात
 वरण भातावर तुळशीचे पान ठेवतात.

कोणत्याही पदार्थाचा नेवैद्य दाखवला की

 तो पदार्थ थोडावेळ तरी देवासमोर ठेवावा असं मला वाटतं.

{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}






 देवीच्या नेवैदयासाठी पुरणपोळी 








Thursday, 11 February 2016

आजचं वेगळं वॉक.....


सकाळी लवकर जाग आली नाही...
उशीर झाला ना उठायला...
म सगळ्यांना whatsapp सुप्रभात, गप्पा....

आजचा दिवस छान.... माघी गणेश चतुर्थी.... गणेशजन्म.!

आणि गुरुवार... चला मठात जाऊ....
रस्ता ओलांडतांना बस दिसली... लांबून १२६ वाटली... 
मला धावतांना पाहून वाहनचालकाने थांबवली... पटकन् चढले.
आणि कंडक्टरला विचारलं..
१२६ आहे ना...
तर तो नाही म्हणाला पण म्हणाला .... स्टॉपला उतरा.
बरं वाटलं... चिडला नाही
पुढच्या स्टॉपला उतरले.
मागोमाग आलीच बस.!
चढले बसमधे अवघी ८-१० माणसे होती.
तर.... बसमधे जुनी हिंदी गाणी ऐकू येत होती.
क्षणभर वाटलं आपण सहलीला निघालोय.
एक ७० च्या जवळचा ज्येष्ठ हातात रेडिओ घेऊन ती गाणी ऐकत होता.
 आणि त्या गाण्यावर मस्त हातवारे करून ते गाणे enjoy करत होता.
(गाणं... ओ हसीना जुल्फोवाली जाने जहाँ...)
कंडक्टर म्हणाला... हे रोजचं आहे. रेडिओ घेऊन फिरतात. 
आणि मोठ्याने गाणी लावतात.
बसमध्ये एक मुलगी भेटली.
ती म्हणाली..
मस्त ना... हे आजोबा....
त्यावर मी तिला म्हटलं....
* की हे आपण कशा मनस्थितीत असतो त्यावर आहे....

* आपला चांगला मूड असेल तर आपण ते enjoy करतो.

मनस्थिती ठीक नसेल तर ....

काय कटकट आहे.. सकाळी सकाळी

असं म्हणतो.
आनंद घ्यायचा की चिडचिड करायची.... आपल्यावर असतं.!!!!

है ना.

   मठात जाऊन दर्शन घेतलं.
चला वॉक सुरू.....
अचानक समोर केबल वायरवरून दोन माकडं जातांना दिसली.

 सकाळची छान वेळ आणि आम्ही दोघं.. मस्त गप्पा मारत निघालो.
 चालत चालत वाडीतआलो
वाडीतच  एक गुजराथी बाई राहतात... त्यांनी लांबूनच विचारलं...
 कैसी हो????
आणि अर्धातास छान गप्पा झाल्या.
निघतांना म्हणाल्या.... छान वाटलं गप्पा मारून...
मी म्हटलं ... मला सुद्धा.
तेवढ्यात त्यांचा नवरा आला. 
थोडा त्रासिक स्वरात म्हणाला....
आधा घंटा हुआ अभी तक यही खडी हो....
हा हा जा रही हूँ....
गप्पा थांबल्या... पण या गप्पा आम्हा दोघींना खूप आनंद देऊन गेल्या...
गप्पांच्या ओघात आजपासून सुरू होणाऱ्या भगवद् गीता वर्गाबद्दल माहिती दिली....
 त्या येईन असं म्हणाल्या.

०००००००००००००००००००००००००

आजपासून भगवद् गीता वर्ग सुरू होईल.
दीड वर्ष.
आठवड्यातून दोन दिवस
मंगळवार बुधवार...
संध्याकाळी ६ ते ७

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

मनात खूप दिवस होतं.... 

भगवद् गीता पाठ करावी.

 शिकावी. कोणाकडून तरी ...

ऐकावी.... सहज सोप्या शब्दात.!

योग जुळुन आलाय....

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

★ चांगला विचार आला की तो बहुतेक पूर्ण होतोच

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Tuesday, 9 February 2016

चला.... मॉर्निंग वॉक


सकाळी लवकरच जाग आली.
म्हटलं मुहुर्त करू या.
आजपासूनच सुरु करू...
खुपच लवकर निघाले.
नानाचौक स्वच्छ, निवांत, तुरळक, कोणी दिसत नव्हतं.
छान सुखद असा गारवा...
मस्त वाटलं चालतांना....
चौपाटी???? अरे हे काय?
संपूर्ण पत्र्यांचं कुंपण घातलंय.!
का बरं???
ओ...

आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत. 

नमो..!!

१४ फेब्रुवारी... जोरदार तयारी सुरू आहे.
 रस्ते नवे बनत आहेत, ते पण कांम सुरू आहे.

तर.... जे काही साहित्य दिसत होतं....

 त्यावर दंव दिसत होतं. मस्त वाटलं

मी छोटी झाडं आहेत तेथपर्यंत गेले नाही ना....
नाहीतर झाडाच्या पानांवर दवबिंदू मस्त दिसले असते.
लोकमान्य टिळकांना प्रणाम केला.
खुप लवकर गेल्यामुळे सुर्यदर्शन झालं नाही.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

अशी सुंदर दिवसाची सुंदर सकाळ.….

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

चर्नीरोड  स्टेशनलाच गेले.
तेथेच छोटं साईबाबांचं मंदिर आहे.
येणारा प्रत्येकजण घंटा वाजवून बाबांचे दर्शन घेऊन कामावर जातो.
तसंच मी ....
तेथील छोटी घंटा वाजवली.
बाबांचं दर्शन घेतले. प्रसन्न वाटलं.
रेल्वे यायला वेळ होता.
मस्त दीर्घ श्वास घेत बसले.
 घरी आल्यावर पेपरवाचन....
शब्दकोडे, सुडोकू सोडवले.
छान सुरूवात झाली दिवसाची.!
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
आता.....

तुमच्याबरोबर संवाद होईल. आणि मनाचा मनाशी सुद्धा.!!!

••००••००••००••००••००••००••००••००••००••००••००••००••००••००••००••

Saturday, 6 February 2016

कल्पवृक्ष... नारळ


श्रीफळ...

सुमुद्रकिनारी दिसणारी ही नारळाची, माडाची झाडं.!
सरळसोट उंच असणारी,
 तसंच जसा वारा असेल तशी झुकणारी 
आणि शेंड्याला अनेक झावळ्या,
वाऱ्यानी मस्त डोलणाऱ्या झावळ्या आणि
वर नजर टाकली तर दिसणारी शहाळी/नारळ
माडाच्या झाडाला
 किंवा

 नारळाच्या झाडाला कल्पवॄक्ष कल्पतरू का म्हणतात???

हा प्रश्न प्रत्येकानेच लिहिला असेल.

(मुळापासुन शेंड्यापर्यंतच्या प्रत्येक भागाचा उपयोग होतो)

—————————————————

कोककणातील माणूस आपली श्रीमंती सांगतांना झाडं-माडं किती हे सांगतो.

—————————————————

नारळ, श्रीफळ......

 

 प्रत्येक भागाचा उपयोग होतो म्हणून तर श्रीफळ म्हणत असतील का???

तर.....

देवाची करणी आणि नारळात पाणी.!

किंवा....

कोकणची माणसं साधी भोळी,

काळजात त्यांच्या भरली शहाळी.

वरून टणक पण आतून गोड.....
असं गाण्यात दिसणारं वर्णन
खरंच खारी हवा असलेल्या ठिकाणी ही झाडं असतात. 
पण हे शहाळ, नंतर होणारा नारळ... 
किती गोड पाणी असतं...
 काही वेळा तर सहज शब्द येतात की अमृतासारखं गोड पाणी आहे.

नारळाचं पाणी, नैसर्गिक म्हणूनच शुद्ध
आणि म्हणूनच अमृतासमान.!!!!

* बरं नसेल तर .... शहाळ्याचं पाणी प्यालं जातं.
एरव्ही सुद्धा शहाळ्याचं पाणी आवडीने प्यालं जातं.
शहाळं,
 सुखड,






नारळ,
गोटा नारळ, 







मोहाचा नारळ,
मोदकांसाठी खास नारळ असतात.
सुकं खोबरं,
डेसिकेटेड कोकोनट..... सजावटीसाठी,
लाडू करण्यासाठी.....
उपयोगी.!

..................................................................................................

* नारळात काही वेळा आतल्या बाजूने कोंब असतो, (मस्त लागतो).

 

 

* काही वेळा नारळाला कोंब येतो (बाहेरून) आणि घरीच नारळाचं झाड वाढतांना बघता येतं.





* काही हॉटेल मध्ये देव्हाऱ्यात असं छोटं नारळाचं झाड असतं, ज्याची पूजा केली जाते.
* देवासमोर नारळ वाढवला जातो.
(म्हणजे नारळ फोडतात)
* देवीची खणानारळाने ओटी भरली जाते.

* कोणतेही धार्मिक कार्य असेल तर देवासमोर विडा सुपारी नारळ ठेवतात.

* लग्नमुंजीचं निमंत्रण करायला आले की मानाचा नारळ देण्याची पद्धत आहे.
* आहेर करतांना पण दिल्या जाणाऱ्या भेटी बरोबर नारळ दिला जातो.
 देतांना त्याची शेंडी समोरच्या व्यक्तीकडे ठेवतो.

* सत्कार करतांना... शाल श्रीफळ देऊन  सत्कार करतात.

* जावयाला मांडवात घेऊन येताना छान सजवलेला नारळ देतात.

* नवरीमुलीची सुखड, असोला नारळाने ओटी भरतात.
* प्रवासाला निघतांना देवासमोर नारळ ठेवतात, 
तसंच गाडीला ओवाळुन तो नारळ फोडतात, 
मग प्रवासाला सुरूवात करतात.

❀ ❀ ❀❀ ❀ ❀❀ ❀ ❀

* हे फळ बाराही महिने मिळतं
* नारळाला तीन डोळे आणि शेंडी असते.
* शेंडी ठेवुन नारळ फोडला जातो.

.ツ.....ツ.....ツ.... .ツ.....ツ.....ツ.....ツ.... .ツ....

* माडावरून नारळ काढणं कठीण असतं, 
माडाला काही अंतरावर खाचे पाडले जातात आणि
 तेथे पाय ठेवत वरवर चढतात आणि नारळ पाडले जातात.
(खाचे एकदाच पाडतात.)
★ पण आता सिंगापुरी नारळाची झाडं लावतात,
 ज्याची उंची कमी असल्याने झाडावर चढून नारळ काढावे लागत नाहीत, 
सहज हाताने काढता येतात. शहाळ्याचा रंग केशरी असतो.
* शहाळं सोलणं सुद्धा कठीण, खूप धारदार सुरी लागते.
शहाळं -  नुसतं पाणी, पतला मलई, जादा मलई अशा स्वरूपात मिळतं
* शहाळं कसं हे बघण्यासाठी बोटाने टिचकी वाजवून परीक्षा घेतली जाते.
तर नारळ चांगला आहे ना हे पाहण्यासाठी
 विशिष्ट प्रकारची अंगठी बोटात घालून ती नारळावर वाजवून बघतात.

.ツ.....ツ.....ツ.... .ツ.....ツ.....ツ.....ツ.... .ツ....

* जेव्हा शहाळ्याचं
रुपांतर नारळात होतं तेव्हा वरील सोडण काढणे खूप शक्तीचे काम असते. 
नंतर त्याच्या किशा काढून नारळ मिळतो. 
* पुर्वी या किशा भांडी घासण्यासाठी,
बीडाचा तवा असतो त्यावर घावन घालतांना तेल लावण्यासाठी करत.
* वरील टणक भाग म्हणजे करवंटी. मग आत खोबरं आणि पाणी.
* नारळ विकत घेतांना त्यात पाणी आहे ना हे नारळ हलवून बघितलं जातं.
* जर त्यात पाणी नसेल तर गोटा आहे असं म्हटलं जातं.
* तसंच करवंटीपासून खोबरं अलग करून ते वाळवतात, तेच सुकं खोबरं.
* नारळ खूप दिवस चांगला राहतो, मात्र थंडीत नारळ तडकतात.

☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆

卐卐卐卐卐卐卐卐卐卐卐卐卐卐卐卐卐卐卐卐

* शुभ कलश... तांब्यावर केळीची पानं आणि नारळ ठेवला जातो
असा कलश करवलीच्या हातात,
 सत्यनारायणाच्या पुजेच्या वेळी चौरंगावर ठेवतात.
* देवीस्वरूप मानून, सजवून मार्गशीर्ष महिन्यात पूजा करतात.
* कुणाकडूनही शुभ कार्यासाठी, चौरंग, पाट, भांडी...
आणली तर परत देतांना नारळ देण्याची पद्धत आहे.

卐卐卐卐卐卐卐卐卐卐卐卐卐卐卐卐卐卐卐卐

* नारळ फोडण्यासाठी कोयता वापरला जातो.

* दोन छान भाग होण्यासठी मध्यभागी पाण्याची रेघ केली जाते, 

मग होणारे दोन भाग छान होतात.

 यालाच कवड किंवा नारळाच्या वाट्या म्हणतात.

* नारळ खोवतांना ते दोन भाग जर धुवुन/ ओले केले तर त्याचे कण खाली पडत नाहीत.
* नारळ थोडा कोरडा झाला तर खोवतांना त्रासदायक होतो.
* विळीची खवणी जशी असेल त्याप्रमाणे खोबरे खोवले जाते.
* आता फूड प्रोसेसर वर नारळ खोवला जातो.
* वेगळं यंत्र पण मिळतं.
* कोकणातले, राजापुरचे नारळ, व साऊथ कडचे केरळकडचे नारळ वेगळे वाटतात.
* देवस्थानात मिळणारे नारळ हे पूर्ण सोललेले नसतात.
नारळाचे तेल... केसांसाठी छान असते.
 तसेच काही पदार्थ खोबरेल तेलात करतात. (फणसाचे गरे तळतात)
पदार्थ सजावट, पदार्थाला चव येण्यासाठी खोबरे वापरतात.....

♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡

* खोबऱ्यापासून खास पदार्थ बनवले जातात.
∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞

* नारळाच्या नावाचा सण....

नारळी पौर्णिमा, सागराला नारळ अर्पण करतात,
 समुद्राची पूजा करतात आणि मग आपल्या होड्या समुद्रात सोडतात.

♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡

हा आहे कल्पवृक्ष....

याबद्दल किती लिहावं तेवढं थोडं....

सहज सुचलेलं लिहिलंय.

.ツ.....ツ.....ツ.... .ツ.....ツ.....ツ.....ツ.... .ツ....

००••००••००••००••००••००••००••००••००••००••०००••

एक आलेला रीप्लाय....

खूप छान माहिती......नारळाची
सर्वांग उपयोगी.

★गावाला पाण्याच्या ओहोळावर नारळाच्या  झाडांची खोडे टाकून 

 तात्पूर्ता ब्रीज,साकव केला जातो.

★करवंटीच्या शोभेच्या वस्तू बनवतात.

★करवंटीचे तेल औषधी आहे.


♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡

  अमावास्येला वास्तुपुरुषाला नारळ देण्याची प्रथा आहे … 

 

 

 

 

 


  अमृततुल्य …….