अनन्याश्चिन्तयन्तो मां
ये जनाः पर्युपासते ।
तेषां नित्याभियुक्तानां
योगक्षेमं वहाम्यहम् ।।
९ | २२
असे भगवान श्रीकृष्ण यांनी
नवव्या अध्यायात गीतेत सांगितले आहे.
अर्थ:
जे अनन्य प्रेमी भक्त मज परमेश्वराला
निरंतर चिंतन करीत निष्काम भावनेने
भजतात ,
त्या नित्य माझे चिंतन करणाऱ्या
माणसांचा योगक्षेम
मी स्वतः
त्यांना प्राप्त करून देतो.
:::::::::::::::::::::::::::::: ::::::
काही लोक म्हणतात योगक्षेम म्हणजे
जेवण खाण्याची व्यवस्था.!
पण असे लक्षात घ्यावे...
न मिळालेली वस्तू मिळणे याचे नाव योग व
मिळालेल्या वस्तूंचे संरक्षण करणे म्हणजे क्षेम.!
:::::::::::::::::::::::::::::: ::::
गीतेतील उपदेश:
मरणाचे स्मरण ठेवून वागावे.
हा उपदेश फार मोलाचा आहे.
गीतेचे सार असलेला अध्याय कोणता?
असे म्हणता येईल कि
नवव्या अध्यायात गीतेचे सारे सार आले आहे.
( काही लोकांना हे मान्य नाही )
ज्ञानेश्वरांच्या
मते गीतेचे सार नवव्या अध्यायात आहे.
ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी घेताना
९
वा अध्याय मांडीवर ठेवून जिवंत समाधी घेतली.
गीता-गंगेच्या बाबतीत असे म्हणता येईल कि,
९ वा अध्याय - हरिद्वार
१२ वा अध्याय - काशी
१५ वा अध्याय - प्रयाग याप्रमाणे आहेत.
- न्या. राम केशव रानडे-
संकलन.
*******************
|| अथ गीतामाहात्म्यम् ||
गीताशास्रमिदं पुण्यं
यः पठेत्प्रयतः पुमान् ।
विष्णोः पदमवाप्नोति
भयशोकादिवर्जितः ।।
ह्या
पवित्र भगवद्गीतारुपी शास्त्राचे
जो मनुष्य प्रयत्नपूर्वक पठण करेल
, तो
भय, शोक इत्यादीपासून
मुक्त होऊन विष्णूचे पद (मोक्ष) प्राप्त करतो.
गीताध्ययनशीलस्य
प्राणायामपरस्य च ।
नैव सन्ति हि पापानि
पूर्वजन्मकृतानि च ।।
जो भगवद्गीतेचा सातत्याने अभ्यास करतो
आणि नित्यनेमाने प्राणायाम करतो त्याची
या आणि पूर्वजन्मातील पापे शिल्लक राहत नाहीत.
मलनिर्मोचनं पुंसां
जलस्नानं दिने दिने ।
सकृद्गीताम्भसि स्नानं
संसारमलनाशनम् ।।
दररोज
पाण्याने स्नान केल्यामुळे
माणसे शरीराच्या मळापासून मुक्त होतात.
(परंतु)
गीतारुपी जलात एकदाच स्नान केल्याने
संसाराच्या मळाचा (पापांचा) नाश होतो.
गीता सुगीता कर्तव्या
किमन्यैः शास्त्र विस्तरैः ।
या स्वयं पद्मनाभस्य
मुखपद्माद्विनिः सृता ।।
(एकच)
गीता " सुगीता " करावी
(गीतेचे नीट अध्ययन करावे)
कि जी स्वतः
श्रीकृष्णाच्या मुखकमलातून बाहेर पडली आहे.
(गीतेचे नीट अध्ययन केले असता)
इतर शास्त्र विस्ताराची काय आवश्यक्यता??
भारतामृतसर्वस्वं
विष्णोर्वक्त्राद्विनिः सृतम्
गीतागङ्गोदकं पीत्वा
पुनर्जन्म न विद्यते ।।
महाभारतरुपी
अमृताचे सार सर्वस्व असलेले,
विष्णूच्या (कृष्णाच्या) मुखातून बाहेर
पडलेले
गीतारुपी गंगेचे पाणी प्राशन केल्यावर पुनर्जन्म येत नाही.
सर्वोपनिषदो गावो
दोग्धा गोपालनन्दनः
पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता
दुग्थं गीतामृतं महत् ।।
सर्व
उपनिषदे या गायी आहेत.
श्रीकृष्ण हा दोहन करणारा आहे.
बुद्धिमान अर्जुन
वासरू आहे आणि
त्या गायींचे दूध म्हणजे गीतारुपी मोठे अमृत आहे.
एकं शास्त्रं देवकीपुत्रगीत
मेको देवो देवकीपुत्र एव।
एको मन्त्रस्तस्य नामानि यानि
कर्माप्येकं तस्य देवस्य सेवा ।।
देवकीपुत्र
श्रीकृष्णाने गायलेले भगवद गीता
हे एकच शास्त्र आहे.
देवकीपुत्र श्रीकृष्ण
हाच एकमेव देव आहे.
त्याची जी नामे आहेत तोच एक मंत्र आहे.
त्या देवाची
म्हणजे श्रीकृष्णाची सेवा हेच एकमेव कर्म आहे.
हरी ॐ....
ज्याचे स्मरण केल्याने पापांचा नाश होतो,
त्याचे नाम 'हरी'
<><><><><><><><>
• गीता वाचायच्या अगोदर गीता माहात्म्य वाचायची पद्धत आहे.
• गीता वाचण्यामुळे काय लाभ होतो ते या माहात्म्यात सांगितले आहे.
• अनेक ग्रंथ वाचण्यापेक्षा अनेक वेळा वाचण्याजोगा एकच ग्रंथ म्हणजे गीता.
• गीतेत कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग असे तीन योग आहेत.
• परंतु प्रामुख्याने कर्मयोग हाच सांगितला आहे.
• श्रीमद्भगवद्गीता हा हिंदूंचा पवित्र ग्रन्थ आहे.
No comments:
Post a Comment