ब्लॉग.... आता 300 वे लिखाण.! तर spl लिहू काही
तर ... का बरं आपण यावर लिहू नये....
लिखाणाचे त्रिशतक...
आंबा फळाचा राजा.!!!
ঠ ঠ ঠ ঠ ঠ ঠঠ ঠ ঠ ঠ ঠ ঠ
आंब्याची आमराई
आजोळी असावी,
आढी असलेल्या खोलीत
स्वारी अमुची बसावी...
ঠ ঠ ঠ ঠ ঠ ঠঠ ঠ ঠ ঠ ঠ ঠ
बघा या कवितेच्या ओळीतून काही गोष्टी चटकन लक्षात आल्या..
ঠ ঠ ঠ ঠ ঠ ঠ ঠ ঠ ঠ ঠ ঠ ঠ
◆ आंब्याची खूप झाडे/ आम्रवृक्ष / आम्रतरू जेथे असता
त्याला आमराई म्हणतात.
■ सगळे लाड आजोळी मामाकडे जास्त होतात.
◆ आंबे पसरून ठेवतात त्याला आढी म्हणतात.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
● आंब्याला फुले येतात त्याला मोहोर असं म्हणतात.
तो वर्षातून दोनवेळा येतो.
महाशिवरात्रीला शंकराला वाहतात. (म्हणे.)
● आंब्याच्या झाडाला आयुष्य भरपूर असते.
● आंब्याची पाने शुभ असतात.
● तोरणे करताना आपण ती वापरतो.
● आंब्याची कोवळी पाने पाण्यात उकळून तो प्याला जातो.
याने साखर लेव्हल योग्य राहते.
● आंब्याच्या लाकडाच्या फळ्या केल्या जातात.
त्याच्या पेट्या बनवल्या जातात.
☬☬☬☬☬☬☬☬☬☬☬☬
★ आंबे ... पक्का शेकडा १३२ आंब्याचा असतो.
★ सात डझन ची पेटी असते पण फळ लहान असते.
★ पाच डझन ची पेटी ,
दोन डझनची पेटी असते.
◆आमरस... काहीजण नुसता हापूस आंब्याचा रस काढतात..
◆ तर काहींना मात्र हापूस आणि पायरी मिक्स रस आवडतो.
आणि तो जसा काढला तसाच आवडतो..
त्यात कोणी दूध/मिरपूड घालतात.
◆ खरे खवय्ये मिक्सर मधून काढलेला रस खाऊ शकत नाहीत.
◆ रसात तूप घालून खाणारे लोक आहेत.
◆ आणि हो आमरस साठी चांदीची थोडी मोठी वाटी असेल तर.... अहाहा....!!
काही लोक
★★पाडवा.... या दिवसापासून आंबा खायला सुरुवात करतात.
म मात्र रोज वाटीभर तरी हवा.
त्यासाठी थोडं जास्त चालावं लागलं तरी चालेल,
अस म्हणणारे लोक आहेत.
❁❁❁❁❁❁❁❁❁❁❁❁❁❁
मे मध्ये एकदातरी आमरस पुरी पोळी... एकत्र बेत.! असतो काही काही कुटुंबात.
~~~~~~~~~~~~~~~
तस चोखून खाण्यासाठी रायवळ आंबा बेस्ट.
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
◆ पण घरी कुणी आले तर मात्र हापूस च्या फोडी करून वाटीत चमचा घालून आंबा द्यावा लागतो.
◆ मँगो मिल्क शेक... असाच एक सुंदर पदार्थ.!
आंबा बर्फी, आंबा वडी आंबा साठ.. असे अजूनही वर्षभर मिळणारे पदार्थ.!
★अलीकडे काही वर्ष आंबा रस डबाबंद मिळू लागलाय
पण... यात साखर घातलेली असते. आणि रस गुळगुळीत मिक्सर मधून काढलेला असतो.
काहीजण रस काढतात आणि प्लास्टिक पिशवीत हवाबंद करून फ्रीझ करून ठेवतात.
❁❁❁❁❁❁❁❁❁❁❁❁
आंब्याचा गूळाम्बा, साखरांबा (मुरंबा)... करून ठेवतात.
तसं... खास राजपुरी कैरीचा साखरंबा करतात किसून किंवा फोडी करून.!
टक्कू, चटणी, कांदाकैरी,
कैरी पन्हे आणि आंबा डाळ.! क्या बात है....
कैरीच्या फोडीना तिखट मिठ लावून... नुसते बघितले तरी तोंडाला पाणी सुटते.
✺✺✺✺✺✺✺✺✺✺✺✺✺✺✺
आंब्याचे बी.. बाठ, कोय.!
हि चुलीत भाजून आतील गराचा सुपारी म्हणून उपयोग करतात.
ʕʔ ʕʔ ʕʔ ʕʔ ʕʔ ʕʔ ʕʔ
हापूस तो हापूस आंबा .!
अस असले तरी.. मे नंतर येणारे आंबे पण तितकेच सुंदर असतात.
वलसाड, दशहरी, लंगडा, तोतापुरी...
महाराष्ट्रातील प्रसिद्ध... रत्नागिरी, देवगड, हापूस आंबे...
ʕʔ ʕʔ ʕʔ ʕʔ ʕʔ ʕʔ ʕʔ
एकदा
का हापूस आंबा आला बाजारात कि...
इतर फळांना म्हणावी तशी गोडी लागत नाही
किंवा वाटत नाही...
पण एकदा का पाऊस पडला कि आंबे खाऊ नये म्हणतात..
⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘
फुगड्या खेळात सुद्धा आंब्याने स्थान पटकावले आहे.
आंबा पिकतो
रस गळतो
कोकणचा राजा
झिम्मा खेळतो.
⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘
पाडला पिकालााय आंबा...
पाडला पिकालााय आंबा...
हे प्रसिद्ध गाणे आहे...
❦❧❦❧❦❧❦❧❦❧❦❧❦❧❦❧❦
मुलांचे आवडते मोराचे गीत..
नाच रे मोरा
आंब्याच्या वनात
नाच रे मोरा नाच.
❀ ❀ ❀❀ ❀ ❀❀ ❀ ❀
आला वसंत ऋतू आला असे कोकिळ पक्षी आंब्याच्या झाडावर बसून सांगतो.
(आंबा मोसमात .. कोकिळेचे कुजन ऐकू येते.)
❥♡❥♡❥♡❥♡❥♡❥♡
आंब्याच्या झाडाची निगराणी खूप करावी लागते..
झाड जुने झाले कि आंबा लासा होतो. म्हणजे बाठीजवळ खराब होतो.
अढी रोजच्या रोज नीट करावी लागते नाहीतर एक आंबा नासला कि पटापट आंबे खराब होऊ लागतात.
मुलांना आंब्याच्या झाडावर चढायला आवडते.
नजर चुकवून झाडावरचे आंबे/ कैऱ्या पाडायला आवडतात.
आंबे चोखून खायला आवडतात.
•{}•{}•{}•{}•{}•{}•{}•{}•{}•{} •{}•{}•{}•
खरतर आंबे झेल्याने काढतात.
जर आंबा जमिनीवर पडला तर तो ठेचकळतो व लवकर खराब होतो.
【•】【•】【•】【•】【•】【•】
आता नम्बर 1 आंबे निर्यात केले जातात.
कोकणी माणसाला विचारले कि यंदा आंबा कसा आहे???
तर त्याच्याकडून कधीच अस उत्तर येणार नाही कि छान आहे.!
तो म्हणेल कि यंदा जरा कमीच आहे आंबा.
किंवा मागास आहे किंवा उशिरा आहे.
:::::::::::::::::::::::::::::: ::::::::::::::::::::::::::
गेली काही वर्षे आंब्याला मोहोर आला कि दलालाला झाडे दिली जातात.
म खाली एखादी कैरी किंवा आंबा पडला तरी आपला अधिकार राहत नाही
तो पडलेला आंबा उचलण्याचा.!
:::::::::::::::::::::::::::::: ::::::::::::::::::::::::::
No comments:
Post a Comment