Sunday, 9 April 2017

ঠ ঠ ঠ आंबा... फळांचा राजा ঠ ঠ ঠ



ब्लॉग.... आता 300 वे लिखाण.! तर spl लिहू काही

तर ... का बरं आपण यावर लिहू नये....

लिखाणाचे त्रिशतक...

आंबा फळाचा राजा.!!!

 


ঠ ঠ ঠ ঠ ঠঠঠ ঠ ঠ ঠ


आंब्याची आमराई 

आजोळी असावी,

आढी असलेल्या खोलीत 

स्वारी अमुची बसावी...


ঠ ঠ ঠ ঠ ঠঠ ঠ ঠ ঠ ঠ


बघा या कवितेच्या ओळीतून काही गोष्टी चटकन लक्षात आल्या..

ঠ ঠ ঠ ঠ ঠ ঠ ঠ  ঠ ঠ ঠ ঠ


◆ आंब्याची खूप झाडे/ आम्रवृक्ष / आम्रतरू जेथे असता
 त्याला आमराई म्हणतात.
■ सगळे लाड आजोळी मामाकडे जास्त होतात.
◆ आंबे पसरून ठेवतात त्याला आढी म्हणतात.

-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*

● आंब्याला फुले येतात त्याला मोहोर असं म्हणतात.
तो वर्षातून दोनवेळा येतो.
महाशिवरात्रीला शंकराला वाहतात. (म्हणे.)
● आंब्याच्या झाडाला आयुष्य भरपूर असते.
● आंब्याची पाने शुभ असतात.
तोरणे करताना आपण ती वापरतो.

● आंब्याची कोवळी पाने पाण्यात उकळून तो प्याला जातो.
याने साखर लेव्हल योग्य राहते.
● आंब्याच्या लाकडाच्या  फळ्या केल्या जातात. 
त्याच्या पेट्या बनवल्या जातात.


☬☬☬☬☬☬☬☬☬☬☬☬

★ आंबे ... पक्का शेकडा १३२ आंब्याचा असतो.
★ सात डझन ची पेटी असते पण फळ लहान असते.
★ पाच डझन ची पेटी , 
दोन डझनची पेटी असते.

◆आमरस... काहीजण नुसता हापूस आंब्याचा रस काढतात..
◆ तर काहींना मात्र हापूस आणि पायरी मिक्स रस आवडतो.
आणि तो जसा काढला तसाच आवडतो..
त्यात कोणी दूध/मिरपूड घालतात.
◆ खरे खवय्ये मिक्सर मधून काढलेला रस खाऊ शकत नाहीत.

◆ रसात  तूप घालून खाणारे लोक  आहेत.
◆  आणि हो आमरस साठी चांदीची थोडी मोठी वाटी असेल तर.... अहाहा....!!
काही लोक
★★पाडवा.... या दिवसापासून आंबा खायला सुरुवात करतात.
म मात्र रोज वाटीभर तरी हवा.
त्यासाठी थोडं जास्त चालावं लागलं तरी चालेल, 
अस म्हणणारे लोक आहेत.

❁❁❁❁❁❁❁❁❁❁❁❁❁❁

मे मध्ये एकदातरी आमरस पुरी पोळी... एकत्र बेत.! असतो काही काही कुटुंबात.
~~~~~~~~~~~~~~~

तस चोखून खाण्यासाठी रायवळ आंबा बेस्ट.

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

पण घरी कुणी आले तर मात्र हापूस च्या फोडी करून वाटीत चमचा घालून आंबा द्यावा लागतो.

◆ मँगो मिल्क शेक... असाच एक सुंदर पदार्थ.!

आंबा बर्फी, आंबा वडी आंबा साठ.. असे अजूनही वर्षभर मिळणारे पदार्थ.!

★अलीकडे काही वर्ष आंबा रस डबाबंद मिळू लागलाय
पण... यात साखर घातलेली असते. आणि रस गुळगुळीत मिक्सर मधून काढलेला असतो.
काहीजण रस काढतात आणि प्लास्टिक पिशवीत हवाबंद करून फ्रीझ करून ठेवतात.
❁❁❁❁❁❁❁❁❁❁❁❁

आंब्याचा गूळाम्बा, साखरांबा (मुरंबा)... करून ठेवतात.
तसं... खास राजपुरी कैरीचा साखरंबा करतात किसून किंवा फोडी करून.!
कैरीचे लोणचे अनेक प्रकार गोड तिखट, आंबट गोड.!

टक्कू, चटणी, कांदाकैरी,
कैरी पन्हे आणि आंबा डाळ.! क्या बात है....
अगदी छोट्या कैऱ्या मिठाच्या पाण्यात घालून मस्त लागतात



कैरीच्या फोडीना तिखट मिठ लावून... नुसते बघितले तरी तोंडाला पाणी सुटते.

✺✺✺✺✺✺✺✺✺✺✺✺✺✺✺

आंब्याचे बी.. बाठ, कोय.!

हि चुलीत भाजून आतील गराचा सुपारी म्हणून उपयोग करतात.

ʕʔ ʕʔ ʕʔ ʕʔ ʕʔ ʕʔ ʕʔ


हापूस तो हापूस आंबा .!

अस असले तरी.. मे नंतर येणारे आंबे पण तितकेच सुंदर असतात. 
वलसाड, दशहरी, लंगडा, तोतापुरी...

महाराष्ट्रातील प्रसिद्ध... रत्नागिरी, देवगड, हापूस आंबे...

ʕʔ ʕʔ ʕʔ ʕʔ ʕʔ ʕʔ ʕʔ

एकदा का हापूस आंबा आला बाजारात कि...
 इतर फळांना म्हणावी तशी गोडी लागत नाही किंवा वाटत नाही...
 पण एकदा का पाऊस पडला कि आंबे खाऊ नये म्हणतात..
⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘

फुगड्या खेळात सुद्धा आंब्याने  स्थान पटकावले आहे.

आंबा पिकतो

रस गळतो 

कोकणचा राजा 

झिम्मा खेळतो.

⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘


पाडला पिकालााय आंबा...
पाडला पिकालााय आंबा...
हे प्रसिद्ध गाणे आहे...
 ❦❧❦❧❦❧❦❧❦❧❦❧❦❧❦❧❦

मुलांचे आवडते मोराचे गीत..

नाच रे मोरा 

आंब्याच्या वनात 

नाच रे मोरा नाच.


❀ ❀ ❀❀ ❀ ❀❀ ❀ ❀
 आला वसंत ऋतू आला असे कोकिळ पक्षी आंब्याच्या झाडावर बसून सांगतो. 
(आंबा मोसमात .. कोकिळेचे कुजन ऐकू येते.)
 ❥♡❥♡❥♡❥♡❥♡❥♡

आंब्याच्या झाडाची निगराणी खूप करावी लागते..

झाड जुने झाले कि आंबा लासा होतो. म्हणजे बाठीजवळ खराब होतो.

अढी रोजच्या रोज नीट करावी लागते नाहीतर एक आंबा नासला कि पटापट आंबे खराब होऊ लागतात.

मुलांना आंब्याच्या झाडावर चढायला आवडते.

नजर चुकवून झाडावरचे आंबे/ कैऱ्या पाडायला आवडतात.

आंबे चोखून खायला आवडतात.



•{}•{}•{}•{}•{}•{}•{}•{}•{}•{}•{}•{}•{}•

खरतर आंबे झेल्याने काढतात.

जर आंबा जमिनीवर पडला तर तो ठेचकळतो व लवकर खराब होतो.
【•】【•】【•】【•】【•】【•】
आता नम्बर 1 आंबे निर्यात केले जातात.
कोकणी माणसाला विचारले कि यंदा आंबा कसा आहे???
तर त्याच्याकडून कधीच अस उत्तर येणार नाही कि छान आहे.!
तो म्हणेल कि यंदा जरा कमीच आहे आंबा.
किंवा मागास आहे  किंवा उशिरा आहे.
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
गेली काही वर्षे आंब्याला मोहोर आला कि दलालाला झाडे दिली जातात.
म खाली एखादी कैरी किंवा आंबा पडला तरी आपला अधिकार राहत नाही
तो पडलेला आंबा उचलण्याचा.!
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

Saturday, 8 April 2017

*अप्रतिम संदेश*


पावसात एक घटना घडली. 
झाडावरचं एक घरटं वाऱ्याने अचानक पडलं. 
दोघं जण शब्दं संपल्यासारखे बसून होते.
 त्याने तिला पंखानी जवळ घेतलं.
 थरथरत्या पंखानी ती ही कुशीत शिरली. 

चिमणा - 'सकाळी बोलूयात'
चिमणी - 'हो'

रात्र संपायची वाट बघत दोघं बसून राहिले.
 सकाळी स्वच्छ प्रकाश पडला.
चिमणा उत्साहानी म्हणाला, 'निघूया? पुन्हा नव्या काड्या आणू.
'तिच्या डोळ्यात पाणी आलं. 
चिमणा - 'अग वेडे, 'पाडणं' त्याच्या हातात आहे तर "बांधणं" आपल्या हातात आहे 
आणि मदतीची वाट बघायला आपण "माणसं" थोडीच आहोत! 
चल निघूया" आणि त्यांनी उंच आकाशात झेप घेतली...यालाच 'जगणे' म्हणतात.
*******************************

 वरील मेसेज आला आणि मनात आलेले विचार....

लगेच लिहिले

*******************************
 खरंय....
अस बघतोच आपण
पक्षी घरटे बांधतात.
त्यांना सोयीस्कर वाटते अशा ठिकाणी.!
पण......
माणसाला जर त्या घरट्यामुळे त्रास होणार असेल तर तो ते घरटे पाडून टाकतो/ तेथून ते सगळे उचलून फेकून देतो.
पण हे पक्षी पुन्हा नव्या जोमाने साहित्य गोळा करतात आणि घरटे तयार करतात. 
मध्यंतरी घराचे काम चालू होते... बाहेरील बाजूने भिंतीला एक भोक पाडले तर लगेच चिमणा चिमणी यांनी घरटे सुरु केले.! आम्ही पण लगेच ते छिद्र कापडाच्या बोळ्याने बंद केले

चिमणी घरटे करताना 

चिवचिवाट खूप करते... बहुतेक घरटे करायला जागा मिळाली याचा आनंद असावा.!
तर.. जसे छिद्र बंद केले तसे ती यायची बंद झाली
मला प्रश्न पडला कि कसे कळले तिला कि आपल्या घरट्यासाठी येथे जागा आहे?? 
आणि ते छिद्र बुजवले आता येथे जागा नाही.!
असो 
घरटे मोडले तर ती तक्रार कोणाकडे करणार?? तिला त्याची कोण भरपाई देणार..

पण पक्षी मात्र नव्या जोमाने पुन्हा कामाला लागतात...

हे मात्र खरंच.!
कधीच अस बघितलं नाही कि वर्षानुवर्षे ते तेच तेच घरटे वापरतात.

विणीचा हंगाम आला कि नव्याने घरटे बांधतात...

नवं निर्मिती, सृजन, मेहनत.!
खरंच खूप काही शिकण्यासारखे.!!!!!

तसे कबुतरे....

हल्ली लोक घरे घेतात. सेकण्ड होम. क्वचित जातात त्या घरी.! आणि जर नजरचुकीने एखादी खिडकी उघडी राहिली तर... कबुतरे आपले घरटे तेथे तयार करतात... आणि सतत गुटूर घु सुरु असते.

 एरव्ही शांततेचा पक्षी म्हणतो आपण पण... 

एकदा घरटे तयार झाले कि कबुतर आपल्या घरट्याकडे कोणाला फिरकू देत नाही... कबुतर क्रोधित दिसते.
आणि आपण जवळ जायचा प्रयत्न केला तर अगदी आपल्याला हुसकावून लावते, झडप घालते..
हि प्रतिक्षिप्त क्रिया आहे. कोणीही आपला , आपल्या पिलांचा जीव वाचवण्यासाठी असेच करतो...
*******************************

सुगरण पक्षी...

बहिणाबाई चौधरी ... यांच्या कवितेची आठवण होते...

"खोप्या मध्ये खोपा सुगरणीचा चांगला."

वैशिट्यपूर्ण घरटे असते.
 ते इतके सुंदर असते कि

 माणूस ते आपल्या बैठकीच्या खोलीत शो पीस म्हणून ठेवतो.

एकदा पिले मोठी झाली स्वतंत्र झाली कि ते घरटे तिथेच लटकत असते.. 
पण ती पुढील विणीच्या हंगामात नवे घरटे बांधत
तिथे लटकत असलेल्या घरट्याकडे ढुंकून सुद्धा पाहत नाही..
फक्त चोच आणि पाय यांच्या मदतीने पक्षी घरटी बांधतात.

कावळा....

हा घरटे करू लागला कि आता लवकरच पाऊस सुरु होणार असे आपण म्हणतो.

कावळ्याचे घरटे म्हणजे तारा, कपडे वाळत घालायचे चिमटे, हँगर...

असे टोचणारे असते गोळा केलेले.

चिमणीचे घरटे मऊ पिसे... 

असो...

निसर्ग.! खूप शिकण्यासारखे....

आनंददायी....

*******************************
हि एक सुंदर आवडलेली कविता...

घरटे उडते वादळात 
बिळा, वारूळात 
पाणी शिरते 
कोणती मुंगी ? कोणतं पाखरू ? 
म्हणून आत्महत्या करते ? 

प्रतिकुल परिस्थितीत ही
 वाघ लाचारीने जगत नाही 
शिकार मिळाली नाही म्हणून 
कधीच अनूदान मागत नाही 

घरकुलासाठी मुंगी 
करत नाही अर्ज 
स्वतःच उभारते वारूळ 
कोण देतो गृहकर्ज  ? 

हात नाहीत सुगरणी ला 
फक्त चोच घेउन जगते 
स्वतःच विणते घरटे छान 
कोणतं पॅकेज मागते ? 

कुणीही नाही पाठी 
तरी तक्रार नाही ओठी 
निवेदन घेउन चिमणी 
फिरते का कोणत्या योजनेसाठी ? 

घरधन्याच्या संरक्षणाला 
धाऊन येतो कुत्रा 
लाईफ इन्शुरन्स काढला का ? 
अस विचारत नाही मित्रा 

राब राब राबून बैल 
कमाउन धन देतात 
सांगा बरं कुणाकडून 
ते निवृत्ती वेतन घेतात ? 

कास्तकाराची जात आपली 
आपणही हे शिकलं पाहिजे 
पिंपळाच्या रोपा सारखं 
पाषाणावर टिकलं पाहिजे 

कोण करतो सांगा त्यांना 
पुरस्काराने सन्मानित 
तरीही मोर फुलवतो पिसारा 
अन कोकिळ गाते मंजुळ गीत 



घाबरू नको कर्जाला 
भय, चिंता फासावर टांग 
जिव एवढा स्वस्त नाही 
सावकाराला ठणकाऊण सांग 

काळ्या आईचा लेक कधी 
संकटापुढे झुकला का ? 
कितीही तापला सुर्य तरी 
समुद्र कधी सुकला का ? 

निर्धाराच्या वाटेवर 
टाक निर्भीडपणे पाय 
तु फक्त विश्वास ठेव 
पुन्हा सुगी देईल धरणी माय 

निर्धाराने जिंकु आपण 

पुन्हा यशाचा गड


माझ्या सर्व शेतकरी बांधवांना समर्पित....
*********************************
कभी नीम सी जिंदगी ।।
कभी नमक सी जिंदगी ।।

मैं ढूंढता रहा उम्रभर ।।
एक शहद सी जिंदगी ।।

कभी पत्थर सी जिंदगी ।।
कभी  काँटों सी जिंदगी ।।

मैं ढूंढता रहा उम्रभर ।।
एक मुलायम सी जिंदगी ।।

कभी तपती सी जिंदगी ।।
कभी गीली सी जिंदगी ।।

मैं ढूंढता रहा उम्रभर ।।
एक सलोनी सी जिंदगी ।।

कभी भागती सी जिंदगी ।।
कभी रूकती सी जिंदगी ।।

मैं ढूंढता रहा उम्रभर ।।
एक सुकून सी जिंदगी ।।

कभी सफ़ेद सी जिंदगी ।।
कभी काली सी जिंदगी ।।

मैं ढूंढता रहा उम्रभर ।।
एक रंगीन सी जिंदगी ।।

कभी पराई सी जिंदगी ।।
कभी बेगानी सी जिंदगी ।।

मैं ढूंढता रहा उम्रभर ।।
एक अपनी सी जिंदगी ।।

कभी दिखावे सी जिंदगी ।।
कभी झूठी सी जिंदगी ।।

मैं ढूंढता रहा उम्रभर ।।
एक सच्ची सी जिंदगी ।।

:):-)  :):-)  :):-)  :):-)  :):-)  :):-)  :):-)

Friday, 7 April 2017

नाच रे मोरा ......


मी हा अनुभव घेतलाय...

   आपल्या राणी च्या बागेत 

मुलांना घेऊन गेले होते.
पिंजऱ्यात मोर, पांढरे सुद्धा होते.
मी तर बालपणात गेले आणि चटकन 
नाचरे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच ...
 हे गाणं म्हटलं मात्र....
मोर सुंदर नाचू लागला. जणू काही माझ्या गाण्यामुळेच तो नाचला.

 बडोद्याला गेले तिथेही हाच अनुभव घेतला.

मी म्हटलं गाणं....
अगदी असाच सुरेख नाचला

तो तर पांढरा होता.

आधीच तो मोर आणि त्यातही पांढरा... आणि पिसारा फुलवून नाचतोय.
ना काळ्या ढगांनी भरलेले आभाळ आणि नाही पाऊस.!

या दोन्ही वेळी माझी आई बरोबर होती

 त्यानंतर ताडोबाला पाणवठ्यावर.....

अगदी सकाळी सकाळी मोर  नाचताना बघितला

 आणि आता गीरला मोराची झुंज...... बघितली


गीर हे सिहांसाठी प्रसिद्ध आहे तस...  मोरांसाठी देखील प्रसिद्ध आहे.

गुजराथ... अहमदाबाद आबादनगर..

येथे तर मोर रस्त्याने चालतात
 मी मोराच्या बरोबर चालले आहे.
तेथिल जंगलात जाऊन मोराची पिसे गोळा केली... अगदी लहान होती पिसे...
मोराने झटकलेली.!


रस्त्याने आपल्याबरोबर चालता खार आणि मोर
भरपूर आहेत तेथे.

आमच्या वाडीत तर असा उडताना.... बघितला.

चौथ्या मजल्यावर बसला होता. 
एकदम रुबाबदार
एवढ्या उंचावरून उडाला. वाह.!

तसं मलबरहिल येथे फिरायला गेलो कि फारपूर्वी मोर दिसत.

 पण अलीकडे कधी दिसला नाही.

मागे एकदा आम्ही केळशी येथे गेलो होतो

तेथे अंगणात मोर बांधलेला बघितला. फार वाईट वाटले.
आपला राष्ट्रीय पक्षी असा बंदी करून ठेवला आहे.???
नैसर्गिक मुक्त पक्षी प्राणी बघण्यात जी मजा आहे ती असा बघण्यात मज्जा नाही

मुक्त, अचानक मोर दिसला कि 

ओह, वाव, हे आनंदोद्गर

निघतात ना...
आणि बंदी मोर बघितला कि

 हळहळ, अरेरे, बिच्चारा...

असो 
मोर, नाचताना, फिरताना बघणे किती आनंददायक असते ना....

शाळेतली कविता आठवते 

थुई थुई नाच माझ्या अंगणात मोरा...

निळ्या निळ्या पिसाऱ्याचा फुलव फुलोरा.....