आज गीता संथा वर्ग सांगता समारंभ...
✿✿✿✿✿✿✿✿✿✿
बरोबर
वेळेवर कार्यक्रम सुरु झाला...
नेहमीप्रमाणे..
सर्व म गीता प्रथम अध्याय
म्हटला आणि वर्गात येणारे विध्यार्थी यांनी आपले मनोगत मांडले.!
जेव्हा वर्ग सुरु झाला तेव्हा....
संथा देणार म्हणजे....
श्लोक कसे म्हणायचे ते सांगणार म्हणजे संथा...
असे
जेव्हा सांगितले, तेव्हा काही जणांना असे वाटत होते.
पण सर म्हणाले कि
अनेक तज्ज्ञ लोकांनी अर्थ सांगितले आहेत.
खूप पुस्तके आहेत ती वाचून अर्थ
कळू शकेल.
इथे गीता कशी म्हणायची हे सांगणार...
*******************
या गीता वर्गाचा जवळपास ६० लोकांनी लाभ घेतला आणि
सरासरी उपस्थिती ३० च्या आसपास होती.
यातील एकजण शृंगेरीला जाणार आहेत.
✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧
काही जण गीतेचा अभ्यास करत आहेत आणि
पुढेही गीता म्हणण्याचा सराव करणार आहेत.
✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧
या कार्यक्रमातून मला कळलेले जाणवलेले....
★ वर्गाला आलो तेव्हा अवस्था अर्जुनाप्रमाणे गोंधळलेली होती.
★ आता नष्टो मोहस समूर्तिलब्ध्वा
याप्रमाणे संदेह दूर झाला आहे, प्रसाद मिळाला आहे.
जसे जसे गीता वाचत जातो तशी तशी गीता कळत जाते.
★ मनात द्वंद्व असते ते कमी कमी होत जाते.
★ आपल्या मनात सतत सुख दुःख असते.
★ गीता संधी सोडून का म्हणायची नाही?
१) सामूहिक पठण करताना ती एकसाथ म्हटली जाणार नाही
२) अगदी महत्वाचे...
व्यास ऋषींनी ती संधी सोडवून लिहिली असती.
३) श्रीभागवानुवाच...
प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातील शब्द आहेत. भगवंतांनी गहन अर्थ स्वतःच्या मुखाने सांगितला आहे.
★ गीता म्हटल्यामुळे आपल्या आत लहरी निर्माण होतात.
वातावरण निर्माण होते, असे एक वर्षाने आढळले.
गुरुजनांचे मार्गदर्शन..
● गीता म्हणायला, पाठ करायला, शिकवायला वयाचे बंधन नाही.
● आपली वाचा व्यवस्थित होते.
● आपल्या पुढे ध्येय हवे ध्येयच नाही असे व्हायला नको... म्हणून शृंगेरीला जाण्याचे ध्येय ठेवा.
● आता संथा घेऊन झाली. वर्ग संपला तर गीता म्हणण्याचे सोडून देऊ नका.
● सरांना आनंद केव्हा होतो????
आपण १८ अध्याय पाठ करतो तेव्हा त्यांना खूप आनंद होतो.
● लहरींचा नक्की फायदा होतो.
● आपण शांत होतो
( गीता जर आचरणात आणता आली तर अतिशय छान.!!!
अहंकार,बळ, काम, क्रोध लोभ... सगळे दूर करता आले पाहिजे...
●
आपण प्रथम बघून म्हणतो, सर शिकवतात त्या प्रमाणे म्हणतो, हळूहळू पाठ करतो
किंवा होते, म नुस्तीच मनातल्या मनात म्हणतो, आणि... म आपोआपच गीतेचे शब्द
बाहेर येतात.
तर असे आणि याहून सुंदर मनोगत, मार्गदर्शन लाभले.
♤♤♤♤♤♤♤♤♤♤♤♤♤♤♤
आणि वर्गातील सगळ्यांना
गीता वर्ग शास्त्री हॉल २०१७ असे ज्या पेन वर लिहिले असे पेन सगळ्यांना दिले.
(गीता वर्गाची आठवण )
✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽
मागे आम्हा तिघींना बक्षीस मिळाले तर ते कौतुक भगिनी समाजाने आज केले
तो फोटो....
आम्हा
तिघीना बाहेर गीता पठण मध्ये बक्षीस मिळाले... त्याचे आज भगिनी समाजाने
कौतुक केले... ते सरांच्या हस्ते कौतुक केले... त्यावेळी मी म्हटले... सर,
मला जे बक्षीस मिळाले...
ते तुमच्या मुळे मिळाले.
अठरावा अध्याय डिसेंबर मध्ये स्पर्धा होणार तर तुम्ही तो आधीच संथा दिल्यामुळे पुरेसा वेळ मिळाला म्हणून तो पाठ करू शकले.....
आणि सर्वांसमोर मी प्रथमच माईक समोर उभे राहून म्हटले.
सौ जोशी, सर... श्री. श्रीकृष्ण जोशी सर आणि मी.!
सौ पूजा जोशी ताई आणि मी...
असे फोटो काढता आले.
सरांच्या हस्ते बक्षीस घेताना मी.!
केलेले कौतुक.! भेट पाकीट आणि पेन.!
गेल्या वर्षी
११ फेब्रुवारी २०१६
गणेश जन्म
आणि गुरुवार
यादिवशी गीता वर्ग सुरु झाला भेट ओळख.. आणि माहिती असे स्वरूप होते
आणि प्रत्यक्ष वर्ग १६|२|२०१६ यादिवशी वर्ग सुरु झाला....
गीता चांगली, सुयोग्य पद्धतीने म्हणायची,
पाठ करायची अशी खुप दिवस मनात इच्छा होती... ती पूर्ण झाली..
चांगली इच्छा नेहमी पूर्ण होते .!
याला मी देवाचे थोरामोठ्यांचे आशीर्वाद मानते.
○○○○○○○○○○○○○○
No comments:
Post a Comment