Tuesday, 30 May 2017

पहिला पाऊस.! तुषार सिंचन असावे असा.!!!!!


काय कस काय आहे वातावरण


काल संध्याकाळी आणि आज सकाळी तुषार सिंचन सारखा पाऊस झाला..
असे मी आज सकाळी whatsapp केले आणि माझी एक मैत्रीण म्हणाली...
 आज सकाळी वाँकला जाऊन येताना भिजले पहिल्या पावसात.!
मस्त ना मला आवडते.

म मला पाऊस आवडतो ..

आणि काय काय आवडते ते तिला सांगत होते....


मला पण खूप आवडते पावसात भिजायला.!

इंद्रधनुष्य दिसले कि क्या बात है.!!!

म दुधात साखर,
पडणाऱ्या पावसाचे अवलोकन करायला आवडते...
पाऊस पडल्यावर दिसणारी सृष्टी,
वेगवेगळ्या ठिकाणाहून बघितलेला पाऊस,
पावसाची गाणी, कविता....

होड्या सोडायला पण आवडते....

अगदी घरासमोर थोडे पाणी साचते त्यात.!
कोणी लहान असेल त्याच्यासाठी भरपूर होड्या करायच्या आणि सोडायच्या होड्या पाण्यात

झोपाळ्यावर बसून हातात कॉफी कप आणि पाऊस...

क्या बात है.!!!!

कांदा भजी, पाऊस संध्याकाळी, 

रात्री पडत असेल तर... भाजलेले मक्याचे कणीस.!

आपले अगदी छोट्या गोष्टीतील आनंद आहेत.

आणि हो.... जर वेळ असेल तर... पाऊस आणि whatsapp गप्पा.!


मे महिन्याचे शेवटचे दिवस...

 खूप उकडणार,
 पाणी पाणी होणार,
 कधी एकदाचा पाऊस येतो असे होणं... 
सूर्यदेव कोपलेत,
 निसर्ग चक्र माणूस बिघडवतो असे वाटू लागणे....
आणि पावसाचे काही ठोकताळे आहेत... 
काही प्राणी पक्षी, झाडांची फुले , 
पालवी यावरून बांधले जातात... बघुया काय आहे ते...
 

बहावा... 
याला बहर आला कि ४५ दिवसात पाऊस पडतो असे कुठेतरी वाचल्याचे आठवते.!

तसच राजापुरची गंगा.
येण्यापूर्वी  कुठेतरी भूकंप होतो असा अनुभव आहे
अर्थात अनेक वर्षांच्या अनुभवाने बांधलेला ठोकताळा आहे

 गुलमोहर फुलला कि पाऊस चांगला होणार असे म्हणतात, 

◆ तसेच पावसाच्या सुरवातीला 

प्रचंड प्रमाणात उडत्या लाल मुंग्या येतात, 

म्हणजे पाऊस येणार असे समजायचे.
 काल पुण्याला जाताना इतका गुलमोहोर फुललेला बघितला आहे...
लाल भडक.!! केशरी 
खूपच
मस्त दिसत होते.


◆ कावळे आणि घरटे बांधायची जागा
 यावरून असाच अंदाज 
पक्षीनिरीक्षणासाठी भटकताना सलीम अली यांनीही नोंदवला आहे.

 कावळ्याचे घरटे..

बांधताना तारा, कपडे उडु नये म्हणून जे चिमटे वापरतो ते चिमटे, हँगर
झाडाची  वाळलेली काटकी... असेच तो गोळा करतो.
 मी तरी कधी कावळ्याचे सुबक घरटे बघितले नाही.
 वस्तूच बघा कशा निवडतो....
टोचक्या????


एक सुंदर पण मोठी पोस्ट  आली होती ....

खूपच अभ्यासपूर्ण
~~~~~~~~~~~~

वनअभ्यासक, साहित्यिक व पक्षीतज्ज्ञ मारुती चितमपल्ली 

यांनी आयुष्याची तब्बल ४० वर्षे महाराष्ट्रातील निरनिराळ्या जंगलांमध्ये व्यतीत केली. 
वन खात्यातील नोकरीच्या निमित्ताने त्यांना जंगल आणि निसर्ग अत्यंत जवळून जाणून घेण्याची संधी लाभली. जंगलामधील या वास्तव्यातील सूक्ष्म निरीक्षणांतून वृक्षवल्ली आणि वन्यप्राणी तसेच पक्ष्यांच्या अनेक प्रजातींचा अभ्यास करून त्यांनी अनुभवसिद्ध ग्रंथसंपदा प्रसवली आहे. 

पावसाळ्यापूर्वी निसर्गसृष्टीत होणाऱ्या बदलांचे आश्चर्यकारक विश्व या अरण्यऋषीच्या शब्दांत..

तब्बल चार दशकांचा काळ मी जंगलात घालवला. त्यामुळे स्वाभाविकपणे निसर्गाच्या इतक्या निकटतम सान्निध्यात वातावरणातील बदलांचे निसर्गातील विविध घटकांवर होणारे परिणाम अत्यंत जवळून अनुभवले. या अवलोकनातून अनेक आश्चर्यकारक गोष्टी उमगल्या. जंगलातील मुक्कामात असंख्य वन्यजीव-पक्ष्यांच्या प्रजातींचे मी बारकाईने निरीक्षण केले. कोकणच्या समुद्रकिनाऱ्यावरील वास्तव्यात समुद्री पक्षी तसंच समुद्री जीवांच्या हालचालींचाही अभ्यास केला. त्यातूनही पावसाळ्यापूर्वीचे सृष्टीतील असंख्य आश्चर्यजनक बदल टिपता आले. शिवाय जंगलावरच ज्यांचे जीवन अवलंबून आहे अशा हजारो आदिवासी कुटुंबांना भेटलो, त्यांच्याबरोबर जंगलात राहिलो, त्यांचा विश्वास संपादन केला. पशुपक्ष्यांप्रमाणेच आदिवासींनाही उपजतच निसर्गचक्रातील बदलांचे ज्ञान असते आणि ते ज्ञान ते सहसा कोणाला देत नाहीत, हेदेखील पाहिले. परंतु अशी असंख्य निरीक्षणे मी स्वत:ही अनुभवली. टिपली. माझ्या पुस्तकांमध्ये त्यांचा सविस्तर उल्लेख आढळतो. 

पावसाळ्यापूर्वी जंगलातील वातावरणातले अनोखे बदल मलादेखील सूक्ष्म निरीक्षणानंतरच जाणवले.. आकळले. 
       पशुपक्ष्यांची अस्वस्थता, त्यांच्या हालचालींवरून येणाऱ्या पावसाच्या अंदाजाचे, तसंच दुष्काळाचे मिळणारे संकेत हे अत्यंत गूढ रहस्य आहे. या निरीक्षणांना आधुनिक संगणकयुगात अंधश्रद्धा म्हणून हिणवले जाऊ शकेल; परंतु निबीड अरण्यातील तसेच समुद्रकाठानजीकचे माझे अनुभव फार वेगळे आहेत. 
हवामान खात्यानेही या निरीक्षणांची नोंद घ्यावी. एवढे ते महत्त्वाचे आहेत. पाऊस केव्हा येतो आणि केव्हा संपतो, हे आम्हाला सांगता येत नाही, असे हवामानतज्ज्ञ म्हणतात. परंतु अरण्यातल्या पशुपक्ष्यांना त्याचे पूर्वसंकेत खूप आधीच मिळतात, हेही तेवढेच खरे. 

साधारण दीड- दोन महिने आधीच पावसाळ्याची चाहूल लागण्यापूर्वी वन्यजीव आणि पक्ष्यांच्या पावसाळी संकेतांना सुरुवात होते. 
पक्ष्यांना सर्वप्रथम पावसाच्या संकेतांची चाहूल लागते. 
हे कालबद्ध नैसर्गिक चक्र आहे. पक्ष्यांना संभाव्य हवामानाचे, दुष्काळाचे, वातावरणातील बदलांचे अगदी अचूक संकेत मिळत असतात आणि त्यानुसार त्यांच्या दिनक्रमात बदल होत असतात. पक्षी प्रजाती ही अत्यंत संवेदनशील आणि बदलत्या हवामानाशी स्वत:ला जुळवून घेणारी निसर्गाची आश्चर्यकारक निर्मिती आहे. अशा हजारो पक्ष्यांची निरीक्षणे, टिपणे माझ्या संग्रही आहेत. वर्षांनुवर्षे त्यांच्या हालचालींवर बारकाईने नजर ठेवली तेव्हा कुठे त्यांच्या दिनक्रमातील बदलांचे हे रहस्य उलगडले. अशी रहस्ये एका दिवसात समजत नाहीत. नोकरीनिमित्ताने वर्षांनुवर्षे जंगलात राहिल्यामुळे मला त्यांचे आश्चर्यकारक विश्व समजून घेण्याची संधी मिळू शकली. 

पावसाळा जवळ आल्याचे संकेत आफ्रिकेतून आलेले चातक पक्षी सर्वप्रथम देतात. 

जंगलातील वृक्षांची सळसळ सुरू होते. हवेचा जोर वाढतो. आकाशात ढग येण्याची चाहूल या पक्ष्यांना पूर्वीच मिळालेली असते. 
पाऊस अगदी वेळेवर येणार असेल तर चातक पक्ष्यांचे आगमन लवकर होते. जर त्यांचे आगमन लांबले तर पाऊसही लांबणार, ही काळ्या दगडावरची रेघ. 
त्यासाठी कोणत्याही भविष्यवेत्त्याची गरज नाही. चातक पक्षी ‘पिऊ.. पिऊ’ या त्यांच्या सांकेतिक आवाजात ओरडू लागले की पहिल्या पावसाचे दिवस जवळ आले हे हमखास समजावे. 
चातक पक्ष्याप्रमाणेच सृष्टीतील बदलांचे पूर्वसंकेत देणाऱ्या आश्चर्यकारक घटनांचा पावशा पक्षी हा आणखी एक महत्त्वाचा दूत! ‘पेर्ते व्हा’ असे सांगणारा पावशा ओरडू लागला की जुन्या काळी शेतकरी मशागतीची कामे सुरू करत. आज विज्ञान कितीही प्रगत झाले असले तरी आजही तुम्ही ग्रामीण भागात जा, पावशाने दिलेल्या संकेतावरच 
शेतकऱ्यांकडून शेतीची नांगरणीची कामे सुरू केली जातात. हा पक्षी ‘पेरणी करा’ असे शेतकऱ्याला सुचवण्यासाठीच येत असतो. माळरानावर, शेतांवर काळ्या-पांढऱ्या, अंगावर ठिपके असलेल्या तित्तीर पक्ष्यांचे थवे ‘कोडय़ान केको.. कोडय़ान केको..’ अशा सांकेतिक स्वरात ओरडू लागले की आता लवकरच  पाऊस येणार असे खुशाल समजावे. जंगलातील माळरानांत या पक्ष्यांचे अस्तित्व फारसे आढळून येत नाही. परंतु मानवी वस्त्यांशेजारच्या माळरानांवर तित्तीरांचा गडबडगुंडा सुरू झाला की ते हमखास पावसाचे लक्षण समजले जाते. 

कावळ्यांची निरीक्षणे ही तर यापेक्षाही आश्चर्यकारक आहेत. संस्कृत ग्रंथांमध्ये उल्लेख केलेली स्निग्ध झाडे- आंबा, करंज तसेच काटेरी झाडे यांचा व कावळ्यांचा पूर्वापार संबंध आहे. हवामानातील बदल, पावसाचे संकेत आणि दुष्काळाची नांदी देणारे हे नैसर्गिक चक्र आहे. पण त्याचा अभ्यास या नव्या युगात कुणीही करीत नाही. कावळ्याने मे महिन्याच्या काळात बाभुळ, सावर अशा काटेरी झाडांवर घरटे केले तर पाऊस कमी पडतो आणि आंबा, करंज या वृक्षांवर केले तर त्या वर्षी पाऊस चांगला येतो, हा जंगलातला अनुभव आहे. कावळा आणि कावळीण दोघेही घरटे तयार करण्यासाठी एकत्र झटतात. कावळा घराला लागणाऱ्या काटक्या, कापूस, गवत कावळिणीला आणून देतो, तर कावळीण घराची सुरेख अशी रचना करते. यावेळी त्यांची गडबड मोठी पाहण्यासारखी असते. कारण त्यांना पावसापूर्वी पिल्लांसाठी छानसा निवारा तयार करण्याची घाई झालेली असते. कावळ्याने झाडाच्या पूर्व दिशेने घरटे केले तर पाऊस चांगला पडणार. पश्चिमेला केले तर पाऊस सरासरीएवढा पडणार. दक्षिण-उत्तरेला केले तर पाऊस अत्यंत कमी पडणार. आणि झाडाच्या शिखरावर केले तर अवर्षणपर्वाची ती नांदी होय. सहसा कावळा झाडाच्या शिखरावर घरटे करीत नाही. आणि केले तर ती अत्यंत दुर्मीळ घटना असते. यातून दुष्काळाचे अगदी डोळस संकेत मिळू शकतात. यापेक्षाही मनोरंजक बाब म्हणजे कावळिणीने अंडी किती घातली, यावरूनही जुन्या काळात पावसाचा अंदाज बांधला जात असे. तिने सुमारे चार अंडी दिली तर पाऊस चांगला पडतो. दोन अंडी दिली तर कमी पाऊस. एकच अंडे दिले तर अतिशय कमी. आणि जमिनीवर अंडी दिली तर अभूतपूर्व दुष्काळाचे आगमन ठरलेले. 

मी कोकणात असताना समुद्रकिनाऱ्यावर अनेक वर्षे घालवली. समुद्राचे अथांग विश्व आणि त्यात राहणारे लाखो जीव म्हणजे मानवाला न उलगडणारे निसर्गचक्र आहे. त्याचा अभ्यास करण्यासाठी अगदी बारीकसारीक घटनांवर नजर ठेवली तेव्हा काही पूर्वसंकेतांची चाहूल मला मिळू शकली. पाऊस येण्याअगोदर वादळी पक्षी किनाऱ्याच्या दिशेने येऊ लागतात. त्यामुळे पाऊस पडणार याचे संकेत ओळखून समुद्रावर उपजीविका करणारे मच्छिमार आपल्या बोटी, जहाजे, पडाव समुद्रात नेत नाहीत. अशावेळी केव्हाही पाऊस कोसळण्याची शक्यता असते. समुद्रातील माशांमध्ये एकदम खळबळ माजते. त्यांच्या हालचाली अत्यंत गतिमान होऊन ते समुद्रात उंच उडय़ा मारू लागतात. हे चित्र नवीन पिढीने समुद्रकिनाऱ्याशेजारी मुक्काम ठोकून अवश्य निरखावे. समुद्रातील प्राण्यांनी अस्वस्थ हालचाली सुरू केल्यानंतर समुद्रातून प्रचंड असे आवाज येऊ लागतात. वादळी पाखरू किनाऱ्याच्या दिशेने आले की वादळवारा त्याच्यापाठोपाठ येत आहे याचे संकेत कोळ्यांना मिळतात. एक प्रकारे ती धोक्याची पूर्वसूचनाच असते. त्याचा अर्थ हमखास पाऊस पडणार किंवा सुमद्रात वादळ येणार. 

आणखीन एक गंमत म्हणजे पहिल्या पावसानंतर नदी-नाले, ओढे, तलावांचे पाणी समुद्राला येऊन मिळू लागते तसे मासे त्या पाण्यात उडय़ा मारून प्रवेश करतात आणि प्रवाहाच्या उलट दिशेने जाऊ लागतात. डोंगर, पहाडी भागातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाण्यात ते अंडी घालतात आणि पुन्हा सरळ दिशेने समुद्रात परततात. हे नैसर्गिक जीवनचक्र आहे. याबाबतीत अत्यंत बारकाईने निरीक्षण केले असता पहाडी, डोंगरी भागातील माशांच्या अंडय़ांतील पिल्ले मोठी होऊन जेव्हा समुद्राच्या दिशेने पोहू लागतात, तेव्हा तो काळ पाऊस संपण्याचा.. उत्तरा नक्षत्राचा असतो. त्यामुळे पाऊस केव्हा पडणार आणि केव्हा संपणार, याची सुस्पष्ट चाहूल माशांच्या या जीवनचक्रातून मिळते.

जंगल आणि डोंगरांच्याही अभ्यासातून काही निरीक्षण समोर आली आहेत. तांबूस रंगाचे खेकडे हजारोंच्या संख्येने समुद्राच्या दिशेने जाताना दिसतात. तुम्ही त्यांच्या मार्गाचे निरीक्षण केले असता अशा अनेक अभूतपूर्व घटना पाहावयास मिळतात. समुद्राच्या दिशेने जाणाऱ्या खेकडय़ांवरून शेतकऱ्याला पावसाचे संकेत मिळतात. हा खेकडय़ांच्या स्थलांतरणाचा कालखंड आहे. भरधाव वाहनांखाली असे हजारो खेकडे दरवर्षी समुद्राकडील प्रवासादरम्यान चिरडले जातात. परंतु त्यांची समुद्री धाव कशासाठी असते, याचा कोणी विचारही करीत नाही. 

पाऊस केव्हा आणि किती पडणार, हे सांगणारी पशुपक्ष्यांच्या प्रजाती आज धोक्यात आल्या आहेत. समुद्राचे पाणी दूषित होऊ लागले आहे. जंगलांवर कु ऱ्हाड चालवली जात आहे. वाघांच्या शिकारी केल्या जात आहेत. ही परिस्थिती अत्यंत वाईट आणि भविष्यासाठी धोकादायक आहे. निसर्गचक्राचे घटक असलेले पशुपक्षी आपल्या दिनक्रमात पावसाळ्यापूर्वी कसकसे बदल करतात, हे कुणीही लक्षात घेत नाही याची खूप खंत वाटते. 

कीटकांचे जीवनचक्र तर हवामानतज्ज्ञांच्या सर्वतोपरी उपयोगाचे असतानाही या सांकेतिक बदलांकडे सपशेल दुर्लक्ष केले जात आहे. खरं तर हा निसर्गविज्ञानाचा एक चकित करणारा भाग आहे. हजारोंच्या संख्येने काळ्या मुंग्या त्यांची पांढरी अंडी तोंडात धरून सुरक्षित जागी नेऊ लागल्यास पाऊस नक्की पडणार, हे समजावे. अत्यंत पुरातन काळापासून काळ्या मुंग्यांच्या हालचालींवरून पावसाचे अंदाज बांधले जात आहेत. जंगलात हमखास झाडे पोखरणाऱ्या वाळवी/ उधईला कधी पंख फुटत नाहीत. परंतु पावसाळ्यापूर्वी वारुळातून उधईचे थवेच्या थवे हजारोंच्या संख्येने एका झपाटय़ात बाहेर पडू लागले की पावसाचे लवकर आगमन होते. पावसाळ्यापूर्वी प्रजननासाठी वाळवीचे पंख फुटलेले थवे उडून एकमेकांशी समागम करतात. त्यातून त्यांच्या नंतरच्या पिढय़ा तयार होतात. त्या जंगलात वारुळे तयार करतात. दुसरे म्हणजे बिळांमध्ये दडून राहणारे सरपटणारे जीव बिळाच्या बाहेर पडू लागले की ती हमखास पावसाची चाहूल समजावी. या प्राण्यांना पाऊस येणार असल्याचे अगोदरच कळलेले असते. त्यामुळे बिळात पाणी शिरण्यापूर्वीच स्वत:च्या बचावासाठी ते उंच जागांचा आश्रय शोधू लागतात. पावसाळ्यापूर्वी सापदेखील मोठय़ा प्रमाणात बिळाच्या बाहेर पडू लागतात. 


नवेगावबांध पक्षीअभयारण्यातील पक्ष्यांची निरीक्षणे पावसाबद्दल खूप काही सांगणारी आहेत. मोरनाची म्हणून नवेगावला अनेक जागा आहेत. मोरनाची म्हणजे निसर्गाचे एक अवघड कोडे आहे. पावसाळ्यापूर्वी शेकडोंच्या संख्येने मोर अशा जागांवर रिंगणात जमतात आणि एक सुंदर मोर अगदी मधोमध येऊन आपला सुंदर पिसारा फुलवून नाचू लागतो. त्याचे हे नाचणे म्हणजे एक लयबद्ध नृत्यच असते. कधी दोन्ही पायांवर, तर कधी एका पायावर. तर कधी गिरक्या घेत नाचणाऱ्या या देखण्या नरावर लांडोर/ मोरणी भाळतात. त्यांचा समागम होतो. त्या नराशी समागम केल्यावर लांडोर दूर निघून जाते आणि कालांतराने अंडी घालते. हा पावसाचा पूर्वसंकेत आहे. या भागातील आदिवासी मोरनाचींच्या जागांवर मोर जमू लागल्यानंतर चांगला पाऊस पडणार असल्याचे ठोकताळे बांधतात आणि ते अचूक ठरतात. पक्षी-अभ्यासकांनीही या बदलाचा विस्तृत अभ्यास केल्यास याचे रहस्य कदाचित उलगडू शकेल. कारण या मुक्या जिवांना कोणीही पाऊस येईल म्हणून हवामानाचा अंदाज सांगत नाही; तो त्यांना आपोआपच कळत असतो. पक्ष्यांच्या जीवनचक्राचा अभ्यास करताना मी स्वत: मोरांच्या हालचालींवर नजर ठेवून ही निरीक्षणे टिपली आहेत. निसर्गाचे हे चक्र माणसाला कधीही न आकळणारे असते. परंतु त्यामागे पृथ्वीच्या व्युत्पत्तीपासून चालत आलेले निसर्गविज्ञान आहे, हे निश्चित. 

वृक्षांमधील बदलांतूनही पावसाळ्यापूर्वीचे काही संकेत स्पष्टपणे मिळतात. यासंबंधीचा अभ्यास मी स्वत: केलेला आहे. मराठवाडय़ात प्रचंड संख्येने आढळणाऱ्या गोडंबा- म्हणजे बिब्याच्या झाडाला बहर येणे हे दुष्काळाचे संकेत आहेत. खैर आणि शमीच्या वृक्षांना फुलोरा आल्यास त्या वर्षी पाऊस कमी पडतो. कवठाला आलेला फुलांचा बहर वादळवाऱ्याचे संकेत देतो. बिचुलचा बहर आणि कुटजाचा बहर तर अतिवृष्टीचेच हाकारे देतो. आपण वेली पाहतो. या वेलींचे तंतू  अगदी काटकोनात, सरळ रेषेत उभे राहताना दिसू लागले तर ते चांगल्या पावसाचे लक्षण समजावे. अर्थात याकरता आपली नजर तरबेज असली पाहिजे. हवामानतज्ज्ञांची तर अशा बदलांवर बारीक नजर असायला हवी. जंगलाचे नियंत्रण करणाऱ्या अधिकाऱ्यांनी अशा बदलांचा अवश्य अभ्यास करावा. कारण ही सूक्ष्म निरीक्षणे हवामानाचा अंदाज वर्तवताना अत्यंत मोलाची ठरू शकतात.

भविष्यवेधी हरिणी आणि वाघ !

हरितपर्णी वृक्षांची आणि पानगळीची जंगले वातावरणातील बदलांचे पूर्वसंकेत देतात. अशा जंगलांमध्ये राहणाऱ्या वन्यजीवांच्या दिनक्रमातील आश्चर्यकारक बदलांचा अभ्यास केल्यावर पावसाबद्दलचे अचूक आडाखे बांधता येतात. पाऊस येणार नसेल तर विणीच्या काळातही हरिणी पिल्लांना जन्म देत नाहीत. आणि हे अत्यंत खरे आहे. हा बदल मी स्वत: अभ्यासलेला आहे. हरीण आणि वाघ यांचा एरवी ३६ चा आकडा असला तरी पावसाळ्याचे दोन्ही प्राण्यांचे आडाखे मात्र एकदम तंतोतंत जुळणारे असतात, हा सृष्टीतील चमत्कार होय. आणि याला निसर्ग-विज्ञानाची जोड आहे. 

वाघिणीचे ठोकताळे तर अत्यंत अचूक असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. मेळघाटच्या जंगलात असताना आम्ही एका गर्भवती वाघिणीचे अनेक महिने अत्यंत जवळून निरीक्षण केले. तिच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली. तेव्हा वाघांनासुद्धा पावसाच्या अंदाजाचे आणि भविष्यातील वातावरणाचे पूर्वज्ञान असल्याचे आमच्या लक्षात आले. आम्ही पाहिलेली ही वाघीण गर्भवती होती. तिला पिल्ले होणार होती. परंतु या वाघिणीने डायसकोरियाचे कंद खाऊन गर्भपात करवून घेतला. हे कंद खाऊन आदिवासी स्त्रियादेखील गर्भपात करवून घेतात. या वाघिणीचे सृष्टीज्ञान अक्षरश: तोंडात बोटे घालायला लावणारे होते. यंदा पाऊस येणार नाही, त्यामुळे जंगलात गवत राहणार नाही. गवत नाही म्हणजे तृणभक्षी प्राणीदेखील राहणार नाहीत. परिणामी आपल्या पिलांना भक्ष्य मिळणार नाही. त्यांची उपासमार होईल.. याची पूर्वकल्पना आल्यानेच तिने गर्भपात करवून घेतला होता. आम्ही जंगलात तिच्या मागावर राहून हा प्रसंग प्रत्यक्ष अनुभवला आहे. ते वर्ष मला आता नीटसे आठवत नाही. पण माझ्या उमेदीच्या काळातील जंगलभ्रमणाच्या दिवसांत मी अनुभवलेली ही एक आश्चर्यकारक घटना आहे. 
वाघिणीच्या गर्भपातानंतर त्या वर्षी अभूतपूर्व दुष्काळ पडल्याचा अनुभव आम्ही घेतला.

Friday, 26 May 2017

२६ मे २०१७....


आज गीता संथा वर्ग सांगता समारंभ...

वेळ संध्याकाळी ५.३० ते ७.००

 


 

✿✿✿✿✿✿✿✿✿✿
बरोबर वेळेवर कार्यक्रम सुरु झाला...
 नेहमीप्रमाणे..
 सर्व म गीता प्रथम अध्याय म्हटला आणि वर्गात येणारे विध्यार्थी यांनी आपले मनोगत मांडले.!
जेव्हा वर्ग सुरु झाला तेव्हा.... 
संथा देणार म्हणजे....
 श्लोक कसे म्हणायचे ते सांगणार म्हणजे संथा... 
असे जेव्हा सांगितले, तेव्हा काही जणांना असे वाटत होते. 
पण सर म्हणाले कि अनेक तज्ज्ञ लोकांनी अर्थ सांगितले आहेत. 
खूप पुस्तके आहेत ती वाचून अर्थ कळू शकेल.
इथे गीता कशी म्हणायची हे सांगणार...
*******************

या गीता वर्गाचा जवळपास ६० लोकांनी लाभ घेतला आणि

 सरासरी उपस्थिती ३० च्या आसपास होती.
यातील एकजण शृंगेरीला जाणार आहेत.
✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧

काही जण गीतेचा अभ्यास करत आहेत आणि 

पुढेही गीता म्हणण्याचा सराव करणार आहेत.

✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧

या कार्यक्रमातून मला कळलेले जाणवलेले....

★ वर्गाला आलो तेव्हा अवस्था अर्जुनाप्रमाणे गोंधळलेली होती.
★ आता नष्टो मोहस समूर्तिलब्ध्वा 
याप्रमाणे संदेह दूर झाला आहे, प्रसाद मिळाला आहे.
जसे जसे गीता वाचत जातो तशी तशी गीता कळत जाते.
★ मनात द्वंद्व  असते ते कमी कमी होत जाते.
★ आपल्या मनात सतत सुख दुःख असते.

★ गीता संधी सोडून का म्हणायची नाही?

१) सामूहिक पठण करताना ती एकसाथ म्हटली जाणार नाही
२) अगदी महत्वाचे...
व्यास ऋषींनी ती संधी सोडवून लिहिली असती.
३) श्रीभागवानुवाच...
प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातील शब्द आहेत. भगवंतांनी गहन अर्थ स्वतःच्या मुखाने सांगितला आहे.
★ गीता म्हटल्यामुळे आपल्या आत लहरी निर्माण होतात. 
वातावरण निर्माण होते, असे एक वर्षाने आढळले.
गुरुजनांचे मार्गदर्शन..
● गीता म्हणायला, पाठ करायला, शिकवायला वयाचे बंधन नाही.
●  आपली वाचा व्यवस्थित होते.
● आपल्या पुढे ध्येय हवे ध्येयच नाही असे व्हायला नको... म्हणून शृंगेरीला जाण्याचे ध्येय ठेवा.
● आता संथा घेऊन झाली. वर्ग संपला तर गीता म्हणण्याचे सोडून देऊ नका. 

● सरांना आनंद केव्हा होतो????

आपण १८ अध्याय पाठ करतो तेव्हा त्यांना खूप आनंद होतो.
● लहरींचा नक्की फायदा होतो.
● आपण शांत होतो
( गीता जर आचरणात आणता आली तर अतिशय छान.!!!
अहंकार,बळ, काम, क्रोध लोभ... सगळे दूर करता आले पाहिजे...
● आपण प्रथम बघून म्हणतो, सर शिकवतात त्या प्रमाणे म्हणतो, हळूहळू पाठ करतो किंवा होते, म नुस्तीच मनातल्या मनात म्हणतो, आणि... म आपोआपच गीतेचे शब्द बाहेर येतात.
तर असे आणि याहून सुंदर मनोगत, मार्गदर्शन लाभले.
♤♤♤♤♤♤♤♤♤♤♤♤♤♤♤

यानंतर सर आणि आमचे मार्गदर्शक यांचा सत्कार केला... 


आणि वर्गातील सगळ्यांना 
गीता वर्ग शास्त्री हॉल २०१७ असे ज्या पेन वर लिहिले असे पेन सगळ्यांना दिले.
(गीता वर्गाची आठवण )
✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽
मागे आम्हा तिघींना बक्षीस मिळाले तर ते कौतुक भगिनी समाजाने आज केले
सरांच्या हस्ते आज भेट पाकीट दिले. 

तो फोटो....
आम्हा तिघीना बाहेर गीता पठण मध्ये बक्षीस मिळाले... त्याचे आज भगिनी समाजाने कौतुक केले... ते सरांच्या हस्ते कौतुक केले... त्यावेळी मी म्हटले... सर,
मला जे बक्षीस मिळाले...
ते तुमच्या मुळे मिळाले.
अठरावा अध्याय डिसेंबर मध्ये स्पर्धा होणार तर तुम्ही तो आधीच संथा दिल्यामुळे पुरेसा वेळ मिळाला म्हणून तो पाठ करू शकले.....
आणि सर्वांसमोर मी प्रथमच माईक समोर उभे राहून म्हटले.

आज सरांबरोबर फोटो काढला.

सौ जोशी, सर... श्री. श्रीकृष्ण जोशी सर आणि मी.!

तसंच आम्हाला सुरुवातीला सरांनी संथा दिल्यानंतर मार्गदर्शन करणाऱ्या ताई

सौ पूजा जोशी ताई आणि मी...
असे फोटो काढता आले.
सरांच्या हस्ते बक्षीस घेताना मी.!
केलेले कौतुक.! भेट पाकीट आणि पेन.!




गेल्या वर्षी 


११ फेब्रुवारी २०१६

गणेश जन्म

आणि गुरुवार

यादिवशी गीता वर्ग सुरु झाला  भेट ओळख.. आणि माहिती असे स्वरूप होते

आणि प्रत्यक्ष वर्ग १६|२|२०१६ यादिवशी वर्ग सुरु झाला....

गीता चांगली, सुयोग्य पद्धतीने म्हणायची,
 पाठ करायची अशी खुप दिवस मनात इच्छा होती... ती पूर्ण झाली..

चांगली इच्छा नेहमी पूर्ण होते .!

 याला मी देवाचे थोरामोठ्यांचे आशीर्वाद मानते.

○○○○○○○○○○○○○○

Wednesday, 24 May 2017

लयलूट...



उन्हाळा.... 

वैशाख वणवा.!

दिवस मोठा मोठा होत जातो आणि रात्री लहान होत जाते.

सूर्यदेव जणू कोपतात असेच वाटते, धरणी माता... बिच्चारी होते.

लोकांचे सुद्धा... किती उन्हाळा? 
गरम होतंय, काय हा उकाडा???
असे बोलणे ऐकू येते.

पण निसर्ग... 

अगदी सगळ्याची लयलूट करत असतो....

 पण या उन्हाच्या तलखीने तिकडे लक्ष असते का आपले???

फळा फुलांची लयलूट...

फळाच्या राजाचे आगमन.!

आंबा.!!! किती प्रकारचे आंबे येतात...

कितीतरी प्रकार करता येतात आंब्याचे.

रोज रस खाणारे लोक... भाजी नसली तरी चालेल रस मात्र रोज हवा.!

मधुमेही तर... जास्त चालेन पण आंबा हवा.!
आणि इतर फळे तर वाह.!
(आणि हो हि सगळी मज्जा अनुभवता येते भर मुंबईत... 
आधुनिक कोकणात. सुंदर असा लाभलेला समुद्र किनारा)

नैसर्गिक रित्या पाणी मिळते फळातून.!
कलिंगड, खरबूज/ टरबूज, ताडगोळे,  


जांभूळ, करवंदे, जाम, लिची, चिंचा, बोरे, आवळे, फणस,.... नेहमी मिळणारे नारळ पाणी, 

सरबते- कोकम, आवळा, लिंबू, पन्हे, 

 

 

रसाचा राजा... उसाचा रस ताजा.!
ताक, लस्सी, 
फळांचे रस ..



~~~~~~~~~~~~

किती सुंदर वर्णन केले आहे कुणी या फळांचे..

 

 

~~~~~~~~~~~~~
ऋतूंप्रमाणे रोज नव्याने
हाक मारती आम्हा फळे,
आम्ही धावतो भलत्यापाठी
सात्विक खाणे का न कळे ?

टरबूज म्हणतो आलो मित्रा
घे माझा तू भरपूर स्वाद,
नकोच खाऊ काही बाही
नकोस भलता करूस नाद.

रोज शहाळे हाका मारी
अमृत त्याच्या पोटाशी,
गाढ तृप्तता मिळते त्याला
बघा लावूनी ओठाशी.

पपई म्हणे मी छान बहुगुणी
ठेव ध्यानी मी पाचक रे,
कशास खातो चूर्णे सोळा
खुशाल होऊन याचक रे.

छान रसरशीत लिंबू म्हणतो
माझा ताजेपणा पहा,
लिंबूपाणी पी खुशाल अन
उत्साहातच न्हात रहा.

संत्री आणि मोसंबीच्या
मोठ्ठीच जादू अंगात,
मैत्री त्यांची सदा रंगवी
जीवन विविध रंगात.

पेरू, द्राक्षे, फणस नि बोरे
खुशाल खावी कैरी रे,
नकोच काही भलते सलते
आरोग्याचे वैरी रे.

सफरचंद अन सीताफळाला
स्थानच देऊ या वरचे,
दोन काळजीवाहू आपले
मानु या त्यांना घरचे.

अननस, अंजीर, आवळा ही तर
अ दर्जाची छान फळे,
हातात घेता हात तयांचा
भयाण संकट दूर पळे.

केळी, कवठे, खजूर, खरबूज
जांभूळ सुद्धा खरे महान,
चिंचा करवंदेही खावी
होऊन जावे बरे लहान.





आंबा हा तर राजा मित्रा
दे त्यालाही टाळी रे,
छान मांडली समोर प्रभूने
फळांची नैसर्गिक ही थाळी रे.
~~~~~~~~~~~~
.

फुले तर.... 

 

मोगरा, सोनचाफा.. यांच्या वासाने तर उन्हाळा दूर पळतो...

 कुणी हौशीने लावलेल्या रोपाला आलेली फुले... याची काही मजाच वेगळी.






घरात स्वतः लावलेल्या झाडाला आलेली फुले वाऱ्याच्या झुळकीने येणारा सुगन्ध अनुभवतात.
नागचाफा/अर्थात कैलासपती/ वृक्ष फुले,

 देवचाफा, 

अशीच चाफ्यासारखी दिसणारी पांढरी शुभ्र फुले नुसती घोसानी असतात, लाल चाफा, कवठी चाफा... 



सदा सर्वकाळ फुलणारी सदाफुली, जास्वंदी,

तरी त्यातही लक्ष वेधून घेते ते रक्तवर्णी जास्वंद,

तशी केशरी, पिवळे, पांढरे, गुलाबी, गडद गुलाबी,( राणी रंग)

 

 

      लॅबर्नम... ची मस्त पिवळी फुले,  हि फुले जणू आपले स्वागत करत असतात रस्त्याच्या कडेने .! 

बोगनवेल तर नुसती बहरून आली आहे.! 

एखाद्या वृक्षावर चढलेली रंगीबेरंगी बोगनवेल बघताना तर भान हरपून जाते.

कुठे कुठे तर शंकासुर ची फुले केशरी पिवळी लक्ष वेधून घेतात.

 

 

 

झुंजूमुंजू वेळी चांदणी ची फुले... 
जणू तारकाच जमिनीवर आल्याचा आनंद देतात. 
यातसुद्धा डबल तगर, उठावदार दिसते.

गुलमोहोर... अहाहा...!!!

 

 

 

लाल भडक, आणि केशरी. सुंदर हे सुद्धा रस्त्याच्या कडेने उभे असतात.


 

 

उन्हाळी लिली... छान केशरी रंग आणि आकार पण इतका मस्त असतो.!

 

 

 

 

शोभेची फुले सुद्धा मस्त असतात.

(त्यांची नावे मात्र मला माहित नाहीत पण दिसतात सुंदर)
आता लवकरच पाऊस येणार असा सांगावा घेऊन येतो तो बहावा...

छान पिवळा/ सोनेरी घोसाघोसाचा बहावा.!

 

कोणी याचे किती समर्पक वर्णन केलंय....
मन बहावा बहावा...
      डोळे भरून पहावा...
जसे मायेचे तोरण...
    मिळे त्याखाली विसावा
..मन बहावा बहावा...
  डोळे भरून पहावा..

खाली उतरूनी येई...
   सूर्यकिरणांची हि माया
मन बहावा बहावा....

ग्रीष्म ऋतूचे फुलणे...
   लाल पिवळे ..तांबडे.
देई मनास ओलावा....
  हिरवे पान ते सोनुले...

मन बहावा बहावा....
○○○○○○○○○○○○○○○○○○○○○

हा बहावा big bazar जवळ बघायला मिळतो.

○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○

हे झाले काही फळे आणि फुले याबद्दल.!

झाडे तर सुंदर कोवळी पाने... 

हिरव्या रंगाच्या अनेक छटा पाहायला मिळतात.. 

 पिंपळाच्या पालवीकडे आणि 

एकंदरीतच झाडाकडे बघत राहावे असे रंग बघायला मिळतात....


हे झाले नैसर्गिक स्वागत.!
मोठीच मोठी उन्हाळी सुट्टी. कित्तीतरी गोष्टी करता येतात या सुट्टीत,
खास म्हणजे 
पाण्यात डुंबणे, ए.सी. मध्ये बसणे, नाटक सिनेमा पाहणे, ए सी गाडीने सहल.!

बर्फ गोळा, आईसक्रीम खाणे, मिल्कशेक, फालुदा.! कुल्फी.

वाह.! बहोत बढिया.!!!

आणि हो मुंबईत वीज जात नाही, पाण्याचा त्यामानाने दुष्काळ नसतो.

पण एक मात्र खरे कि अधूनमधून येणाऱ्या वाऱ्याच्या झुळकांचा आनंद घ्यायचा असेल तर.... 

पंखा, एसी बंद ठेवायला हवा.!

(म्हणजे खरे सुख कळेल)

□□□□□□□□□□□□□□□□□□

शृंगेरीला जाणाऱ्यांसाठी सराव वर्ग...

२२, २३, २४ मे २०१७ 


 २२ मे २०१७

गीता वर्ग 
सराव..
६ वाजता सुरुवात
प्रथम ओंकार
ध्यानाचे श्लोक म्हटले 
सर आणि मेघना ताई  परीक्षक... एका कागदावर जे चुकेल ते लिहिणार होते
म्हणजे चूका दुरुस्त करता येतील
~~~~~~~~~~~~
सुरुवात केल्यानंतर ज्यांना  खूण करणार त्यांनी म्हणायचे.

 मधले काही श्लोक गाळुन पुढील श्लोक म्हणायला सांगत होते.

★ संजय उवाच


चार श्लोक लक्षात ठेवायला हवं

पहिला अध्याय
२ श्लोक

दुसरा अध्याय १ श्लोक

आणि ११ वा अध्याय

एक श्लोक

ज्याची सुरुवात एवमुक्त्वा अशी आहे.

•••••••••••••••••••••••••
कुठलाही श्लोक म्हणायला सांगतील
तर शब्द सांगितलं तर तेथून सुरुवात करायची
नाहीतर क्रमाने म्हणायचे
 दोन अध्याय झाल्यानंतर
एकदम तिसरीतल्या मधलाच सांगितलं


 आज २३ मे


७|१

यातील ज्ञास्यासि

याच्या उच्चारकडे नीट लक्ष दिले पाहिजे
स हा अर्धा उच्चारला तर पुढे यसि असे उच्चारावे.

जे जोडाक्षर असेल तर ते घाईने म्हणू नये
तर ते सावकाश म्हणावे

६|३ 

आरु रुक्षोर् मुनेर् योगं (ङ)


   अनुस्वाराकडे नीट लक्ष    द्यावे. म्हणजे पुढील शब्द नीट येतो.

सहस्र.... हा शब्द नीट उच्चारावा.

यात स् + र आहे.

स्र



शत्रू यात त्र आहे.

त् + र = त्र

जर श्लोक मधेच म्हणायला सांगितला आणि

 त्याची सुरुवात कुणाच्या म्हणण्याने असेल तर... तशी करावी.

८|३ म्हणायला सांगितला तर 
        श्रीभगवानुवाच
अक्षरं (म् ) बह्म परमं (व् )
अशी सुरुवात करावी.

✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽

निबध्नती आणि अजून एक वेगळ्या पद्धतीने लिहितात त्यात ध अर्धा आहे त्याचा उच्चार तसाच करावा

९ | ११

निगृह्णाम्युत् सृजामि


यात ह अर्धा आणि ण पूर्ण आहे.


तसेच अजून काही शब्द
२ | २२

नवानी गृह्णाति 


प्रह्लाद


जाह्नवी


प्र यात प् अर्धा आहे.

छ्रुत्वा = छ् + र् + ु 


राष्ट्र यात र पूर्ण असतो.


विद्धि... द अर्धा ध पूर्ण


मद्भक्त... द अर्धा भ पूर्ण.


( मला असे वाटते... कि पूर्ण अक्षर अर्धे दिसते आणि अर्धे अक्षर पूर्ण दिसते )

ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽऽ ऽ ऽ ऽ ऽऽ

अवग्रह.... दीर्घ ... 

ओढावे.

ʕʔ ʕʔ ʕʔ ʕʔ ʕʔ ʕʔ ʕʔ

अध्याय समाप्ती कडे नीट लक्ष द्यावे.

जसे लिहिले आहे तसेच म्हणावे.

ʕʔ ʕʔ ʕʔ ʕʔ ʕʔ ʕʔ ʕʔ

*ष*चा उच्चार नीट करावा.
*ष्ट* हा उच्चार नीट करावा.
*ष्ठ* असा होण्याची शक्यता असते.

∞∞∞∞∞∞∞∞

जागर्ति... र् + ति


जाग्रति... ग् + र


असा उच्चार आहे.
दोन्ही शब्दाचे अर्थ एकच आहेत.
ॐ♤ॐ♤ॐ♤ॐ♤ॐ♤ॐ

*संधी सोडून वाचू नये.*

ॐ♤ॐ♤ॐ♤ॐ♤ॐ♤ॐ

 अध्याय पाठ केला किंवा 

न बघता म्हणता येत असला तरी पुस्तक बघूनच म्हणावे...

 सराव करताना... 

๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑

अनुस्वारा पुढील अक्षर , विसर्ग... श्लोकांच्या शेवटी येणारे अक्षर,
 ष,  ष्ट, ष्ठ, स्य, सहस्र, 
๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑

सञ्जय उवाच, 

अर्जुन उवाच,

श्रीभगवानुवाच...

यापुढील सुरुवात चुकणार नाही.

•••••••••••••••••••••••••
आकार, एकार, ओकार, औकार ईकार ऊकार 
यानंतर जोडाक्षर आले तर या कारांवर आघात देऊ नयेत.
~~~~~~~~~~~~

फक्त अकार, इकार, उकार

 यानंतर जोडाक्षर असेल तरच आघात येतो.

~~~~~~~~~~~~

ः विसर्गानंतर ने सुरु होणारा शब्द असेल तरच विसर्गाचा उच्चार स करावा.

सुखिनः (स् ) स्याम माधव
*******************

आकार नंतर विसर्ग असेल तर तो उच्चार ओढावा मग स चा उच्चार करावा.


राज्यं (म् ) भोगाः ऽ ऽ स् सुखानि च


------------------------------
२४ मे २०१७

 ☬ ☬ ☬ ☬ ☬ ☬ ☬ ☬ ☬


अनुस्वार... एकतर *म* करावा किंवा

 योग्य, जो शिकवला आहे तो करावा. 

चुकीचा करू नये.


::::::::::::::::::::::::::::::::::::

अठरावा अध्याय... सगळ्यात मोठा आणि शेवटचा अध्याय...

म थोडा कंटाळत, किंवा चला झाली गीता पाठ अस म्हणत केला जाण्याची शक्यता असते

तर हा अध्याय.... नीट पाठ केला पाहिजे द्विधा होण्याची शक्यता आहे.


तर नीट पाठ करावा



☬☬☬☬☬☬☬☬☬

अध्याय १३ थोडा कठीण आहे....

चांगला करावा

सराव करताना एकेकट्याला म्हणायला सांगितले.


✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧

Tuesday, 16 May 2017

विश्वरूपदर्शन .!!!

अध्याय ११ वा

विश्वरूपदर्शन .!!!

२५ | १ | २०१७

या दिवशी ११ व्या अध्यायाची संथा द्यायला सुरुवात झाली.
सर म्हणाले हा अध्याय कठीण आहे. मला संथा देताना असे वाटते कि काही चूक तर होणार नाही ना???

या अध्यायातील १५ ते ५० हे श्लोक त्रिष्टुप छंदात आहेत ,

 तर आपण या वर्गात स्पर्धा ठेवू... 
तुमच्या वेळेनुसार, तुम्ही सांगाल तेव्हा तुम्ही म्हणा.!

आपल्या गुरूंची इच्छा पूर्ण करावी असे मला वाटले म मी हे श्लोक पाठ करायचे ठरवले.

आणि रोज म्हणून म्हणून आणि एक श्लोक पाठ करू असे ठरवून पाठ करू लागले.
आता संथा देण्याचे तीनच दिवस राहिले आणि आम्ही म्हणणाऱ्या तिघी.
काल १५ मे... एका विद्यार्थिनीने छान श्लोक म्हटले.

आज १६ मे २०१७ 

आज गीता वर्गात ११ वा अध्याय विश्वरूप दर्शन ...
यातील १५ ते ५० श्लोक मी म्हटले. 

मला खूप आनंद झाला म्हणताना.

गुरूंची इच्छा पूर्ण करत असल्याचा आनंद होता हा.


 सरांना खूप आवडले

तसे त्यांनी बोलून दाखवले.

 तुमचे विसर्ग चांगले आहेत असे सर म्हणाले 

विसर्ग खणखणीत आला पाहिजे असे सर नेहमी म्हणतात.

मला खूप समाधान वाटले.
म वर्गातील सगळ्यांनी छान झाल्याचे सांगितले.
ज्या काही चुका झाल्या त्या सरांनी छान समजावले.
खरतर मी १५ ते ५० श्लोक पाठ करणार होते पण....
त्या friend ने म्हटले कि आपण पूर्णच अध्याय पाठ करू.! त्यामुळे माझा हा अध्याय पूर्ण पाठ झाला.
काही महिन्यापूर्वी ...
वर्गात एक गीता प्रेमी आले होते त्यांनी ह्या अध्याबद्दल खूप प्रेम आवड आहे हे सांगितले होते. आणि त्याची cd भेट दिली होती
(पण cd मला मिळाली नाही, नेमकी मी त्यावेळी गेले नव्हते)
असो... आज मला खूप छान वाटत आहे.
 हा अध्याय पाठ करताना *ह्यांची* खूप मदत झाली. पाठांतर रोज न कंटाळता घेत होते.
अर्थ लक्षात घेऊन जर म्हटले तर छान लक्षात राहील असे वाटते.

आता उद्याच १७ वा अध्याय संथा देऊन होईल.. आणि गीता संथा वर्ग संपेल.
आठरावा अध्याय अगोदरच संथा देऊन झाला आहे. 
पण अजून वर्ग होईल ३ दिवस.! 
आणि
 चौथ्या दिवशी सांगता समारंभ

२५ मे २०१७..... गुरुवार


❁ ❁❁ ❁❁ ❁❁❁ ❁❁ ❁❁ ❁❁ ❁❁ ❁