कालच झोपताना ठरवले,
सकाळी लवकर उठून लवकर फिरून येऊ.!
सकाळी लवकर जाग आली,
मस्त तयार होऊन बाहेर पडलो,
सुखद थंड वारे वाहत होते,
रात्री कधीतरी हलका पाऊस पडून गेलाय!
त्यामुळे रस्ते ओलसर, त्यामुळे सुंदर
काळेभोर दिसत आहेत.
वाहनांची वर्दळ अगदी तुरळक!
तसं वॉक साठी येणारे पण
कमी.
आता हळूहळू उजाडेल ... त्याचवेळी रस्त्यावरचे दिवे बंद झाले.....
अशावेळी दिसणाऱ्या आकाशाचा छान निळसर रंग, आणि त्याचे प्रतिबिंब पाण्यात..
मन मोहवीत होता,
पण काही क्षणच!
आणि त्यानंतर आकाश उगवतीचे दिसू लागले.
पावसाळी ढग, जोराचा वारा, इतका कि कावळ्यांना उडताना त्रास होतोय अस वाटलं.
माडाच्या झावळ्या वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने... जात होत्या.
आम्ही बसलो
होतो तर आम्हाला वारा ढकलतो आहे असं वाटत होते...
( वारा आला तर उडून जाशील हे काय ते जाणवले)
आणि तो पावसाला दुसरीकडे नेत आहे हे पण दिसत होते.
अशा पावसाळी ढगाळ वातावरणात सूर्यदर्शन होणार नव्हतेच,
अशा पावसाळी ढगाळ वातावरणात सूर्यदर्शन होणार नव्हतेच,
एकतर खूप लवकर गेलो होतो,
आज सूर्योदय ६.०८
आज सूर्योदय ६.०८
๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑๑
गीता अध्याय दुसरा...सुरु आहे,
तर आज बाहेर पडताना एक श्लोक वाचून बाहेर
पडले,
म तो श्लोक म्हणत म्हणत मार्ग चालत होते, तर तो पाठ झाला
त्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत कि,
त्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत कि,
सुख अथवा दुःख, लाभ अथवा हानी, जय अथवा पराजय
याचा विचार न करता
तू युद्धासाठी म्हणून युद्ध
कर.
असे केल्याने तुला पाप लागणार नाही.
No comments:
Post a Comment